Saturday, 11 August 2012

वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी 434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्या त सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0), आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4), आणि कारंजा-40 (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6 मि.मी. .

वर्धा जिल्ह्यात पावसाची सरासरी 434.6 वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0),
आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4),
आणि कारंजा-40  (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6  मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.

Friday, 10 August 2012

वर्धा जिल्ह्यात पावसाची सरासरी 434.6 मि.मि.


    वर्धा, दिनांक 11 : वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 20.2 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. आतापावेतो जिल्ह्यात एकूण सरासरी  434.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 40.0 मि.मी. पाऊस झाला आहे.
          जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
          वर्धा- 24.00 मि.मी.(455.6), सेलू- 11 मि.मी.(245.0), देवळी-4.6 (309), हिंगणघाट-निरंक-.(488.0), आर्वी-25.0 मि.मी.(519.0),
आष्टी 30.0 मि.मी.(381.2), समुद्रपूर-7.2 मि.मी.(599.4),
आणि कारंजा-40  (479.6 )मि.मी. पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत 434.6  मि.मी. सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
                                  0000000

राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियाना अंतर्गत कार्यशाळा


        वर्धा, दि. 10- जिल्‍हा परिषद वर्धाच्‍या आरोग्‍य विभागातर्फे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व  वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामिण रुग्‍णालय तसेच सर्व आरोग्‍य पर्यवेक्षक आणि आरोग्‍य कर्मचारी  यांच्‍या करीता राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियान अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा सन 2012-13 या विषयावर  कार्यशाळेचे आयोजन दि. 2 ऑगस्‍ट 2012 रोजी जिल्‍हा प्रशिक्षण पथक येथे करण्‍यात आले.
            या कार्यशाळेचे उदघाटन प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  यांचे अध्‍यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. दिलीप माने , डॉ. एस.डी.निमगडे, स्‍वयंसेवी संस्‍थेचे प्रतिनिधी  अभयुदय मेघे यांचे उपस्थित दिप प्रजवलन करुन करण्‍यात आले.
       या कार्यशाळेचे प्रासताविक मध्‍ये बोलतांना डॉ. दिलीप माने  म्‍हणाले  जिल्‍हा सतरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा व कार्यशाळचे आयोजनामागील भुमिका विषय केली.
       आपल्‍या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  म्‍हणाले की जिल्‍ह्यातील सर्व गरोदर मातांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा पुरविल्‍यास  प्रसुतीमध्‍ये  होणारी गुंतागुंत टाळता येवून एक नविन सुदृढ पिढी निर्माण होईल. सर्व गरोदर मातांची प्रसुती ही शासकिय संस्‍थेतच व्‍हावयास पाहिजे यावर विशेष भर दिला तसेच आराखउ्याची अंमलबजावणी आरोग्‍य विभागातील शेवटच्‍या स्‍तरापर्यंत प्रभावीपणे करणे अतिशय महत्‍वाचे आहे. जेणे करुन जिल्‍ह्यातील प्रत्‍येक नागरिकांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा देता येईल.
      कार्यशाळेत इतर मान्‍यवरांनी  आपले मार्गदर्शनपर विचार व्‍यकत केले. यानंतर  डॉ. निमगडे यांनी सर्व विषयाच्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने सादरीकरणाव्‍दारे कार्यशाळेला मार्गदर्शन केले तसेच जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा  कार्यक्रमाचे, आशा योजना, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम, आय.पी.एच.एस.आर.के.एस. तसेच ईतर राष्‍ट्रीय कार्यक्रमाचे सादरीकरण त्‍यासंबधीत  समन्‍वयकाने  विभाग प्रमुखाने केले.
       या कार्यशाळेच्‍या आयोजनाकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. राज गहलोत व  जिल्‍हा व्‍यवस्‍थापन अधिकारी डॉ. कु. अनुजा बारापात्रे यांच्‍या संपूर्ण कर्मचारी वृंदानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन सुनिल गायधने यांनी केले.
                                                                0000000

माजी वायु सैनिकांच्‍या पाल्‍यांना शिष्‍यवृत्‍ती


वर्धा, दि.10- माजी वायुसैनिकांच्‍या पाल्‍यांसाठी सन 2012-13 करीता  शिष्‍यवृत्‍ती  दि. 28 जून 2012 चे अन्‍वये  जाहिर झाली असून, नमुना फॉर्म व माहितीपत्रक  IAF BA  च्‍या www.indianairforce.nic.in   या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे.  यासाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण  अधिकारी, वर्धा यांच्‍याशी संपर्क साधावा.
                                                0000 

माजी सैनिक रोजगार मेळावा


            वर्धा,दि.10- जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी वर्धा यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार दिनांक 29 ऑगस्‍ट 2012 रोजी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे सकाळी  11 वाजता माजी सैनिकांचा  रोजगार मेळावा आयोजीत केलाआहे.
        रोजगार पटावरील माजी सैनिकांनी  मेळाव्‍यास उपस्थित रहावे व रोजगार नोंदणीपत्रक अद्यावत करण्‍यासाठी सोबत आणावे. असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.

                                                0000

हत्‍यारबंद पहरेदाराची भरती


         वर्धा,दि.10-स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद, प्रधान कार्यालय, गनफउनड्री हैदराबाद यांनी महाराष्‍ट्र राज्‍यात विविध ठिकाणी स्‍टेट बँक ऑफ हैदराबादमध्‍ये हत्‍यारबंद पहारेदार यांची भरती करण्‍याबाबत कळविले आहे तरी ईच्‍छुक  माजी सैनिक उमेदवारांनी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे दिनांक 17 ऑगस्‍ट 2012 पर्यंत संपर्क करावा.
          उमेदवाराची  शैक्षणिक पात्रता 8 वी पास,  उमेदवार 12 वी पास नसावा. शारीरीक पात्रता  SHAPE-I , आवेदन पत्र पोहचण्‍याची  शेवटची तारीख 25 ऑगस्‍ट 2012 आहे. उमेदवारांनी  जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, शाळा सोडल्‍याचा दाखल, डिस्‍चार्ज बुक याचा समावेश असावा.
          वर्धा जिल्‍ह्यातील पात्र माजी  सैनिकांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी  या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन फ्ला.ले.धनंजय य. सदाफळ, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी , वर्धा यांनी केले आहे.
                                                0000000

Thursday, 9 August 2012

अत्‍याचार पिडीतांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्‍ध करुन द्यावे - जिल्‍हाधिकारी


          वर्धा, दि. 9- अनुसूचित जाती व अनुसूचित जामीतीच्‍या घटकातील अत्‍याचार पिडीतांना कायदेशिररित्‍या त्‍वरीत लाभ व न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जातीच्‍या प्रमाणपत्राची गरज असते.  अन्‍यथा  असे प्रकरणातील लाभार्थींना लाभ व न्‍याय मिळवून देण्‍यासाठी विलंब लागतो. या प्रकरांना विलंब होऊ नये यासाठी संबधित विभागाने अत्‍याचार पिडीतांना जातीचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिले.
          जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात आज जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते.
      यावेळी अप्‍पर पोलीस अधिक्षक टि.एस.गेडाम, सामाजिक न्‍याय विभागचे सहाय्यक आयुक्‍त के.जे. बागुल, समितीचे सदस्‍य विजय पर्वत, डॉ. ए.एच.रिझवी, चंद्रशेखर झोड, शासकिय अभियोक्‍ता एम.एन.माळोद व नाहस विभागाचे पोलीस निरीक्षक ए.पी. सातघरे आदी मान्‍यवर  उपस्थित होते.
       ग्रामीण क्षेत्रातील अत्‍याचार पिडीतांना पुरेसे ज्ञान नसल्‍यामुळे  त्‍या व्‍यक्‍ती  कायदेशिर बाबीसाठी पुढाकार घेत नसल्‍याचे सांगून जिल्‍हाधिकारी चन्‍ने म्‍हणाले की  अन्‍यायग्रस्‍थ  लोकांना कायदेशिर बाबीचे मार्गदर्शन करुन आवश्‍यक ते कागदपत्रे प्राप्‍त  करुन घेतल्‍यास पिडीतांना शासनाकडून अर्थसहाय्य  मंजूरीच्‍या प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल.  त्‍याचा लाभ सर्वसामान्‍य पिडीतांना होऊ शकेल.
        याप्रसंगी बोलताना सहाय्यक आयुक्‍त बागुल म्‍हणाले की, एप्रिल 2012 ते जुलै 2012 याकालावधीमध्‍ये अनुसूचित जाती व जमाती अत्‍याचारप्रतिबंध कायद्याअंतर्गत 9 प्रकरणापैकी 4 प्रकरणे  न्‍यायालयात दाखल झाली असून उर्वरीत पाच प्रकरणे  पोलीस तपासावर आहेत. त्‍यातील काही प्रकरणांत जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. तथापि या 9 प्रकरणापैकी तीन प्रकरणामध्‍ये लाभार्थ्‍यांना  1 लक्ष 81 हजार 250 रुपयाचे अर्थसहाय्य देण्‍यात आले असल्‍याची माहिती  त्‍यांनी  दिली.
       यावेळी समितीच्‍या सदस्‍यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले.
                                           000000