वर्धा
दि.19- बदलत्या वातावरणामुळे ग्रामीण क्षेत्रात अनेक आजार लोकांमध्ये आढळून येत
असतात गाव निरोगी रहावे यासाठी प्रत्येक गावामध्ये स्वच्छता पाळणे गरजेचे असून
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यापुढे सर्व सुविधेने सुसज्ज करण्याचा
प्रयत्न राहणार आहे.वैद्यकीय अधिका-यांचे रिक्त पदे तसेच आरोग्य संस्थेचे इतर
पदे भरण्यावर भर राहणार असून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा
प्रयत्न असेल अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांनी दिली.
समुद्रपूर
तालुक्यातील मांडगाव या गावामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 3 कोटी 71
लक्ष रुपये खर्च करुण बांधण्यात येणा-या
नविन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते
बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, जि.प. शिक्षण व आरोग्य
सभापती प्रा. उषाकिरण थुटे,पंचायत समिती समुद्रपूरच्या सभापती नंदाताई
साबळे,उपसभापती संध्याताई डांगरी, वर्धा पंचायत समितीचे उपसभापती संदेश किटे,
सरपंच अर्चनाताई घुसे जि.प.सदस्य संगिताताई उईके, आदि मान्यवर मंचावर उपस्थित
होते.
बदलत्या काळानुसार ग्रामीण क्षेत्रात
कार्यरत आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याचा प्रयत्न असलयाचे सांगून जि.प.अध्यक्ष
ढगे म्हणाले की येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिर्ण अवस्थेत असल्यामुळे
नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केला. या
इमारतीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. येत्या 9 महिन्याच्या
आत या इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. असा विश्वास व्यक्त करुण ढगे म्हणाले
की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून यावर्षी 71 लक्ष रुपये उपलब्ध करुण देण्यात
आले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये येणा-या आर्थीक वर्षात उपलब्ध होतील जिल्ह्यातील
ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून गरोदर
महिलांनी त्यांचे बाळंतपण प्राथमीक आरोग्य केंद्र किंवा शासकीय संस्थेत करावे
असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना सभापती थुटे म्हणाल्या
की, जनतेच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून आरोग्य विभागाने वेळीच उपचार करणे गरजेचे
आहे.सुदृढ गाव,सुदृढ जिल्हा व सुदृढ महाराष्ट्र असला पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून
दाखविली.
यावेळी
बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चन्ने म्हणाले की जिल्ह्यातून
कुपोषण आजार हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून नागरिकांनीसुध्दा या
कार्यात सहकार्य करावे. शून्य ते सहावर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात यावे. बाळ
पोटात असल्यास मातेने योग्य प्रमाणात व सुतुलीत आहार घ्यावा आपले बाळ कुपोषित
होणार नाही याची दक्षता संबंधित कुटूंबांनी घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य
कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्हा आघाडीवर असून अनेक कार्यक्रमामध्ये
आतापर्यंतच्या सर्वेक्षणात अव्वल आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वैद्यकीय
अधिका-यांचे रिक्तपदे भरण्याची कार्यवाही सुरु असून गुनात्मक व दर्जेदार आरोग्य
सेवा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करतांना डॉ. दिलीप माने म्हणाले
की, आरोग्य विभागाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यात 5 नवीन
प्राथमिक आरोग्य केंद्र व 7 उपकेंद्र मंजुर झालेले आहे.वर्धा जिल्ह्याने
नेत्रदिपक प्रगती साधली असून महाराष्ट्रात वर्धा जिल्हा शासनाच्या
कार्यक्रमामध्ये आघाडीवर असून ही गुणाक्रमे ठरलेली आघाडी सतत कायम राहील यासाठी
आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरु आहे. पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन समितीच्या
अनुदानातून ई.सी.जी. यंत्र घेण्यात येणार असून ग्रामीण भागातील ह्रृदय रुग्णांनाया
यंत्राचा मोठा दिलासा मिळू शकेल असेही ते
म्हणाले.
यावेळी डॉ.पोहाने यांनी सुध्दा आपले विचार
व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन विजय कुंभलकर व आभार डॉ. शंभरकर यांनी
मानले.यावेळी समुद्रपूर पंचायत समितीचे संवर्ग प्रकल्प अधिकारी एन.के.भांडारकर
यांचेसह पं.स.व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सदस्य,अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या
प्रमाणावर उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment