Saturday, 7 July 2012

उपविभागीय दंडाधिका-या मार्फत स्‍पोटाची चौकशी


     वर्धा दि.7- मेसर्स अरावली एक्‍सफलोझिव्‍ह अॅण्‍ड केमीकल कंपनी,तळेगांव रघुजी ता.आर्वी येथे दिनांक 23 मे,2012 रोजी स्‍पोट होवून 2 मजुर मृत्‍यू पावले असून 5 मजुर गंभीर जखमी झालेले आहे.सदर प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आर्वी यांची नियुक्‍ती केलेली आहे.
          सदर प्रकरणाची चौकशी उपविभागीय कार्यालयात सुरु आहे.या घटनेविषयी कोणाला काही माहिती किंवा पुरावे द्यायचे असल्‍यास त्‍यांनी दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त कार्यालयीन वेळेत द्यावे असे उपविभागीय दंडाधिकारी,आर्वी यांनी कळविले आहे.
0000

तलाठी रिक्‍त पदे सरळसेवेने भरती 24 जुलै पर्यंत अर्ज स्विकारले जातील


         वर्धा दि.7- तलाठी रिक्‍त पदांची सरळ सेवेने भरती होणार असून दिनांक 12 जुलै पर्यन्‍त अर्ज मागविण्‍यात आले होते..आता अर्ज स्विकारण्‍यास मुदतवाढ  दिली असल्‍यामुळे उमेदवारांनी 16 जुलै,2012 पर्यन्‍त अर्ज विहीत नमून्‍यात सादर करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी वर्धा यांनी केले आहे.
         ज्‍या उमेदवारांना तलाठी पदाकरीता घेण्‍यात येणा-या लेखी परिक्षेसाठी नामनिर्देशन करावयाचे आहे.त्‍यांनी hptt://colwardha.applyjobz.com या संकेत स्‍थळावर शर्ती व अटी पाहाव्‍या..अर्ज स्विकारण्‍याचे तारखेत वाढ करण्‍यात येवून ऑन लाईन अर्ज दिनांक 16 जुलै,2012 पर्यन्‍त उपलब्‍ध राहतील.तसेच स्विकारण्‍यात येतील.  त्‍यानंतर प्राप्‍त होणा-या अर्जचा विचार केला जाणार नाही. संकेत स्‍थळावरुन अर्जाची घेलेल्‍या प्रिंटची प्रत तसेच  डी.डी.सह अर्ज या कार्यालयास दिनांक 24 जुलै,2012 पर्यन्‍त स्विकारले जातील याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्‍यावी असे जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
00000

जिल्‍ह्यांतील पर्जनमान समुद्रपूर येथे 51 मि.मी. पावसाची नोंद


         वर्धा, दि. 7- जिल्‍हयामध्‍ये सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्‍यात झाली असून तेथे 51 मि.मी.पाऊस पडला आहे.   आतापर्यंत जिल्‍ह्यातील एकूण पावसाची सरासरी 177.2 मि.मि.नोंद झाली आहे.
       तालूका निहाय पडलेला पावसाचे आकडे कंसा बाहेर असून कंसामधील आकडे हे एकून पडलेल्‍या पावसाचे आहे.
            वर्धा 38.6 (172.4) मि.मि., सेलू 9.00 (75) मि.मि.,देवळी 8.2 (139.8) मि.मि.,हिंगणघाट 17.1 (230.4) मि.मि.,आर्वी 16 (267.) आष्‍टी 3.8 (111.8) समुद्रपूर 51 (260.) कारंजा 19 (160) मि.मि. पावसाची नोंद करण्‍यात आली आहे.. आज पडलेला एकूण पाऊस 162.7 ( 1416.7) मि.मि. असून  पावसाची प्रत्‍यक्ष सरासरी 20.4 मि.मि. असून एकूण पावसाची सरासरी 177.2 एवढी नोंद करण्‍यात आली आहे.
0000

Friday, 6 July 2012

कुंडी गावाच्‍या मतदार याद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम जाहिर


         वर्धा दि.6- पंचायत समितीमधील रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीसाठी  मतदार याद्या तयार करण्‍याच्‍या कार्यक्रम जाहिर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे.
         वर्धा जिल्‍ह्यात पंचायत समिती कारंजा निर्वाचन गन क्रमांक 12- कुंडी हे पद रिक्‍त आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्‍याचा दिनांक 1 जून,2012 शुक्रवार असून  राज्‍य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्‍या तारखेस अस्तिवात असलेल्‍या विधानसभेच्‍या  मतदार यादीवरुन जिल्‍हा परिषद,पंचायत समिती निवडणूका करीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सूचना मागविण्‍याकरीता प्रसिध्‍दी करण्‍याचा दिनांक 6 जुलै,2012 आहे.
         मतदार यादी संदर्भात हरकती व सूचना दाखक करण्‍याचा अंतिम दिनांक 10 जुलै,2012 मंगळवार राहणार असून निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या छापील मतदार याद्या अधिनियमाच्‍या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्‍याचा दिनांक 16 जुलै,2012 सोमवार असेल.
         निवडणूक विभाग व निर्वाचन गणाच्‍या मतदार याद्या  लोकांच्‍या माहितीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत.याबाबतची सूचना प्रसिध्‍द करण्‍याची तारीख 16 जुलै,2012 सोमवार राहील. असे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

जिल्‍ह्यांतील पर्जनमान


         वर्धा, दि. 6- जिल्‍हयामध्‍ये  आतापर्यंत 156.8 मि.मि.सरासरी एवढा पाऊस पडला आहे. तालूका निहाय पडलेला पावसाचे आकडे कंसा बाहेर असून कंसामधील आकडे हे एकून पडलेल्‍या पावसाचे आहे.
          वर्धा 5.2 (133.8) मि.मि., सेलू 3.00 (66) मि.मि.,देवळी 8.00 (131.6) मि.मि.,हिंगणघाट 11 (113.3) मि.मि.,आर्वी 3.00(251) मि.मि.,आष्‍टी 3.00(108) मि.मि.,समुद्रपूर 17 (209) मि.मि., कारंजा 4.2 (141.3) मि.मि.,असा आज पडलेला एकून पाऊस 54.2 (1254) मि.मि.असून आज पडलेल्‍या पावसाची प्रत्‍यक्ष सरासरी 6.8 मि.मि.असून एकून पावसाची सरासरी 156.8 एवढी नोंद करण्‍यात आली आहे.
                       00000               

ग्रामीण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर -रणजित कांबळे


                                  
                                       वर्धा दि. 6 – गेल्‍या अनेक वर्षापासून तरोडा व परिसरांत विकासाचे कामे संथ गतीने सुरु होते. हे ग्रामिण क्षेत्र देवळी-पुलगांव मतदार संघात समाविष्‍ट झाल्‍यामुळे या क्षेत्राच्‍या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्‍यात येणार असून ग्रामिण क्षेत्राच्‍या विकासावर अधिक भर देण्‍यात येईल असे आश्‍वासन पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता,सार्वजनिक बांधकात विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिले.
                                    काल वर्धा तालुक्‍यातील मदनी व तरोड येथे ग्रामपंचायत भवन आंगणवाडीच्‍या जागेचे व रस्‍त्‍याचे भुमिपुजन त्‍यांचे हस्‍ते संपन्‍न झाले त्‍यावेळी तरोडा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,पं.स. सभापती धैर्यशिल जगताप,पं.स.सदस्‍य निताताई शिंदे,सरपंच सुभाष चांभारे,तहसिलदार सुधांशु बन्‍सोड, माजी जि.प. सदस्‍य देवराव पाटील, मदनीच्‍या सरपंच निर्मलाताई कोवे,उपसरपंच मनिष मेहत्रे आदि उपस्थित होते.
                                     गेल्‍या  अनेक वर्षापासून हे क्षेत्र हिंगणघाट मतदार क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ट असल्‍याचे मनूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की मतदार संघाच्‍या पूर्नविभाजनामुळे हे क्षेत्र आता पुलगांव –देवळी मतदार संघात आले आहे. त्‍यामुळे या क्षेत्राचा विकास करणे हे माझे प्राथमिक कर्तव्‍य समजतो. तरोडा ग्रामपंचायत भवनाच्‍या बांधकामासाठी 17 लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून त्‍यामधे साडे आठ लाख  जिल्‍हा नियोजन समितीच्‍या अनुदानातून साडे पांच लाख आमदार निधीतून व 3 लाख ग्रा.प. अनुदानातून खर्च होतील. गावांचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी माझया मतदार संघातून दोन गावे निवडून  प्रस्‍तावित केले असून  त्‍यातील एक गांव  तरोडा व दूसरे विजयगोपाल आहे.या गावांतील  रस्‍ते ,नालीबांधकाम व सौंदर्यिकरणासाठी 3 कोटीचा प्रस्‍ताव विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडे पाठविण्‍यात आला असून तो प्रस्‍ताव शासन स्‍तरावर मंजूर करण्‍यांत येईल. एरनगांव ते सावली हा प्रस्‍तावित असलेल्‍या रस्‍त्‍याला मान्‍यता प्रदान करण्‍यात आली आहे. गांवातील सरपंच धडाडीचा असल्‍यास कामांचा पाठपुरावा करतो त्‍यामुळे   गावांतील प्रस्‍तावित विकासाचे कामे तातडीने पूर्ण होत असतात.या परिसरातील विकासाचे कार्य प्रामाणिकपणे पूर्णत्‍वास नेणार असून जाम ते तरोडा पर्यन्‍तचा रस्‍ता येत्‍या कालखंडामध्‍ये दुरुस्‍त करुन त्‍या रस्‍त्‍याचे  डांबरीकरण केल्‍या  जाईल. तसेच प्रस्‍तावित पांधनरस्‍ते माती व मुरमाचा थर देवून रस्‍ता मजबूत करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.
                                     याप्रसंगी बोलतांना जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, अल्‍लीपूर येथील पाण्‍याचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी राज्‍यमंत्र्यांनी मोलाची मदत करुन ग्रामिण पाणीपुरवठा योजनेत साडे नऊ कोटीची योजना मंजुर केली.त्‍यामुळे ग्रामस्‍थांना दिलासा मिळाला आहे. आमदार  निधीतून अनेक विकास कामे राबविण्‍यात येत आहे असेही ते म्‍हणाले.
       यावेळी आपत्‍ती व्‍यवस्‍थापण अंतर्गत विहीरीत पडून मृत्‍यू पावलेले अमोल धनविज यांच्‍या पत्‍नी छबिनाताई यांना 1 लाखाचा धनादेश मंत्रीमहोदयांचे हस्‍ते प्रदान  करण्‍यात आला.
       याप्रसंगी मदनी व तरोडा येथील ग्रामपंचायत भवन,आंगणवाडी इमारतीच्‍या जागेचे तसेच ग्रामपंचायती अंतर्गत रस्‍त्‍याचे भुमिपुजन मंत्रीमहोदयांच्‍या  हस्‍ते करण्‍यात आले.
                                      यावेळी जगताप यांनीही समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन सुभाष चांभारे  व आभार प्रदर्शन संदिप तिमांडे यांनी मानले.यावेळी मोठया संखेत जिल्‍हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्‍थ उपस्थित होते.
                                                                                  000000

जिल्‍हयातील तिर्थस्‍थळाच्‍या विकासासाठी कटिबध्‍द -रणजित कांबळे



        वर्धा दि. 6 – जिल्‍हयात अनेक पौराणिक मंदीरे असून  त्‍यांचा संबध अनेक भाविकांशी जुळलेला आहे. ही मंदीरे त्‍यांचे श्रध्‍दास्‍थान म्‍हणून गणले गेले आहे. भाविकांना देण्‍यात येणा-या मूलभूत सोयीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी शासन प्रयत्‍नशिल असून जिल्‍ह्यातील तिर्थस्‍थळांच्‍या  विकासासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याची भावना पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभाग व पर्यटन विकास विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
         काल तिर्थक्षेत्राच्‍या क वर्ग अंतर्गत देवळी तालूक्‍यातील श्रीक्षेत्र एकपाळ येथील हनुमान मंदीर देवस्‍थानच्‍या सभामंडपाचा लाकार्पन सोहळा  व शिलाण्‍यासाचे  उदघाटन  त्‍यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, पं.सं. देवळीचे सभापती दिनेश धांदे, उपसभपती मंगलाताई इंगळे,जि.प.सदस्‍य मोरेश्‍वर खोडके एकपाळा देवस्‍थानचे अध्‍यक्ष प्रकाश कादोरकर आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.  
        एकपाळा देवस्‍थानासोबत 20 ते 25 गावे जुळलेली असल्‍यामुळे या ठिकाणी शनिवारी व रविवारी मोठया संखेने भावीकांचे आगमण होत असल्‍याचे सांगून राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की भाविकांना उन,वारा व पाणी या ऋतूपासून संरक्षण मिळावे यासाठी आमदार निधीतून सभामंडपाचे  बांधकाम करण्‍यात आले. भाविकांना स्‍वयंपाकाच्‍या सोयीसाठी पुरकअनुदान मंजुर करण्‍यात येणार आहे.जिल्‍हा नियोजन समिती  विकासा अंतर्गत तिर्थक्षेत्राच्‍या विकासा अंतर्गत नांदोरा देवस्‍थानासाठी  15 लक्ष वायगांव येथील देवस्‍थानासाठी 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात आले असून  हनुमान मंदिराच्‍या देवस्‍थानात भाविकांच्‍या सोयी सुविधेसाठी 40 लक्ष मंजुर करण्‍यात आले. कापसी देवस्‍थान येथील भाविकांच्‍या सोयी व सुविधेसाठी 10 लक्ष रुपये याआधी देण्‍यात आले असून आता 10 लक्ष रुपये मंजुर करण्‍यात येणार आहे. जिल्‍हयामध्‍ये हिंगणघाट तालूक्‍यातील आजणसरा येथील देवस्‍थानावर  मोठ्या प्रमाणावर श्रध्‍दा ठेवणारा वर्ग आहे. त्‍या ठिकाणी  हजारो भाविक येत असतात. या ठिकाणाला  शासनाने पर्यटन स्‍थळाचा दर्जा दिला असून भाविकांच्‍या सोयी व सुविधेत वाढ करण्‍यासाठी तीन कोटी रुपये मंजुर करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातील  अनेक तिर्थक्षेत्र दुर्लक्षित राहणार नाही याकडे लक्ष देण्‍याची गरज असून विस्‍वस्‍त मंडळाने शासनाकडे विकासाबाबत प्रस्‍ताव दिल्‍यास त्‍यांना टप्‍या टप्‍याने अनुदान मंजुर करुन देण्‍यात  येईल. त्‍यामुळे भाविकांना  सोयी  सुविधा  पुरविल्‍या जातील. जिल्‍ह्यात पाऊस कमी झाल्‍याची चिंता व्‍यक्‍त करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, येत्‍या काही दिवसात पाऊसमाणात वाढ होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे हवालदिल झालेल्‍या शेतक-यांना दिलासा मिळेल. पावसावर पिकाचे नियोजन करणे हे शेतक-यासाठी आवश्‍यक असलेली बाब आहे. सिंचनाशिवाय शेती परवडण्‍यासारखी नसल्‍याचे नमूद करुन राज्‍यमंत्री कांबळे म्‍हणाले की, देवळी तालुक्‍यातील सिंचन प्रकल्‍प पूर्ण होण्‍यास 4 ते 5 वर्षाचा कालावधी                      लागणार आहे. येत्‍या वर्षापासून टप्‍या टप्‍याने 5 हजार हेक्‍टरवर सिंचनाची सोय निर्माण करण्‍यात येईल. असे त्‍यांनी सांगितले. वर्धा नदीवर  पुलगांव परिसरात बॅरेक्‍स बांधण्‍याच्‍या कामाला वेग आला असून खर्डा येथीही  बॅरेक्‍स बांधकाम होणार आहे.त्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍यासोबत शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्‍ध होणार आहे.त्‍यामुळे येत्‍या दोन तीन वर्षात देवळी तालुक्‍याचे चित्र पालटणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
        जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की, तिर्थस्‍थळाच्‍या विकासामुळे भाविकांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले  असून भाविकांना मिळणा-या मुलभूत सोईमध्‍ये वाढ झाली असल्‍याचे ते म्‍हणाले.
        याप्रसंगी सभापती धांदे , गफ्फार शेख व प्रकाश कादोरकर, यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य मोरेश्‍वर खोडके यांनी केले. संचलन मनिष खोडके व आभार गुलाब डफरे यांनी मानले.यावेळी जिल्‍हा परिषद व पंचायत समितीचे सदस्‍य व परिसरातील ग्रामस्‍थ मोठया संखेने उपस्थित होते.
0000