Thursday, 30 March 2017



योजनाची प्रचार प्रसिध्‍दी चलचित्ररथाव्‍दारे
Ø हाथीबेड यांनी हिरवी झेंडी
Ø जिल्‍हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
     वर्धा दि 30- राज्‍यात अनुसुचित जाती योजने अतंर्गत विविध योजना राबविण्‍यात येतात. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील  नागरिकांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी  जिल्‍हा माहिती कार्यालयाचे वतीने चलचित्ररथ व्‍दारे  जनजागृती करण्‍यात येत आहे. या चलचित्ररथाला राष्‍ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्‍य दिलीप के. हाथीबेड यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातून हिरवी दाखवून रवाना केले. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, समाज कल्‍याण सहाय्यक आयुक्‍त बाबासाहेब देशमुख,  जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेके, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे उपस्थित होत्‍या.
            चित्ररथ जिल्‍हयातील आठही तालुक्‍यातील अनुसुचित जातीची अधिक  लोकसंख्‍या असलेल्‍या 120 गावांमध्‍ये 29 मार्च ते 29 एप्रिल अशा 32 दिवसाच्‍या कालावधित फीरुन योजनाचा प्रचार व प्रसार करणार आहे. या चलचित्राव्‍दारे शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत मिशन, जलयुक्‍त शिवार अभियान, कृषि विभागाच्‍या योजना, मुद्रा बँक योजना, रोकड रहित व्‍यवहार, महसुल विभागाच्‍या योजना, आरोग्‍य विभागाच्‍या योजना व पशुसंवर्धन विभागाच्‍या अशा विविध अनुसुचित जातीसाठी असलेल्‍या  योजनांची चलचित्र(एल.ए.डी. स्‍क्रीन) व्‍दारे प्रचार करण्‍यात येत आहे. हा चित्ररथ  दररोज तीन गावामध्‍ये सायंकाळी गावात फीरुन  प्रचार करण्‍यात येत आहे. यामध्‍ये जीपीएस यंत्रणा लावण्‍यात आली आहे. यामुळे सुविधा उपलब्‍ध आहे. यामुळे सदर चित्ररथ कोणत्‍यागावामध्‍ये प्रचार करीत आहे. याबद्दल प्रशासनाला मोबाईलवर माहिती उपलब्‍ध होते.  नागरिकांनी चित्ररथाच्‍या माध्‍यमातून योजनांची माहिती जाणून घ्‍यावी, व योजनेचा सं‍बंधित विभागाकडे जावून योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
             
                                

Friday, 24 March 2017



       पाणी बचतीचे महत्‍व प्रत्‍येक नागरिकांपर्यंत पोहचवावे
                                                                     -शैलेश नवाल
     वर्धा दि 22- पाणी बचत ही काळाची गरज असून भावीपिढीला समृध्‍द करण्‍यासाठी आजपासुन पाणी बचतीचे महत्‍व प्रत्‍येक नागरिकांपर्यंत पाहोचवावे असे मत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी जलजनजागृती सप्‍ताहाचे  समारोपीय कार्यक्रमप्रसंगी व्‍यक्‍त केले. 
            विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर व निम्‍न वर्धा प्रकल्‍प यांच्‍या वतीने 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सप्‍ताहाचे समारोपीय कार्यक्रम प्रसंगी शैलेश नवाल बोलत होते. यावेळी अध्‍यक्षस्‍थानी नागपूर पांटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत गवळी होते. तर नगराध्‍यक्ष अतुल तराळे, समाजसेवक पंडित शंकरप्रसाद अग्‍नीहोत्री, शेती तंज्ञ विजय जावंधिया, समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, एमगीरीचे प्रफुल्‍ल काळे, निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे कार्यकारी अभियंता शंकरराव मंडवार, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, कार्यकारी अभियंता दत्‍तात्रय रब्‍बेवार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित मेश्राम यांची प्रमुख उपस्थितीती होती.
            जिल्‍हाधिकारी पुढे बोलतांना म्‍हणाले महात्‍मा गांधीचे स्‍वप्‍न होते. गावाकडे चला त्‍यांचे हे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी खेडी समृध्‍द झाली तर नागरिक समृध्‍द होईल. याकरिता शेतक-यांना समृध्‍द करण्‍यासाठी त्‍यांच्‍या शेतीला सिंचन सुविधा देणे महत्‍वाचे आहे. सिंचनासाठी पाणी बचतीचे महत्‍व पटवून काटकसर करणे तेवढेच महत्‍वाचे आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जास्‍तीत जास्‍त कामे नाला खोलीकरणाचे घेण्‍यात येत आहे. यामुळे शेतक-यांना जास्‍त प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्‍ध होणार आहे.
            पाणी वापर सहकारी संस्‍थानी केवळ संस्‍था नोंदणी न करता शेतक-यांना पाणी बचतीचे महत्‍व पटवून देण्‍याचे कार्य करावे. शेतक-यांनी नगदी पिकाची शेती करावी. तसेच नागरिकांनी सांडपाण्‍यावर प्रक्रिया करुन पाणी वापरण्‍यासाठी नियोजन करणे महत्‍वाचे आहे. जिल्‍हयात 48 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली आहे. ते क्षेत्र आज वाढविण्‍याची गरज असल्‍याचे यावेळी जयंत गवळी म्‍हणाले. सुक्ष्‍मसिंचन योजनेसाठी शेतक-यांना अनुदानावर शेती साहित्‍य देण्‍यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी सुक्ष्‍मसिंचन शेती करावी असेही आवाहन यावेळी श्री. गवळी यांनी केले.
            पंडित शंकरप्रसाद अग्‍नीहोत्री म्‍हणाले आपण दैनंदिन जिवनात वापरत असलेले 75 टक्‍के पाणी हे वाहून जातात. व 25 टक्‍केच पाणी वापरले जाते. यासाठी पाण्‍याचे महत्‍व जाणण्‍यासाठी चिंतन करण्‍याची आज गरज आहे. पाणी हेच जिवन आहे. ज्‍याप्रमाणे शरीराला पाच लिटर महत्‍वाचे आहे. यासाठी पाण्‍याचे महत्‍व ओळखले पाहिजे. भूमी, पर्यावरण व पाण्‍याला वाचविण्‍यासाठी सर्वानी एकत्र येण्‍याची गरज आहे. यासाठी आपले विचार बदलण्‍याची गरज आहे. प्रत्‍येकांनी विचार बदलल्‍यास समाजाचा विकास होण्‍यास मदत होईल.
            यावेळी विजय जावंधिया, मुरलीधर बेलखोडे व मोहन अग्रवाल, अतुल तराळे यांनी सुध्‍दा आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
            प्रास्‍ताविकात बोलतांना श्री. रब्‍बेवार म्‍हणाले, पाण्‍याचा वापर काटकसकर करुन बचत करावी. आपल्‍याला उपलब्‍ध असलेल्‍या पाण्‍याचा 80 टक्‍के वापर सिंचनासाठी करण्‍यात येतो. शेतक-यांनी कमीतकमी पाणी वापरुन जास्‍तीत जास्‍त सिंचन  करावे. आर्वी तालुक्‍यात साडे आठ हजार हेक्‍टर सुक्ष्‍म सिंचन प्रकल्‍प प्रायोजिक तत्‍वावर सुरु करण्‍यात येणार आहे. मातीच्‍या कालव्‍यातून पाणी वाहून जात असतात. यासाठी शेतक-यांनी लक्ष देऊन काळजी घेण्‍याचे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.  
            यावेळी जलजागृती सप्‍ताहानिमित्‍त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी  आयेाजित करण्‍यात आलेल्‍या चित्रकला स्‍पर्धेचे बक्षिस वितरण करण्‍यात आले.
            कार्यक्रमाला सुहास पाटील, संदीप हासे, इरफान शेख क्रिष्‍णा भादे, इमरान राही, राजेश धोपटे, राकेश राणा, विजय डेहनकर, साहेबराव गोडे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी मोठया संख्‍येने  उपस्थित होते.



              महिलांनी लघुउद्योगासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आधार घ्यावा.
                                   
                                     - सभापती गंगाधर कोल्हे
           हिंगणघाट व समुद्रपूर येथील मेळाव्यात 2 कोटी  रुपयांचे कर्ज वितरण
        वर्धा दि 23 (जिमाका ):- महिलांच्या आर्थिक विकासाशिवाय  देशाचा  संपूर्ण  विकास  होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी नोकरी सोबतच स्वतःमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे लघु उद्योग उभारावा.त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन  हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती गंगाधर कोल्हे यांनी केले.  हिंगणघाट येथे कलोडे सभागृहात आयोजित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
           या कार्यक्रमाला पंचायत समिती  उपसभापती धनंजय रिठे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, जिल्हा  माहिती अधिकारी मनीषा सावळे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे तसेच बँकांचे  व्यवस्थापक  उपस्थित होते.
               
पाणी हे  जीवन समजून त्याचा चांगला उपयोग करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असेही आवाहन श्री कोल्हे त्यांनी जागतिक जलदिनी केले.
                 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री कोहाड म्हणालेबँका, बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज देतात.त्याचा उपयोग करून  आज ग्रामीण भागात छोटे मोठे गृह उद्योग सुरु आहेत. महिलांनी शिक्षण - प्रशिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवसाय सुरु करण्यासाठी योग्य ज्ञान आत्मसात करावे. उत्तम कौशल्य गुणांच्या आधारे कोणताही व्यवसाय महिला करू शकतात. मुद्रा योजनेचा लाभ पारंपारिक  व्यवसाय करणा-यांसोबतच नवीन व्यवसाय सुरु करणा-याला सुद्धा होऊ शकतो. कोणतेही तारण न ठेवता या योजनेतुन   कर्ज सहज उपलब्ध होत असल्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेतून कर्ज उपलब्ध होणे साठी  अडचण आल्यास कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही  वामन कोहाड यांनी केले.
                यावेळी बोलताना म. ग्रा. जी. अ. चे व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी सर्व महिलांचे वैयक्तिक खाते बँकेत  उघडून द्यावे, अशी विनंती सर्व बँकांना केली.  महिलाबचत गटाच्या माध्यमातून केलेल्या बचतीमुळे देशाच्या विकासात महत्वाचा  सहयोग देत आहेत.  मुद्रा बँक योजनेतून महिलांनी स्वयंरोजगार करून देशाच्या आर्थिक विकासात भर घालावी. आपल्या योजना या मोबाईल अँप चा वापर करून योजनांचा लाभ घ्यावा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
असाच मेळावा समुद्रपूर येथेही घेण्यात आला.दोन्ही मेळाव्यात 187 बचत गटांना 2 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.




                           

                            शेतकरी आत्‍महत्‍येची 16 प्रकरणे पात्र
     वर्धा दि 23- शेतकरी आत्‍महत्‍या प्रकरणाची जिल्‍हास्‍तरीय समितीची सभा आज समितीचे अध्‍यक्ष अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. बैठकीत एकुण 28 शेतकरी आत्‍महत्‍येची प्रकरणे ठेवण्‍यात   आली. शासनाच्‍या निर्णयानुसार समितीचे अध्‍यक्ष यांनी सर्वानुमते 16 प्रकरणे पात्र ठरविले. तर 10 प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आले. आणि 2 प्रकरणे फेरतपासणीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कडे पाठविण्‍यात आले.
बैठकीला जिल्‍हा परिषद, जिल्‍हा पोलिस अधिक्षक,जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी, केमचे  प्रतिनिधी, जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाचे डॉ. विनोद वाघमारे, कारंजा पंचायत समितीच्‍या सभापती पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी, देवळी पंचायत समितीच्‍या सभापती विद्या भुजाडे उपस्थित होते.
                                                0000

                   भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना विनम्र अभिवादन
     वर्धा दि 23-जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज शहिद दिनी त्‍यांच्‍या फोटोला हारअर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            0000