महाराष्ट्र
वार्षिकी व महामानव पुस्तक विक्रीस उपलब्ध
Ø माहिती व जनसंपर्क
महासंचालनयाव्दारे प्रकाशित
Ø सर्व बुक स्टॉल व
जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध
वर्धा , दि 13(जिमाका)माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाव्दारे महाराष्ट्र वार्षिकी 2017 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे महामानव हे पुस्तक प्रकाशित
करण्यात आले आहे. सदर दोन्ही पुस्तके
जिल्हयातील सर्व बुक स्टॉल, स्पर्धा परिक्षा केंद्र व जिल्हा माहिती
कार्यालय येथे विक्रीस उपलब्ध आहे. वाचक व स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या
विद्यार्थ्यांसाठी पुस्तकात अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. वाचक विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करावयाचे असल्यास जिल्हा
माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे
यांनी केले आहे.
महाराष्ट्र वार्षिकी 2017 या पुस्तकात महाराष्ट्राची
अधिकृत, वस्तुनिष्ठ माहिती, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची
परंपरा, महाराष्ट्रातील जिल्हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्य शासनाने
घेतलेले महत्वाचे निर्णय, योजना, घडामोडी
तसेच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,
पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे
मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, संसद सदस्य आदींची माहितीचा समाविष्ट
आहे.
महामानव पुस्तकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विविधांगी पैलूवर आधारित अभ्यासपूर्ण लेख, राज्यातील मान्यवर लेखक, संशोधक,
प्राध्यापक, संपादक, लेखक यांनी लिहिले आहे. यातून बाबासाहेबांच्या चतुरस्त्र
प्रतिमेची नेमकी व प्रभावीरित्या ओळख होते. हे पुस्तक अभ्यासक, संशोधक आणि
सामानय वाचक या सर्वासाठी अतिशयक उपयुक्त अशी आहे. बाबासाहेबाचे श्रेष्टत्व आणि
त्यांचे चौफेर व्यक्तीमत्व जाणून घेण्यासाठी सदर पुस्तक सहाय्यभूत
ठरेल.
0000
.प्र.प.538
दि.13 सप्टेंबर 2017 18 गावांचा होणार डिजीटल विकास
Ø ग्राम सामाजिक
परिवर्तन अभियानांतर्गत इंटरनेट जोडणी
वर्धा , दि 13(जिमाका) शासन आणि खाजगी
कंपन्यांच्या मदतीने राज्यातील ग्रामीण भागात भागात परिवर्तन घडवून आणण्यासाठी
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या
टप्यात राज्यातील 350 गावांपैकी वर्धा जिल्हयातील 18 गावांचा समावेश आहे. या
अठराही गावामध्ये या अभियानाच्या माध्यमातून इंटरनेट जोडणी देऊन गावे डिजिटल
करण्यात येणार आहे.
दर्जेदार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कृषि उत्पादनात वाढ
करणे, गावात इंटरनेट जोडणी, गावातील सर्वासाठी पक्की घरे , पर्यावरणाचे संरक्षण व
संवर्धन, गावातील तरुणांना कौशल्यपूर्ण् बनवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन
देणे, या लक्षांकावर काम करण्यात येत आहे. यासाठी जिल्हयातील 18 गावांमध्ये
मुख्यमंत्री ग्रामविकास सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्राम
सहका-यांच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने माहिती गोळा करुन ग्रामसभा,
ग्रामपंचायत आणि गावक-यांच्या सहकार्यांने गाव विकास आराखडा तयार करण्यात आला
आहे.
देवळी तालुक्यातील 12 गावे आणि आर्वी तालुक्यातील 6
गावांचा या अभियानात समावेश असून या गावांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने
रिलायन्स जिओ कंपनी मार्फत इंटरनेट जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे गावातील
ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र डिजिटल होणार आहे.
तसेच आरोग्य सेवा, कृषि विषयक माहिती,
कृषि मालाचे बाजारभाव, शासनाच्या विविध योजनांची माहिती गावक-यांना गावातच उपलब्ध
होऊन विकासाच्या प्रक्रीयेत थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामप्रर्वतकांडून तयार करण्यात आलेल्या
ग्रामविकास आराखडयास व गावाच्या विकासासाठी गावक-यांनी सहकार्य करुन ग्राम
प्रर्वतकांना मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment