वर्धा,दि.8-जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा या कार्यालयामार्फत शाश्वत विकासासाठी कृषि पणन व्यवस्थेत शासकीय व खाजगी भागीदारी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल गणराज येथे नुकतीच (दि.24-11) रोजी आयोजित करण्यात आली होती.
कृषि समृध्दी या कार्यक्रमाचा खाजगी उद्योजकांना परिचय करुन देणे, शासन विभाग व खाजगी उद्येाजक यांना एकत्रित आणुन शेतक-यांसाठी शाश्वत समतोल, शोषनरहित बाजारपेठेची मुख्य साखळीची निर्मिती करणे हे या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यशाळेत वर्धा जिल्ह्यातील कृषि प्रक्रिया आणि विपणन करणारे प्रमुख उद्येाजक उपस्थित होते. त्यात सगुणा पोल्ट्री फॉर्म प्रा.लि.मावने इंडस्ट्रीज,अंकूर सीड्स, डि.जी.ऑर्चीड, आय.टी.सी.कंपनी, संस्कार अॅग्रो इंडस्ट्रीज धैर्यशील बाघ जिनिंग आणि प्रेसिंग इ. उपस्थित होते. सोबतच शासकिय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा संजय भागवत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ब-हाटे होते. कृषि समृध्दी कार्यक्रमाचे अतिरिक्त कार्यक्रम संचालक अमितकुमार नाफडे यांची उपस्थिती होती.कार्यशाळेची सुरुवात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद संकपाळ यांनी कृषि समृध्दी या कार्यक्रमाची माहिती देऊन केली.
अतिरिक्त कार्यक्रम संचालकांनी या कार्यक्रमातुन अपेक्षित खाजगी व शासकीय भागीदारीवर प्रकाश टाकला. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतक-यांच्या नफ्यात वाढ होण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक आणि शासन यांची भागीदारी कशी महत्वाची आहे हे पटवून दिले
कृषि व्यवसाय तज्ञ आनंद महाकाळकर यांनी उपस्थित उद्योजकांना मुक्त चर्चेसाठी पाचारण केले. उद्योजकांनी आपआपल्या उद्योगाबद्दल आणि भागिदारी या विषयांवर मते मांडली. उपस्थित शासकिय अधिकारी यांनी शासकिय योजना आणि भागीदारीची गरज याबद्दल चर्चा केली.
No comments:
Post a Comment