Tuesday, 31 October 2017



                मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
 वर्धा, दि 31 (जिमाका) मागासवर्गी विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणुन शासकिय वसतीगृहाची व्यवस्था आहे मात्र विद्यार्थी संख्या आणि वसतीगृहाची क्षमता बघता अनेक विद्याथी्र यापासुन वंचीत राहत होते. अशा विद्यार्थ्याचा शिक्षणासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली. यामध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या  आधार संलग्नीत बँक खात्यात जमा केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत.
  या योजनेचा लाभ घेऊ ईच्छिणारा विद्यार्थ्यांना  इयत्ता  10 वी , 12 वी , पदवी , पदवीकामध्ये 60 टक्के  पेक्षा जास्त गुण  असणे आवश्यक आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द  प्रवर्गातील  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक राहील.
            शासकिय वसतीगृहात प्रवेशित नसणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी  रक्कम अशी आहे.
अ.क्र.
खर्चाची बाब
मुबंई शहर, मुबंई उपनगर, नवी मुबंई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी रक्कम
इतर महसूली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी रककम
इतर जिल्हयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी रककम
1
भोजन भत्ता
32000/-
28000/-
25000/-
2
निवास भत्ता
2000/-
15000/-
12000/-
3
निर्वाह भत्ता
8000/-
8000/-
6000/-

एकुण
60000/-
51000/-
43000/-
वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी याव्यतिरिक्त  5 हजार रुपये  व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये  शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी, व शर्ती  अर्जासोबत दिल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलेाकन करुन अर्ज भरावे.  अर्जाचा नमुना http://sjsa.maharashtra.gov.in   किंवा http://www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  विद्यार्थ्यांकडे  ज्या जिल्हयातील जातीचे प्रमाणपत्र आहे. त्याच जिल्हयातील समाज कल्याण सहायक आयुक्त यांचे कडे अर्ज सादर करण्यात यावा. असे समाज कल्याण सहायक आयुक्तांनी कळविले आहे.


राष्ट्रीय एकात्मता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद
 वर्धा, दि 31 (जिमाका) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन  देशभर साजरा करण्यात आली.  या एकता दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा मैदान येथून आयोजित एकात्मता दौडचे मध्ये  नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. या एकात्मता दौडला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  हिरवी झेंडी दाखवून दौडला प्रारंभ केला. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समत्वयक संजय माटे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे  व शासकिय अधिकारी पोलिस विभागाचे अधिकारी , विद्यार्थी , खेळाडू उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की,  वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्वपुर्ण काम केले. आज त्यांच्या नावाने संपूर्ण देशभर एकात्मता दौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील. देशाची अखंडता कोणीही दूर करु शकत नाही. अशा प्रकारचा संदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल  यांनी यावेळी दिला. तत्पुवी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ दिली .
            सदर दौड झाशी राणी चौक – इतवारा चौक- सामान्य रुग्णालय – कच्छी लाईन – निर्मल बेकरी- गोल बाजार – सरदार वल्लभभाई पटेल चौक मार्गे जाऊन पुन्हा जिल्हा क्रिडा संकुल येथे या रॅलीचा समारोप झाला.
                                                            00000






शेतक-यांनी तुती लागवड करुन महारेशिम अभियानाचा लाभ घ्यावा
Ø मनरेगा मधुन मिळते अनुदान
 वर्धा, दि 31 (जिमाका) जिल्हयातील शेतक-यांना रेशीम शेतीपासुन मिळणा-या उत्पादनाचे परीपुर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे शेतकरी वळलेले दिसून येत नाही.  तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढवा, शेतक-यांच्या बांधावर तुती वृक्षाची लागवड करुन पर्यावरणाचे संतुलन राखणे व त्यांच्या उत्पादनात वाढ करणे, नाविन्यपुर्ण रेशीम तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहाचविणे याकरीता जिल्हयात 30 नोव्हेंबर पर्यंत महारेशमी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा लाभ घेऊन शेतक-यांनी तुती लागवडी करीता नाव नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.
            सदर अभियान राज्यातील एकुण 4 तुती समुहामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये वर्धा  जिल्हयाचा समावेश आहे.
            जिल्हयात सध्या 400 एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली असून मागील वर्षी 68.75 मे.टन कोष उत्पादन झाले आहे. तुती लागवड केलेल्या शेतक-यांना एक एकर क्षेत्रावर दुस-या वर्षापासुन 4 ते 5 वेळा कोष उत्पादनाचे पिक घेऊन 1 लक्ष20 हजार   प्रति एकर निव्वळ उत्पन्न मिळते. 2 एकर ते 2 ते अडीच एकर तुतीची लागवड केल्यास पगारव्यक्ती प्रमाणे दर महा उत्पन्न घेता येते. मनरेगा अंतर्गत प्रति एकर  2 लाख 90 हजार 675 रुपये तिन वर्षासाठी तुती लागवडीकरीता व किटक संगोपन गृह बांधकामाकरिता मजूरी समुग्रीकरीता अनुदान देण्यात येत आहे.  
            महा रेशीम अभियान 2018 करीता तुती लागवडीसाठी 500 शेतक-यांचे सर्वेक्षण करुन नोंदणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच  जिल्हयामध्ये 1 हजार कुंटुंबापर्यंत लाभार्थी वाढ  करण्याचे नियोजन आहे. सदर अभियानाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी यांचे हस्ते तुती लागवड नोंदणी करुन  करण्यात येणार आहे.


न्यास नोंदणी बाबत 30 दिवसाचे आत हरकती सादर करावे
वर्धा, दि 31 (जिमाका)   सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या अनेक  निष्क्रीय संस्थाची नोंदणी रद्द करणेसाठी सहायक धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी सुरु केली आहे.  न्यासांनी नोंदणी झाल्यापासुन पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासुन न्यासांची हिशोबपत्रके दाखल केली नाहीत.  होणारे बदल अर्ज सादर केलेले नाहीत, तसेच आजपर्यंत काही न्यासांनी मुळ नोंदणी प्रमाणपत्र सादर केले नाही.  अशा संस्थांनी    न्यास नोंदणी बाबत काही हरकती घ्यावयाची असल्यास किंवा पुरावा दयायचा असल्यास लेखी स्वरुपात 30 दिवसाचे आत सादर करावे, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.
मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत हरकती न आल्यास संबंधित न्यासाचे काही म्हणने नाही  असे समजुन चौकशी पुर्ण करुन  योग्य ते आदेश पारित केल्या जाईल. तसेच सदर प्रकरणात पुढील कोणतीही तारीख दिली जाणार नाही. ज्या न्यासांची नोंदणी रद्द करण्यात येईल त्यांची यादी कार्यालयाचे सुचना फलकावर व धर्मादाय संघटनेच्या charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. असे सहायक आयुक्त धर्मादाय आयुक्त यांनी कळविले आहे.