Wednesday, 18 April 2012

उष्‍माघातापासून बचाव असा करा


       वर्धा,दि.18- उन्‍हाळ्यामध्‍ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळा    करणा-या कारखान्‍याच्‍या बॉयलर रुममध्‍ये तसेच जास्‍त तापमानाच्‍या खोलीमध्‍ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर भर उन्‍हात करणे, अनवाणी फिरणे अशा प्रत्‍यक्ष उष्‍णतेशी अथवा तापमानातील वाढत्‍या परिस्थितीशी सतत संबंध येण्‍याने उष्‍माघात होतो. उष्‍माघातात थकवा येणे, ताप येणे, त्‍वचार कोरणी पडणे, भूक न लागणे, चक्‍कर येणे, निरुत्‍साही होणे, डोके दुखणे, रक्‍तदाब वाढणे, बेशुध्‍दावस्‍था ही उष्‍माघाताची लक्षणे आहेत.
    यावर प्रतिबंधक उपाय म्‍हणून वाढत्‍या तापमानातील फार वेळे कष्‍टाची कामे करणे टाळावीत. कष्‍टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्‍याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्‍णता शोषूण घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाचे वापरु नयेत. सैल, पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. ओ.आर.एस. द्रावणाचा वापर करावा. पाणी भरपूर प्‍यावे. अधूनमधून उनहामध्‍ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्‍यावी. उनहात बाहेर जातांना गॉगल्‍स, डोक्‍यावर टोपी, टॉवेल, फेटा याचा वापर करावा. उष्‍माघात उपचार रुग्‍णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे , कुलर ठेवावेत. वातानुकूलीत खोलीत ठेवावे. रुग्‍णांचे तापमान खाली आणन्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करावेत. रुग्‍णास बर्फाच्‍या पाण्‍याने आंघोळ घालावी. रुग्‍णाच्‍या कपाळावर थंड पाण्‍याच्‍या पट्टया ठेवाव्‍यात, आईसपॅक लावावेत.
     बाटली बंद पेये मग ते कोणतेही असो, ते कृत्रीम असेल तर त्‍याच्‍यात पोषणमुल्‍य कमी असुन आर्थिक दृष्‍ट्याही परवडणारे नसतात. तरीपण गेल्‍या काही वर्षात शहरात तसेच प्रत्‍येक खेड्यापाड्यात सुध्‍दा ज्‍या ठिकाणी पिण्‍याचे पाणी मिळत नाही अशा वस्‍तीतही ही थंड पेये पोहोचली आहेत. या थंड पेयात नेमके काय असते ते या बाटल्‍यांच्‍या लेबलवर कधीच लिहीलेले नसते. परंतु अनेक प्रयोग शाळेतील विश्‍लेषणा अंती या कोल्‍डींक मध्‍ये विरघळलेला कार्बनडॉय ऑक्‍साईड, कॅफीन, सायट्रीक अॅसिड, फॉस्‍फरीक अॅसीड, प्राणीजन्‍य ग्‍लीसरीन आदि शरीरास अपाय करणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. म्‍हणून प्रत्‍येकाने आकर्षक, मोहक व कल्‍पक अशा जाहीरातींना बळी न पडता व शरीराला पोषक असणारे घरी उपलब्‍ध असणारे पारंपारिक पेयाचा उपयोग करावा. कोल्‍डींकला उत्‍तम पर्याय म्‍हणून ताजे ताक, कैरीचे पन्‍हे, उसाचा रस, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, कोणत्‍याही फळाचा रस यासारखी नैसर्गीक पेये वापरल्‍यास शरीरामध्‍ये चैतन्‍य निर्माण होऊन मन उत्‍साहीत होऊन शरीराची पोषण द्रव्‍याची कमतरता भरुन निघते व शरीराला निरोगी ठेवून उष्‍माघातापासुन संरक्षणही होते.
                               0000000

नझुल जमिन बाबत सुधारीत धोरण


      वर्धा,दि.18-नागपूर व अमरावती विभागातील नझूल किंवा शासकीय जमिनीबाबत सूधारीत धोरण शासनाने दि. 28 डिसेंबर 2011 रोजी जाहीर   केले आहे. त्‍यानूसार नझूल जमिनीच्‍या  भाडेपट्टयांचे नूतणीकरण करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टयांची मुदत दि. 1 जानेवारी 2012 पूर्वी संपुष्‍टात आली आहे असे भाडे पट्टे दि. 1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्ष मुदतीसाठी शासकीय दराने  भूई भाड्याची आकारणी करुन नुतनीकरण करण्‍यात येतील.
      नझूल जमिनीच्‍या भाडेपट्टयांचे वर्ग 2 मध्‍ये रुपांतर करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टा   धारकांना अस्तित्‍वातील भाडे पट्टयाचे रुपांतर कब्‍जे हक्‍काने   वर्ग-2  धारण प्रकारात करावयाचे असल्‍यास शासकीय दराने रक्‍कम खजिना दाखल करुन रुपांतरण करता येईल.
      शर्तभंग नियमानूकूल करण्‍यासाठी भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीचा भंग करुन अनधिकृत हस्‍तांतरण किंवा वापरात बदल झाले असल्‍यास 25 टक्‍के अनर्जित उत्‍पन्‍नाची रक्‍कम भरुन शर्तभंग नियामनुकुल करता यईल.
     अधिक माहितीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा.असे उपविभागीय अधिकारी,    नझूल अधिकारी, हिंगणघाट यांनी कळविले आहे.
                              000000

Friday, 13 April 2012

विधी साक्षरता शिबीर आयोजन सामाजिक संस्‍थाकडून प्रस्‍ताव आमंत्रित



                    
   वर्धा,दि. 13-  2012-2013 या वर्षात कमीत कमी 12 विधी साक्षरता शिबीरे आयोजीत करण्‍याकरीता सामाजिक संस्‍थाकडून सहाय्य अनुदान देण्‍याकरीता विहीत नमुन्‍यात दोन प्रतीत प्रस्‍ताव  द्यावयाचे आहे.
           प्रस्‍तावासोबत सामाजिक संस्‍थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्र जोडणे आवश्‍यक आहे. प्रस्‍ताव  दि. 23 एप्रिल 2012 पुर्वी  सदस्‍य सचिव, जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा यांचेकडे  सादर  करावे.
         सहाय्यक अनुदान व अधिस्विकृती फॉर्म संपूर्ण भरलेले असावे. अशासकीय संस्‍थेचे नोंदणी प्रमाणपत्रा , अशासकीय संस्‍थेचा संस्‍थापना लेख व अधिसंघ नियमावली याची प्रत. मागील तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल. मागील वर्षाचा संस्‍थांचा वार्षिक अहवाल. प्रती शिबीराकरीता होणारा संभाव्‍य खर्च दाखविणारा प्रत्‍येक शिर्षाखाली होणा-या खर्चाचे अंदाजपत्राक. अशासकीय संस्‍थेस विधी साक्षरता मध्‍ये काम करीत असल्‍याचा अनुभव असल्‍याबाबतची कागदपत्रो. अशासकीय संस्‍था 2012-13 मध्‍ये जिल्‍ह्यात शिबिरे घेणार आहेत त्‍याची ठिकाणे . मागील आर्थिक वर्षात ज्‍या अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव मंजूर झाला होता, त्‍या अशासकीय  संस्‍थेने उपयोगिता प्रमाणपत्र, सी.ए.रिपोर्ट, परफॉर्म्‍न्‍स रिपोर्ट, अध्‍यक्ष , जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्रा प्रसताव पाठविण्‍याच्‍या पूर्वी पाठविणे आवश्‍यक आहे. या बाबींची पूर्तता केलयानंतरच त्‍या अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव योग्‍य असल्‍यास पाठवावा. आलेल्‍या सर्व अशासकीय संस्‍थेच्‍या प्रस्‍तावातून पुक्‍त एकाच अशासकीय संस्‍थेचा प्रस्‍ताव अध्‍यक्षांच्‍या शिफारस पत्रासहीत पाठवावे. सदर प्रस्‍ताव दोन प्रतीत असणे आवश्‍यक आहे.
                                                            000000

रविवारी पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम



       वर्धा, दि. 13-  पोलीओ निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत राज्‍यात 1995 पासून पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्‍यात येत आहे. पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी दिनांक 15 एप्रिल 2012 रोजी  राबवायची आहे.
       जिल्‍ह्यात 1296 लसीकरण केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन यामध्‍ये ग्रामीण भागात 1114 , शहरी क्षेत्रात 182 केंद्रे आहेत. या मोहीमेत एकूण 3163 कर्मचारी व 260 पर्यवेक्षक व अधिकारी कार्यरत राहणार आहेत. यावर्षी ग्रामीण भागातील 86687 लाभार्थींना शहरी क्षेत्रात 30454 असे एकूण 117141 लाभार्थींना पेालीओचा डोज पाजण्‍यात येणार आहे. याशिवाय टोल नाके, फिरती पथके, ट्रान्‍झीट टिम्‍स, पर्यवेक्षकिय पथके, वाहन व्‍यवस्‍था पुरेशा प्रमाणात करण्‍यात आलेली आहे.

             दि. 15 एप्रिल 2012 च्‍या सत्रात आपल्‍याकडील व परिसरातील 5 वर्षाचे आंतील बालकांना  पोलीओ लसीकरण केंद्रांवर नेऊन लस पाजून घ्‍यावी आणि मोहिम यशस्‍वी करावी. स्‍थानिक लोकप्रतिनिधीनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील  5 वर्षाचे आंतील  एकही बालक पोलीओ डोजपासून वंचित राहणार नाही याबाबत सतर्क राहुन पल्‍स  पोलीओ लसीकरण मोहीम यशस्‍वी करावी. असे आवाहन जिल्‍हा पल्‍स पोलिओ लसीकरण समन्‍वय  समीतीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.के.झोड.राठोड  यांनी केले आहे.

उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार 2011प्रवेशिका आमंत्रित


         वर्धा,दि.13- राज्‍य शासनाच्‍या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्‍कृष्‍ट पत्रकारिता, उत्‍कृष्‍ट लेखन आणि उत्‍कृष्‍ट दूरचित्रवाणी, वृत्‍तकथा, उत्‍कृष्‍ट छायाचित्रकार पुरस्‍कार स्‍पर्धा  जाहीर करण्‍यात आली आहे. या स्‍पर्धेसाठी 2011 या कॅलेंडर वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्‍या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्‍यात येत आहेत.
     पत्रकार, इलेक्‍ट्रानिक मिडिया, माहिती व जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी, वृत्‍तपत्र व छायाचित्रकार, छायाचित्रकार असे पाच गट या स्‍पर्धेसाठी  असतील. सन 2011 या वर्षापासून पुरस्‍काराची रक्‍कम वाढविण्‍यात आली असून 41 हजार रुपये एवढी करण्‍यात आली आहे.
          उत्‍कृष्‍ट  पत्रकारिता पुरस्‍कार 2011 चे माहिती पत्रक / अर्जाचे नमुने सर्व विभागीय माहिती  कार्यालयास व सर्व जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्‍ध आहेत. तसेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in   dgipr.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर देखील उपलब्‍ध आहेत.
          प्रवेशिका पाठविण्‍याची अंतीम तारीख 30 एप्रिल 2012 अशी राहील. तरी पत्रकारिता व छायाचित्रकार क्षेत्रात  कार्यरत लोकांनी स्‍पर्धेत सहभागी होण्‍याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्‍यात आले आहे.
                                                  0000000

Tuesday, 10 April 2012

जिल्‍ह्यात 37(1) आणि 3 कलम जारी


         वर्धा, दि.11- जिल्‍ह्यात  शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री  भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)  आणि 3 कलम लागू केले आहे.
        या कलमाचा अंमल दि. 21 एप्रिल 2012  च्‍या रात्री  12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द  कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
                                                  0000000

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाअंतर्गत जि.प. अध्‍यक्षाचे हस्‍ते धनादेशाचे वाटप


          वर्धा, दि. 11- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान सन 2011-12 अंतर्गत हरितगृह उभारणी करणे या घटकात वर्धा उपविभागात 4 हरितगृह कार्यान्वित करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये अजय महादेवराव डेकाटे  रा. हिंगणी ता. सेलु, यांचेकडे  1.67 हेक्‍टर शेती असून,त्‍यांचेकडे संत्रा व मोसंबी, फळपिकाची व गुलाब 0.50 हेक्‍टर या फळपिकाची लागवड झालेली  आहे. तसेच त्‍यांनी हार्टिकल्‍चर ट्रेनिंग सेंटर, तळेगांव (दाभाडे) ता. मावळ जि. पुणे येथे हरित गृहातील शेती बाबत पाच दिवस प्रशिक्षण घेऊन  प्रशिक्षणातून  प्रवृत्‍त होऊन त्‍यांनी शेतात 1000 चौ.मी. आकाराचे पॉली हाऊस व 2000 चौ. मि. आकाराचे शेडनेट हाऊसची उभारणी केलेली आहे. शेडनेट हाऊस मध्‍ये दोडके व पॉलीहाऊस मध्‍ये कोथिंबीर ही पिके घेतलेली आहे. त्‍यांचेकडे पॅक हाऊस 600 चौ. फुट आकाराचे बांधकाम झालेले आहे. मीनी  ट्रॅक्‍टर 18 एच पी  व नर्सरी (वनराई) कार्यान्वित आहे.
       डेकाटे यांना पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस व पॅक हाऊस उभारणी करीता बँक ऑफ इंडिया, हिंगणी शाखा ता. सेलु यांनी 20 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले आहे. राष्‍ट्रीय  फलोत्‍पादन अभियानातंर्गत कृषि विभागाकडून 3,52,800 रुपयाचे धनादेश  जि.प. चे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे यांचे हस्‍ते  प्रदान करण्‍यात आले.
         यावेळी जिल्‍हा कृषि अधिक्षक  संतोष डाबरे, उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा, आर्वी, हिंगणघाट उपस्थित होते.
                                                            00000000