Monday, 17 October 2016



जिल्‍हा परिषदमध्‍ये सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीन सुरु
वर्धा , दि. 17  (जिमाका) :  जिल्‍ह्याच्‍या महत्‍वाच्‍या पदावर जेव्‍हा महिला अधिकारी विराजमान होते, तेव्‍हा महिलांचे विषय किती संवेदनशीपणे हाताळले जातात. याचा अनुभव सध्‍या जिल्‍हा परिषदमध्‍ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना येत आहे. महिलांना मासिक पाळीच्‍या काळात लागणारी सॅनिटरी नॅपकीन ही अत्‍यंत निकडीची वस्‍तु आहे. याची जाणीव ठेवून जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणुन रुजु होताच नयना गुंडे यांनी तीन महिन्‍याच्‍या आत सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करुन देणारी आणि त्‍याची विल्‍हेवाट लावणारी व्‍हेण्‍डींग मशीन बसवून नोकरी करणा-या महिलांची मासिक पाळीच्‍या वेळी होणारी कुचंबना थांबली आहे.
          जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष चित्रा रणनवरे यांच्‍या हस्‍ते या सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीनचे उद् घाटन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्‍या.
          नोकरी करणा-या महिलांना कामावर असताना अचानक सुरु होणा-या मासिक पाळीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सोबत सॅनिटरी नॅपकीन नसल्‍यामुळे त्‍यांची स्थिती अवघडल्‍यासारखी होते. महिलांच्‍या या अतिशय संवेदनशील आणि निकडीच्‍या विषयाला मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हात घातला. या मशिनमध्‍ये पाच रुपयांचे नाणे टाकल्‍यास एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. त्‍यामुळे ऐनवेळी महिलांची होणारी तारांबळ यामुळे थांबेल. तसेच वापरलेले नॅपकिनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सुध्‍दा मशीन आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद महिला कर्म-यांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त होतोय.
          वास्‍तविक हा विषय स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा आहे. रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्‍थापना येथील महिलांची प्रसाधनगृहे बघितल्‍यास तेथे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन कोंबलेले, इतरततः पडलेले दिसतात. कारण त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था अद्याप या ठिकाणी उभी झाली नाही. त्‍यामुळे नाईलाजाने महिलांना ती अशी इतरत्र फेकावी लागतात. या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्‍हेवाट लावणारी आणि उपलब्‍ध करुन देणारी व्‍हेण्‍डींग मशीन लावल्‍यास स्‍वच्‍छ भारत अभियानास तर हातभार लागेलच पण महिलांची कुचंबनाही थांबेल.
000000
         



वर्धा , दि. 17  (जिमाका) :  जिल्‍ह्याच्‍या महत्‍वाच्‍या पदावर जेव्‍हा महिला अधिकारी विराजमान होते, तेव्‍हा महिलांचे विषय किती संवेदनशीपणे हाताळले जातात. याचा अनुभव सध्‍या जिल्‍हा परिषदमध्‍ये काम करणा-या महिला कर्मचा-यांना येत आहे. महिलांना मासिक पाळीच्‍या काळात लागणारी सॅनिटरी नॅपकीन ही अत्‍यंत निकडीची वस्‍तु आहे. याची जाणीव ठेवून जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणुन रुजु होताच नयना गुंडे यांनी तीन महिन्‍याच्‍या आत सॅनिटरी नॅपकीन उपलब्‍ध करुन देणारी आणि त्‍याची विल्‍हेवाट लावणारी व्‍हेण्‍डींग मशीन बसवून नोकरी करणा-या महिलांची मासिक पाळीच्‍या वेळी होणारी कुचंबना थांबली आहे.
          जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष चित्रा रणनवरे यांच्‍या हस्‍ते या सॅनिटरी नॅपकीन व्‍हेन्‍डींग मशीनचे उद् घाटन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे उपस्थित होत्‍या.
          नोकरी करणा-या महिलांना कामावर असताना अचानक सुरु होणा-या मासिक पाळीमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा सोबत सॅनिटरी नॅपकीन नसल्‍यामुळे त्‍यांची स्थिती अवघडल्‍यासारखी होते. महिलांच्‍या या अतिशय संवेदनशील आणि निकडीच्‍या विषयाला मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी हात घातला. या मशिनमध्‍ये पाच रुपयांचे नाणे टाकल्‍यास एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. त्‍यामुळे ऐनवेळी महिलांची होणारी तारांबळ यामुळे थांबेल. तसेच वापरलेले नॅपकिनची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सुध्‍दा मशीन आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद महिला कर्म-यांमध्‍ये आनंद व्‍यक्‍त होतोय.
          वास्‍तविक हा विषय स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वाचा आहे. रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा तसेच खाजगी आस्‍थापना येथील महिलांची प्रसाधनगृहे बघितल्‍यास तेथे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन कोंबलेले, इतरततः पडलेले दिसतात. कारण त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी कोणतीच व्‍यवस्‍था अद्याप या ठिकाणी उभी झाली नाही. त्‍यामुळे नाईलाजाने महिलांना ती अशी इतरत्र फेकावी लागतात. या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्‍हेवाट लावणारी आणि उपलब्‍ध करुन देणारी व्‍हेण्‍डींग मशीन लावल्‍यास स्‍वच्‍छ भारत अभियानास तर हातभार लागेलच पण महिलांची कुचंबनाही थांबेल.
000000
         


Wednesday, 21 September 2016


कृषि समुधी महामार्ग
शेतक-यांच्‍या मागण्‍यांवर शासन लवकरच निर्णय घेईल
-         किरण कुरंदकर
वर्धा,दि.21- नागपूर-मुंबई कृषि समृधी महामार्ग जिल्‍हातील शेतक-यांसाठी अतिशय फायदेशिर ठरणार आहे. शेतक-यांच्‍या या प्रकल्‍यापाबाबत असणा-या मागण्‍या शासनाला कळविण्‍यात आल्‍या असून त्‍यावर शासन लवकरच सकारात्‍मक निर्णय घेईल. जिल्‍ह्यातील काही शेतक-यांनी या महामार्गासाठी भूसंचयन करण्‍यास सहमती दर्शवली असून इतर शेतक-यांनीही यामध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन महाराष्‍ट्र रस्‍ते विकास मंहामडळाचे सह व्‍यवस्‍थापकीय संचालक किरण कुरंदकर  यांनी केले.
नागपूर-मुंबई कृषि समृधी महामार्गासाठी जिल्‍ह्यात येणा-या अडचणी संदर्भात अधिकारी आणि गावस्‍तरावर काम करणारे संवादक, निरिक्षक यांची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयात घेण्‍यात आली. यावेळी मागदर्शक करतांना ते बोलत होते. या बैठकीला निवासी उप जिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अभियंता यु. जे. डाबे, वर्धा उपविभागीय अधिकारी जी. एच. भूगावकर, आर्वी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अभियंता श्रीमती अन्‍सारी, जिल्‍हा अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारी ए.ए.जोशी, वर्धा तहसिलदार एम. आर. चव्‍हाण, सेलू तहसिलदार रविंन्‍द्र होळी,  कम्‍युनिकेशन एजन्‍सीचे संचालक राजेश देशमुख उपस्थित होते.
शासनाच्‍या हा महत्‍वकांक्षी प्रकल्‍प असून या प्रकल्‍पाकडे मुखमंत्र्याचे  विशेष लक्ष आहे. महाराष्‍ट्रात आतापर्यत झालेल्‍या विकास प्रकल्‍पामध्‍ये कुठेही शेतक-यांना भागीदार करुन घेतले नाही. शेतक-यांची जमीन घेवून त्‍यांना मोबदला देण्‍यात आला. पण एकमुस्‍त रक्‍कम देण्‍याचे तोटे आतापर्यंत झालेल्‍या प्रकल्‍पामधून समोर आले आहे. त्‍यामुळे यापुढे शेतक-यांच्‍या केवळ जमीनी न घेता त्‍यांना अशा प्रकारच्‍या विकास प्रकल्‍पात भागीदार करुन त्‍यांची प्रगती करण्‍याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे, अशी माहिती त्‍यांनी यावेळी दिली.
शेतक-यांच्‍या जमीनीच्‍या मोबदलात त्‍यांना विकसीत भूखंड देण्‍यात येणार आहे. याशिवाय शेतक-यांना वार्षिक सहाय्यक अनुदान देण्‍यात येईल. यासंदर्भात वेगवेगळ्या जिल्‍ह्यातून आलेल्‍या शेतक-यांच्‍या मागणीनुसार वार्षिक अनुदानात वाढ करणाचा विचार शासन करित आहे. लवकरच यावर निर्णय होईल. याशिवाय कोरडवाहु आणि बागायती अशी जमिनीची वर्गवारी आहे. यामध्‍ये शेतक-यांच्‍या  मागणीनुसार हंगामी सिंचन अशी वर्गवारी सुध्‍या करणाच्‍या विवार होत आहे. भूसंचयन करणा-या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना शासनाकडून मोफत कौशल्‍य विकासाचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. यात उच्‍च शिक्षणासाठी सुध्‍या शेतक-यांच्‍या पाल्‍यांना सवलत द्यावी आणि शेतक-यांना प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून नोकरी देण्‍याची मागणी शासनाकडे करण्‍यात आली आहे. याबाबतीतही मुख्‍यमंत्री लवकरच निर्णय घेतील. असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
भूसंचयन केल्‍यास शेतक-यांना विकसित भूखंड मिळणार आहे ज्‍याची किंमत शेतीच्‍या आजच्‍या किंमतीपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. शेतक-यांना ही जमीन त्‍यांच्‍या नावे झाल्‍यावर कधीही विकता येईल. ज्‍याचा आर्थिक फायदा शेतक-यांना होईल. तसेच या भखंडावर शेतक-यांना कर्ज सुध्‍या काढता येईल. या सर्व बाबी शेतक-यांच्‍या कुंटुंबातील सर्व संदस्‍याना पारदर्शक पणे समजावून सागाव्‍यात, असे निर्देश श्री. कुरंदकर यांनी निरिक्षक आणि संवादक यांना दिलेत.
या प्रकल्‍पाबाबत अफबा पसरविण्‍या-या तसेच शेतक-यांना खोटी माहिती देणा-या व्‍यक्‍तीची  माहिती तात्‍काळ जिल्‍हाधिकारी यांना कळवावी, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

0000000


         शेतक-यांना तुती लागवडीचे बेणे उपलब्‍ध
            वर्धा दि. 21- तुती लागवडीस जिल्‍हयात वातावरणपोषक असून  तुती बेणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे शेतक-यांनी तुती बेणे जिल्‍हा रेशीम कार्यालय तसेच संबंधित तालुक्‍यातील रेशीम कर्मचा-यांकडे तुती बेण्‍याची मागणी करावी व तुतीची लागवड करावी. चालू वर्षापासुन तुती लागवड कार्यक्रम मनरेगा अंतर्गत करण्‍यात येत असून त्‍यानुसार आवश्‍यक कागदपत्र जिल्‍हा रेशीम कार्यालयाकडे जमा करावे असे रेशीम विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            0000000
प्र.प.क्र-659                                                                                 21 सप्‍टेंबर, 2016
         ग्रंथालयाच्या योजनेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन
वर्धा,दि.21- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान, कलकत्‍ता अंतर्गत  येणा-या समान व असमान अर्थसहाय्याच्‍या विविध योजनांच्‍या  व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्‍यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती सार्वजनिक ग्रंथालयांना होण्‍यासाठी 23 सप्‍टेंबर रोजी विकास भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

            कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांचे हस्‍ते ग्रंथालय उपसंचालक सु.हि.राठोड यांचे अध्‍यक्षतेखाली संपन्‍न होणार आहे. कार्यक्रमाला कलकत्‍त्याच्‍या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्‍ठान चे सहाय्यक संचालक दिपांजन चॅटर्जी , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, प्र. सहाय्यक ग्रंथालय , संचालक वि.मु.डांगे , जिल्‍हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे , राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ नागपूरच्‍या ग्रंथालय व माहितीशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. मंगला हिरवाडे, जिल्‍हा माहिती अधिकारी मनिषा सावळे , विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक डॉ. गजानन कोटेवार व जिल्‍हा ग्रंथालय संघाचे अध्‍यक्ष मदन मोहता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेला सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या पदाधिका-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा ग्रंथालय अस्मिता मंडपे यांनी केले आहे. 

Tuesday, 20 September 2016

जलयुक्‍त शिवार अभियान अंमलबजावणीत
               वर्धा जिल्‍हा विभागात आघाडीवर
Ø 25 हजार हेक्‍टर सिंचन क्षमता
Ø 37 हजार द.श.ल.क्ष. घनमीटर पाणीसाठा निर्मीती
वर्धा,दि.20-पावसाच्‍या पाण्‍यावरील शेतक-यांचे अवलंबित्‍व कमी करुन शेत-शिवारात विकेंद्रीत जलसाठे निर्माण व्‍हावेत या उद्देशाने राज्‍यशासनामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या अंमलबजावणीत वर्धा जिल्‍हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहा जिल्‍हयांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्‍हयात निर्माण झाली असुन यामुळे 25 हजार हेक्‍टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्‍ध झाली आहे.
            जिल्‍हयात 4 लाख 48 हजार 285 हेक्‍टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्‍यामध्‍ये केवळ 27 टक्‍के क्षेत्र सिंचनाखाली असुन उर्वरित 73 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्‍यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्‍पादकता यांचा थेट संबंध आपल्‍या जिल्‍हयात पहायला मिळतो. यावर्षी सुध्‍दा शेतक-यांना हा अनुभव आलाच. पण ज्‍या गावांमध्‍ये जलयुक्‍त शिवारची कामे झालीत तेथील शेतक-यांना मात्र तिथे साठलेल्‍या पाण्‍याने तारले. ऑगस्‍ट महिन्‍यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागलीत तेव्‍हा सिमेंट बंधारा, शेततळे  नाल्‍यातील पाण्‍यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली .
            जलयुक्‍त शिवार अभियानात 2015-16 मध्‍ये 214 गावांची निवड करण्‍यात आली होती. त्‍यापैकी 115 गावांमध्‍ये 100 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तर 44 गावांमध्‍ये 80 टक्‍के पेक्षा जास्‍त काम झाले आहे. या 159 गावांमधील शेतक-यांनी खंड काळात नाल्‍यामध्‍ये व सिमेंट बंधा-यामुळे साठलेल्‍या पाण्‍याचा उपयोग डिझेल पंप लावून पिके वाचविण्‍यासाठी केला.
            मागील वर्षी 214 गावांमध्‍ये 3206 कामे घेण्‍यात आली होती. यापैकी 2896  कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्‍हयात 37 हजार 459 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्‍याचा उपयोग कापुस पिकासाठी एकदा पाणी दिल्‍यास 24 हजार 972 हेक्‍टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्‍यास 12 हजार 486 हेक्‍टर सिंचन होवू शकते. त्‍यामुळे यावर्षी जिल्‍हयातील किमान 25 हजार हेक्‍टरवरील शेतक-यांना तरी पावसाच्‍या लहरीपणाचा फटका बसणार नाही.
            याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्‍या पाणी पातळीत दीड ते 2 मिटरने वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतक-यांना पावसाच्‍या खंड काळात तसेच रब्‍बी पिकासाठी होणार आहे. त्‍यामुळे एका धरणामुळे जे शक्‍य झाले नसते ते जलयुक्‍त शिवारमध्‍ये झालेल्‍या विकेंद्रीत जलसाठयामुळे साध्‍य झाले आहे.
>

Saturday, 17 September 2016

प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.17-जिल्‍हयातील सालोड (हिरापूर) व नेरी (पुनर्वसन ) या दोन ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
20 सप्‍टेंबर पर्यंत महाराष्‍ट्र ग्रामपंचायत (सदस्‍यांची संख्‍या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्‍य संख्‍या ठरविणे व प्रारुप प्रभाग रचना करण्‍यात येईल. 23 सप्‍टेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकारी मान्‍यता देतील. 28 सप्‍टेंबर पर्यंत आरक्षणाची सोडत ठरविण्‍यात येईल. 29 सप्‍टेंबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्‍यासाठी जाहीर सुचना प्रसिध्‍द करण्‍यात येईल. 7 ऑक्‍टोंबर पर्यंत  हरकती स्विकारण्‍यात येतील. हरकती व सुचना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यावर 18 ऑक्‍टोंबर पर्यंत निर्णय घेण्‍यात येईल. अंतिम प्रभाग रचना, आरक्षित जागा इत्‍यादी  तपशिल  24 ऑक्‍टोंबर रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी एन.के.लोणकर  यांनी कळविले आहे.
                                                

Thursday, 15 September 2016

एस. टी. महामंडळाच्‍या बडतर्फ वाहकानी
पूर्नर्नेमणूकीसाठी संपर्क साधावा
वर्धा,दि.15- महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातील गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या  वाहकास कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी व शर्तीनुसार पुर्नर्नेमणुक देण्‍यात येणार आहे. यासाठी बडतर्फ वाहकानी महामंडळाशी संपर्क साधण्‍याचे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
राज्‍य परिवहन सेवेतून गैरहजेरीस्‍तव तसेच अपहार प्रकरणी बडतर्फ झालेल्‍या वाहकांना त्‍यांच्‍या कुंटूंबाची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी यासाठी 45 वर्षापेक्षा जास्‍त वय नसलेल्‍या कर्मचा-यांना कुंटूंब सुरक्षा योजने अंतर्गत अटी शर्ती नुसार नेमणुक देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.
पुर्नर्नेमणुक देतांना सदर कर्मचा-यांच्‍या पदातील त्‍याच्‍या विभागातील सामाजिक आरक्षणानुसार व सध्‍याच्‍या रिक्‍त जागांनुसार कार्यवाही करण्‍यात येणार आहे. या संदर्भात प्रसारित करण्‍यात आलेली परिपत्रके राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या msrtc.gov.inया अधिकृत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करण्‍यात आलेली आहेत. तसेच विभागांच्‍या व आगारांच्‍या सुचना फलकावरही प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे. या बाबत अधिक माहिती करिता संबंधित राज्‍य परिवहन विभागाशी त्‍वरीत संपर्क साधावा. तसेच या संदर्भात कोणत्‍याही भुलथापांना बळी पडू नये असे विभाग नियंत्रक , राज्‍य परिवहन महामंडळ यांनी कळविले आहे.
                                      0000


मेस्‍को करीअर अॅकॅडमी येथे युवकांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण
वर्धा,दि.15- यवतमाळ येथे 6 जानेवारी 17 पासुन सुरु होणा-या नागपूर ए.आर.ओ. च्‍या सैन्‍य भरतीसाठी महाराष्‍ट्र शासन अंगिकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्‍को ) संचालित सातारा जिल्‍हयातील मेस्‍को करीअर अॅकडमी येथे भरतीपुर्व प्रशिक्षण चालविण्‍यात येत आहे. इच्‍छुक उमेदवरांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी ध.य.सदाफळ यांनी केले आहे.
प्रशिक्षण समाजाच्‍या सर्व स्‍तरातील युवकांसाठी उपलब्‍ध असून प्रशिक्षणामध्‍ये मैदानी व लेखी परिक्षेच्‍या तयारीची तसेच राहण्‍याची आणि जेवणाची उत्‍तम सुविधा उपलब्‍ध आहे. यासाठी मासिक शुल्‍क 6 हजार 500 असून ते अॅकडमी मध्‍ये प्रवेश घेतांना भरावे लागेल. अधिक मा‍हितीसाठी अॅकडमीच्‍या सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळात 9168986864 व 7588624043 या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर तसेचwww.mescoltd.co.in या संकेत स्‍थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.
                                      00000

मतदार याद्याचा पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहिर
वर्धा,दि.15-भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्‍या कार्यक्रमानुसार जिल्‍हया‍तील 44-आर्वी, 45-देवळी, 46-हिंगणघाट व 47 वर्धा विधानसभा मतदार संघातील 1 जानेवारी 2017 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे मतदार संघानुसार विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.
16 सप्‍टेंबर रोजी प्रारुप याद्यांची प्रसिध्‍दी करुन, 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर दरम्‍यान दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील. 16 सप्‍टेंबर व 30 सप्‍टेंबर ला मतदार यादी मधील संबंधित भागाचे/सेक्‍शनचे ग्रामसभा /स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था येथे वाचन करुन नावाची खातर जमा करण्‍यात येईल. 18 सप्‍टेंबर व 1 ऑक्‍टोंबर रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. 16 नोव्‍हेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्‍यात येईल. 15 डिसेंबर पर्यंत डाटाबेसचे अद्यावतीकरण  व 5 जानेवारी ला अंतिम मतदार यादीची प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे.
          ज्‍या भारताच्‍या नागरिकांनी 1 जानेवारी 2017 रोजी 18 वर्ष पूर्ण केले असतील आणि त्‍या मतदार संघातील कायमचे रहिवाशी आहेत अशा नागरिकांनी आपले नांवे मतदार यादी मध्‍ये नोंदवावे.
          मतदार संघनिहाय मतदार नोंदणी अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.  44-आर्वीसाठी  उपविभागीय अधिकारी आर्वी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणुन तहसिलदार ,आर्वी, आष्‍टी कारंजा (घा.) ,45 – देवळीसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक नोंदणी अधिकारी तहसिलदार देवळी , 46 –हिंगणघाटसाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय हिंगणघाट व सहायक नोंदणी अधिकारी ,तहसिलदार, हिंगणघाट व समुद्रपूर, 47 –वर्धासाठी मतदार नोंदणी अधिकारी  उपविभागीय अधिकारी , वर्धा तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसिलदार वर्धा व सेलू यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
          सं‍बंधित मतदान केंद्रावर नियुक्‍त केलेल्‍या पदनिर्देशित अधिका-याकडे, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व मतदान केंद्रावर दावे व हरकती दाखल करण्‍यासाठी व चुकीच्‍या नोंदीची दुरुस्‍ती करण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज विनामुल्‍य उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. मतदार याद्या जास्‍तीत जास्‍त अचुक व  अद्यावत बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने सक्रिय भाग घेवुन या कामामध्‍ये निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेआहे.