Wednesday, 29 August 2018


सफाई कर्मचा-यांच्या उन्नतीसाठी शासकिय योजनाचा लाभ मिळवून दयावा
-         दिलीप हाथीबेड
वर्धा , दि. 28 : सफाई कर्मचा-यांच्या सर्वार्गिन उन्नती साठी त्यांच्या साठी असलेल्या शिक्षण, आरोग्य, व रोजगार उपलबध करुन देणा-या योजनाची माहिती संबंधित विभागांनी त्यांच्या परसिरात जाऊन जनजागृती व्दारे दयावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी आज संबधित विभाग व सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकां-याच्या बैठकित दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगाराच्या प्रश्नासंदर्भात विभाग प्रमुख आणि सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांची आढावा  बैठक आयोजित करण्यात आली  होती. यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, सर्व नगर परिषेदेचे मुख्याधिकारी , महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी  व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषदे अंतर्गत श्रमश्राफल्य योजनेमध्ये सफाई कर्मचा-यांना देण्यात येणा-या सदनिकेचे जेवढे मुल्य होत असेल तेवढया मुल्यांचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. वर्धा नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचा-यांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे  श्रीमती वाघमळे यांनी सांगितले. तसेच कर्मचा-यांचा आरोग्य विमा काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेने सर्व समावेषक विमा योजना सुरु करावी, अशा सूचना श्री हाथीबेड यांनी केल्या. 
सफाई कर्मचा-यांच्या वस्तीत देण्यात येणा-या मुलभूत सुविधांसाठी नगर परिषदेने दुर्बल घटकांसाठीचा निधी वापरावा. सफाई कर्मचा-यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी सुध्दा हा निधी वापरण्यात यावा. सफाई कर्मचा-यांच्या वेतना संदर्भात त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते पुस्तक कत्राटदाराकडून  कर्मचा-यांना पुरविण्यात यावे. तसेच कत्राटदार भविष्य निवार्ह निधीची कपात करतो किंवा नाही हे तपासावे त्याचबरोबर किमान वेतन नियमाचे पालन करण्यात येते की नाही याची सुध्दा तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंजी मोठी या ग्राम पंचायत मध्ये एकमेव सफाई कर्मचा-याला कामावरुन काढून टाकले अशी तक्रार सदर सफाई कर्मचा-यांनी केल्यावर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले.
सफाई कर्मचा-यांना देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्वयंरोजगार करण्यासाठी राष्ट्रीय अनुसुचित जाती  आर्थिक विकास महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच महात्मा फुले विकास महामंडळाच्या योजनांची माहिती सफाई कर्मचा-यांचे  मेळावे शिबिर घेऊन देण्यात यावी. स्वच्छता निरिक्षकांचे पद सरळ सेवेने न भरता 50 जागा पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 16 August 2018

ग्रामीण भागात  शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी
युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावणार
 
                                            - प्रकाश महेता
      *माहिती व जनसंपर्क महासंचालनालायच्या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ

वर्धा दि 15 :-
  शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील,  असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता  यांनी  केले. 

       शासकिय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शासनाच्या 'युवा माहिती दूत' उपक्रमाचा शुभारंभ आज श्री महेता यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून करण्यात आले. त्यानंतर
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाची ध्वनिचित्रफीत उपस्थितांना  दाखविण्यात आली.  यावेळी श्री महेता  बोलत होते. या कार्यक्रमाला  जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार डॉ पंकज भोयर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अजय गुल्हाणे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली,  सहायक जिल्हाधिकारी श्री जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्षमी शाह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक डॉ करुणा जुईकर,  माजी खासदार सुरेश वाघमारे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक  उपस्थित होते.

युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती
  लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ तसेच पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून
  केला जातो.  ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाऱ्या शासकीय योजना माहिती थेट त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत तयार करण्यात आलेली माहिती दूत उपक्रमाबाबत माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
                                                            00000





Monday, 9 July 2018


प्रधानमंत्री आवास योजनेतून वर्ध्यात अतिरिक्त 11 हजार घरे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्र्यांनी घेतला वर्धा जिल्ह्याचा आढावा  लोकसहभागातून पांदन रस्त्यांसाठी भरीव निधी  ग्रामविकास आराखडा, ‘मुद्रा शक्ती’ डीव्हीडीचे प्रकाशन नागपूर,दि. 9 : सन 2022 पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्कृष्टपणे होत आहे. घरापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, यासाठी वर्धा जिल्ह्याची वाढीव मागणी लक्षात घेता अतिरिक्त 11 हजार घरे उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधान भवन येथील सभागृहात वर्धा जिल्हा आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, नागो गाणार, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, अमर काळे, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधीक्षक निर्मलादेवी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे उपस्थित होते. जिल्ह्यात पालकमंत्री अतिक्रमणमुक्त पांदन रस्ता योजना लोकसहभागातून चांगल्या पध्दतीने राबविण्यात येत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 200 किमीचे पांदन रस्ते पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांची मागणी पाहता पांदन रस्त्यांसाठी उपलब्ध निधी खर्च होताच तात्काळ अतिरिक्त निधी देण्यात येईल. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत येणारे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करावे. या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे रस्त्याची कामे दर्जेदार होतील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालानुसार कामे करावीत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या देवळी पाणी पुरवठा योजनेच्या दहा किलोमीटरच्या पाईपलाईनचे कार्य दीड महिन्यात पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी. तसेच सध्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. नदी आणि नाल्यांच्या काठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूर नियंत्रण कार्यक्रमासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. धाम नदीच्या स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले असता या मोहिमेत हिंगणघाट येथील वणा नदीचा समावेश करावा, तसेच कपंनी सामाजिक दायित्वमधून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत विशेष बैठक : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सद्यस्थितीत प्रशासक नेमण्यात आला आहे. या बँकेतील दोन लाख 19 हजार 409 ठेवीदारांचे 364 कोटी 22 लाख रुपये देणे आहे. या बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव आमदार डॉ. पंकज भोयर आणि लोकप्रतिनिधींनी ठेवला. यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी सहकार मंत्री आणि सहकार सचिव यांच्या उपस्थितीत विशेष बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी हमी दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपासाठी वीज पुरवठा, स्वच्छता अभियान, पोलिस गृहनिर्माण योजना, पीककर्ज आढावा, पीक विमा योजना आदींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील लोकाभिमूख आणि नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यात सौरऊर्जा जलउपसा प्रकल्प, गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली, लोकसहभागातून पांदन रस्ते, धाम नदी पुनर्जीवन, स्वयंसहायता बचतगट उद्योगिक सशक्तीकरण, टोल फ्री हेल्पलाईन, लघु प्रकल्प कालव्यांची दुरुस्ती व नुतणीकरण (दहेगाव, गोंडी), आपला आधार आपली बँक या उपक्रमांचा समावेश होता. तत्पूर्वी बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेला ग्रामविकास आराखडा आणि जिल्हा माहिती कार्यालय निर्मित प्रधानमंत्री मुद्रा योजनेवरील ‘मुद्राशक्ती’ या माहितीपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. *****





Monday, 11 June 2018










सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबध दृढ होईल
                                                      -चांग झीयुन
वर्धा, दि 11 (जिमाका) :- चीन हा देश नेहमी महात्मा गांधी यांचे तत्व मानणारा देश आहे. त्यामुळे भारत आणि चीनचे संबध चांगले मैत्रीपूर्ण राहावे  तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतक-याचा विकास व्हावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  त्यांच्या पावन भूमीत शेतक-यांना  बारमाही  सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी   सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमाने येथील शेतक-यांनी बारमाही शेती करावी,  असे प्रतिपादन या प्रकल्पाचे हस्तांतरण आणि प्रकल्पाची पाहणी करतांना  चीन सरकारचे भारतातील मुबंई येथील दुतावास कार्यालयातील  अधिकारी( कॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी  ग्रामपंचायत पिंपळगाव (भोसले) येथे केले.
चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नवाचार आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमा अतंर्गत मुबंई आधारीत चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादित च्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आला. सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरण  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुबंई येथील दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सलर)  वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, श्री. वांग ली, श्रीमती अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जिवन राऊत, उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. चाँग म्हणाले, चीन हा देश नेहमी भारतसोबत मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्ररत असून आजचा दिवस योगायोगाने चांगला आहे. कारण भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी चीन दो-यावर भारताचे संबध चांगले राहावे यासाठी चर्चा करीत आहे. आणि इथे चीन सरकारच्या वतीने सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. चीन हा देश कृषी प्रधान देश असून चीन मध्ये सौर उर्जेवर तांत्रिक पध्दतीची शेती करण्यात येते त्याप्रमाणे येथील शेतक-यांनी सुध्दा तांत्रिक पध्दतीची शेती करावी. तसेच शेतीमध्ये बारमाही पिके घ्यावी याकरीता   शेतक-यांसाठी  हा सोलर सिंचन प्रकल्प मदत नसून  भारताला सहकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर सोलर सिंचन प्रकल्‍प सुरु करण्यात आला. अशाच प्रकारच्या योजना  चीन सरकारच्या वतीने सुरु करण्यात येईल असेही श्री चाँग म्हणाले.
चीनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास 50 शेतक-यांना बारमाही सिंचनाचा  लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील 22 हेक्टर शेती सोलर सिंचनखाली येणार आहे. तसेच 30 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असल्याचे शैलेश नवाल म्हणाले. या प्रकल्पामध्ये शेतक-यांना समप्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वेगवेगळया ठिकाणी 5 पाणी वितरण नलिकेचे चेंबर बनविण्यात आले असून यामध्ये 10 उपनलिका तयार करण्यात आल्या आहे.  या प्रकल्पामुळे येथील शेतक-यांना बारमाही सिचनाची सुविधा होणार असल्याने शेतक-यांनी बारमाही शेती पिके घ्यावी, असेही आवाहन शैलेश नवाल यांनी केले.
भारतासोबतचे चीन सबंध मैत्री व सलोख्याचे राहावे, यासाठी चीन सरकारच्या वतीने भारतात विविध प्रकल्प उभारण्यासाठी प्ररत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोलर सिंचन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्या वतीने  1 कोटी 60 हजार रुपये तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने 30 लाख खर्च झालेला  असून धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी 30 एच.पी. मोटर पंप बसविण्यात आलेआहे . या सोलस सिंचन प्रकल्पाचा येथील शेतक-यांनी लाभ घेऊन सिंचन करावे, असे आवाहन तानाजी सत्रे यांनी यावेळी शेतक-यांना केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी श्री. शिंदे,  उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभाभागाचे उपअभियंता श्री.साबळे, जिल्हा परिषदच्या लघु सिचन विभागाचे उपअभियंता श्री. लांडगे, श्री. ससाने, पोलिस पाटील सतिश इंगोले व नागरिक मोठया प्रमणावर उपस्थित होते.
यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
                                      0000

Friday, 1 June 2018


नागरिकांनी दुधातील भेसळ ओळखून विक्रेत्याविरुध्द प्रशासनाकडे तक्रार करावी
                                                      -जिल्हाधिकारी
वर्धा, दि.1- नागरिकांना दुधाच्या शुध्दतेबाबत शंका आल्यास  नागरिकांनी घरच्या घरी दुधातील भेसळ ओळखून दूध विक्रेत्याविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी.  असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  केले. जिल्हा स्तरीय दुध भेसळ आळा घालणा-या समितीच्या बैठकित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकिला पोलिस विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापकिय संचालक, जिल्हा दुग्धशाळा विकास अधिकारी,  अन्न सुरक्षा अधिकारी, उपस्थित होते.
मागिल दोन वर्षात अन्न व औषध प्रशासनाव्दारे 49 नमुने विश्लेशनाकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी 43 नमुने प्रमाणित घोषित झाले असुन मात्र 6 नमुने कमी दर्जाचे घोषित झालेले आहे. 6 नमुन्यापैकी कोणत्याही अन्न नमुन्यामध्ये युरीया ,माल्टो डेकस्ट्रीन, शुगर इत्यादी रासायनिक पदार्थाद्वारे भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर नमुने फक्त फॅक्ट व एस.एन.एफ. या मानदामध्ये कमी दर्जाचे आढळून आले. सदर मानद दुधात पाणी टाकल्यामुळे किंवा जनावरांना योग्य प्रमाणात खुराक न दिल्यामुळे कमी दर्जाचे घोषित होऊ शकतात. परंतु सदर दुधात शरीराला अपायकारक असणा-या घटकांची भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर कमी अर्जाच्या नमुन्यापैकी 5 प्रकरणात एकुण 27 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आलेला असून एका प्रकरणात कारवाई सुरु असल्याचे यावेळी  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी  बैठकित माहिती देतांना सांगितले
नागरिकांनी दुधातील भेसळ कशी ओळखावी
दुधातील भेसळ ओळण्यासाठी दुधात जर पिस्टमय पदार्थ (स्टार्च) ची भेसळ केली असल्यास दुधामध्ये आयोडीनचे थेंब टाकल्यास दुधास निळा रंग येतो. तसेच पाणी जास्त टाकुन असल्यास थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठ भागावर टाकल्यास पाणी मिश्रीत दुधाचा थेंब लवकर खाली ओघळतो तर शुध्द दुधाचा थेंब सावकाश खाली ओघळतो. परंतु चाचणीत स्थिम मिल्क पावडर मिसळलेल्या दुधास लागु होत नाही.