Friday 9 December 2011

अन्‍न सुरक्षा मानदे कायद्या अंतर्गत परवाना बंधनकारक


  
वर्धा,दि.9-जिल्‍ह्यातील सर्व अन्न पदार्थ उत्‍पादक, विक्रेते, वितकरक, हॉटेल, रेस्‍टारंट, पानपट्टी धारक, धाबेवाले, कॅटरर, फिरते विक्रेते, दुध विक्रेते, वेवीफुड व फुड सप्‍लीमेंट विक्रेते, मांस व मांस पदार्थ विक्रेते, अस्‍थायी स्‍टॉलधारक, फळ व भाजीपाला विक्रेते, घरगुती खानावळ व उब्‍बेवाले तसेच इतर अन्‍न व्‍यवसाय चालक यांना अन्‍न  सुरक्षा मानद कायद्यान्‍वये परवाने बंधनकारक आहे.
दि. 5 ऑगस्‍ट 2011 पासून संपूर्ण महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये अन्‍न सुरक्षा व मानद कायदा 2006 लागू करण्‍यात आलेला आहे व त्‍याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. यापुर्वीचा अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा कायदा नविन कायद्यात विलीन करण्‍यात आलेला आहे. अन्‍न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत कलम 31 व (2) नुसार सर्व अन्‍न  व्‍यवसाय चालक यांनी परवाना घेणे अथवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. विना परवाना अथवा विना नोंदणी व्‍यवसाय करणे कलम 63 नुसार कायद्याने गुन्‍हा  आहे व त्‍यांच्‍या विरुध्‍द न्‍यायालयीन कार्यवाही होऊ शकते.
     अन्‍न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार ज्‍या अन्‍न व्‍यवसाय चालकाची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा कमी आहे त्‍यांनी फार्म अ व नोंदणी शुल्‍क कार्यालयात भरुन नोंदणी करुन घ्‍यावी तसेच ज्‍या  अन्‍न व्‍यवसाय चालकाची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जास्‍त आहे त्‍यांनी फार्म ब आवश्‍यक ते कागदपत्रे व योग्‍य ते परवाना शुल्‍क कार्यालयात भरुन परवाना मिळण्‍यासाठी अर्ज करावा. ज्‍या  अन्‍न व्‍यवसाय चालकानी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल व त्‍याची मुदत    दि.31 डिसेंबर 2011 पर्यंत असेल अशा अन्‍न व्‍यावसायीकांनी नुतनीकरणासाठी दि. 31 डिसेंबर 2011 पुर्वी आपल्‍या परवान्‍याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. जर अन्‍न व्‍यावसायीकांनी त्‍यांच्‍या परवान्‍याचे नुतनीकरण दि. 31 डिसेंबर 2011 पर्यंत न केल्‍यास त्‍यांच्‍या  विरुध्‍द विना परवाना व्‍यवसाय गृहीत धरुन कार्यवाही होऊ शकते.
     ज्‍या अन्‍न व्‍यावसायीकांनी अन्‍न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत परवाना घेतला असेल व त्‍याची मुदत दि. 31 डिसेंबर 2011 नंतर असेल अशा व्‍यावसायीकांनी दि. 4 आगस्‍ट 2012 पूर्वी कार्यालयात रितसर अर्ज करुन नवीन कायद्यानुसार परवान्‍याचे परिवर्तन परवाना अथवा नोंदणी मध्‍ये करुन घेणे बंधनकारक आहे. त्‍याकरीता कोणतेही अतीरिक्‍त परवाना किंवा नोंदणी शुल्‍क आकारले जाणार नाही. जर अन्‍न व्‍यवसाय चालक यांनी दि. 4 आगस्‍ट 2012 पूर्वी अन्‍न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत आपल्‍या जून्‍या परवान्‍याचे परिवर्तन करुन घेतले नाही तर त्‍यांचा व्‍यवसाय विना परवाना गृहीत धरुन त्‍यांचेविरुध्‍द कायदेशिर कार्यवाही करण्‍यात येईल. तरी सर्व अन्‍न व्‍यवसायीकांनी सहायक आयुक्‍त यांचे कार्यालय, अन्‍न व औषध प्रशासन म.रा.सुदामपुरी, आरती चौक वर्धा येथे नुतनीकरणाकरीता अर्ज करावा अथवा प्रशासनातर्फे आयेाजित करण्‍यता येत असलेल्‍या विविध तालुकयातील शिबिरामध्‍ये रितसर अर्ज करावा. अन्‍न व्‍यवसाय चालक यांना परवाना अथवा नोंदणी करण्‍यास कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्‍यास कार्यालयाशी संपर्क साधावा.असे अन्‍न व औषध प्रशासन,वर्धा कळवितात.     

1 comment: