* जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
* जिल्हा व तालुकास्तारावर 24 तास नियंत्रण
कक्ष सुरु
* विविध
विभागाच्या समन्वयाने आपदा निवारण
* पुराचा धोका असलेल्या 65 गावासाठी विशेष उपाययोजना
* नदीकाठावरील 201 गावांमध्ये जनजागृती
* 3 बोट, लाईफ जॉकेट,जिवनरक्षक साहित्य.
वर्धा,
दि.26- अतिवृष्टी, पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा व
तालुका स्तरावर तात्काळ नियंत्रण कक्ष कार्यरत
करुन विविध विभागाच्या समन्वयाने कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी
यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचना अर्थ व नियेाजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
व नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री
राजेंद्र मुळक यांनी घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर
ढगे, नगराध्यक्ष आकाश शेंडे, जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज, मुख्य कार्यपालन
अधिकारी शेखर चन्ने , अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, अपर जिल्हा पोलीस
अधिक्षक टी.एस.गेडाम तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी
जिल्हा स्तरावर नियंत्राण कक्ष सुसज्ज ठेवतांना जिल्ह्यातील प्रतयेक गावाशी
संपर्क असणारी यंत्राणा निर्माण करुन ही
यंत्रणा चोवीस तास सुरु राहील याची दक्षता घेतांनाच
नियंत्रण कक्षामध्ये जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व
विभागाच्या अधिका-यांचे दूरध्वनी असलेली
अद्ययावत यादी तयार ठेवावी व विभागाशी समन्वय ठेवावा अशी सूचनाही यावेळी
पालकमंत्र्यांनी केली.
आपत्ती व्यवस्थापना संदर्भात
विभागांची पूर्वतयारी, प्रशिक्षण , मॉकड्रील तसेच पेालीस, आरोग्य , महसूल ,
जलसंपदा विभागातील आपत्ती नियंत्रण संदर्भातील केलेल्या उपाययोजनाची माहिती नियंत्राण कक्षात एकत्र
ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात
आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत ग्रामीण
भगातील जनतेमध्ये जनजागृती सुरु असून विविध विभागातील 405 व्यक्तींना प्रशिक्षण
देण्यात आले आहे. जिल्ह्यात 3 बोटी असून दोन आर्वी व अेक बोरधरण येथे सज्ज
ठेवण्यता आली आहे. हिंगणघाट तालुक्यासाठी
अेक बोट येत्या पंधरा दिवसात खरेदी करण्याच्या सूचनाही यावेळी
पालकमंत्र्यांनी दिल्यात.
आपत्ती
निवारणार्थ 37 लाईफ जॉकेट, 28 लाईफ बॉईज, फटपंप, टॉर्च, दोर तसेच इतर साहित्य
खरेदीसाठी 40 लाख रुपये उपलब्ध झाल्याची
माहिती जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज
यांनी दिली.
नदी काठावरील गावांना पूराच्या
धोक्या संदर्भात पूर्व सूचना देण्यासाठी एसएमएस सेवा तसेच जलसंपदा विभागांनी
सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या पातळी संदर्भातील माहिती दररोज नियंत्रण कक्षाला
द्यावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत
दोनशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी त्यांच्या
सेवा उपलब्ध होणार असून, त्यांची संपूर्ण माहिती तहसिलदाराकडे उपलब्ध करुन देण्यात
यावी. विदृयुत विभागांनी विद्युत तारा तुटणे, खांब पडणे तसेच नैसर्गिक आपत्ती
निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना
तयार ठेवावी अशी सूचनाही यावेळी केली.
पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग ,
अग्निशमन यंत्रणा, नगर परिषदा, सिंचन विभाग यांनी सदैव तत्पर असावे त्यादृष्टीने
मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवावी अशी
सूचनाही पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी यावेळी केली.
जिल्हा परिषदेतर्फे नियंत्रण कक्ष सुरु
करण्यात आला असून, प्रत्येक गावामध्ये नैसर्गिक आपदेचा सामना करण्यासाठी खंडविकास अधिकारी यांनी गावनिहाय आराखडा तयार
केला आहे. जिल्ह्यातील पूरनियंत्राणासाठी
35 गावे तसेच 30 गावात यात्रा भरते अशा गावात वैद्यकिय सुविधेसह आवश्यक उपाययोजना
केल्याची माहिती जिल्हा परिशदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांनी
दिली.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती जयश्री भोज
यांनी स्वागत करुन जिल्हा आपतती व्यवस्थापना अंतर्गत करण्यात आलेल्या
उपाययोजनांची माहिती दिली.
0000