Wednesday 16 August 2017

लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते
-महादेव जानकर
 स्वाेतंत्र दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
वर्धा दि.16 (जिमाका) – जिल्हरयात मागील तीन वर्षात शासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे 3 लक्ष 50 हजार दक्षलक्ष घन मीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली आहे. ही जिल्हयासाठी समाधानाची बाब असून जल-जंगल- जमीन या तीन बा‍बींवर शासन आणि लोकसहभागातून मोठे काम उभे होऊ शकते, हेच जिल्हयातील नागरिकांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धपविकास व मत्य्या विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
स्वा्तंत्र दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकिय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महादेव जानकर यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यंक्ष नितीन मडावी , जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक निर्मलादेवी एस. ,मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होते.
पाणी फाऊंडेशनच्या् वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत काकडदरा या गावाने राज्यातून पहिले 50 लक्ष रुपयांचे बक्षिस मिळविले यासाठी श्री जानकर यांनी गावक-यांचे अभिनंदन केले. पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सावरण्यासाठी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पं केला. हा संकल्पा पूर्ण करण्यासाठी वर्धेरांनी उत्फुर्तपणे सहभाग देऊन रेकार्डब्रेक 12 लक्ष 38 हजार वृक्ष लागवड केली. यासाठी शासकिय विभागासोबतच शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्थाा आणि नागरिकांचे अभिनंदन केले.
स्वच्‍छ भारत अभियानातर्गत वर्धा जिल्हयातील सर्व 513 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या‍ आहेत. तसेच प्रगतशैक्षणिक महाराष्ट्र् कार्यक्रमातर्गत जिल्हाा परिषदेच्या 90 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. यासाठी विशेष सहकार्य करणा-या जानकीदेवी बजाज संस्थेचे आभार व्यक्त करुन विकासाच्या प्रक्रियेत जनतेने यापूढेही असेच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हयातील संक्षिप्त माहिती देणारी आपला जिल्हा् वर्धा ही पुस्तिका तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजना पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने तयार करण्याात आल्या् या पुस्तकेचे प्रकाशन यावेळी मंत्री महोदयांचे हस्तेा करण्यात आले.
पोलिस उपअधिक्षक सुभाष सावंत यांना गुणवत्ता पुर्ण सेवेबद्दल 2017 चे राष्ट्रपती पदक जाहिर झाले. याबद्दल श्री. सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच विश्वनाथ वसंत मोहुर्ले (पो.नि.), सुधिर कोडापे (स.पो.नि.) , गोविंद रेहपाडे , दिलीप चरडे यांनी नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्ष खडतर सेवा केली याबद्दल त्यांना महाराष्ट. राज्याचे विशेष सेवा पदक जाहिर झाले यासाठी त्यांचे मंत्रीमहोदयाचे हस्ते सत्कार करण्या त आला.
4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात विशेष सहभाग दिलेल्या व्यक्ती् व संस्था् तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्का र प्राप्त गावांचा गावचे सरपंच व सचिव तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळाच्या मुख्याकद्यापकांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यायत आला.
यावेळी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण् पांचाळ अतिरिक्त, जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, उप वनसंरक्षक दिंगाबर पगार, अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा पुनर्वसन अधिकारी राजलक्ष्मी शहा, पत्रकार, अधिकारी ,कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.







No comments:

Post a Comment