Thursday, 14 September 2017



            महाराष्‍ट्र वार्षिकी  व महामानव पुस्‍तक विक्रीस उपलब्‍ध
Ø माहिती व जनसंपर्क महासंचालनयाव्‍दारे प्रकाशित
Ø सर्व बुक स्‍टॉल व जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्‍ध

वर्धा , दि 13(जिमाका)माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाव्‍दारे महाराष्‍ट्र वार्षिकी 2017 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनाच्‍या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे महामानव हे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले आहे. सदर दोन्‍ही पुस्‍तके  जिल्‍हयातील सर्व बुक स्‍टॉल, स्‍पर्धा परिक्षा केंद्र व जिल्‍हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्‍ध आहे. वाचक व स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी पुस्‍तकात अतिशय उपयुक्‍त माहिती दिली आहे. वाचक विद्यार्थ्‍यांना  पुस्‍तक खरेदी करावयाचे असल्‍यास जिल्‍हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले आहे.
            महाराष्‍ट्र वार्षिकी 2017 या पुस्‍तकात महाराष्‍ट्राची अधिकृत, वस्‍तुनिष्‍ठ माहिती, महाराष्‍ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्‍ट्राची परंपरा, महाराष्‍ट्रातील जिल्‍हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्‍य शासनाने घेतलेले महत्‍वाचे निर्णय, योजना,  घडामोडी तसेच  भारताचे राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्‍ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्‍ट्र विधिमंडळ सदस्‍य, संसद सदस्‍य आदींची माहितीचा समाविष्‍ट आहे.
            महामानव पुस्‍तकात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विविधांगी पैलूवर आधारित अभ्‍यासपूर्ण लेख, राज्‍यातील मान्‍यवर लेखक, संशोधक, प्राध्‍यापक, संपादक, लेखक यांनी लिहिले आहे. यातून बाबासाहेबांच्‍या चतुरस्‍त्र प्रतिमेची नेमकी व प्रभावीरित्‍या ओळख होते. हे पुस्‍तक अभ्‍यासक, संशोधक आणि सामानय वाचक या सर्वासाठी अतिशयक उपयुक्‍त अशी आहे. बाबासाहेबाचे श्रेष्‍टत्‍व आणि त्‍यांचे चौफेर व्‍यक्‍तीमत्‍व जाणून घेण्‍यासाठी सदर पुस्‍तक सहाय्यभूत ठरेल. 
                                                0000

.प्र.प.538                                                                दि.13 सप्‍टेंबर  2017                              18 गावांचा होणार डिजीटल विकास
Ø ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत इंटरनेट जोडणी
वर्धा , दि 13(जिमाका) शासन आणि खाजगी कंपन्‍यांच्‍या मदतीने राज्‍यातील ग्रामीण भागात भागात परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्‍या संकल्‍पनेतून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये  पहिल्‍या टप्‍यात राज्‍यातील 350 गावांपैकी वर्धा जिल्‍हयातील 18 गावांचा समावेश आहे. या अठराही गावामध्‍ये या अभियानाच्‍या माध्‍यमातून इंटरनेट जोडणी देऊन गावे डिजिटल करण्‍यात येणार आहे.
            दर्जेदार शिक्षण, आरोग्‍य, स्‍वच्‍छता, कृषि उत्‍पादनात वाढ करणे, गावात इंटरनेट जोडणी, गावातील सर्वासाठी पक्‍की घरे , पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, गावातील तरुणांना कौशल्‍यपूर्ण्‍ बनवून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देणे, या लक्षांकावर काम करण्‍यात येत आहे. यासाठी जिल्‍हयातील 18 गावांमध्‍ये मुख्‍यमंत्री ग्रामविकास सहकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. या ग्राम सहका-यांच्‍या माध्‍यमातून शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने माहिती गोळा करुन ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि गावक-यांच्‍या सहकार्यांने गाव विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे.
            देवळी तालुक्‍यातील 12 गावे आणि आर्वी तालुक्यातील 6 गावांचा या अभियानात समावेश असून या गावांना डिजिटल करण्‍याच्‍या दृष्‍टीने रिलायन्‍स जिओ कंपनी मार्फत इंटरनेट जोडणी देण्‍यात येणार आहे. यामुळे गावातील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र डिजिटल होणार आहे. तसेच  आरोग्‍य सेवा, कृषि विषयक माहिती, कृषि मालाचे बाजारभाव, शासनाच्‍या विविध योजनांची माहिती गावक-यांना गावातच उपलब्‍ध होऊन विकासाच्‍या प्रक्रीयेत थेट सहभागी होण्‍याची संधी मिळणार आहे.
          ग्रामप्रर्वतकांडून तयार करण्‍यात आलेल्‍या ग्रामविकास आराखडयास व गावाच्‍या विकासासाठी गावक-यांनी सहकार्य करुन ग्राम प्रर्वतकांना मदत करावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

Tuesday, 22 August 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
27 हजार शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज दाखल
*48 हजार 382 ऑफलाईन अर्ज
• 190 केंद्रावर सुविधा
वर्धा दि, 22 (जिमाका) दुष्काळ, नापिकी, आणि शेतमालाचे पडलेले भाव याने अडचणीत सापडलेल्या आणि बँकांचे थकीत कर्ज असलेल्याशेतक-यांना शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली . या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज पर्यंत 27 हजार 86 शेतक-यांनी ऑनलाईन तर 48 हजार 382 शेतकऱयांनी ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत.
या योजनेसाठी शेतक-यांना ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती ऑनलाईन जमा होत असून योजनेत पारदर्शकता येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून 1 ते 14 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळावा दरम्यान 48 हजार 382 शेतक-याचे अर्ज ऑफलाईन भरून घेण्यात आले होते. त्या सर्व शेतक-यांना संपर्क करून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. तसेच आतापार्यंत 32 हजार 384 शेतकरी कुटुंबाची ऑनलाईन नोंदणी झाली असून त्यापैकी 27 हजार 86 शेतक-यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत . थकीत कर्ज असलेले जिल्ह्यात 74 हजार 909 शेतकरी आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 20हजार 909 शेतकरी थकबाकीदार आहेत. तसेच ज्या शेतक-यांनी कर्जाची नियमित परतफेड केली अशा शेतकऱ्यानाही बोनस स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे.
190 केंद्रांवर अर्ज भरण्याची सुविधा
ऑन लाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्ह्यात 3 एजन्सी काम करीत आहेत. महाऑनलाईन केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण व नागरी आपले सरकार सेवा केंद्र. ऑनलाईन अर्जासाठी शासनाकडून 159 बायोमेट्रिक मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून केंद्र चालकांकडे असलेल्या मशीनही वापरण्यात येत आहेत. जिल्ह्यात बायोमेट्रिक मशीन महाऑनलाईन 80 केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण 20 आणि शहरी 90, अशा एकूण 190 केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. या सर्व केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गती यावी म्हणून प्रशासनाकडून आणखी 200 बायोमेट्रिक मशीनची मागणी करण्यात आली आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱयांनी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी जेणेकरून यासाठी शेतकऱयांना पुन्हा फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. यामध्ये शेतकरी पती पत्नी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास पॅन कार्ड, कर्जदाराचे बँक पासबुक- बचत व कर्ज खाते दोन्ही आवश्यक आहेत

Friday, 18 August 2017



तीन वर्षात सर्व शेतक-यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविणार
                                                              -चंद्रशेखर बावनकुळे
            वर्धा दि 18 (जिमाका) येत्‍या तीन वर्षात जिल्‍हयातील सर्व शेतक-यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर विज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. तसेच दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत प्रत्‍येक गावात सौर पथदिवे, ग्रामपंचायत च्‍या नळ योजना आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळांना सौर विज पुरवठा कार्यान्वित करण्‍यात येणार असल्‍याचे  प्रतिपादन राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे विविध विद्युत उप केंद्राचे भूमी पूजन, लोकार्पण सोहळा व जनता अदालत  प्रसंगी ते बोलत होते. इंटीग्रेटेड पावर डेवलपमेंट योजने अंतर्गत भारत सरकारच्‍या शहरी विद्युत वितरण प्रणालीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या हेतून अल्‍लीपूर, तरोडा, हिंगणघाट, पुलगाव  व कारला चौक वर्धा येथे विद्युत उपकेद्राचे भूमीपूजन व खरांगना, मांडगाव व गिरोली उपकेद्राचे लोकापर्ण सोहळयाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी , नगराध्‍यक्ष अतुल तराळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य पंकज सायंकार, विद्युत विभागाचे विभागीय संचालक श्री.खंडाईत, अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते.
          प्रत्‍येक नागरिकाला घरगुती 24 तास विद्युत पुरवठा देण्‍यात यावा तसेच कृषी पंपासाठीचा 8 तासाचे वर विद्युत पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश असतांना काही ग्रामीण भागात 8 तासाचे वर विज पुरवठा ख‍ंडित केल्‍याबाबत यावेळी विद्युत विभागाच्‍या अधिका-याविषयी नाराजी व्‍यक्‍त करुन यापूढे असा प्रकार घडल्‍यास अधिका-यांच्‍या वेतनवाढी थांबविण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी श्री. बावनकुळे म्‍हणाले. जिल्‍हयातील 68 हजार शेतक-यांना सौर विज कृषिपंप देण्‍यात येणार असून यासाठी शेतक-यांनी अर्ज करावे. वर्दळीच्‍या ठिकाणी असलेल्‍या जागेवरील विद्युत खांब, रोहित्र व तारामुळे सामान्‍य नागरिकांना त्रास होऊन अपघात होण्‍याची शक्‍यता असते यासाठी  विद्युत विभागांनी अपघातस्‍थळावरील विद्युत तारा , रेाहीत्र व खांब तात्‍काळ दुसरीकडे स्‍थानांतरीत करावे.
          प्रत्‍येक नागरिकाला केवळ विज जोडणीचे अनामत रककमच घेऊन विज जोडणी दयावी. विद्युत खांब किंवा विद्युत तारा जोडणीची रक्‍कम घेऊ नये अशाही सुचना यावेळी दिल्‍यात. वर्धा जिल्‍हात 2030 पर्यंत विद्युतीकरण  पुर्ण होईल. यासाठी जिल्‍हयाला 200 कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहे. यामध्‍ये आणखी 250 रुपये  कोटीची आवश्‍यकता असून लवकरच उपलब्‍ध करुण देण्‍यात येणार आहे. ज्‍या शेतक-याला शाश्‍वत विज दिली जाणार नाही त्‍या अधिका-यांवर कठोर कारवाई करण्‍यात येर्इल असा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.
          जिल्‍हयात 86 कोटी रुपयाचे देयक शेतक-यांकडे थकित असतांनाही  शेतक-यांची विज कापण्‍यात आली नाही.  जिल्‍हयात दोन वर्षात 9 हजार 500 विज कनेक्‍शन देण्‍यात आले असून केवळ 2 हजार 300 कनेक्‍शन बाकी आहे.   यावेळी विद्युत विभागाशी संबधित 270  नागरिकांनी तक्रारी दाखल केल्‍या. सर्वच तक्रारीचे मं‍त्रीमहोदयानी निराकरण केले. यापुढे प्रत्‍येक शाखा अभियंत्‍यांनी  महिन्‍यातून एकदा ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करावे. तसेच कार्यकारी अभियत्‍यांनी ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहक सेवेचे व्रत जोपासावे, असेही  श्री. बावनकुळे म्‍हणाले.
          कार्यक्रमाला विद्युत विभागाचे अधिकारी , कर्मचारी, नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
                                               



Wednesday, 16 August 2017

लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते
-महादेव जानकर
 स्वाेतंत्र दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
वर्धा दि.16 (जिमाका) – जिल्हरयात मागील तीन वर्षात शासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे 3 लक्ष 50 हजार दक्षलक्ष घन मीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. ही जिल्हयासाठी समाधानाची बाब असून जल-जंगल- जमीन या तीन बा‍बींवर शासन आणि लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते, हेच जिल्हयातील नागरिकांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धपविकास व मत्य्या विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
स्वा्तंत्र दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महादेव जानकर यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यंक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक निर्मलादेवी एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होते.
पाणी फाऊंडेशनच्या् वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत काकडदरा या गावाने राज्यातून पहिले 50 लक्ष रुपयांचे बक्षिस मिळविले यासाठी श्री जानकर यांनी गावक-यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सावरण्यासाठी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पं केला. हा संकल्पा पूर्ण करण्यासाठी वर्धेरांनी उत्फुर्तपणे सहभाग देऊन रेकार्डब्रेक 12 लक्ष 38 हजार वृक्ष लागवड केली. यासाठी शासकिय विभागासोबतच शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्थाा आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
स्वच्‍छ भारत अभियानातर्गत वर्धा जिल्हयातील सर्व 513 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या‍ आहेत. तसेच प्रगतशैक्षणिक महाराष्ट्र् कार्यक्रमातर्गत जिल्हाा परिषदेच्या 90 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. यासाठी विशेष सहकार्य करणा-या जानकीदेवी बजाज संस्थेचे आभार व्यक्त करुन विकासाच्या प्रक्रियेत जनतेने यापूढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हयातील संक्षिप्त माहिती देणारी आपला जिल्हा् वर्धा ही पुस्तिका तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने तयार करण्याात आल्या् या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी मंत्री महोदयांचे हस्तेा करण्यात आले.
पोलिस उपअधिक्षक सुभाष सावंत यांना गुणवत्ता पुर्ण सेवेबद्दल 2017 चे राष्ट्रपती पदक जाहिर झाले. याबद्दल श्री. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच विश्वनाथ वसंत मोहुर्ले (पो.नि.), सुधिर कोडापे (स.पो.नि.) , गोविंद रेहपाडे , दिलीप चरडे यांनी नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्ष खडतर सेवा केली याबद्दल त्यांना महाराष्ट. राज्याचे विशेष सेवा पदक जाहिर झाले यासाठी त्यांचे मंत्रीमहोदयाचे हस्ते सत्कार करण्या त आला.
4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात विशेष सहभाग दिलेल्या व्यक्ती् व संस्था् तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्का र प्राप्त गावांचा गावचे सरपंच व सचिव तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळाच्या मुख्याकद्यापकांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यायत आला.
यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण् पांचाळ अतिरिक्त, जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शहा, पत्रकार, अधिकारी ,कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.







Wednesday, 9 August 2017

श्रमामुळे मिळालेली प्रतिष्ठा‍ कायमस्वरुपी टिकवून ठेवावी
-शैलेश नवाल
 काकडदरा वासियांचे जिल्हा‍धिका-यांकडून अभिनंदन
वर्धा दि 9 (जिमाका) काकडदरा गावाने श्रमाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. श्रमामुळे मिळालेली प्रतिष्ठा आणि यश असेच कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी विवेकपूर्ण कृती, सातत्य आणि एकजुटीने काम केले तर गावात समृध्दी येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम पा‍रितोषिक मिळालेल्या काकडदरा गावाला आज जिल्हा धिकारी यांनी भेट देऊन गावक-यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यां नी गावक-यांना गावातील प्रत्येक व्यक्ती च्या विकासासाठी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
गावातील प्रत्येक व्यक्ती ही समृध्द झाली पाहिजे आणि गावातील प्रत्येक व्य्क्तीचे दरडोई उत्परन्न् वाढविण्या साठी शेती पूरक व्यावसाय करण्या्चे नियोजन करावे. यासाठी दुग्धा व्यवसाय, शेळी पालन , मत्य्ध्द व्य वसाय , कुकुटपालन यापैकी प्रत्ये.क कुंटूबाने कोणतातरी एक व्यवसाय करण्या‍विषयी त्यां नी सांगितले. मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेतून गावात रस्ते, नाल्याची कामे करण्यापेक्षा प्रत्येक व्याक्ती आर्थिक दृष्टगया सक्षम होण्या साठी या रकमेचा उपयोग करण्यात यावा. कमी खर्चात घर आणि घराचे भोवताल स्वरच्छ कसे करता येईल, याचे नियोजन करावे. गावाची समृध्दी ही संस्कारांनी ओळखली गेली पाहिजे. त्याेसाठी प्रत्येकाने आपले संस्का.र जपले पाहिजे, असेही ते म्हणाले
गावात ग्रामसभेच्या खात्यातच पारितोषिकाची रक्क्म जमा होईल. हा निधी फीरता निधी म्हणुन जल- जंगल- जमीन आणि उपजिविका यासाठी वापरायचा आहे. त्याामुळे गावात अवजार बँक, विहिरींसाठी सोलर पंप, विस शेतकरी एकत्र येऊन 100 एकर शेती सामुहिक पध्दरतीने करणार असतील तर त्यांंना शासनाच्याक सर्व योजनाचा लाभ देण्याआत येइल. असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आदिवासी उपयोजनामधून या गावाला जास्तीदत जासत योजनांचा लाभ देण्याीसाठी प्रयत्नं करण्याात येईल. कोणतीही गेाष्ट मोफत घेण्याची सवय लावून घेऊ नका असाही सल्ला जिल्हांधिकारी यांनी गावक-यांना दिला.
जिल्हाधिकारी यांनी गावक-यांनी केलेल्या कामाची पाहणी करुन गावक-यांचे कौतुक केले. यावेळी त्यां चे सोबत उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, तहसिलदार विजय पवार, पाणी फांऊडेशनचे मंदार देशपांडे व गावकरी मोठया संख्येभने उपस्थित होते.


Sunday, 6 August 2017



एक महिन्यात शेतक-यांना अन्न सुरक्षा
योजनेत समाविष्ट करून घ्यावे
                                                              - किशोर तिवारी


                  वर्धा दि 6( जिमाका) जिल्ह्यातील शिल्लक  दीड लाख शेतक-यांना अन्न सुरक्षा योजनेत  समाविष्ट करून घेण्यासाठी  तातडीने 1 महिन्यात शिबीर आयोजित करावे. तसेच  ग्रामीण भागातील  80 टक्के  नागरिकांना  अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्यावा.  शेतक-यांना अन्नसुरक्षा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास आत्महत्या कमी होतील असे मत स्व वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.
              जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी  संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी  मंगेश जोशी तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
   सध्या ग्रामीण भागातील 59 टक्के जनता तर शहरी भागातील 44 टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक मध्यम भूधारक अशा सर्वच शेतक-यांचा समावेश योजनेत करावा. तसेच विधवा, परित्यक्त्या, श्रावण बाळ, अंत्योदय योजनेतील लाभार्थींचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा आशा सूचना श्री तिवारी यांनी पुरवठा अधिकारी यांना केल्यात.
          जिल्हा सामान्य रुग्णालयाची सेवा चांगली असून सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयांमुळे वर्धेतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने रिक्त  डॉक्टरांची पदे  मुलाखती घेऊन भरावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          बँकानी शेतक-यांना 10 हजार रुपयांचे अग्रीम तसेच छत्रपती शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजनेची व्यवस्थित माहिती द्यावी. शेतक-यांना बँकेत फेऱ्या माराव्या लागू नयेत याची खबरदारी घ्यावी.  सध्या पावसाच्या खंड काळात ज्या शेतक-यांकडे विहीर आंबे आणि त्यांनी वीज पंपासाठी वीज जोडणीसाठी अर्ज केला असेल त्याला तातडीने वीज जोडणी देण्याची प्रक्रिया करावी. तसेच ग्रामीण भागात लाईनमन स्वतः काम न करता दुसऱ्या  मुलांना कामावर ठेवतात.असे लाईनमन  आठळून आल्यास थेट अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी वीज वितरण विभागाला दिला.
          यावेळी जिल्हाधिकारी  यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी बचत गट, महिला बचत यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा समावेश होता.

