* पायलट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड
* वैयक्तिक लाभांच्या योजनांची सबसीडी थेट बँकेत जमा
* आधार कार्डासोबत बँकेचे
खाते जोडणार
* केरोसीन वरील अनुदान
महिलांच्या खात्यात जमा करणार
वर्धा, दिनांक 25 – रासायनीक
खतांच्या अनुदानासह केरोसीन संजय गांधी
निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय
वृध्दपकाळ योजनेसह महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना व ई-स्कॉलरशीप योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करण्यासाठी वर्धा जिल्ह्याची प्रायोगीक तत्वावर निवड झाली आहे.
शेतक-यांसह इतर योजनांच्या लाभार्थ्यांना डिसेंबर पासून त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट निधी
जमा होत असल्यामुळे आधारकार्डासह
राष्ट्रीयकृत बँकेत तात्काळ खाते उघडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
जयश्री भोज यांनी केले आहे.
रासायनीक खतांचे अनुदान
शेतक-यांच्या खात्यांवर थेट जमा होणार
आहे यासाठी वर्धा जिल्ह्याची देशात
पायलट प्रकल्पां अंतर्गत निवड झाली आहे. तसेच केरोसीन, स्वयंपाकाचा गॅस, संजय
गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्टीय वृध्दपकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, विधवा
योजनेच्या लाभार्थ्यांने आधारकार्ड तसेच राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून
त्यांची माहिती तात्काळ संबंधीत तहसिल कार्यालयाकडे देण्याचे आवाहनही यावेळी
जिल्हाधिका-याने केले.
आधारकार्ड नोंदणीमध्ये राज्यात
वर्धा जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले असून, 12 लक्ष 99 हजार 592 लोकसंख्येपैकी
10 लक्ष 54 हजार 743 लोकांची आधारची नोंदणी झाली आहे. आधारकार्ड नोंदणीसाठी
संबंधीत तहसिल कार्यालयामध्ये विशेष कक्ष
सुरु करण्यात आला असून, ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही. अशा सर्व नागरिकांनी
आधारची नोंदणी करावी. असे आवाहनही श्रीमती
जयश्री भोज यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व राष्टीयकृत बँकांना विविध योजनांच्या
लाभार्थ्यांचे तसेच सर्व कुटूंबांचे बँक खाते उघडण्यासाठी आवाहन करण्यात आले असून, त्यांचा विविध बँकाचा चांगले सहकार्य मिळत असल्याचेही सांगतांना जिल्हाधिकारी जयश्री भोज म्हणाल्या की प्रत्येक
गावात बँकेचे खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष व्यवस्था करावी व डिसेंबर पूर्वी सर्वांचे
बँकेत खाते उघडावे यासाठी
सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केरोसीन वरील सबसीडी
थेट महिलांच्या खात्यात जमा होत
असल्यामुळे महिलांनीही बँकेत खाते उघडावे यासाठी अंगणवाडी सेवीका तसेच आशा सेवीकेंची मदत घेण्यात येत आहे. प्रत्येक महिलेचे बँकेत
खाते उघडण्यासाठी त्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येत असल्याचेही यावेळी
जिल्हाधिका-याने सांगितले.
विविध योजनांचा लाभ डिसेंबर
पासून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात
जमा होत असल्यामुळे गावातील प्रत्येकाचे खाते उघडण्यासोबत आधारकार्ड काढण्यासाठी दिनांक 30 व 31 ऑक्टोंबर व 1 नोव्हेंबर या तीन
दिवशी प्रत्येक गावात विशेष शिबीर
आयोजीत करण्यात येणार असून, ग्राम पंचायत कार्यालयामध्ये बँक खाते क्रमांक व आधारकार्डाचा क्रमांक योजनांच्या लाभासाठी उपलब्ध करुन द्यावा. अशी माहिती त्यांनी
यावेळी दिली.
रासायनीक खतांचे अनुदान
शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यासाठी
देशात वर्धा जिल्ह्याची निवड झाली असून, ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. प्रथम जिल्ह्यातील
सर्व ठोक व किरकोळ विक्रेत्यांचे
वेबसाईडवर नोंदणी करण्यात येणार असून, 81 ठोक व 596 किरकोळ
खत विक्रेत्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सर्व विक्रेत्यांना आयडी, पासवर्ड व पिन क्रमांक देऊन त्या आधारे
खताचा पुरवठा करण्यात येईल.
तीस-या टप्प्यात किरकोळ विक्रेत्यांनी शेतक-यांना खत विक्री
केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये खताचे अनुदान
थेट जमा करण्यात येणार आहे. खताच्या
विक्रीनंतर ऑनलाईन शेतक-यांना विक्री केलेल्या खताची नोंद घेऊन लगेचच
अनुदान त्यांचे खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचे प्रत्यक्ष अंमलबजावनीचे काम नागार्जून व आरसीएफ या कंपन्यांना देण्यात
आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधारकार्डची नोंदणी करावी व आपला नोंदणी
क्रमांक प्रशासनाकडे राष्ट्रीयकृत
बँकेतील खाते क्रमांकासह उपलब्ध करुन
द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी
जयश्री भोज यांनी केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील
गाडे, रोजगार हमी योजना विभागाचे
उपजिल्हाधिकारी जगदीश संगीतराव
उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment