प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी व्हावे
-
जिल्हाधिकारी शैलेश
नवाल
वर्धा,
दि.21- रब्बी हंगाम 2016-17 मध्ये
प्रधानमंत्री पिक विमा योजना वर्धा जिल्ह्यात
राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी
सहभागी होण्याची अतिंम मुदत 31 डिसेंबर 2016 आहे. कर्जदार शेतक-यासाठी पिक
विमा योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार
शेतक-यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतक-यांचा विमा बँकेमार्फत भरला जाईल तर बिगर
कर्जदार शेतक-यांनी अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरुन या योजनेत
सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
योजनेत समाविष्ट पिके आणि विमा
संरक्षित रक्कम या प्रमाणे आहे. गहू (बा)
विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रु 33
हजार रुपये आणि शेतक-यांना भरावयाचा विमा हप्ता 495 रुपये. गहू (जि) विमासंरक्षित रक्कम प्रती हेक्टर रु.
30 हजार रुपये असून शेतक-याने
भरावयाचा विमा हप्ता 450 रुपये
आहे. हरभरा पिकासाठी 24 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतक-याने भरावयाचा विमा हप्ता 360 रुपये आहे.तसेच सुर्यफुलासाठी विमा
संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 22 हजार रुपये आणि शेतक-याने भरावयाचा विमा हप्ता 330 रुपये तर उन्हाळी भुईमुग विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर
36 हजार रुपये शेतक-याने भरावयाचा
विमा हप्ता 540 रुपये आहे. रब्बी कांदा
पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर
60 हजार रुपये शेतक-याने भरावयाचा विमा हप्ता 3 हजार रुपये आहे. 31 डिसेंबर पूर्वी जास्तीत
जास्त शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment