Saturday, 20 August 2016

दिव्‍यांगांसाठी नागपूरला होणार
संयुक्‍त पुर्नवास केंद्र
                                           -केंद्रीय मंत्री  थावरचंद्र गेहलोत
Ø 532 दिव्‍यांगांना साहित्‍याचे वितरण
वर्धा, दि.20 :-दिव्‍यांगांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्‍यांची आरोग्‍य तपासणी, प्रशिक्षण, स्‍वंयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा योजना, यासारख्‍या  सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्‍हणुन नागपूरला संयुक्‍त पुर्नवास केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कर्मचा-यांची नियुक्‍ती झाल्‍यावर तीन महिन्‍यात हे केंद्र अंपगासाठी कार्यान्वित होईल.  अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.
दिव्‍यागांसाठी निःशुल्‍क साहित्‍य वितरणाचा कार्यक्रम आज सावंगी मेघे येथील दंत महाविद्यालयाचे सभागृहात सामाजिक न्‍याय आणि अधिकारि‍ता मंत्रालय ,एलिम्‍को कंपनी आणि जिल्‍हा प्रशासनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने घेण्‍यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री गेहलोत बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी , जिल्‍हाधिकारी  शैलेश नवाल, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर उपस्थित होते.
यावेळी श्री गेहलोत यांचे हस्‍ते अपंगांना तीन चाकी सायकल, व्‍हील  चेअर, श्रवणयंत्र, एमएसआयईडी कीट, ब्रेलकाठी, ब्रेलकीट इत्‍यादी साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. यावेळी बोलतांना ते म्‍हणाले, आतापर्यंत दिव्‍यागांना शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात येत नव्‍हती. मात्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिव्‍यांगांच्‍या सर्वांगिण विकासासाठी काही योजना नव्‍याने सुरु केल्‍या. त्‍यामध्‍ये 2014-15 पासुन अपंगांसाठी शिष्‍यवृत्‍ती योजना सुरु केली आहे. याचा लाभ पूर्वमाध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक आणि पदवीधर विद्र्या‍र्थी  घेऊ शकतात .
त्‍याचबरोबर 80 टक्‍के पेक्षा जास्‍त अंपग असणा-या व्‍यक्‍तींना मोटराईज्‍ड ट्रायसिकल देण्‍याची योजना सुरु केली आहे. यामध्‍ये केंद्र सरकार 25 हजार अनुदान देते उर्वरित 12 हजार रुपये आमदार ,खासदार निधीतून उपलब्‍ध करुन दिल्‍यास दिव्‍यांग याचा सुध्‍दा लाभ घेऊ शकतात. देशात आतापर्यंत दोन हजार शिबिराच्‍या माध्‍यमातून 5 लाख पेक्षा जास्‍त दिव्‍यांगांना विविध दैनंदिन साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. कर्णबधिर मुलांसाठी  कॉकलिअर इम्‍प्‍लॉटची सुविधा उपलब्‍ध करुन दिली असून यासाठी 6 लाख रुपये अनुदान केंद्र शासन देते.  आतापर्यंत 355 मुलांवर इम्‍प्‍लाट केले असून आता ती मुले चांगल्‍याप्रकारे ऐकू व बोलू शकत आहे.
 याशिवाय केंद्र सरकार राष्‍ट्रीय  स्‍तरावर राष्‍ट्रीय क्रिडा केंद्र स्‍थापित करण्‍याचा विचार करीत आहे. यामुळे दिव्‍यांगांमध्‍ये असलेल्‍या  क्रिडागुणांचा विकास होईल. त्‍याचबरोबर दिव्‍यागांसाठी विशिष्‍ट प्रकारचे ओळखपत्र बनविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून  यामुळे दिव्‍यांग कोणत्‍याही शहरात कुठल्‍याही  योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही ते यावेळी म्‍हणाले. वर्धा जिल्‍हयाच्‍या उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन लवकरच त्‍यांनाही साहित्‍याचे वितरण करण्‍यात येईल, अशी हमी त्‍यांनी यावेळी दिली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्‍हयातील 532 दिव्‍यांगांना केंद्र सरकारच्‍या  सामाजिक न्‍याय विभागाने साहित्‍याचे वितरण केले याबद्दल सामाजिक न्‍याय  मंत्री थावरचंद गेहलोत यांचे प्रति आभार व्‍यक्‍त केले. केंद्र शासनाने आतापर्यत 71 नविन योजना सुरु केल्‍या याचा लाभ नागरिकांना घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले. तसेच उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगाना सूध्‍दा साहित्‍य वितरण करण्‍यासाठी लवकरच कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार समिर कुणावार, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल आणि सामाजिक न्‍याय विभागाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात  117 व्‍यक्‍तींना  तीन चाकी सायकल, 48 व्हील चेअर, 2 सीपी चेअर, 132 कुबडया, 39 वृध्द व्यक्तींना काठी, 10 अंध व्‍यक्‍तींना  काठी, 32 ब्रेल किट, 178 कर्ण यंत्र, बालकांसाठी 7 रोलेटर , मानसिक विकलांग व्यक्तींना एम.एस.आय.ई.डी. किट 176, कृष्ठ रुग्णांसाठी ए.डी.एल. किट 7 , अशा एकुण 748 साहित्याचे 532 व्‍यक्‍तींना वाटप करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी  केले कार्यक्रमाला प्रशासकिय अधिकारी , लोकप्रतिनिधी, लाभार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते


शेतक-यांचे समाधान होईपर्यंत
                         जमिनीला हात लावणार नाही
                                                   -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.20 :-नागपूर-मुंबई महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासाठी शेतक-यांच्‍या जमिनीचे भुसंपादन नव्‍हे तर भूसंचयन करण्‍यात येणार आहे. यामधुन शेतक-यांना विकसित भूखंड देण्‍यात येईल. या भूसंचयनासाठी लागणारी जमीन जोपर्यंत शेतक-यांच्‍या शंकाचे पूर्ण निरसन करुन त्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत शेतक-यांच्‍या  जमिनीला हात लावणार नाही असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. आर्वी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना त्‍यांनी हे स्‍पष्‍ट केले.
महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासंदर्भात आर्वीतनी ा यंत शेतक-यांच् शेतक-यांच्‍ तालुक्‍यातील शेतकरी –भूधारकांशी प्रशासनाच्‍या वतीने संवाद साधुन त्‍यांच्‍या शंकाचे निरसन करण्‍यात आले. यावेळी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता यु.व्‍ही. डाबे, तहसिलदार विजय पवार, पंचायत समिती सभापती  ताराबाई ताडाम उपस्थित होत्‍या.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी यांनी महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाबाबत. सादरीकरण करुन शेतक-यांना माहिती दिली. कोणताही विकास हा एकतर्फी न होता तो भागीदारीचा विकास व्‍हायला हवा आणि त्‍यासाठी शेतक-यांचा जास्‍तीत जास्‍त फायदा करुन देण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शेतक-यांच्‍या शेतातील पाईपलाईन, विहिर, विंधनविहीर, झाडे यांचेही सर्वेक्षण करुन त्‍यांची नोंद घेवून त्‍याचा मोबदला दिला जाईल. असेही त्‍यांनी यावेळी शेतक-यांचे शंका निरसन करतांना स्‍पष्‍ट केले. ज्‍या शेतक-यांच्‍या सातबारावर ओलिताची नोंद नाही ती सर्वेक्षणाच्‍या वेळी करुन घेण्‍यात येईल. तसेच कृषी समृध्‍दी केद्रामध्‍ये शेतक-यांना विकसित भुखंड हे लॉटरी काढून देण्‍यात येतील.
यावेळी त्‍यांनी शेतीचे आताचे दर आणि विकसित भुखंडाचे दर यातील तफावत उदाहरणाव्‍दारे पटवून दिली. तसेच शेतक-यांच्‍या शंकाचे निरसन केले.
आमदार अमर काळे म्‍हणाले लोकप्रतिनिधी म्‍हणुन लोकांचे हित बघणे जबाबदारी असुन शेतक-यांच्‍या विकासाठी या प्रकल्‍पासंदर्भात सकारात्‍मक भूमिका असेल. पण लोकांचे समाधान झाले तरच भूसंचयन करु देणार असुन शेतक-यांच्‍या काही प्रश्‍नांची उत्‍तर अजुनही शासनाकडे नाहीत. त्‍यासंदर्भात शासनाकडून स्‍पष्‍ट सुचना आल्‍या तरच भुसंचयन करणे शक्‍य होईल. शेतक-यांचे प्रश्‍नासंदर्भात मुख्‍यामंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य गजानन निकम, कार्यकारी अभियंता श्रीमती अन्‍सारी, शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


 

Thursday, 18 August 2016

कापूस ते कापड प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार
                        -ना. दीपक केसरकर 
*
चंद्रपुर जिल्ह्याची प्रायोगिक  स्तरावर निवड. 
*
एम गिरी करणार तांत्रिक सहकार्य 
*5
वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
वर्धा, दि.17 :- महात्मा गांधीनी चरख्याचा उपयोग कापसापासून कपड़ा तयार करुन त्याकाळी विदर्भाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले होते. आजही महात्मा गांधींची ही विचारधारा विदर्भासाठी लागू होते. कापूस हे विदर्भातील शक्तिस्थान असून कापूस  उत्पादक शेतकऱ्यांच्या  कापसाचे मूल्य वर्धन करुन विदर्भात कापूस ते कापड  अशी मूल्यवर्धित साखळी  विकसीत करण्याची योजना राबवतोय. ज्यामुळे पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट होईल. हा प्रायोगिक प्रकल्प  चंद्रपुर  जिल्ह्यात  राबवण्याचा निर्णय घेतला असून एम गिरी यामधे महत्वाची भूमिका बजावेल असे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. एम गिरी येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
         यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, लीना बनसोड, एम गिरी चे संचालक डॉ प्रफुल्ल काळे,राहुल ठाकरे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, नियोजन अधिकारी उपस्थित होते. 
          महाराष्ट्रात रिसोर्स बेस प्लानिंग चा प्रयोग राबवण्यात येतोय.  यामधे  त्या- त्या  जिल्ह्यातील शक्तिस्थानावर काम करुन तेथील जनतेच्या  उत्पन्नात वाढ कशी करायची याचा विचार या प्रकल्पात करण्यात येईल. यामधे वस्तुच्या मूल्यवर्धनाला  खुप महत्व आहे. विदर्भात कापूस पिकवणारया  शेतकऱ्यांच्या घरामधे जर सूत तयार झाले तर मोठा आर्थिक बदल घडू शकतो.  असे काही प्रकल्प या आधी राबवले गेलेत. पण ते पायलट मॉडेल आहेत. त्या प्रायोगिक प्रकल्पांना मोठ्या स्तरावर एखाद्या  जिल्ह्यात राबवून यशस्वी झालोत तर विदर्भातील सर्व कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प राबवता येईल. असेही ते यावेळी म्हणाले. यासाठी एमगिरि या  भारत सरकारच्या अधीनस्थ संस्थेने  या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य  करावे. या संस्थे ने याविषयावर बरेच काम केले आहे.  सौर उर्जेवर आधारित चरखे बनवले आहेत. अशाच प्रकारची सौर उर्जेवर चालणारे लूम आणि रोमिंग मशीन्स त्यांनी  तयार कराव्यात. 
         तसेच सामूहिक सुविधा केंद्र तयार करावे. जिथे शेतकरी आपला कापूस देवून त्यापासून लळया किंवा सूत तयार करुन घेऊ शकेल. अर्थातच सुताची कींमत कापसापेक्षा जास्त असेल. याशिवाय कापड़ तयार करण्याच्या प्रक्रिएमधे सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील याचा विचार करुन प्रकल्प तयार करण्यासाठी एम् गिरी ने सहकार्य करावे यावर सुद्धा चर्चा झाली. विदर्भात कापसावर प्रक्रियेची अशी संपूर्ण साखळी विकसित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ करता येईल. यासाठी शासनाने प्रायोगिक स्तरावर यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात हा प्रयोग  राबविन्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण विदर्भात याची अमलबजावणी करण्यात येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.  डॉ काळे यांनी या प्रकल्पात एमगिरि संपूर्ण सहकार्य करण्याची हमी केसरकर यांना  दिली.  यावेळी एम गिरीचे अधिकारी उपस्थित होते. श्री केसरकर यांनी एमगिरि ने विकसित केलेले लूम रोमिंग मशीन्स आणि सूत कताई मशीन्स तसेच सोलर वर चालणाऱ्या मशीन्सची पाहणी केली. प्रथम  त्यांनी महात्मा गांधी आणि कस्त्तुरबा यांच्या पुतळ्यास कापूस माला घालून अभिवादन केले.
0000


Monday, 8 August 2016

 शेतक-यांचे जीवनमान उंचावल्‍यास
केलेल्‍या कामाचे समाधान मिळेल
                                    -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø भाजीपाला उत्‍पादक शेतकरी कार्यशाळा               
      वर्धा,दि 6 प्रत्‍येक शेतक-याला महिन्‍याला 10 ते 15 हजार रुपये महिना उत्‍पन्‍न मिळावे यासाठी शेतक-यांनी शेती सोबत जोडधंदा सुरु करावा. शेतक-यांचे जिवनमान उंचावण्‍यासाठी त्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच शेतीमध्‍ये येणा-या बियाणे, खते, किड व्‍यवस्‍थापन आणि विपणनाच्‍या समस्‍या आपण सोडवु शकलो तर, केलेल्‍या कामाचे मोठे समाधान मिळेल, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
            विकास भवन येथे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि कृषि तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांची जिल्‍हास्‍तरीय कार्यशाळा घेण्‍यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. नवाल बोलत होते. या कार्यशाळेला जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती , पंजाबराव कृषि विद्यापिठाचे भाजीपाला तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस.एस.घावडे, रोग व्‍यवस्‍थापन तज्ञ डॉ. एकता बागडे, किड व्‍यवस्‍थापन तज्ञ विनोद सोनारकर, बी.वाय. अॅग्रो इन्‍फ्रा कंपनीचे संचालक हसन शाफीक , प्रगतीशील शेतकरी संदीप पनपालिया आत्‍माच्‍या शितल मानकर उपस्थित होत्‍या.
            पुढे बोलतांना जिल्‍हाधिकारी म्‍हणाले शेतक-यांनी एकटयाने भाजीपाला लागवड करण्‍यापेक्षा गटाने केल्‍यास त्‍याचा जास्‍त फायदा होईल. शेतक-यांनी मागेल त्‍याला शेततळे योजनेचा लाभ घेऊन संरक्षित सिंचनाची व्‍यवस्‍था करावी. ज्‍यामुळे रब्‍बी व भाजीपाला पिक घेणे शक्‍य होईल. जिल्‍हा प्रशासन व कृषि विभाग सर्व समस्‍या सोडविण्‍यासाठी शेतक-यांना निश्चितीच सहकार्य करेल, असेही ते म्‍हणाले.
            यावेळी बी.वाय.अॅग्रो ईन्‍फ्रा लिमिटेड कंपनीचे संचालक हसन शाफीक यांनी सिंदी विहिर येथे सुरु केलेल्‍या कंपनी विषयी तसेच तिथे उपलब्‍ध सोई सुविधांविषयी माहिती दिली. कंपनीतर्फे भाजीपाल्‍यावर  प्रक्रिया करुन सौदी अरेबिया, दुबई, युरोप, रशिया येथे निर्यात करण्‍यात येते. शेतक-यांकडून 30 ते 40 टन रोज विकत घेण्‍यात येतो.  भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांनी त्‍याच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शितगृहाचा लाभ घ्‍यावा. तसेच शेतक-यांकडून भाजीपाला खरेदी करण्‍यासही त्‍यांनी सहमती दर्शवली
            यासोबतच संदीप पनपालिया यांनी सेंद्रीय शेती, अविनाश कहाते यांनी शेतकरी बचत गटामार्फत होत असलेले भाजीपाला उत्‍पादन, आणि अमित गाडबैल यांनी शेतक-यांमार्फत स्‍थापन केलेल्‍या वर्तमान अॅग्रो प्रोडयुसर कंपनीची वाटचाल याबाबत माहिती दिली.
            यावेळी बोलतांना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती म्‍हणाले, भाजीपाला उत्‍पादक शेतक-यांना क्रेट  खरेदीसाठी अनुदान देण्‍यात येते. शेतक-यांनी याचा लाभ घ्‍यावा तसेच भाजीपाल्‍यामध्‍ये किटकनाशकाचा अंश तपासणीसाठी तालुका कृषी अधिका-याकडे नमुने विनामुल्‍य तपासणी करुन देण्‍यात येते. यावेळी त्‍यांनी काही प्रगतीशील शेतक-यांचे उदाहरण देवून त्‍याप्रमाणे शेतक-यांनी विविध प्रयोग करण्‍याचे आवाहन केले. शेतक-यांना उत्‍पादक कंपनी स्‍थापन करण्‍यसाठी आत्‍मा मदत करेल असेही त्‍यांनी सांगितले.

            या कार्यशाळेला सर्व तालुका कृषी अधिकारी , व प्रगतीशील शेतकरी , भाजीपाला उत्‍पादक शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
वाहनांमुळे वनविभागाला चागले दिवस
 -खासदार रामदास तडस
·       वर्धा,आष्‍टी व खरागंणासाठी गस्‍त वाहन
·       वाहनांमुळे शिकार व तस्‍करीच्‍या प्रमाणात होईल घट
वर्धा,दि.6- वन विभागाकडून शासनाना खुप अपेक्षा असतात पण साधनांअभावी हा विभाग अपेक्षा पूर्ण करु शकत नाही.   म्‍हणूनच राज्‍य  शासनाने वन विभागाला गस्‍त  वाहन उपलब्‍ध करुन दिले आहे. या वाहनामुळे वनविभागाला  चागले दिवस आले असून  यापूढे अधिक जबाबदारीने वन व वन्‍य प्राण्‍याचे संरक्षण करावे लागेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
वन विभागाला प्राप्‍त झालेल्‍या पेट्रोलींग गाड्याचे हस्‍तांतरण खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते वनविभागाच्‍या कार्यालयात करण्‍यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपवन संरक्षक दिंगबर पगार, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, पिपल फॉर अॅनिमल संस्‍थेचे आषिश गोसावी
उपस्थित होते.
पुढे बोलतांना खासदार तडस म्‍हणाले एकाच दिवशी दोन कोटी पेक्षा जास्‍त झाडे लावून महाराष्‍ट्राने देशात इतिहास रचला आहे. या निमित्‍ताने वृक्षारोपनाबाबत नागरिकामध्‍ये मोठया प्रमाणात जनजागृती झाली. त्‍यामुळे हे अभियान लोकांचे झाले, हे याचे सर्वात मोठे यश आहे. देशाच्‍या लोकसभेत अनेक चांगले निर्णय होतात. देशाचे नागरिक म्‍हणून सर्व योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्‍यात आपण सहभाग द्यावा,असे आवाहन त्‍यांनी यावेळी उपस्थित कर्मचा-यांना केले.
खासदार तडस यांच्‍या हस्‍ते  वर्धा, आष्‍टी, खरागंणा येथील वनपरिक्षेत्र अधिका-यांना गाडीची चावी  देण्‍यात आली. आजपासून तीन गाड्या वन विभागाच्‍या ताफ्यात दाखल झाल्‍या आहेत. याबा‍त माहिती देताना उपवन संराक्षक दिंगबर पगार म्‍हणाले, वित्‍त मंत्री तथा पालकमात्री सुधीर  मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्‍हयासाठी  आठ पेट्रोलींग व्‍हॅन उपलब्‍ध करून दिल्‍यात. वन संपत्‍तीचे संरक्षण करण्‍यासाठी या  गाड्याचा खुप फायदा होईल. मनुष्‍य–प्राणी संघर्षाच्‍या वेळी तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचून वन्‍य प्राण्‍याला  गाडीत आणता येते. प्राण्‍याने एखादया मनुष्‍यावर हल्‍ला केल्‍यास जखमी इसमास तातडीने रुग्‍णालयात नेण्‍यासाठी गाडीचा उपयोग होऊ शेकतो वन संरक्षणासाठी या गाडया अतिशय महत्‍वाची भूमिका बजावणार असून यामुळे वन  शिकार व तस्‍करीच्‍या प्रकरणात निश्चितच घट होईल अशी आशा त्‍यांनी  व्‍यक्‍त केली.
या कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी  मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.
0000

         

          

Thursday, 4 August 2016

नाल्‍याकाठी बहरले खरीपाचे पिक
Ø मलकापूर झाले जलयुक्‍त
Ø 537 द.ल.घ.मी. पाणी साठा
Ø शेतक-यांनी केली डाळिंब लागवड
Ø पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली
   वर्धा, दि.4- पावसाळयात नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन खरीप पिक नष्‍ट होत होते. एखादया वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्‍वती  मलकापूर गावातील नाल्‍याकाठच्‍या शेतक-याची अनेक वर्षापासुनची ही वेदना ! पण जलयुक्‍त शिवार अभियानांत झालेल्‍या नाला खालीकरणाचे कामामुळे शेतात पाणी शिरण्‍यास पायबंद बसला आाणि नाल्‍याकाठच्‍या अनेक शेतक-यांच्‍या चेह-यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्‍येक वर्षात ज्‍या शेतात खरीपाचे पिकच आले  नाही, त्‍या शेतात सोयाबिन, कापूस व तूरीचे पिक आज डौलाने उभे आहे.
          देवळी तालुक्‍यातील मलकापुर हे गाव कायम टंचाई ग्रस्‍त  गाव.  मागील वर्षी या गावाची आणेवारी 50 टक्‍केच्‍या आत होती.  2015-16 मध्‍ये या गावाची निवड जलयुक्‍त शिवार अभियानात करण्‍यात आली आणि गावाचे चित्रच पालटले गावाच्‍या एकुण पाण्‍याच्‍या गरजेनुसार पाण्‍याचे नियोजन करण्‍यात आले. यामध्‍ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे, आणि पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्‍ट 5 अशी एकुन 13 कामे घेण्‍यात आली.  त्‍यापैकी 8 कामे पूर्ण झाली असून 5 कामे प्रगतीपथावर आहे.  गावाच्‍या एकुण वाटर बजेटींग नुसार 91 टक्‍के पाण्‍याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्‍या गावात 537. 64 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला असून  या पाण्‍याचा उपयोग सुमारे 537 हेक्‍टर संरक्षित सिंचनासाठी होणार आहे.या संपूर्ण कामासाठी 1 कोटी 46 लक्ष रुपयाचा आराखडा तयार करण्‍यात आला असून  त्‍यापैकी पूर्ण झालेल्‍या कामावर 70 लक्ष 67 हजार रुपये खर्च झाले आहे..
जलयुक्‍त शिवारमधील  झालेल्‍या कामामुळे विशेषतः नाल्‍याकाठच्‍या शेतक-यांना मोठया प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे. पदमाकर बाजारे यांची नाल्‍याकाठी 5 एकर शेती आहे. मात्र काही वर्षापासुन त्‍यांनी या शेतात खरीपाचे पीक घेतले नव्‍हते नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन पीक जळायचे, मात्र यावर्षी शेतात पाणी शिरलेच नाही. शिवाय पावसाचे अतिरिक्‍त पाणी नाल्‍यात सोडता आले त्‍यामुळे यावर्षी    खरीपाचे पीक चांगले होण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
डाळिंब लागवड
नाल्‍यालगत माझी 5 एकर शेती असून शेतात विहिर आहे. मात्र रब्‍बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्‍हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्‍या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्‍यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळयानंतर विहिरीच्‍या पाण्‍यावर डाळिंब शेती जगवता येईल.
                                                                              प्रशांत निवल
                                                                                 शेतकरी
पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली  हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्‍त मध्‍ये असते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. मात्र या योजनेसाठी वापरण्‍यात येणारी विहिर उन्‍हाळयात कोरडी होते त्‍यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्‍हता. जलयुक्‍त शिवार मध्‍ये पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्‍टची कामे करण्‍यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्‍हाळयात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे.
                                                                                       साधना नेहारे
                                                                                   सरपंच ,मलकापूर



Wednesday, 3 August 2016

महसूल प्रशासन अधिक तिमान करण्यासाठी पुढाकार घ्या
                                                       - अन कुमार  
                                    उत्कृष्ट अधिकारी म्हणून
                        वैभव नावडकर, मनोहर चव्हाण यांचा गौरव
                        एस. व्ही. हाडके यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव
                        महसूल दिनानिमित्त अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान

        वर्धा, दि. 2: महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा भाग असल्यामुळेच विविध योजनांच्या मलबजावणीच्या समन्वयाची जबाबदारी या विभागाकडे सोपविण्यात आली आहे. महसूल प्रशासन अधिक तिमान करुन जनतेला अधिक जलद सुविधा उपलब्ध करुन द्या असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
            महसूल दिनानिमित्त नागपूर विभागात उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा गौरव विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला . त्याप्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते.
            यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रुपा कुळकर्णी , नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे , अपर विभागीय आयुक्त संजिव उन्हाळे, महसूल उपायुक्त जितेंद्र पापकर तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी उपस्थित होते.
            वर्धा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांना वैभव नावडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यासाठी शाळेमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करुन वेळेत दाखले मिळवून दिले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी घरांच्या नुकसानी  संदर्भात मदतीचे वाटप करतांना सुसत्रता आणने महसूल वसुली करण्याबाबत विशेष परिश्रम घेवून दिलेले द्दिष्ट पूर्ण करणे, न्यायालयीन दंडाधिकारी कामे वेळेत विहित कार्यपद्धतीने हाताळतांनाच जनतेची कामे करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त अन कुमार यांनी प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे.
            आर्वी येथील तहसिलदार मनोहर चव्हाण यांना तहसिलदार संवर्गात 15.16 या वर्षात संपूर्ण विभागात स्वयंस्पूर्तीने पुढाकार घेवून महसूल सेवांचा लाभ जनतेला दिल्या बद्दल तसेच महसूली वसुली करण्याबाबत केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल विभागीय आयुक्तांनी चव्हाण यांचा प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे. प्रशासनामध्ये तंत्रानाचा वापर तसेच टंचाई नैसर्गिक आपत्ती काळात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील एस. व्ही. हाडके, यांना लघुलेखक संवर्गात त्यांनी केलेल्या उत्कृष् कार्याबद्दल उत्कृष् कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले आहे. तलाठी संवर्गात देवळी तहस कार्यालयाने एस. एम. पवार, शिपाई संवर्गात जिल्हाधिकारी कार्यालयातील सलिम शेख , वसंता पिसे, या कर्मचा-यांचा विभागीय आयुक्त अन कुमार यांनी गौरव केला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी महसूल प्रशासनामध्ये कार्यरत असतांना केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
प्रारंभी महसूल उपआयुक्त जितेद्र पाळकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात महसूल दिन महिलांच्या सबळीकरणासाठी विभागात महिनाभर राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.
                                                            *****