Wednesday, 21 December 2011

गांधी ; जनसंपर्काच्‍या यशाचे ब्रांडिंग मॉडेल


पब्लिक रिलेशन्‍स सोसायटी ऑफ इंडियाच्‍या वतीने येत्‍या 23-25 डिसेंबर दरम्‍यान नागपूर आणि वर्धा येथे 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. वर्धा येथे 24 रोजी महात्‍मा गांधी आणि जनसंपर्क या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्‍यात आले आहे. या आयोजनाविषयी सांगाताहेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे.                                                        

महात्‍मा गांधी यांना केवळ राजकीय चष्‍म्‍यातून बघणे, त्‍यांच्‍या  व्‍यक्तित्‍व आणि कृतित्‍वाच्‍या इतर आयामांपासून अनभिज्ञ राहणे होय. एवढी वर्ष लोटल्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांच्‍या व्‍यक्तित्‍वाच्‍या विशाल वटवृक्षाचे बरेच असे पैलू आहेत ज्‍याच्‍याशी अजून स्‍पर्शही झाला नाही. ते शोधणे, जाणून घेणे आणि त्‍यांचे मूल्‍यांकन करणे वर्तमान संदर्भात प्रासंगिक होत चालले आहे. गांधी विचार वाडःमयातून बरेच काही देशाने  आणि जगाने घेतले आहे.
आज जन-समन्‍वयात आलेली घसरण यामुळे गांधींच्‍या विशाल जनसंपर्काला विचारात घेण्‍याची आवश्‍यकता वाटत चालली आहे. जन-भागिदारी, जन-समन्‍वय किंवा जन-संपर्काच्‍या शिवाय बहुआयामी कार्याचे यश असंदिग्‍धच वाटते.
     गांधी आपल्‍या व्‍यक्‍तीमत्‍वात आणि आपल्‍या कर्मात समन्‍वय, सहयोग आणि जन-संपर्क या सूत्राचे उदाहरण बनले होते. असे नसते तर गांधी एवढ्या मोठ्या  जगासाठी यशाचे मानक उदाहरण झाले नसते. त्‍यांचा समन्‍वय, सहयोग आणि संपर्क हा एक ब्रांड झाले होते. आजच्‍या वैश्र्विकरणाच्‍या काळात त्‍यांचा तो समन्‍वयधर्मितेचा जनसंपर्क आवश्‍यक वाटू लागला आहे आणि काही अंशी तो स्‍थापितही झाला आहे.

     जनसंपर्काची भूमिका एक ब्रांड रोल प्रमाणे विविध कार्याच्‍या यशात सहयोगी होत असते. ही संकल्‍पना केंद्रस्‍थानी ठेवून 33 व्‍या अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाच्‍या  नागपुर चॅप्‍टरने आपल्‍या चर्चेचा विषय `रोल ऑफ पब्लिक रिलेशन्‍स इन ब्रांडिंग `असा ठेवला आहे. या संमेलनात जनसंपर्क, पत्रकारिता आणि जाहिरात या त्रयींची तारतम्‍यता कोणत्‍याही ब्रांडला व्‍यावहारिक ठरविते, यावर विशेष चर्चा होणार आहे.
     पब्लिक रिलेशन्‍स सोयटी ऑफ इंडियाच्‍या नागपूर चॅIप्‍टरने 232,24 आणि 25 डिसेंबर असे तीन दिवस हे आयेाजन केले आहे. यापेकी 24 डिसेंबर रोजी वर्धा येथील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात गांधीजींचा जनसंपर्क या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     हे आयोजन महात्‍मा गांधींच्‍या जनसंपर्काचा व्‍यापक आणि संमेलनाच्‍या महत्‍वाच्‍या उद्देशांची पूर्तता करण्‍याचाच एक भाग होय. इथे हे सांगणे महत्‍वाचे वाटते की वर्धा ही संतांची अशी कर्मभूमी आहे. जेथून गांधीजींनी स्‍वातंत्र्याच्‍या यशासाठी जनसंपर्काच्‍या माध्‍यमातून देशाला एक ब्रांड दिला होता. महानगर मुंबईला जावून त्‍यांनी `डू ऑर डाय`चा नारा दिला होता आणि हाच ब्रांड पुढे जावून यशाचा सूत्रधार ठरला होता.
     संमेलनाच्‍या या महत्‍वाच्‍या श्रृंखलेत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाने ` गांधीजींची पत्रकारिता आणि वर्तमान संदर्भ` या विषयावर दि. 21 डिसेंबर 2011 रोजी एक निबंध स्‍पर्धा आयोजित केली होती.

