वर्धा, दि. 26- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 52 वा वर्धापन
दिन 1 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या निमित्ताने ध्वजारोहनाचा
शासकिय कार्यक्रम सकाळी 8 वाजता येथील स्टेडीयमच्या
प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री
राजेंद्र मुळक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी
जयश्री भोज यांनी दिली.
काल जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन
दिना निमित्ताने आढावा बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी
विशेष भुअर्जन अधिकारी आर.बी. खजांची, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता
के.आर. बजाज, डॉ. प्रा. अजय येते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी
उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन उत्साहाने
साजरा करण्याच्या सुचना देवून जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी ज्या विभागांना वर्धापन
दिनाच्या निमित्ताने कामे सोपविण्यात आली आहेत त्यांनी तातडीने ते पूर्ण
करावी. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 या दरम्यान कोणताही शासकिय व निमशासकीय कार्यक्रम
होणार नाही . तथापि 7.15 पूर्वी व 9 वा. च्या नंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यास
हरकत राहणार नाही. या निमीत्तानेजनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी
आवाहन केले.
यावेळी संबधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment