Saturday, 21 January 2012

दिवाणी न्‍यायालयांच्‍या आर्थिक अधिकार क्षेत्रात वाढ


     वर्धा,दि.21- मुंबई दिवाणी न्‍यायालये अधिनियम 1869 मध्‍ये महाराष्‍ट्र शासन राजपत्र 30 डिसेंबर 2011 नुसार सुधारणा करण्‍यात येवून दिवाणी न्‍यायालयांच्‍या दाव्‍यांच्‍या संदर्भातील अधिकार क्षेत्रात वाढ करण्‍यात आलेली आहे.
     सदर सुधारीत अधिनियमाची अंमलबजावणी 16 जानेवारी 2012 पासून संपूर्ण राज्‍यात केली जात आहे. सुधारीत अधिनियमा नुसार दिवाणी न्‍यायालय (कनिष्‍ठ स्‍तर)येथे एक लाखा पर्यंतच्‍या चालणा-या दाव्‍याची आर्थिक अधिकार क्षेत्राची वाढ पाच लाख रुपयापर्यंत वाढविण्‍यात आलेली आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हा न्‍यायालयात चालणा-या दिवाणी दाव्‍याच्‍या अपीलांची आर्थिक अधिकार क्षेत्रात वाए करण्‍यता येवून ते दोन लाखावरुन दहा लाख रुपया पर्यंत करण्‍यात आलेली आहे. व ज्‍या दिवाणी न्‍यायाधीश, कनिष्‍ठ स्‍तर यांचेकडे चालणा-या प्रकरणाची वाद विषयाची रक्‍कम एक लाख रकमे पर्यंत असेल त्‍यांना पाच लाख रुपया पर्यंत दाव्‍याची आर्थिक मर्यादा राहील. ज्‍यांची दहा वर्षापेक्षा कमी नोकरी नसेल आणि ज्‍यांचया बाबतीत उच्‍च न्‍यायालयांनी विशेश शिफारस केली असेल अशा कोणत्‍याही दिवाणी न्‍यायाधीश, कनिष्‍ठ स्‍तर श्रेणीच्‍या न्‍यायालयांना आर्थिक अधिकर क्षेत्र एक लाख पननास हजार ऐवजी सात लाख पन्‍नास  हजार रुपया पर्यंत आर्थिक अधिकार क्षेत्राची मर्यादा राहील.
    ज्‍या दाव्‍यांच्‍या वाद विषयाची रक्‍कम पाच लाख रुपयापर्यंत आहे असे दावे दिवाणी न्‍यायालय, वरिष्‍ठ स्‍तर येथून दिवाणी न्‍यायालय, कनिष्‍ठ स्‍तर ह्यांचेकडे वग्र करावे लागणार आहे.
    या आधी जिल्‍हा नयायालयामध्‍ये दोन लाख रुपया पर्यंतची अपील चालविण्‍यात येत होती व त्‍यावरील अपील हे उच्‍च न्‍यायालयात दाखल करावे लागत होते. परंतू आता नविन अधिनियमानुसार जिल्‍हा न्‍यायालय हे 10 लाख रुपयापर्यंत अपील चालवू शकतील. असे प्रबंधक, जिलहा व सत्र न्‍यायालय, वर्धा कळवितात.

भविष्‍य निवार्ह निधीची माहिती वेबसाईटवर


    वर्धा, दि.21- सर्व राज्‍य शासकीय कर्मचा-यांच्‍या सन 2010-11 या वर्षाच्‍या भविष्‍य निर्वाह निधीच्‍या पावत्‍या प्रधान लेखाकार कार्यालयातर्फे वेबसाईटवर अपलोड करण्‍यात आल्‍या आहेत.
      कर्मचारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी वर्गणीदाराचा जन्‍मदिनांक, GPF Series   आणि खाते क्रमांक नोंदवून भविष्‍य निर्वाह निधी खात्‍याबाबतची माहिती वेबसाईटवर पाहू शकतात.
     ही माहिती पुढील वर्षाच्‍या जमा रकमा अपलोड होईपर्यंत संपूर्ण वर्षभर पाहता येईल. सक्षम प्राधिका-यांनी वर्गणीदारास भविष्‍य निर्वाह निधी खात्‍यातून अग्रिम मंजूर करताना कर्मचा-यांच्‍या वैयक्तिक खात्‍यातील जमा रक्‍कम पाहता येईल. जर एखाद्या कर्मचा-यास भविष्‍य निर्वाह निधीची वार्षिक स्‍लीप प्राप्‍त झाली नसेल तर, अशा कर्मचा-यास वरील वेबसाईटवरुन त्‍याची प्रत घेण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे.
     http://agmaha.cag.gov.in  या  वेबसाईटवर उपरोक्‍त माहिती उपलब्‍ध असून सर्व आहरण व संवितरण अधिकारी व सर्व वर्गणीदारांनी या सुविधेचा लाभ घ्‍यावा.
              सदर शासन परिपत्रक महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर  उपलब्‍ध  करण्‍यात आला असून त्‍याचा संगणक सांकेतांक 20111130153621001 असा आहे. हा शासन निर्णय सामान्‍य प्रशासन विभागाचे उपसचिव पां.जो. जाधवयांच्‍या स्‍वाक्षरीने निर्गमित झाला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून २०१२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच विभाजनांमुळे व नव्याने अस्तित्त्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : ५/१/२०१२ (गुरुवार)

मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम १९५९ मधील नियम ७ पोट नियम १ अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम (२) नुसार नमुना अ अ मधील निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक : १६/१/२०१२ (सोमवार)

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना-अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : २४/१/२०१२ (मंगळवार) ते ३०/१/२०१२ (सोमवार) पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : ३१/१/२०१२ (मंगळवार) सकाळी ११ पासून

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) : २/२/२०१२ (गुरुवार), सकाळी ११ ते दुपारी ३

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ : २/२/२०१२ (गुरुवार) दुपारी ३ नंतर

आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक : १४/२/२०१२ (मंगळवार), सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत

मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील. : १५/२/२०१२ (बुधवार)

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक : १७/२/२०१२ (शुक्रवार)

Friday, 20 January 2012

वाहनांची वाढ आणि विकासाला खीळ .. !


वाढलेली वाहनसंख्‍या पर्यावरणाचे संकट निर्माण करणारी नसून, त्‍याचा परिणाम अपघातांमधील प्राणहानी व वित्‍तहानी पर्यंत वाढलाय. पार्किंग आणि अपू-या रस्‍त्‍यांची समस्‍या निर्माण झालेली आपणास दिसते. यासोबत इंधनापोटी मोठया प्रमाणावर विदेशी चलन खर्च करावे लागते. या सर्वांचा एकत्रित परिणाम विकास प्रक्रियेवर होत असल्‍याने याबाबत जागरुक होण्‍याची वेळ आता आली आहे.
               -प्रशांत दैठणकर


    गेल्‍या 2 दशकांमध्‍ये वाहन संख्‍या वाढल्‍याने विविध समस्‍यांची एक साखळीच समोर आली आहे. यात जितका मोठा धोका पर्यावरणाला आहे तितकाच मानवी आयुष्‍याला आहे. वाहनांमुळे होणारे अपघात त्‍यात होणारी प्राणहानी तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी वित्‍तहानी यासोबत जागेच्‍या टंचाईची अर्थात पार्कींगची समस्‍या देखील या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने निर्माण झाली आहे.

वाहन संख्‍येत होणारी ही वाढ इतकी प्रचंड आहे की, त्‍यामुळे जागा कमी पडायला लागली आहे. कधी काळी मोकळे-मोकळे असणारे रस्‍ते आता मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण करुन चार व सहापदरी केले तरी अल्‍पावधीत ते रस्‍ते देखील वाहतुकीने ओव्‍हर-फ्लो होत असल्‍याचं चित्र आहे.

रस्‍त्‍यांवर होणारे पार्कींग ही शहरी भागातली मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनांसाठी पार्किंग हवे म्‍हणून घरांच्‍या बांधकामाची पध्‍दत बदलून गेली. याचा परिणाम मुलांना खेळायला देखील जागा न मिळणे, पादचा-यांना रस्‍त्‍यावरुनच चालावे लागणे आदी प्रकार दिसत आहेत. अपरिहार्य व्‍यवस्‍था म्‍हणून आता महानगरांमधून खास पार्कींगसाठी इमारती बांधण्‍याची वेळ आली आहे.

वाढलेल्‍या वाहन संख्‍येचा आणखी एक तोटा म्‍हणजे वाहतुकीची होणारी कोंडी वाहनांच्‍या गर्दीत आपलेच वाहन पुढे दामटण्‍याचा प्रयत्‍न प्रत्‍येकजण करताना दिसतो. महानगरात सिग्‍नलवर संथपणे रांगणा-या कारच्‍या रांगांचे चित्र नवे नाही. 2008 साली चीन ऑलिम्पिकच्‍या वेळी वाहनांच्‍या कोंडीमुळे हजारो वाहन धारकांना तब्‍बल 28 तासांपर्यंत वाहनात अडकून रहावे लागले होते. या प्रकारे लाखो-करोडे मनुष्‍य तास केवळ वाहतुकीच्‍या कोंडीमुळे आपल्‍याही देशात वाया जाताना दिसतात.


वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने आणखी वाढ झाली ती रस्‍त्‍यांवर होणा-या अपघातांमध्‍ये गेल्‍या वर्षभरात रस्‍ते अपघातात दीड लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आणि दरवर्षी ही संख्‍या वाढतेय. सोबत जे अपघातात जखमी होतात आणि अपंग होतात त्‍यांचे आयुष्‍य देखील उर्वरित काळ संकटच बनलेले दिसते. वाहनांच्‍या अपघातात प्राणहानी सोबतच मोठ्या प्रमाणावर वित्‍त हानी देखील होते. ही वाहने अपघातात नष्‍ट झाल्‍याने देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो.

     भारतात वाढलेल्‍या वाहनसंख्‍येचा परिणाम विदेशी मुद्रेवर देखील झालेला आहे. आपण जे क्रूड तेल वापरतो त्‍या तेलाच्‍या बाबतीत आपला देश स्‍वयंपूर्ण नाही. यामुळे मुल्‍यवान विदेशी मुद्रा खर्च करुन आपण ते खरेदी करीत असतो. लोकसंख्‍या वाढीइतकीच वाहन संख्‍या वाढीची ही समस्‍या गंभीर आहे.

    छोट्या गावांमध्‍ये आणि नगरांमध्‍ये वाहनवृध्‍दीचा ताण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांवर झालेला आहे. अपुरे रस्‍ते ही समस्‍या तर आहेच सोबतच वाहनाचे अवागमन वाढलयाने जून्‍या पध्‍दतीच्‍या पध्‍दतीच्‍या रस्‍तयांवर प्रचंड खड्डे पडलेले दिसतात. या रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीपायी इतर सुविधांचा पैसा खर्च होतो परिणामी विकासाची गती कमी होवुन जाते.

     रस्‍त्‍यांची भारवहन क्षमता आणि एकूणच उपलब्‍धता यामुळे आता रस्‍त्‍यांवरुन जाण्‍यासाठी टोल देण्‍याची पाळी ही याच वाढलेल्‍या वाहन संख्‍येमुळेच आलीय. याला कितपत चालना द्यायची की यावर नियंत्रण हवे यावर चर्चा होणे ही आता काळाची गरज झाली आहे.

- प्रशांत दैठणकर

साद ही वसुंधरेची .. !

बाजारपेठ आणि खुली अर्थव्‍यवस्‍था आल्‍यानंतर भौतिकवाद व स्‍वामित्‍वाच्‍या भावनेतून गेल्‍या दशकात वाहन संख्‍या प्रचंड वाढली. परिणामी प्रदूषण आणि पर्यावरण अशी संकटांची मालिका उभी राहिली. या समस्‍येतून अनेक समस्‍यांची रांगच आता समोर आली आहे. याबाबत हा आढावा.
      -प्रशांत दैठणकर

      गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रदूषणाचे वाढते प्रमाण आपल्‍यासाठी चिंतेचा विषय बनलाय. दिसवसेंदिवस जगाची लोकसंख्‍या वाढत आहे. या लोकसंख्‍येच्‍या गरजेनुसार ज्‍यावेळी संसाधनांचा वापर सुरु झाला त्‍याचवेळी पर्यावरणाची हानी आणि प्रदूषणात वाढ अशी दुहेरी समस्‍या निर्माण झाली. यात सर्वच प्रकारच्‍या प्रदूषणाचा आपल्‍या सर्वांच्‍या जगण्‍यावर होत असून, पर्यावरणाची हानी देखील प्रचंड अशीच आहे.

सध्‍या शहरांमधून ध्‍वनी आणि वायू प्रदूषणाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. बाजारपेठ अर्थव्‍यवस्‍था आपण स्‍वीकारली त्‍यानंतर त्‍याच्‍या दुष्‍परिणामांपैकी एक अर्थात मूबलक पैसा. या मूबलक पैसा आणि विक्रीच्‍या स्‍पर्धेत वाहन कंपन्‍यांनी मानवी मनातील स्‍वामित्‍वाच्‍या भावनेला साद घाल आपली उत्‍पादनं विकली. त्‍यात माझं स्‍वतःचं, व्‍यक्‍तीगत वाहन घेण्‍याची हौस आणि त्‍याच प्रमाणात होणारा आर्थिक पुरवठा यामुळे वाहन संख्‍येत गेल्‍या 15-20 वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढ झाली.

या वाढत्‍या वाहनसंख्‍येच्‍या समस्‍येने एका नव्‍याच समस्‍यांच्‍या मालिकेला जन्‍म दिला. यात पहिले पेट्रोल आणि डिझेल यांचे मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. ज्‍याचा दरवाढ होण्‍यावर तर परिणाम झालाच सोबतच महागाई वाढण्‍यास ही दरवाढ कारणीभूत ठरली. याचा सर्वच भारतीयांच्‍या जीवनावर परिणाम झालेला दिसतो.

दुस-या बाजूला या वाढलेल्‍या वाहनसंख्‍येने पर्यावरणाचे संकट निर्माण केले. पेट्रोल-डिझेल हे जीवाश्‍य इंधन आहे. त्‍याचे साठे संपण्‍याचा धोका वाढला. इंधन वहन करुन नेणारी जहाज समुद्रात कलंडून समुद्री जीवसृष्‍टी आणि समुद्री पर्यावरण यालाही धोका सुरु झाला.

या वाहन संख्‍येचा आणखी आणि सर्वात मोठा तोटा अर्थातच प्रदूषण. वाहने ध्‍वनी तसेच वायू प्रदूषणात भर पाडत आहे. वाहनातून इंधनाचे ज्‍वलन होवून जे घातक वायू बाहेर पडतात त्‍यात कार्बन मोनोक्‍साईड मानवी शरीराला हानीकारक आहे. याने श्‍वसन संबंधित विकारांमध्‍ये गेलया दशकात वाढ झाली. त्‍यासोबत आपणाला ध्‍वनी प्रदूषणाचा त्रास देखील खूप वाढलेला जाणवतो. हमरस्‍त्‍यालगत घर असणे पूर्वी मानाचं होतं पण या प्रदुषणामुळे ते ताणाचं बनलय.


आपणास ध्‍वनीप्रदूषणाचा व वायूप्रदूषणाचा जितका त्रास होतो. त्‍याही पेक्षा अधिक त्रास नव्‍या पिढीला, लहान बालकांना आणि रुग्‍ण व्‍यक्‍तींना होतो . वाहनातून वायू उत्‍सर्जन किती असावा याची मानकं शासनानं ठरवली पण त्‍याला न जुमानण्‍याची वृत्‍ती सर्वांच्‍या ठायी आहे परिणामी ही समस्‍या वाढतच आहे.

सततच्‍या वाहतूकीने शहरी भागात ऑक्‍सीजनचे प्रमाण घटलेले आहे. याचा परिणाम रोग प्रतिकारशक्‍ती कमी होण्‍यावर देखील होतो. पर्यावरणाच्‍या नावाने एखादा दिवस नो व्‍हेईकल डे करणा-या मंडळींना या समस्‍येचे गांभीर्य जाणून अधिक सजगपणे कृती करावी लागेल ही धरा, वसुंधरा सुंदर राखायला इतकं आपण करायलाच हवं.
                                                  प्रशांत दैठणकर

25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस

वर्धा,दि.20- भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2012 हा दिवस राष्‍ट्रीय मतदार दिवस म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्‍चीत केले आहे. त्‍यानुसार येत्‍या 25 जानेवारीला प्रत्‍येक मतदान केंद्राच्‍या ठिकाणी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे.

सदर कार्यक्रम मध्‍यवर्ती मतदान केंद्राच्‍या ठिकाणी किंवा परिसरातील शाळा, महाविद्यालय, समाज मंदीर, सार्वजनिक सभागृह आदीमध्‍ये आयोजित केला जाणार आहे. त्‍यात नव्‍याने नोंदणी झालेले सर्व नवीन मतदार, त्‍यांचे पालक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, कार्यकर्ते, स्‍थानिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, प्राध्‍यापक, शिक्षक व कर्मचारी, त्‍या भागातील नागरीक यांना निमंत्रित केले जाणार आहे.


यात नव्‍याने नोंदणी करण्‍यात आलेल्‍या मतदारांना आमंत्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व उपस्थित नवीन मतदारांना प्रतिज्ञा दिली जाणार आहे. नवीन मतदारांना याच कार्यक्रमात छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्‍ले वाटप केले जाणार आहे. मतदार नाव नोंदणी व मतदान याविषयी उपस्थित मान्‍यवरांव्‍दारे मार्गदर्शन केले जाणार आहे. मतदारांना मतदार यादीचे भाग या ठिकाणी दाखविले जातील.

 जनजागृतीकरीता महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्‍ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी, स्‍वयंसेवी संस्‍था आदींची प्रभातफेरी, दौड, सायकल रॅली अशा कार्यक्रमाचे आयोजन आठवडाभर केले जाणार आहे. पथनाट्य, लोककला, लोकनृत्‍य इत्‍यादी कार्यक्रमाव्‍दारे ही मोहीम यशस्‍वी करण्‍याचे प्रयत्‍न शासन व निवडणूक विभागाव्‍दारे सुरु झाले आहे.
 स्‍वातंत्र्यानंतर दुस-यांदा प्रत्येक मतदान केंद्रावर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन मतदारांना व नवीन मतदारांना लोकशाही प्रक्रियेतील त्‍यांच्‍या सहभागाबद्दल, जबाबदारीची जाणीव करुन देण्‍याचा हा प्रयत्‍न राहणार आहे. असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी, वर्धा कळवितात.

प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी इच्‍छुक पंजीबध्‍द संस्‍थांकडून अर्ज आमंत्रित


   वर्धा,दि.20–शैक्षणिक वर्श 2012-13 करीता महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परीक्षा मंडाळामार्फत संगणक, पॅरा-मेडीकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्टि्कल, मेकॅनिकल, सिव्हिल, अॅग्रीकल्‍चर, ऑटोमोबाईल, केमिकल, इन्‍स्‍टुमेंटेशन, आहार, टेक्‍सटाईल, भाषा, खेळ, सौंदर्यशास्‍त्र, मुद्रण, चर्मकला (लेदर), वाणिज्‍य, हस्‍तकला, अपारेल, कला, मासमेडीया, टुरिझाम, हॉस्‍पीटॅलिटी, जेम अॅण्‍ड ज्‍वेलरी, एव्‍हीएशन, म्‍युझीक, परफॉर्मींग आर्ट तसेच इतर गटातील 6 महिने, 1 व 2 वर्ष कालावधीचे एकूण 1090 अभ्‍यासक्रमामधील प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरु करणेसाठी अर्ज मागविण्‍यात येत आहेत. तरी इच्‍छुक  संस्‍थांनी खालील नमूद कालावधीत अर्ज करावा.
     विलंब शुल्‍कासह अर्ज विक्री स्विकृती दि. 1 जानेवारी 2012 ते 31 जानेवारी 2012 पर्यंत राहील. अर्जासहित माहितीपुस्तिका, अभ्‍यासक्रमाची यादी जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे मिळेल. माहिती पुस्तिकेची किंमत रुपये 500 आहे. अर्ज व माहिती पुस्तिका मंडळाचे संकेत स्‍थळावर  www.msbve.gov.in  आहे. इच्‍छूक संस्‍था सदरचा अर्ज व माहिती पुस्तिका संकेत स्‍थळावरुन डाऊनलोड करु शकता. तथापि सदरचा अर्ज जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे जमा करताना रु. 500 इतकी रक्‍कम दिलेल्‍या लेखाशिर्षामध्‍ये कोषागारात भरल्‍याची चलन प्रत अर्जासेाबत जमा करावी लागेल.
    संबंधित इच्‍छूक संस्‍थांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा अपूर्ण अर्ज स्विकृत केला जाणार नाही, याची नोंद घ्‍यावी. मुंबई साव्रजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 अथवा संस्‍था नोंदणी अधिनियम 1860 नुसार नोंदणी प्रमाण, चलन (प्रक्रिया शुल्‍काबाबत) प्रत, बँक बॅलन्‍स प्रमाणपत्रा, एमओयु, करारपत्र, संमतीपत्र, संस्‍था ठराव प्रत, जागेसंबंधी जागा भाउेची असल्‍यास आवश्‍यक ती भाड्याचे जागेची करारपत्र (दुरूयम निबंधकाकडे नोंदणीकृत) प्रत अथवा जागा संस्‍थेच्‍या मालकीची असल्‍यास संस्‍थेच्‍या नावाने असलेला 7/12,8अ,प्रापर्टी कार्ड चा अद्ययावत उतारा अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.अधिक माहितीसाठी  जिल्‍हा व्‍यवसाय विभाग व प्रशिक्षण अधिकारी,वर्धा यांचेशी संपर्क साधावा.