Saturday, 5 August 2017



                मुलींनी स्व -संरक्षणाचे धडे घेणे काळाची गरज
                                                       -शिक्षणाधिकारी

                      यशवंत विद्यालयात  महिला संरक्षण शिबीर
वर्धा दि 4 (जिमाका)  आज मुली शिक्षण व नोकरीसाठी बाहेर पडतात. वृत्तपत्रात  रोज घडणाऱ्या मुली व महिलांच्या अत्याचाराच्या  घटना वाचून मन धास्तावते. त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणून मुलींनी स्व- संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक ठरत आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एल.एम. डूरे यांनी केले.
          राज्य महिला आयोगाच्या वतीने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी 5 दिवसाचे कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यातील सेलू तालुक्यातील शिबीर यशवंत विद्यालायत घेण्यात येत आहे. याच्या  शुभारंभ  प्रसंगी  श्री डूरे बोलत होते.  यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक संगीता वानखडे,  विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका रंजना दाते, पर्यवेक्षिका, तसेच कराटे प्रशिक्षण देणारी कराटे पटू सायली वाघ आणि तिची चमू उपस्थित होती.
पुढे बोलताना श्री डूरे म्हणाले,  ग्रामीण भागातील मुली शाळेत जाण्यासाठी बस, ऑटोरिक्षा इत्यादी साधनांचा वापर करतात. अशावेळी त्यांच्यासोबत गैरप्रकार होत असतात. या कारणांमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविण्यास पालक धजावत नाही.  पण मुलींनी स्व संरक्षणाची  माहीत करून घेतल्यास  त्या स्वतःचे संरक्षण स्वत: करू शकतील. या एका प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होऊन त्या आलेल्या प्रसंगांना धाडसाने सामना करतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मनीषा सावळे म्हणाल्या,  पूर्वीच्या काळातही महिला, मुली घराबाहेर पडल्यात की त्यांना पाहून शेरेबाजी व्हायची, आणि आजही होते. याचा अनुभव प्रत्येक महिलेला आयुष्यात एकदातरी येतोच.  आज ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षणासाठी बाहेर पडण्याचे  प्रमाण वाढले आहे. त्यांना सुरक्षित वातावरणाची गरज आहे. पण विकृत प्रवृत्तीमुळे आज मुली, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वत:चे संरक्षण करण्याची जबाबदारी  घेऊन मुलींनी कराटे प्रशिक्षण शिकून घ्यावे.  संरक्षित भविष्यासाठी  आज ही काळाची गरज बनली आहे.  असे मत त्यांनी व्यक्त केले.
संगीता वानखेडे यांनी राज्य महिला आयोगाला मुलींच्या संरक्षणाची काळजी आहे म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलींनाच स्व संरक्षणाचे धडे देण्याचे काम महिला आयोगाने हाती घेतले आहे ,असे सांगितले.  यासाठी जिल्ह्यात हिंगणघाट, सेलू, आणि देवळी या तीन तालुक्यात असे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.  याचा लाभ मुलींनी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रंजना दाते यांनी या प्रशिक्षणाचा लाभ शाळेतील इयता 9 वी आणि 10 वी च्या 200 विद्यार्थिनींना होणार आहे. शाळेत 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून मुली शाळेत येतात. अशावेळी अशाप्रकारचे प्रशिक्षण मुलींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास मिळवून देते. प्रशिक्षणासाठी यशवंत विद्यालयाची निवड केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. काराटेपटू सायली वाघ आणि तिच्या चमूने शाळेतील 200 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहे. तसेच दिपचंद शाळेतील विद्यार्थिनी सुद्धा याचा लाभ घेतील. अशाच प्रकारचे प्रशिक्षणही हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातही आयोजित केले आहे.