नागरिकांनी दुधातील भेसळ
ओळखून विक्रेत्याविरुध्द प्रशासनाकडे तक्रार करावी
-जिल्हाधिकारी
वर्धा, दि.1- नागरिकांना दुधाच्या
शुध्दतेबाबत शंका आल्यास नागरिकांनी घरच्या
घरी दुधातील भेसळ ओळखून दूध विक्रेत्याविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाकडे किंवा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. असे
आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्हा स्तरीय दुध भेसळ आळा घालणा-या समितीच्या बैठकित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात
आयोजित बैठकिला पोलिस विभागाचे प्रतिनिधी, जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापकिय संचालक,
जिल्हा दुग्धशाळा विकास अधिकारी, अन्न सुरक्षा
अधिकारी, उपस्थित होते.
मागिल दोन वर्षात
अन्न व औषध प्रशासनाव्दारे 49 नमुने विश्लेशनाकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी 43
नमुने प्रमाणित घोषित झाले असुन मात्र 6 नमुने कमी दर्जाचे घोषित झालेले आहे. 6 नमुन्यापैकी
कोणत्याही अन्न नमुन्यामध्ये युरीया ,माल्टो डेकस्ट्रीन, शुगर इत्यादी रासायनिक पदार्थाद्वारे
भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर नमुने फक्त फॅक्ट व एस.एन.एफ. या मानदामध्ये कमी
दर्जाचे आढळून आले. सदर मानद दुधात पाणी टाकल्यामुळे किंवा जनावरांना योग्य प्रमाणात
खुराक न दिल्यामुळे कमी दर्जाचे घोषित होऊ शकतात. परंतु सदर दुधात शरीराला अपायकारक
असणा-या घटकांची भेसळ केल्याचे आढळून आलेले नाही. सदर कमी अर्जाच्या नमुन्यापैकी 5
प्रकरणात एकुण 27 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आलेला असून एका प्रकरणात कारवाई
सुरु असल्याचे यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे
सहाय्यक आयुक्त यांनी बैठकित माहिती देतांना
सांगितले
नागरिकांनी दुधातील भेसळ कशी ओळखावी
दुधातील भेसळ ओळण्यासाठी दुधात
जर पिस्टमय पदार्थ (स्टार्च) ची भेसळ केली असल्यास दुधामध्ये आयोडीनचे थेंब टाकल्यास
दुधास निळा रंग येतो. तसेच पाणी जास्त टाकुन असल्यास थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठ भागावर
टाकल्यास पाणी मिश्रीत दुधाचा थेंब लवकर खाली ओघळतो तर शुध्द दुधाचा थेंब सावकाश खाली
ओघळतो. परंतु चाचणीत स्थिम मिल्क पावडर मिसळलेल्या दुधास लागु होत नाही.
No comments:
Post a Comment