Thursday, 27 May 2021

 

..क्र-382                                                                     दि.27.05.2021

खतांची वाढीव दराने विक्री करणा-यांविरुध्द मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी

Ø कृषि विभागाचे आवाहन

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-   खरीप हंगाम लवकरच सुरु होत असून सध्या जिल्हयातील शेतक-यांकडून  खरीप हंगामासाठी  रासायनिक खते व बियाणे खरेदी करणे सुरु आहे. एप्रिल महिन्यापासुन युरिया वगळता  इतर रासायनिक  खतांची भाववाढ  खत उत्पादक कंपन्यांनी केली होती.  केंद्र शासनाने 20 मे पासुन कंपन्यांना वाढीव  किंमतीसाठी अनुदान  देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे  खत विक्रेता दुकानदारांनी जुना खत साठा हा  जुन्याच दराने विक्री करने बंधनकारक आहे. काही  खत विक्रेते  वाढीव किंमतीनुसार जुन्या साठयातील  खते विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे खत विक्रेते जुना साठयाची  वाढीव दराने  विक्री करीत असल्यास, छापील किमतीत खोडतोड करुन विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तसेच कृषि विभागाच्या  अधिका-यांच्या मोबाईल क्रमांकावर  तक्रार करावी.  तसेच शेतक-यांनी सुध्दा  खताच्या बॅगवरील छापील किमतीनुसार खताची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अनिल इंगळे यांनी केले आहे. 

शेतकरी या मोबाईल क्रमांकावर तक्रार करु शकतात.

 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अनिल इंगळे 9405219478, कृषि विकास अधिकारी  अभयकुमार चव्हाण 8369735159, मोहिम अधिकारी  संजय बमनोटे 9422842245 व जिल्हा गुणनियंत्रण  निरिक्षक  पी.ए.घायतिडक यांच्या 7517366933 या मोबाईल क्रमांकावर  तसेच  सबंधित पंचायत समितीच्या  कृषि विभागास  तक्रार करावी.

 

 

                        कंपनी निहाय खताचे दर

JÉiÉÉSÉä xÉÉ´É

EÆò{ÉxÉÒÊxɽþÉªÉ JÉiÉÉSÉä nù®ú ¯û{ɪÉä |ÉÊiÉ ¤ÉìMÉ 50 ÊEò±ÉÉä |ɨÉÉhÉä Ênù.20/05/2021

<¡òEòÉä

EòÉä®úÉä¨ÉÆb÷±É <Æ]õ®úxÉì¶ÉxÉ±É Ê±É¨ÉÒ]äõb÷

º¨ÉÉ]ÇõEäò¨É ]äõCxÉÉì±ÉÉVÉÒ Ê±É¨ÉÒ]äõb÷

MÉÖVÉ®úÉiÉ ¡ò]õÔ±ÉɪÉZɺÉÇ EÆò{ÉxÉÒ

+É®úºÉÒB¡ò

EÞò¦ÉEòÉä

<ÆÊb÷ªÉxÉ {ÉÉä]ìõ¶É ʱɨÉÒ]äõb÷

ZÉÖ+É®úÒ /Ê{ÉÊ{ÉB±É/ B¨ÉºÉÒB¡òB±É

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

ÊxÉ¨É EòÉä]äõb÷ ªÉÖ®úÒªÉÉ [45kg]

266.5

266.5

266.5

266.5

 

 

266.5

266.5

266.5

266.5

266.5

 

266.5

266.5

266.5

266.5

Êb÷B{ÉÒ

1200

1200

1250

1200

1250

1200

1200

 1200

1340

 

1250

1200 

1225

1200

1255

1200

B¨É+Éä{ÉÒ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1000

 

 

20x20x00x13

975

975

1000

1050

1065

1150

975

 

 

 975

1000

1050 

975

 1050

 

1090

10x26x26x00

1175

1175

1185

1300

1295

1390

1175

 1175

1270

 

1200

1300 

 

 

1225

1375

12x32x16

1185

1185

1200

 

1305

1370

1185

 1185

 

 

1210

1310 

 

 

1235

1310

14x35x14

 

 

1275

1400

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1365

14x28x00

 

 

 

 

 

1280

 

 

 

 

 

 

 

 

 

 

15x15x15

 

 

 

 

 

 

 

 

1060

1180 

 

 

 

 

1030

 

16x16x16

 

 

 

 

1100

1125

 

 

 

 

 

 

1075

1125 

 

 

28x28x00

 

 

1275

1450

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1280

1475

15x15x15x09

 

 

1040

1150

 

 

 

 

 

 

 

 

1040

 1100

 

 

                                                            0000

 

 

 

 

 

 

Tuesday, 25 May 2021

 

..क्र-375                                                                     दि.25.05.2021

              कोविड नंतरचा पाहुणा ‘म्यूकरमायकोसिस’ घातकच

पण वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण होतो बरा

                               -डॉ. एस.पी. कलंत्री

    वर्धा दि.25(जिमाका) कोविड-१९ विषाणूनंतर राज्यात नव्हे तर देशात पाहूणा म्हणून पावले उमटवित असलेला म्यूकरमायकोसिस हा आजार वेळीच निदान न झाल्यास घातकच आहे. असे असले तरी रुग्णाने वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे या पाहूण्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. केवळ नागरिकांनी दक्ष राहून विशिष्ट काळजी घेण्याची गरज असल्याचे सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सांगितले आहे.

         पूर्वीच विविध आजारांची लागण असलेले व्यक्ती तसेच अनेक व्यक्ती कोविडमुक्त झाल्यावर बिनधास्त होतात. कोविडमुक्त झाल्यावर सुरूवातीच्या काळात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते याच काळात म्यूकर हा सूक्ष्म  फंगस मनुष्याच्या शरिरात नाकाद्वारे प्रवेश करतो.  त्यानंतर तो मनुष्याच्या शरिरातील डोळे, नाक या अवयवांना इजा पोहोचविण्यास सूरूवात करतो. नाक बुजणे, दात दुखणे, गालावर सुज येणे, डोळ्यांनी अंधुक दिसणे आदी याची प्राथमिक लक्षणे आहेत. याच काळात या आजाराचे निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.  तर त्यानंतर हा आजार गंभीर रुप धारण करीत असल्याने रुग्णही गंभीर होतो. सीटीस्कॅनद्वारे या आजाराची नुकसानपातळी तपासता येत असली तरी सध्या म्यूकरमायकोसिस बाधितांवर उपचार करताना लागणा-या आवश्यक महागड्या औषधांचा काळाबाजार होण्यास सुरूवात झाल्याने औषधेही दुर्मिळ झाली आहेत. असे असले तरी शासनाने म्यूकरमायकोसिस बाधितांवर उपचार करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ४० हजारांचे पॅकेज दिल्याने शासनाचे हे पॅकेज रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी या पाहूण्या आजाराला न घाबरता लक्षणे आढळल्यास नजीकच्या रुग्णालयात जावून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असेही डॉ. कलंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

                                      0000

Friday, 21 May 2021


 

 

बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

 

                             -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

 

Ø  जिल्हाभर सर्वेक्षण करून गरजू लाभार्थी शोधणार

 

Ø  विधवा, परित्यक्ता, एकल माता यांच्या मुलांना मिळणार लाभ

 

     वर्धा, दि 21 (जिमाका) :- राज्य शासनाची बालसंगोपन योजना आतापर्यन्त  ० ते १८वयोगटातील  निराधार बालकांसाठी राबविण्यात येत होती. आता ही योजना  सुधारीत करण्यात आली असून  एकल माता, विधवा, परित्यक्ता अशा महिलांच्या मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  योजनेचा लाभ जिल्ह्यातील अशा सर्व महिलांना मिळावा यासाठी कालबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून दोन महिन्यांच्या आत  अशा महिलांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेपासून कुणीही गरजू वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले. 

 लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था- संघटना आणि विविध विभागात काम करणारे अधिकारी ज्यांना अशा महिलांची माहिती आहे आणि त्यांना मुलांच्या संगोपनासाठी मदतीची गरज आहे अशा कुटुंबातील महिलांची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावी. जेणेकरून  गरजू महिलांना त्यांच्या मुलांची काळजी योग्य आणि चांगल्या प्रकारे घेण्यासाठी या योजनेचा लाभ देता येईल, असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत जिल्ह्यात ७०० मुलांना जुन्या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आता नव्याने सर्वेक्षण करून या योजनेचा लाभ बालकांना देण्यात येईल असेही श्री केदार म्हणाले.

 

    या योजनेचा लाभ अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही, अशी बालके,  एक पालक असलेली व कौटुंबिक संकटात  असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, तीव्र मतिमंद बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशा अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार,  (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले), अशा मुलांचा व कुटुंबांचा या योजनेत समावेश करता येणार आहे.

 

शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून, बालकल्याण समितीपुढे मुलांना हजर करणे आवश्यक राहील. बाल कल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना बाल संगोपन योजनेंतर्गत अनुदान देण्यात येवू नये. बाल संगोपन योजनेसाठी बालकांची शिफारस राज्यातील दवाखाने,पोलीस स्टेशन,

कारागृह,न्यायालय, कौटुंबिक हिसाचार कायद्याखालील संरक्षण अधिकारी  हे सुध्दा करु शकतील. संबंधित स्वयंसेवी संस्था यांनी महिला व बाळ कल्याण या शासकीय कार्यालयाशी

सतत संपर्कात रहावे. या शासकीय कार्यालयामुळे, एच. आय. व्ही. ग्रस्त बालक, शिक्षा/तुरुंगवास झालेले पालक यांची मुले यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकेल.

 

लाभाची पात्रता

0 ते १८ वर्षांपर्यंतची मुले या योजनेसाठी पात्र आहेत.

 

योजनेअंतर्गत मिळणारा दरमहा लाभ

 या योजनेअंतर्गत दरमहा दरडोई  ११००  रुपये लाभ देण्यात येईल.

 

 कागदपत्रे

लाभार्थ्यांच्या निवासी पुराव्याबाबत रेशन कार्डाव्यतिरिक्त निवासासंबंधीचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत. उदा. रेशनकार्ड , विजेचे देयक, पाण्याचे देयक, घरपट्टी, नगरपालिका दाखला, नगरसेवकाचा दाखला ग्राह्य धरावा.

 तहसिलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी उत्पन्नाचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात येईल. उदा. वेतन चिठ्ठी (Slip), पालकांच्या कार्यालयाचा दाखला, पालक कोणते काम करतात याचा स्पष्ट उल्लेख असावा.

 

00000000

 

..क्र-365                                                                      दि.21.05.2021

        1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे झालेल्या रुग्णांचे

              म्युकरमायकोसिस’ आजाराबाबत सर्वेक्षण करा

                                                -विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार

म्युकरमायकोसिस आजारा बाबत टॉस्कफोर्स समिती स्थापन करा

वर्धा दि 21, (जिमाका):- म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य  आजाराचे रुग्ण  नागपूर विभागात आढळत असून  हा आजार कोविड झालेल्या व मधुमेह असलेल्या रुग्णांना होत असल्याचे आढळून आले आहे. हा आजार चेहरा, नाक, डोळयांचा भाग व  मेंदूवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी  जिल्हा स्तरावर नाक,कान,घसा, नेत्र व दंत तज्ञ, न्युरो चिकित्सक आदी तज्ञ असलेल्या डॉक्टरांचा समावेश असल्याची टॉस्क फोर्स समिती गठीत करावी. समिती मार्फत  1 एप्रिल नंतर कोविड आजारातुन बरे होऊन सुटी मिळालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराबाबत समुपदेशन करावे असे सूचना नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त  डॉ.संजय कुमार यांनी आज  व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे घेतलेल्या बैठकित सर्व जिल्हाधिका-यांना दिल्यात.

बैठकिला वर्धा येथून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते. सभेमध्ये कोविड बाधित असलेले अनाथ बालके त्यांची घ्यावयाची काळजी,  आपत्ती व्यवस्थापन निधी, रेतीघाट व गौण खनिज घाट परवाणगी याबाबती चर्चा करण्यात आली.

म्युकरमायकोसिस आजार प्रामुख्याने मधुमेह,रक्तदाब असलेल्या व कोरोनाच्या गंभीर आजारातुन मुक्त झालेल्या व्यक्तींना होत असल्याचे तज्ञाच्या निर्दर्शनास आले आहे. या आजारावर नियंत्रण आणण्याकरीता  जिल्हयातील रुग्णालयातून कोविड आजारातून मुक्त होऊन सुटी झालेल्या रुग्णांच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी संपर्कात राहून  त्यांना म्युकरमायकोसिस आजाराचे लक्षणे आहे. काय? याबाबत वेळोवेळी  विचारणा करावी यामध्ये नाकातून काळया खपल्या पडणे,  नाक कोरडे होणे,  रक्तमिश्रिीत सर्दी,  गालावरील सवेंदना बदलणे, चेह-यावर सूज येणे,  डोळे लाल पडणे, नजर कमजोर होणे, दात दुखणे व कमजोर होणे अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ  टाक्सफोर्स समितीच्या माध्यमातुन  तपासणी करुन  पुढील उपचाराकरीता  रुग्णालयात दाखल करुन घ्यावे आवश्यकता पडल्यास शस्त्रक्रिया करावी अशा सूचना संजय कमुार यांनी आज दिल्यात.

तसेच म्युकरमायकोसिस आजाराबाबत प्रसारमध्यमे व सोशल मिडिया तर माध्यमांचा वापर करुन जनजागृती करावी अशाही त्यांनी यावेळी सूचना केल्यात.

आपत्ती व्यवस्थापनच्या निधीचे प्रस्ताव सादर करतांना आवश्यक असलेल्या कामासाठी निधीचे प्रस्ताव सादर करावे.

000000

..क्र-366                                                                      दि.21.05.2021

        शिक्षक पात्रता  परीक्षेचे प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

वर्धा दि 21, (जिमाका):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे  मार्फत जिल्हयात 2013 पासुन 2019 या कालावधीत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र राज्य  शिक्षक पात्रता  परिक्षेमध्ये पात्र  झालेल्या विद्यार्थ्यांचे  प्रमाणपत्र  शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयास प्राप्त झालेले आहे. सदर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून  शिल्लक असलेले प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांनी घेउुन जावे असे आवाहन  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय मेहेर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी  TET  परीक्षा  प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डीटीएड, बीएड उर्त्तीण  गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, जात वैधता  प्रमाणपत्र, अंपगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र इत्यादी आवश्यक  कागदपत्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात सादर करुन   उपलब्ध करुन घ्यावे.

                                                                        0000

..क्र- 367                                                                     दि.21.05.2021

जुन महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

Ø प्राधान्य गट व अंत्योदय  अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत 

वर्धा दि.21  -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे. प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजने अंतर्गत  प्राधान्य गट योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्याना जुन महिन्याचे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत  देण्यात येणार आहे.

            नियमित प्राधान्य गट योजनेच्या  लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, नियमितअंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो.  गहू 2 रुपये दराने व तांदूळ 3 रुपये दराने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 3 तांदूळ 2  किलो  व्यक्ती व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

            केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्‍यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                            00000

 

 

 

 

 

..क्र- 368                                                                     दि.21.05.2021

     राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

Ø युवकांना मिळणार हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर

 वर्कर क्षेत्रामधील प्रशिक्षण

           वर्धा दि 21 (जिमाका) : साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये  युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            यासंदर्भातील कौशल्य विकास,रोजगार व  उद्योजकता विभागाचा सविस्तर शासन निर्णय १९ मे रोजी निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सध्या कोरोना साथीच्या अनुषंगाने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ तयार ठेवण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण लवकरच सुरु करण्यात येईल. शिवाय कोरोनोत्तर काळातही या मनुष्यबळाचा उपयोग होणार असून या युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगार मिळणार आहे.

           राज्यातील सर्व शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनेलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन त्यांची निवड करण्यात येईल. तसेच ज्या खाजगी इस्पितळांमध्ये २० पेक्षा अधिक बेड्स आहेत त्यांचीही व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करुन निवड करण्यात येईल. या संस्थांमार्फत युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण तुकडीमध्ये उमेदवारांची संख्या किमान २० व कमाल ३० असावी. परंतु विशेष बाब म्हणून या योजनेकरिता प्रशिक्षण तुकडीमध्ये एकूण प्रशिक्षणार्थ्यांची किमान मर्यादा ५ पर्यत करण्यास मुभा असेल.

वाहनचालक, ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश

        कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच ॲम्ब्युलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सक्षम यंत्रणेमार्फत पॅरामेडीकल कौन्सिलमध्ये करण्यात येईल.  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांची सेवा किमान ६ महिने शासकीय किंवा खाजगी इस्पितळांना देणे अनिवार्य असेल. हे प्रशिक्षण प्राधान्याने ऑन जॉब ट्रेनिंग तत्त्वावर देण्यात येईल. याकरीता उमेदवारांचे वेतन संबंधित संस्थेकडून देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

         या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यांचे सचिव व इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कौशल्य विकास आयुक्त हे या कार्यक्रमाचे नियंत्रक अधिकारी असतील.

 

00000000

 

जुन महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

Ø प्राधान्य गट व अंत्योदय  अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत

वर्धा दि.21  -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जुन महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे. प्रधानमंत्री गरीब  कल्याण योजने अंतर्गत  प्राधान्य गट योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्याना जुन महिन्याचे 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत  देण्यात येणार आहे.

          नियमित प्राधान्य गट योजनेच्या  लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, नियमितअंत्योदय अन्न योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो.  गहू 2 रुपये दराने व तांदूळ 3 रुपये दराने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती गहु 3 तांदूळ 2  किलो  व्यक्ती व प्रति शिधापत्रिका 1 किलो चनादाळ मोफत पुरविण्यात  येणार आहे. साखर फक्त अंत्योदय योजना प्रति शिधापत्रिका 1 किलो प्रमाणे किंवा साठा  उपलब्धतेनुसार 20 रुपये दराने देय राहील.

          केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 व्यक्ती 2 लिटर , 2 व्यक्ती  3 लिटर व 3 व्यक्ती वरील केरोसिन मिळण्यास पात्र शिधापत्रिका 4 लिटर याप्रमाणे देय राहील. गॅस सिलेंडर धारकांना केरोसिन देय राहणार नाही. असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                         00000