     हे आयोजन संमेलनाच्‍या  त्रिदिवसीय श्रृंखलेत महत्‍वाचे यासाठी आहे की गांधीजींच्‍या पत्रकारितेची मिशनरी भावना आजच्‍या बांडिंग मीडियातही प्रतिध्‍वनित होत आहे. अशाप्रकारे हे संमेलन ब्रांड आणि व्‍यवहार यांची आधारशीला स्‍थापित करणार असे म्‍हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही.

सेवाग्राम येथे स्‍वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम


        वर्धा,दि.21-महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा तर्फे सेवाग्राम येथे दि. 5 ते 16 जानेवारी 2012 या कालावधीत स्‍वयंरोजगार विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
या प्रशिक्षणात शेळी पालन, दुग्‍ध उत्‍पादन, गाई-म्‍हशी पालन, कमीकल उद्योगसंधी (डिटर्जंट, लॅट्रीन अॅसिड, फिनाईल, लिक्विड, ब्‍लू लिक्विड सोप, अगरबत्‍ती, मेणबत्‍ती, मसाले, तिखट, हळद, धने पावडर, वेफर्स, पॉपकॉर्न, पेप्‍सी, जेष्‍ठमध सुपारी ई.) उद्योगांविषयी माहिती तज्ञ व्‍यक्‍तीव्‍दारे व टि.व्‍ही.वर दाखविण्‍यात येईल.
 उद्येाजकीय गुण, उद्योजकीय व्‍यक्तिमत्‍व विकास, उद्योग व्‍यवसाय निवडण्‍याची प्रक्रिया, बाजारपेठ पाहणी, प्रकल्‍प अहवाल, विविध शासकीय योजनांची माहिती , जिल्‍हा उद्योग केन्‍द्राच्‍या येाजना, विशेषकरुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्‍मा फुले महामंडळाच्‍या योजना व त्‍यामध्‍ये कर्ज प्रकरण तयार करण्‍याची, लघुउद्योग नोंदणी इत्‍यादी विषयांवर शासकीय अधिकारी वर्गाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
 उमेदवार 18 ते 45 वयोगटातील किमान 8 वी उत्‍तीर्ण असावा. इच्‍छुक उमेदवारांनी दि. 2 जानेवारी 2012 रोजी दुपारी 12 वाजता स्‍थळ बी.डी. इंजिनियरींग कॉलेज, सेवाग्राम येथे एक दिवसीय  निःशुल्‍क उद्येाजकता प्रेरणा शिबीर ठरविण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या पध्‍दतीने फक्‍त 30 प्रशिक्षणार्थीस प्रवेश देण्‍यात येणार आहे.
कार्यक्रम समन्‍वयक नजमा पठाण , महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र व्‍दारा जिल्‍हा उद्योग केन्‍द्र, वर्धा यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे कळविले आहे.

Tuesday, 20 December 2011

विभागीय युवा महोत्सववावर यजमान वर्धेकरांचेच वर्चेस्वी


वर्धा, दि.21- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवावर वर्धा जिल्‍ह्याचे वर्चस्‍व राहिले असून महोत्‍सवात 9 पैकी 5 स्‍पर्धांचे जेतेपद वर्धेकरांनी मिळविले. हे विजेते आता राज्‍यातील युवा महोत्‍सवासाठी रवाना होत आहे.
येथील सत्‍यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात हा महोत्‍सव पार पडला. याचे यजमानपद यंदा वर्धा जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला देण्‍यात आले होते. या महोत्‍सवात नागपूर विभागातील 6 जिल्‍ह्यातील युवक सहभागी झाले होते.
महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी नटराज पूजन व दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी केले.  
या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, स्मिता हेडावू, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक होते.
या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदींनी  परिश्रम घेतले.
स्‍पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
शास्‍त्रीय गायन – अभिषेक मारोडकर, वर्धा. शास्‍त्रीय वाद्य- तबला- दिनेश खांडेकर,वर्धा. हार्मोनियम-किशोर काळे, वर्धा, गीटार – सुरेंद्र टेंभुर्णे, नागपूर. शास्‍त्रीय नृत्‍य- आदीती बोरवटकर, नागपूर, लोकनृत्‍य–श्रृंखला युवा मंच, भंडारा, लोकगीत- लोकधारा कला मंच, वर्धा, एकांकीका- षड्स गांधार गृप, भंडारा आणि वक्‍तृत्‍व–रत्‍नाकर शिरसाट, वर्धा.



नागपूर विभागीय युवक महोत्‍सवाला वर्धा येथे शानदार सुरुवात

वर्धा,दि.20- नागपूर विभागीय युवा महोत्‍सवाला आज येथील बजाज जिल्‍हा ग्रंथालयात सुरुवात झाली. महोत्‍सवाचे उदघाटन निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांच्‍या हस्‍ते  झाले.
उदघाटनप्रसंगी वसंतराव जळीत, वासुदेवराव गोंधळे, निरज दुबे, गौरीशंकर टिबडीवाल आणि बाळकृष्‍ण टिबडीवाल तसेच जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 एकांकिका वक्‍तृत्‍व स्‍पर्धा , नृत्‍य, तालवाद्ये आदींसह समुहगीत, समूहनृत्‍य आदी विविध गटात युवक आपले नैपुण्‍य दाखविणार आहेत.
 या महोत्‍सवासाठी विकास काळे, वसंत जळीत, सुरेश चौधरी, ज्‍योती भगत, माधुरी खाडे, सोनाली मंथनवार, वासुदेवराव गोंधळे, जीवन बांगडे, अजय हेडावू, रवी खाडे, सुरेश सालबर्डे, दामोदर राऊत, श्‍याम केदार, सुनील तितरे, नीरज दुबे तसेच श्रीराम मेंढे हे परीक्षक आहेत. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.
 या महोत्‍सवाच्‍या यशस्वितेसाठी क्रीडाधिकारी घनश्‍याम वरारकर, विनोद ठिकरे, अनिल बोरवार तसेच जिल्‍हा क्रीडा संकुलाचे रवी काकडे आदी परिश्रम घेत आहेत.

Monday, 19 December 2011

क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये प्रवेशासाठी कार्यशाळा


     वर्धा,दि.19-क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सुरु असलेल्‍या विविध क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याव्‍दारे प्रवेश देण्‍यात येतो. महाराष्‍ट्रात शिक्षण व क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्‍यासाठी आणि राज्‍यातून जास्‍तीत जास्‍त आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्‍यासाठी वैज्ञानिक पध्‍दती, अद्यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्‍याची गरज आहे. या उद्देशाने राज्‍यातील खेळ परंपरा अंतःसामर्थ्‍य व खेळ सुविधा लक्षात घेवुन पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्‍थापना केलेली आहे.

     बॅटरी ऑफ टेस्‍टव्‍दारे निवड क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍या शाळा स्‍तरावरुन तालुकास्‍तर, जिल्‍हास्‍तर आणि राज्‍यस्‍तरीय चाचण्‍याचे आयोजन करण्‍यात येणार आहे. यासाठी दि. 22 डिसेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

     जिल्‍ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा संयोजक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्‍यांचे ओळखपत्र

           वर्धा, दि. 19-सहामाही प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम राबविणा-या तसेच पुरवणी परिक्षेला बसलेल्‍या सर्व संस्‍था प्रमुखांना व संबधीत विद्यार्थ्‍यांनी त्‍यांची सहामाही परिक्षा व पुरवणी परिक्षा दिनांक 10 जानेवारी 2012 पासून सुरु होत आहे.

      संस्‍था प्रमुखांनी विद्यार्थ्‍यांची ओळखपत्र दिनांक एक जानेवारी 2012 पर्यंत जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, वर्धा येथून घेवून जावी. त्‍यानंतर घेऊन जाणा-या संस्‍थाप्रमुखांचे विद्यार्थी परिक्षेस न बसल्‍यास ती त्‍यांची वैयक्‍तीक जबाबदारी राहील, याची संस्‍थाप्रमुखांनी नोंद घ्‍यावी. असे जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.

फळबाग लागवड विकास कार्यक्रम


     वर्धा,दि.19-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत फळबाग लागवड विकास कार्यक्रम सन 2011-12 या आर्थीक वर्षात जिल्‍ह्यात 90 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्‍याचे लक्षांक प्राप्‍त  झाले आहे. पपई 50 हजार हेक्‍टर व केळी (टिश्‍यू कल्‍चर 40 हेक्‍टर  क्षेत्रावर लागवड करावयाचे आहे. पपई या पिकासाठी हेक्‍टरी एकूण 30 हजार रुपये व केळी फळपिकांसाठी हेक्‍टरी एकूण 41 हजार रुपये अनुदान दोन वर्षात देय राहील.

     योजने अंतर्गत लाभार्थ्‍यांची निवड, लागवड क्षेत्र मर्यादा, तांत्रीक मंजूरी, प्रशासकीय मंजूरी लाभार्थीच्‍या जबाबदा-या व इतर सर्व निकष रोजगार हमी योजना फळबाग लागवडीचे शासन निर्णयाप्रमाणे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी रासायनिक खते. रोपसंरक्षण औषधे, शेतक-यांनी स्‍वतः खरेदी केल्‍यास खरेदीची पावतीची नोंद घेऊनच अनुज्ञेय अनुदान अदा करण्‍यात येईल. साहित्‍य खरदेी संबधीच्‍या पावत्‍या संबधीत कृषि सहाय्यक यांचेकडे देण्‍यात याव्‍यात. अधिक माहितीसाठी संबधीत तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा व राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान योजनेच्‍या जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.