निम्न
वर्धा प्रकल्पांतर्गत जमिनीची
पुलगाव
येथे खरेदी-विक्रीची सुविधा
वर्धा,दि.5-
निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत येणा-या सर्व जमिनीची खरेदी-विक्री संदर्भात निम्न
वर्धा प्रकल्पाचे उर्वरित भूसंपादन वाटाघाटी पद्धतीने, सरळ खरेदी पद्धतीने संबंधीत
दस्तांची नोंदणीची पुलगाव येथे निबंधक (श्रेणी-1) या कार्यालयात करण्यात येणार
आहे.
निम्न
वर्धा प्रकल्पाचे भूसंपादना संदर्भातील दस्त नोंदणीची कामे बुधवार दिनांक 6
जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 व
दुस-या सत्रात रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण दिवस करण्यात येणार असल्याची माहिती
सह जिल्हा निबंधक अनुप सांगोडे यांनी दिली.
देवळी येथील आठवडयातून मंगळवार,
गुरुवार व तिसरा शनिवारी कार्यालयाची वेळ तात्पुरती उक्त भूसंपादनाची कामे संपेपर्यंत
दुस-या सत्रात म्हणजे दुपारी 2.00 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहणार आहे. मंगळवार,
गुरुवार व तिसरा शनिवार या दिवशी पुलगाव येथे दुय्यम निबंधक श्रेणी-1, पुलगाव
कार्यालयात पहिले सत्रात म्हणजे सकाळी 7.00 ते दुपारी 2 पर्यंत कामकाज सुरु ठेवण्यात
येत आहे. उपरोक्तप्रमाणे भूसंपासदाना संबंधात नोंदणीची कामे पूर्ण होताच देवळी
येथील भेट कार्यालय, पूर्ववत सुरु राहील, असे सह जिल्हा निबंध अनुप सांगोडे यांनी कळविले
आहे.
00000
प्र.प.क्र. 11 दिनांक – 5 जानेवारी 2016
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त
जनजागृती कार्यक्रम
वर्धा, दि.5- मतदारांना, नवीन मतदारांना लोकशाही
प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाबद्दल जबाबदारीची जाणीव करुन देण्याच्या
उद्देशाने जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्यावतीने 25
जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने प्रत्येक मतदार केंद्राच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
साजरा केला जाणार आहे.
सदर कार्यक्रम मध्यवर्ती मतदान केंद्राच्या
ठिकाणी किंवा परिसरातील शाळा, महाविद्यालय, समाज मंदिर सार्वजनिक सभागृह आदी
ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. नव्याने
नोंदणी केलेल्या मतदारांना निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित केले जाणार आहे. या
कार्यक्रमात सर्व उपस्थित नवीन मतदारांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे. नवीन
मतदारांना यांचे कार्यक्रमात छायाचित्रे मतदार ओळखपत्र व बिल्ले वाटप केले जाणार
आहे. मतदार नावनोंदणी व मतदान या विषयी उपस्थित मान्यवराद्वारे
मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदारांना मतदार यादीचे भाग या ठिकाणी दाखविले जातील. जनजागृतीसाठी
महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी, स्वयंसेवी संस्थाच्यावतीने
प्रभातफेरी, दौड, सायकल रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन आठवडाभर केले जाणार आहे.
पथनाट्य, लोकनृत्य इत्यादी कार्यक्रमाद्वारे मोहीम प्रशासनामार्फेत राबविण्यात
येणार आहे.
स्वातंत्र्यानंतर पाचव्यांदा प्रत्येक
मतदान केंद्रांवर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन मतदारांना व नवीन मतदारांना
लोकशाही प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाबद्दल, जबाबदारीची जाणीव करुण देण्याचा
हा प्रयत्न राहणार आहे, असे निवडणूक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
0000
प्र.प.क्र. 12 दिनांक – 5 जानेवारी 2016
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर दलित मित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा
-
बाबासाहेब देशमुख
वर्धा,दि.5
- दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देण्यात
येणार आहे. या पुरस्कासाठीप्रस्ताव दिनांक 25 जानेवारीपर्यंत सादर करावेत,असे
आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले
आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती,
विमुक्त जाती भटक्या जमाती, शारीरिकदृष्ट्या
मनोदुर्बल, अपंग, कृष्ठरोगी आदींच्या कल्याणासाठी कार्य करणा-या व्यक्ती
व सामाजिक शिक्षण, आरोग्य, शेती, वने, पर्यावरण
सहकार, उद्योग, संस्कृती, साहित्य, अंधश्रद्धा निर्मुलन आदी श्रेत्रात कार्य
करणा-या सामाजिक संस्थांना यांना प्रत्येकवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित
मित्र पुरस्कार देण्यात येतो. व्यक्तीसाठी 15 हजार रुपये व सन्मानपत्र आणि
संस्थेकरीता 25 हजार रूपये रोख व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या
सन 2015-16 पुरस्कारासाठी 25 जानेवारीपर्यंत इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अर्जदार व्यक्तीचे वय पुरुषासाठी किमान 50 वर्ष
व स्त्रियांसाठी किमान 40 वर्ष इतके असावे. अर्जदार व्यक्तीचे सामाजिक
क्षेत्रात किमान 15 वर्ष व सामाजिक संस्थेचे किमान 10 वर्ष कार्य असणे आवश्यक
आहे. अर्जदार व्यक्ती खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य अथवा कोणतीही
पदाधिकारी नसावी. तसेच अर्जदार संस्था राजकाणापासून अलिप्त असावी.
पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना व अधिक
माहितीसाठी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी नवीन प्रशासकीय इमारत, वर्धा या
कार्यालयास कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत (दूरध्वनी क्रमांक 07152-243331)
संपर्क साधावा. प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा. प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत
25 जानेवारी आहे. या तारखेनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment