Wednesday, 11 January 2017



         डिजिटल स्‍वाक्षरीने सात बारा  देणारा वर्धा ठरला राज्‍यात पहिला
        वर्धा,दि.11– सात- बारा मिळण्‍यासाठी तलाठयाकडे खेटे घेणा-या  शेतक-याला  आता घरुनच आपले सरकार वेब पोर्टल किंवा गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई- सेवा केंद्राच्‍या माध्‍यमातून डिजिटल स्‍वाक्षरीचा सात बारा उपलब्‍ध होणार आहे. अशा पध्दतींने शेतक-यांना सातबारा उपलब्‍ध करुन देणारा वर्धा हा राज्‍यातील पहिलाच जिल्‍हा ठरला असून मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्‍या व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स व्‍दारे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे अभिनंदन केले आहे.
            आज जिल्‍हाधिकारी यांनी वर्धा तालुक्‍यातील पांढरकवडा येथील सचिन दाते, ज्ञानेश्‍वर दाते, गणेशपूर मधील दिवाकर मुरकुटे आणि मांडवगडच्‍या शंकरराव केळवतकर या शेतक-यांना  डिजिटल स्‍वाक्षरी असलेल्‍या सात बाराचे वितरण केले.
            जिल्‍हाधिकारी यांनी जिल्‍हयाची सुत्रे स्विकारताच शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्‍यास प्राधान्‍य दिले. तसेच नागरिकांना सर्व आवश्‍यक दाखले आणि प्रमाणपत्र ऑन लाईन उपलब्‍ध करुन देण्‍यावर भर दिला. आज महसुल विभागाच्‍या 51 सेवा, कामगार कल्‍याण विभागाच्‍या 17, गृह विभाग18 आणि भूमी अभिलेख विभागाच्‍या 18 सेवा ऑनलाईन करण्‍यात आल्‍या आहेत. इतर विभागाच्‍याही सर्व सेवा ऑनलाईन करण्‍यासाठी अधिकारी व कमचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
            शेतक-यांना घरबसल्‍या सात बारा मिळावा यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी यांच्‍या वारंवार बैठका घेऊन सुचना दिल्‍या. महाऑनलाईनचे समन्‍वयक प्रतिक उमाटे यांनी सर्व नायब तहसिलदार आणि डेटा बेस अॅडमिनिस्‍ट्रेटर यांचे डिजिटल स्‍वाक्षरी तयार करुन  घेतल्‍या. महाभूलेखच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध असलेला आणि  महसूल विभागाने अद्यावत केलेल्‍या सात बाराची लिंक महाऑनलाईन आणि आपले सरकारच्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिली. यासाठी जिल्‍हाधिकारी यांना जमाबंदी आयुक्‍ताची विशेष  परवाणगी घ्‍यावी लागली. 5 जानेवारी 2017 रोजी डिजिटल स्‍वाक्षरीने सात बारा ऑनलाईन उपलब्‍ध करुन देण्‍यास प्रायोगिक तत्‍वावर सुरवात झाली.
            आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्‍या व्‍हीडिओ कॉन्‍फरन्‍समध्‍ये डिजिटल स्‍वाक्षरीचा सातबारा उपलब्‍ध करुन देणारा हा पहिला जिल्‍हा असल्‍याचे सांगितले. तसेच जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांना डिजिटल स्‍वाक्षरीचा सातबारा शेतक-यांना वितरीत करण्‍याच्‍या  दिलेल्‍या सुचनेनुसार जिल्‍हाधिकारी यांनी त्‍याचवेळी 4 शेतक-यांना सातबारा चे वितरण केले. यावेळी मुख्‍यमंत्र्यानी  जिल्‍हाधिकारी यांनी केलेल्‍या विशेष कामगिरीसाठी त्‍यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि इतर जिल्‍हयांनी  सुध्‍दा वर्धा जिल्‍हयाप्रमाणे कार्यवाही पूर्ण करुन शेतक-यांना ऑनलाईन सातबारा उपलब्‍ध करुन देण्‍याचे निर्देश दिलेत.

Thursday, 29 December 2016

शासकिय कामकाज हिंदीतून व्‍हावे
                                               -डॉ. महेंन्‍द्रनाथ पाण्‍डेय
Ø म.गां.अ.हिं.वि.स्‍थापना दिवस समारंभ
Ø हिंदी भाषा क्षेत्रात कार्य करणा-या साहित्यिकांचा सत्‍कार
वर्धा, दि.29- हिंदी ही राजभाषा आहे. ती देशात सर्वात जास्‍त बोलली जाणारी लोकभाषा आहे. तरीही हिंदी भाषा दैनावस्‍थेकडे जात आहे. हिंदी भाषेची ही अवस्‍था बदलण्‍यासाठी शासकिय कामकाज  हिंदी भाषेतून होण्‍याची गरज असल्‍याचे  प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास राज्‍यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पाण्‍डेय यांनी केले.
          महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍व विद्यापिठाच्‍या  19 व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या उद्घाटन  समारंभा  प्रसंगी श्री. पांण्‍डेय  मुख्‍य अति‍थी म्‍हणुन बोलत होते. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी विद्यापिठाचे कुलगुरु प्राध्‍यापक गिरीश्‍वर मिश्र, तर मुख्‍यवक्‍ता म्‍हणुन इंद्रनाथ चौधरी होते. तसेच प्रतिकुलगुरु आनंद वर्धन शर्मा, कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र तसेच हिंदी सेवी सन्‍मानप्राप्‍त प्राध्‍यापक रंजना अरगडे, डॉ. चंद्रकांत पाटील, प्रा.टी.आर. भट्ट उपस्थित होते.
          हिंदी भाषेला सामर्थ्‍यशाली बनविण्‍यासाठी साहित्‍य, कला, संगीत या विषयांसोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा आणि संशोधन सारख्‍या विषयांचे शिक्षण हिंदी भाषेतून देण्‍याइतके या भाषेला सक्षम करावे. हिंदी भाषीक नसलेल्‍या राज्‍यांमध्‍ये सुध्‍दा हिंदी भाषा शिक्षकाला उत्‍तम पगार मिळतो. त्‍यामुळे हिंदी भाषेला चांगले भविष्‍य आहे.म्‍हणुनच   हिंदी भाषेतून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांनी हे कमी पणाचे न मानता अभिमानाची बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          वर्धा हे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र आहे. भारतीय स्‍वातंत्र्याचा इतिहास वर्धेच्‍या उल्‍लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि विनोबा भावे यांच्‍या कार्यांने पावन झालेल्‍या या भूमित विद्यार्थ्‍यांना शिक्षण घेण्‍याची संधी मिळते, ही गौरवाची बाब आहे. आजही विदेशात महात्‍मा गांधीनी अहिंसा आणि सत्‍याग्रहाच्‍या आंदोलनातून स्‍वातंत्र्य  कसे मिळविले  याचे संशोधन सुरु आहे. महात्‍मा गांधीच्‍या नावाने सुरु झालेल्‍या या हिंदी विश्‍व विद्यापिठाच्‍या विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्‍याची हमी त्‍यांनी यावेळी दिली.
          कुलगुरु गिरीश्‍वर मिश्र म्‍हणाले, हिंदी विश्‍वविद्यापिठामध्‍ये केवळ हिंदी साहित्‍याचेच अध्‍ययन होत नाही तर अनेक सॉफ्टवेअर सुध्‍दा हिंदी भाषेत  या विद्यापिठाने तयार केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान  हे  विषय हिंदीतून सुरु करण्‍यासाठी प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला आहे. हिंदीचे महत्‍व असणारे मंत्री या विद्यापिठाच्‍या स्‍थापना दिवस कार्यक्रमाला उपलब्‍ध होणे हे आमच्‍यासाठी अमुल्‍य भेट असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. हिंदी भाषेला समृध्‍द करण्‍यासाठी हे विद्यापिठ नेहमीच पुढाकार घेईल असे आश्‍वासन सुध्‍दा त्‍यांनी यावेळी दिले.
          या कार्यक्रमात प्राध्‍यापक रचना अरगडे यांच्‍याकडून संपादित आणि हिंदी विश्‍व विद्यापिठाकडून प्रकाशित हिंदीतील श्रेष्‍ठ कवी समशेर बहादूरसिंग यांच्‍या रचानावलीचे अतिथीच्‍या हस्‍ते विमोचन करण्‍यात आले. तसेच विद्यापिठाचे कॅलेंडर व दैनंदिनीचे सुध्‍दा प्रकाशन करण्‍यात आले. हिंदी भाषा क्षेत्रामध्‍ये सृजनात्‍मक कार्य करणा-या प्रा. रंजना अरगडे, डॉ. चंद्रकांत पाटील, अमिताभ शंकरराय चौधरी, प्रा. टी.आर. भट्ट, प्रा. इंद्रनाथ चौधरी यांचा शाल श्रीफळ आणि सन्‍मानपत्र देऊन मान्‍यवरांचे हस्ते  गौरव करण्‍यात आला.
          कार्यक्रमाचे स्‍वागतपर प्रास्‍ताविक  प्रतिकुलपती प्रा. आनंदवर्धन शर्मा यांनी केले तर संचालन प्रा. प्रिती सागर आणि आभार कुलसचिव डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र यांनी वयक्‍त केले. कार्यक्रमाला हिंदी साहित्‍य क्षेत्रातील मान्‍यवर साहित्‍यीक सुर्यबाला, कुमुद शर्मा, डॉ. उषा शर्मा तसेच शहरातील मान्‍यवर साहित्‍यीक आणि विद्यापिठातील प्राध्‍यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
                                                0000





Thursday, 22 December 2016

प्रधानमंत्री  पिक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी व्‍हावे
-         जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
    वर्धा, दि.21- रब्‍बी  हंगाम 2016-17 मध्‍ये प्रधानमंत्री  पिक विमा योजना वर्धा जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी  सहभागी होण्‍याची अतिंम मुदत 31 डिसेंबर 2016 आहे. कर्जदार शेतक-यासाठी पिक विमा योजना बंधनकारक असून  बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतक-यांचा विमा बँकेमार्फत भरला जाईल तर बिगर कर्जदार शेतक-यांनी अर्जासह विमा हप्‍ता विहित कालावधीमध्‍ये बचत खाते  असलेल्‍या बँकेच्‍या शाखेमध्‍ये भरुन या योजनेत सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल  यांनी केले आहे.  

                    योजनेत समाविष्‍ट पिके आणि विमा संरक्षित रक्‍कम या प्रमाणे आहे.  गहू (बा) विमा संरक्षित रक्‍कम  प्रती हेक्‍टर रु 33 हजार रुपये आणि  शेतक-यांना  भरावयाचा विमा हप्‍ता 495 रुपये.  गहू (जि) विमासंरक्षित रक्‍कम प्रती हेक्‍टर रु. 30 हजार रुपये असून   शेतक-याने  भरावयाचा विमा हप्‍ता  450 रुपये आहे. हरभरा पिकासाठी  24  हजार रुपये विमा संरक्षित रक्‍कम असून   शेतक-याने भरावयाचा विमा हप्‍ता  360 रुपये आहे.तसेच  सुर्यफुलासाठी   विमा संरक्षित रक्‍कम  प्रती हेक्‍टर  22 हजार रुपये आणि  शेतक-याने  भरावयाचा विमा हप्‍ता  330 रुपये तर उन्‍हाळी भुईमुग  विमा संरक्षित रक्‍कम  प्रती हेक्‍टर  36 हजार रुपये शेतक-याने  भरावयाचा विमा हप्‍ता 540 रुपये आहे.  रब्‍बी कांदा पिकासाठी  विमा संरक्षित रक्‍कम  प्रती हेक्‍टर  60 हजार रुपये  शेतक-याने  भरावयाचा विमा हप्‍ता  3 हजार रुपये आहे. 31 डिसेंबर पूर्वी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे. 
अरबी समुद्रातील छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते  २४ डिसेंबरला भूमिपूजन
Ø  सोहळ्यास उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

वर्धा, दि.20 : मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन  मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिली.

राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
 राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला, परंतु, त्याच्या उभारणीसाठी त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑक्टोबर-2014 मध्ये राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली.त्यानंतर सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करण्यात आल्या. या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची  ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
      आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची  कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  या स्मारकात  महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन  गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज         वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.

प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या असून 30 जानेवारीपर्यंत त्यांची स्वीकृती केली जाईल. त्यानंतर  19फेब्रुवारीपर्यंत कार्यादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरु झाल्यानंतर 36 महिन्यातच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.

Wednesday, 7 December 2016

पदवीधर अशंकालीन उमेदवारांनी शपथपत्र सादर करावे
            वर्धा,दि.5- वर्धा जिल्‍ह्यातील पदविधर अशंकालीन उमदवरांनी पदविधर अशंकालीन म्‍हणून 3 वर्ष पुर्ण काम केल्‍याचे सक्षम प्राधिका-याने (तहसिलदार) दिलेले प्रमाणपत्र  प्राप्‍त केलेले आहे. अशा सर्व अशंकालीन उमेदवारांनी विहित नमुण्‍यात (विहित नमुना जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकिय ईमारत, तळ  मजला, वर्धा या कार्यालयात उपलब्‍ध आहे.) साध्‍या कागदावर शपथपत्र  व त्‍यावर उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचे अलिकडील छायाचित्र लावलेले मुळ शपथपत्र कार्यालयात स्‍वतःप्रत्‍यक्ष येऊन  सादर करावे.
         अशंकालीन उमेदवारांचे यादीमध्‍ये नांव असलेले परंतु यापुर्वी  ज्‍या  उमेदवारांनी शपथपत्र सादर केलेली नाहीत अश्‍याच उमेदवारांनी सादर करावयाची आहे. ज्‍या उमेदवारांनी यापूर्वी शपथपत्र सादर केलेली आहेत अश्‍या उमेदवारांनी  पुनश्‍चः देण्‍यात आवश्‍यकता नाही.
          शपथत्रासोबत पदविधर अशंकालिन म्‍हणून 3 वर्ष पूर्ण काम केल्‍याचे सक्षम  प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्राची छायाप्रत (तहसिलदाराचे प्रमाणप्रत), पदविधर अशंकालीन उमेदवार सद्यस्थितीस कोणतीही नोकरी  करीत नसल्‍यास व तो एखादा खाजगी व्‍यवसाय  करीत असल्‍यास (सध्‍याचे उदर निवार्हाचे साधन) असा अर्ज, उमेदवाराचे  नोंदणी कार्डाची छायाप्रत (ऑनलाईन असलेले).
          वरील सर्व  कागदपत्रे  ( शपथपत्र व कागदपत्रे) या कार्यालयास दिनांक  21 जानेवारी, 2017 पर्यंत जिल्‍हा  कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय ईमारत, तळ मजला, वर्धा या कार्यालयात सादर  करण्‍यात यावे, असे  सहायक संचालक जिल्‍हा कौशल्‍य  विकास, रोजगार  व उद्योजकता  मार्गदर्शन केद्र वर्धा यांनी कळविले आहे.   
                                                       0000000

    प्र.प.क्र- 816                                                                     5 डिसेंबर , 2016
दुध भेसळीच्‍या प्रकरणात आरोपीला सहा महिने शिक्षा व दंड
            वर्धा,दि.5-अन्‍न भेसळ प्रतिबंधीत कायदा 1954 अंतर्गत कारवाई होऊन भेसळयुक्‍त दुधाची विक्री केल्‍याप्रकरणी मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी  यांच्‍या न्‍यायालयाने  आरोपीला सहा महिने सश्रम कारावस व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आलेली आहे दंड न भरल्‍यास आरोपीला आणखी एक महिना साध्‍या करावासाची शिक्षा प्रस्‍तावीत आहे.
          अन्‍न भेसळ  प्रतिबंधक कायदया अंतर्गत तत्‍कालीन अन्‍न निरीक्षक एस.पी नंदनवार यांनी मे.राजेंद्र दुध डेअरी, विठ्ठल मंदिर रोड, मालगुजारीपुरा या पेढीस भेट देऊन आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे यांचेकडुन मे. पवन मिल्‍क अॅण्‍ड फुड प्रोडक्‍टस, तुमसर रोड भंडारा यांच्‍याद्वारे उत्‍पादित करण्‍यात आलेले ‘पाश्‍चराईज्‍ड होमोजीनाईज्‍ड टोन्‍ड दुध (पचन ब्रॅन्‍ड) या अन्‍नपदार्थाचा नमुना दिनांक 21 नोव्‍हेबर, 2009 रोजी भेसळीच्‍या संशयावरुन  विश्‍लेषणाकरीता घेण्‍यात आला होता. सदर नमुना विश्‍लेषाणाअंती कायदयाने ठरवून दिलेल्‍या टोन्‍ड दुध मानदापेक्षा कमी मानदाचे अर्थात अप्रमाणित घोषित  झाला होता. सदर दुधामध्‍ये मिल्‍क फॅट 3 टक्‍के  आवश्‍यक असतांना 2.7 टक्‍के आढळुन आले होते. तसेच एसएनएफ 8.5 आवश्‍यक असंताना विश्‍लेषणांअती 4.62 टक्‍के आढळुन आले होते. त्‍यामुळे सदर दुधाचा नमुना अप्रमाणित घोषित  करण्‍यात  आला होता. प्रकरणाचा संपुर्ण तपास व चौकशी तत्‍कालीन अन्‍न निरीक्षकाने करुन प्रकरण मे 2010 मध्‍ये मुख्‍य न्‍यायादंडाधिकारी, वर्धा  यांचे न्‍यायालयात न्‍यायप्रविष्‍ट केले होते. सदर प्रकरणी भेसळयुक्‍त दुधाचाही विक्री केल्‍यामुळे राजेद्र भुराजी अवथळे, मे. राजेद्र दुध डेअरी, मालगुजारीपुर, वर्धा  यांना आरोपी करण्‍यात आले होते.
          सदर खटल्‍यामध्‍ये तत्‍कालीन अन्‍न निरीक्षक एस. पी. नंदनवार  तसेच एस.बी. नारागुडे, तत्‍कालीन सहायक आयुक्‍त (अन्‍न), वर्धा  यांची साक्ष पुरावे नोंदविण्‍यात आले  होते. त्‍यानंतर आरोपीच्‍या वतीने व  शासनाच्‍या वतीने युक्‍तीवाद करण्‍यात आला व युक्‍तीवादानंतर उपरोक्‍त आरोपींनी भेसळ युक्‍त दुधाचे विक्री केल्‍याचे असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍यामुळे जनहिताच्‍या व जनस्‍वस्‍थाचा विचार करुन तसेच अशा प्रवृत्‍तीला आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने विद्यमान मुख्‍य न्‍यादंडाधिकारी, श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यानी आरोपी राजेंद्र भुराजी अवथळे याने भेसळ युक्‍त दुधाची विक्री केल्‍याप्रकरणी सहा महिने सश्रम करावासाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्‍यास आणखी एक महिना साध्‍या कारावासाची शिक्षा ठोठावण्‍यात आली. आदेश दिनांक  30 नोंव्‍हेबर, 2016 खुल्‍या न्‍यायालयात पारित करण्‍यात आलेले आहे.
          शासनाच्‍या  वतीने सहायक सरकारी अभियोक्‍ता  एस. डी. स्‍थुल यांनी यशस्‍वी युक्‍तवाद करुन न्‍यायालयाला निष्‍कर्षापर्यंत पोहचण्‍यासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर खटल्‍याचा यशस्‍वी पाठपुरावा अन्‍न व औषध प्रशासनाचे सद्याचे कार्यरत अन्‍न सुरक्षा अधिकारी रविराज भो. धाबर्डें व ल.प्र. सोयाम यांच्‍या मार्फत करण्‍यात आला. सदरची कारवाई अन्‍न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्‍त (अन्‍न) ज. रा. वाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्‍यात आली.
          भेसळयुक्‍त दुधाचे उत्‍पादन साठवणुक व विक्री होत असल्‍याचे आढळल्‍यास यापुढेही अशीच कठोर करवाई करण्‍यात येईल असे, आवाहन नागपूर विभागाचे सह आयुक्‍त (अन्‍न ) केकरे यांनी  केले आहे.
                                                           000000
   





एचआयव्‍ही आजारासाठी आपल्‍याला घाबरण्‍याची गजर नाही
                                                                                                  - जिल्‍हाधिकारी
वर्धा,दि.5 – महाराष्‍ट्र राज्‍य एड्स नियंत्रण संस्‍था व सामान्‍य रुग्‍णालय वर्धा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने जागतिक दिन 1 डिसेंबरच्‍या दिनाचे औचित्‍य साधुन सामान्‍य रुग्‍णालय वर्धा येथे एचआयव्‍ही/एड्सबद्दल जनजागृती व्‍हावी याकरिता महाविद्यालयिन विद्यार्थ्‍यांची एड्स संदेश रॅली सकाळी 8.30 वाजता जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. पुरुषोत्‍तम मडावी, डॉ. दुर्योधन चव्‍हान, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, डॉ. अजय डवले, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी व अभ्‍युदय मेघे यांच्‍या हस्‍ते रॅलिला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्‍यात आली.
रॅलिचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष मा. जिल्‍हाधिकारी शैलेश नावल तसेच प्रमुख अतिथी मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्‍या प्रमुख उपस्थिती मध्‍ये घेण्‍यात आला. याप्रसंगी मा. जिल्‍हाधिकारी यांनी इतर आजाराप्रमाणे एचआयव्‍हीचा आजार झाला आहे. इतर बरेचसे आजार आहेत ज्‍यावर अजुनही औषोधोचार नाही. त्‍यामुळे आपल्‍याला घाबरण्‍याची गजर नाही. ‘होऊया सारे एकसंघ, करुया एचआयव्‍हीचा प्रतिबंध’, रोगप्रतिबंधक उपचार, हिंसा नाही, शून्‍य कलंक व भेदभाव, हानी कमी करणे, एचआयव्‍हीसाठी औषधौपचार. या वर्षीच्‍या घोषवाक्‍याने रॅलिची सुरुवात सामान्‍य रुग्‍णालय, वर्धा येथुन निघुन बस स्‍टॉप ते बजाज चौक ते सौशालिस्‍ट चौक ते इंगोले चौक ते इतवारा बाजार परीसरात रॅलीद्वारे एचआयव्‍ही/एड्स प्रतिबंधाचा संदेश देवून गर्दिच्‍या ठिकाणी पॉम्‍पलेट्स वाटण्‍यात आले. तसेच विद्यार्थांनी स्‍लोगनच्‍या माध्‍यमातून एचआयव्‍ही प्रतिबंधात्‍मक संदेश दिला. रॅलिला शहरातील विविध शैक्षणिक संस्‍थातील 1000 महाविद्यालयिन विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी रुग्‍णालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. शिवा देवगडे, जिल्‍हा कार्यक्रम अधिकारी, रंजन हूमने जिल्‍हा पर्यवेक्षक, उत्‍कर्ष जनकल्‍याण शिक्षण संस्‍था, नोबल शिक्षण संस्‍था, डॉ. पाठक तसेच विहान संस्‍था, महाराष्‍ट्र नर्सिंग स्‍कूल, शासकिय नर्सिग स्‍कुल, कासाबाई नर्सिग स्‍कुल, एकविरा नर्सिंग स्‍कुल, शालोकम नर्सिंग स्‍कुल, सातवा नर्सिंग स्‍कुल, राधास्‍वामी नर्सिंग स्‍कुल, राधिकाबाई मेघे नर्सिग कॉलेज सावगी मेघे, नंदाताई लहवे नर्सिंग स्‍कुल, महात्‍मा गांधी महाविद्यालय व शहरातील विविध शैक्षणिक संस्‍थानी या एड्स संदेश रॅलिमध्‍ये सहभाग घेतला. तसेच रुग्‍णालयिन अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्‍ये सहभाग घेतला यामध्‍ये आयसीटीसी विभाग, एआरटी विभाग, रक्‍तपेढी विभाग, एनआरएचएम विभाग यांनी सहभाग घेतला.
00000
प्र.प.क्र- 813                                                                 4 डिसेंबर , 2016
डिजीटल फायनांन्‍स लिट्रसी कार्यक्रम
वर्धा,दि.3– आता आपले सरकार केंद्रा मार्फत गावातील व्‍यक्‍तींना पैस्‍या विना व्‍यवहार करणे शक्‍य आहे याचे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. ही योजना प्रत्‍यक्षात अंमलता आल्‍यावर डेबीट, क्रेडीड कार्डची आवश्‍यकता संपण्‍याची शक्‍यता आहे. पैसे पाठविणे, मिळविणे, खरेदी करणे, बील भरणे इत्‍यादी कामे कॅशलेस इकॉनामी प्रणालीने व आधार क्रमांकाच्‍या माध्‍यमातून अधिक सुकर होणार आहे. गाव पातळीवरील आपले सरकार केंद्र चालक हे स्‍थानिक लोकांना मोबाईलद्वारे व आधार सक्षम प्रणालीद्वारे रोकड विरहित आर्थिक व्‍यवहार कसे करावे याबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम वर्धा जिल्‍ह्यातील 354 आपले सरकार केंद्रामार्फत ग्रामपंचायतस्‍तरावर आयोजित करण्‍यात येत आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ लोकांनी उपस्थित राहून घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
00000
    प्र.प.क्र- 814                                                                     5 डिसेंबर , 2016
आयोगातर्फे सन- 2017 मध्‍ये आयोजि स्‍पर्धा
परीक्षांच्‍या अंदाजित वेळापत्र जाहिर
वर्धा,दि.5 – महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्‍यात येणा-या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्‍यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्‍या www.mpsc.gov.in या संकेतस्‍थाळावर (वेबसाईटवर) प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे.
शासनाच्‍या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्‍यात येते, त्‍यानुसार सन 2017 मध्‍ये घेण्‍यात येणा-या विविध परीक्षांचे दिनांक प्रस्‍ताविक परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले आहे.  संघ लोकसेवा आयोग, इतर लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, विविध विद्यापिठे, परिक्षा घेणा-या इतर संस्‍था इत्‍यादिंकडून आयोजित करण्‍यात येणा-या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्‍या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात येते. जेणेकरुन, आयोगाच्‍या व संबंधीत संस्‍थांच्‍या परिक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळाची अनेकवेळा चर्चा झाली असून त्‍यावेळी विधीमंडळात देण्‍यात आलेल्‍या आश्‍वासनानुसार कोणत्‍याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्‍यानुसार सर्व संबंधित संस्‍थांनाच्‍या प्रस्‍तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे. वेळापत्रकास व्‍यापक प्रसिध्‍दी देणे गरजेचे असल्‍यामुळे प्रस्‍तुत वेळापत्रक/कार्यक्रम कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.
सदर वेळापत्रक आयोगाच्‍या www.mpsc.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे अपर सचिव, महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

000000
           कृषि निविष्‍ठांची खरेदीची रक्‍कम ऑनलाईन पध्‍दतीने अदा
वर्धा,दि.3–बियाणे, खते व किटकनाशके या कृषि निविष्‍ठांची खरेदी शेतक-याकडून केली जाते. या कृषि निविष्‍ठांची बहुतांशी खरेदी रोखीने केली जाते. सध्‍याच्‍या रोख चलन टंचाईमुळे अशा खरेदीवर अडचणी येऊ नयेत म्‍हणून शेतक-यांनी ऑनलाईन पध्‍दतीने खरेदीची रक्‍कम अदा करण्‍याची पध्‍दत अवलंबवावी असे आवाहन कृषि आयुक्‍तांनी केले आहे.
ज्‍या बँकेत शेतक-यांचे खाते आहे त्‍या बँकेतून NFFT (National Electronic Fund Transfer) द्वारे निविष्‍ठा विक्री केंद्र धारकाच्‍या खात्‍यावर निविष्‍ठा खरेदी बिलाची रक्‍कम जमा करु शकतात. त्‍यासाठी शेतक-याने ज्‍या दुकानातून कृषि निविष्‍ठा घ्‍यावयाच्‍या आहेत त्‍या दुकानदाराकडून घ्‍यावयाच्‍या निविष्‍ठांची रक्‍कम निश्चित करुन घ्‍यावी व दुकानदाराकडून त्‍याची कच्‍ची पावती व दुकानदाराचे बँक खाते क्र. व बँकेसंदर्भातील तपशिल जसे आय.एफ.एस.सी. कोड लिहुन घ्‍यावे. सदर तपशिल शेतक-याचे ज्‍या बँकेत खाते आहे त्‍या बँकेकडे देऊन घ्‍यावयाच्‍या निविष्‍ठांच्‍या रकमे एवढी स्‍लीप बँकेस भरुन द्यावी. यानंतर बँकेद्वारे शेतक-याच्‍या खात्‍यावरुन परस्‍पर दुकानदाराच्‍या खात्‍यावर निविष्‍ठाची रक्‍कम जमा होईल. बँक शेतक-याला पोहोच म्‍हणून युनिक विशेष व्‍यवहार संदर्भ क्रमांक UTR देईल. बँकेद्वारे प्राप्‍त झालेली विशेष व्‍यवहार संदर्भ क्रमांक UTR शेतक-यांने दुकानदाराला द्यावे व त्‍या आधारे दुकानदार शेतक-याला कृषि निविष्‍ठा देईल. त्‍यामुळे शेतक-यांना कृषि निविष्‍ठा खरेदी कॅशलेस करता येईल.   


प्र.प.क्र- 810                                                                 3 डिसेंबर , 2016
जिल्‍ह्यातील उद्योग घटकांची नोंदणी मोहिम
वर्धा,दि.3– जिल्‍ह्यातील चालू उद्योग घटकांची नोंद करण्‍याची मोहिम जिल्‍हा उद्योग केंद्रा मार्फत 1 डिसेंबर, 2016 पासून घेण्‍यात येत आहे. वर्धा मार्फत जिल्‍ह्यातील चालू केंद्र सरकारच्‍या सुक्ष्‍म, लघु मध्‍यम उपक्रम विभागाच्‍या www.msmedatabank.in या संकेतस्‍थळावर करण्‍यात यावी. या संकेतस्‍थळावर निर्मिती व सेवा उद्योग घटकांची नोंद घेण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक यांनी दिली.
जिल्‍ह्यातील उद्योजकांना त्‍याच्‍या उद्योग घटकांची नोंद www.udyogaadhaar.gov.in  या शासनाच्‍या संकेतस्‍थळावर नोंद केलेली आहे. त्‍याच उद्योग घटकांची नोंद केंद्र सरकारच्‍या www.msmedatabank.in या संकेस्‍थळावर होत आहे. उद्योग घटकांची नोंद केल्‍यावर संकेस्‍थळावर नोंद झाले बाबतचे प्रमाणपत्र आपल्‍या e-mail वर तात्‍काळ उपलब्‍ध होते. सदर उद्योग घटकांच्‍या नोंदणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पासबुक, उद्योग विषयी सविस्‍तर माहिती असणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा उद्योग केंद्र, येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्‍यवस्‍थापक,सचिन पाटील जिल्‍हा उद्योग केंद्राचे यांनी केले आहे.
0000
                                     






प्र.प.क्र- 811                                                                 3 डिसेंबर , 2016
सन 2016 या वर्षाकरिता वर्धा जिल्‍ह्यातील लघु उद्योजकांसाठी जिल्‍हा पुरस्‍कार योजना
वर्धा,दि.3– महाराष्‍ट्र राज्‍य उद्योग संचालनालयामार्फत लद्यु उद्योजकांसाठी जिल्‍हा स्‍तरावर जिल्‍हा पुरस्‍कार योजना दर वर्षी राबविण्‍यात येते. सन 2016 या वर्षात वर्धा जिल्‍ह्यात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या उत्‍कृष्‍ट लद्यु उद्योजकांकरिता ही योजना राबविण्‍यात येत आहे.यासाठी लघु उद्योजकांनी 15 डिसेंबर, 2016 पर्यंत विहीत नमुन्‍यात अर्ज करावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक सचिन पाटील यांनी केले आहे.
नवीन लघु उद्योजकांना प्रेरणा व उत्‍साह निर्माण करुन उद्योजकाच्‍या आवश्‍यक गुणाचा विकास करणे हा या योजनेचा मुख्‍य उद्देश आहे. या योजने अंतर्गत जिल्‍हा स्‍तरावर दोन पात्र उद्योजकांची निवड करण्‍यात येईल. प्रथम पुरस्‍कर रु. 15 हजार रुपये रोख व मानचिन्‍ह, द्वितीय पुरस्‍कार रु. 10 हजार रुपये रोख व मानचिन्‍ह असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. ज्‍या उद्योजकांना स्‍थायी लघु उद्योग नोंदणी दिनांक 31 डिसेंबर, 2012 ला किंवा त्‍यापुर्वी मिळाली आहे व ज्‍याचे उत्‍पादन सतत दोन वर्षापासून चालू आहे, अशांनाच या योजनेचा लाभ देता येईल.
ज्‍या लद्यु उद्योजकांना यापुर्वी जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळालेला आहे अशाच उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जदार लद्यु उद्योजक कोणत्‍याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लघु उद्योजकांनी विहीत नमुन्‍यात दिनांक 15 डिसेंबर, 2016 पर्यंत अर्ज करावा. अर्जाच्‍या नमुन्‍यासाठी जिल्‍हा उद्योग केंद्राशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्र, महाव्‍यवस्‍थापक यांनी केले आहे.
000000