Thursday, 15 September 2016

                 सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत पारदर्शकतेसाठी वाहनांना हिरवा रंग
Ø जिल्‍ह्यात एकाच कत्रांटदारामार्फत  वाहतूक
Ø धान्‍यवितरणासाठी 112 वाहनांची व्‍यवस्‍था
वर्धा,दि.16-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमध्‍ये सर्व टप्‍प्‍यांवर अधिक पारदर्शकता आणण्‍यासाठी सुधारित धान्‍य वितरण प्रणाली राबविण्‍यात येत आहे. यामध्‍ये जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना धान्‍य वितरणासोबतच धान्‍य वितरण करणा-या सर्व वाहनांना हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. या एकाच रंगामुळे आता सामान्‍य नागरिकांनाही असे वाहन ओळखणे शक्‍य झाले असुन धान्‍य वितरणामध्‍ये होणा-या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे.
सार्वजनिक धान्‍य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्‍यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्‍यांचे आधार लिंकींग करणे सुरु केले आहे. जिल्‍ह्यात  एकुण 13 लाख 57 हजार 45 शिधापत्रिका धारक आहे. यामध्‍ये 65 टक्‍के आधार लिकींग  झाले आहे.राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभ घेणा-या अंत्‍योदय व प्राधान्‍य गटामध्‍ये 8 लाख 82 हजार 367 लाभार्थी असून यातील   95 टक्‍के लाभार्थ्‍यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहे. याशिवाय राज्‍यशासनाने सर्व शेतक-यांना स्‍वस्‍त दराने धान्‍य वितरण सुरु केले असून अशा शेतक-यांची संख्‍या 2 लाख 49 हजार 916 ऐवढी आहे. या सर्व लाभार्थ्‍याना स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत  धान्‍य वितरण करण्‍यात येते. 
भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार या प्रवासात होणारी धान्‍याची चोरी थांबविण्‍यासाठी जिल्‍ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्‍य वितरण सुरु करण्‍यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्‍य पोहचविण्‍यासाठी 34 वाहने वापरण्‍यात येत आहेत. तर राज्‍य शासनाचे गोदाम ते रास्‍तभाव दुकानांपर्यंत 78 वाहनांमार्फत धान्‍य पोहचविण्‍यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्‍यासाठी हिरव्‍या रंगाने रंगवण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर ‘सुधारित धान्‍य वितरण प्रणाली, महाराष्‍ट्र शासन’ असा फलक वाहनाच्‍या समोरील भागावर लावण्‍यात आला आहे. त्‍यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत.
जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्‍य स्‍वस्‍त धान्‍य दुकानांच्‍या व्‍यतिरिक्‍त इतर ठिकाणी उतरत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास तात्‍काळ संबंधित तहसिलदार आणि जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांना 243314 या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेवर सामान्‍य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्‍यास निश्चितच मदत होईल.
                                                 



Friday, 26 August 2016

                         कार्यक्षम  अधिकां-यापासून प्रेरणा घ्‍यावी
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :- शासकिय कामे करतांना एकमेकांचे सहकार्य घेऊन कामे केल्‍यास प्रशासकिय कामात गतीमान येऊन नागरिकाची कामे चांगल्‍या प्रकारे करता यईल यासाठी चांगल्‍या अधिकां-यापासून कामाची प्रेरणा घ्‍यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकास भवन येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्‍यामुळे त्‍यांना प्रशासनाच्‍या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्‍हाधिकारी संजय दैने , निवासी उपजिल्‍हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्‍हाधिकारी श्री.लोणकर,यांची प्रमुख उप‍स्थिती होती.
यावेळी  निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर यांची नुकतीच चंद्रपूर येथे बदली झाली  असल्‍यामुळे त्‍यांच्‍या जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते शाल श्रीफळ व भेट वस्‍तू देऊन सत्‍कार करण्‍यात आला तर त्‍यांच्‍या जागे बदलून आलेले मंगेश जोशी यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नव्‍याने रुजु झालेले उपजिल्‍हाधिकारी  श्री. लोणकर  यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
शासकिय कर्तव्‍य बजावतांना नागरिकांचे समाधान हीच आपल्‍या कामाच्‍या यशाची पावती आहे. शासकिय कामाचे  वैभव नावडकर मध्‍ये सर्व गुण होते त्‍यामुळे त्‍यांना नुकतेच नागपूर विभागाच्‍या वतीने उत्‍कृष्‍ट अधिकारी म्‍हणुन गौरविण्‍यात आले होते. हिच त्‍यांच्‍या यशाची पावती होती. यासाठी आपण सर्वानी अशा अधिकांपासुन प्रेरणा घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
वैभव नावडकर म्‍हणाले  सर्व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाल्‍यामुळेच काम करण्‍यास उत्‍साह वाढला कारण शासकिय कामे करतांना एकटयाने कामे कधी च होत नसून सर्वानी मिळून एकजूटीने कामे केल्‍यामुळे  कामामध्‍ये पारदर्शकता आणता आली .
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक महसूल संघटनेचे अध्‍यक्ष श्री. लोखंडे यांनी केले. यावेळी  जिल्‍हा नियोजन अधिकारी टेंभुणे, लेखाधिकारी प्रतापराज मासाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, तालुक्‍यातील सर्व तहसिलदार, महसूल विभागाचे कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते.
                                                0000

                            बचत गटानी उत्‍कृष्‍ट उद्योजक बनावे
                                                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.26 :-बचत गटानी बाजापेठेतील उत्‍पादकाशी स्‍पर्धा करुन लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्‍कृष्‍ठ उद्योजक बनावे. यासाठी त्‍यांनी तयार केलेल्‍या उत्‍पादनाला शासनाच्‍या वतीने बाजार पेठ मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येईल  तसेच उद्योगाकरिता निधी सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात येईल असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज विकास भवन येथे महाराष्‍ट्र ग्रामीण जिवनोन्‍न्‍ती अभियानांतर्गत उमेद,  माविम व कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प यांच्‍या वतीने आयोजित वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत  केले.
          या वस्‍त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्‍या कार्यक्रमाला कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) चे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी, जिल्‍हा परिषदचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्‍हा अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक जांगडा, नाबार्ड च्‍या व्‍यवस्‍थापक श्रीमती बन्‍सोड, रितेश ताजने, माविमच्‍या जिल्‍हा व्‍यवस्‍थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍पाचे जिल्‍हा प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक  निलेश वावरे, प्रविण जयस्‍वाल व मिलींद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.
पुढे बोलतांना शैलेश नवाल म्‍हणाले बचत गटानी आपला  कायमस्‍वरुपी उदरनिर्वाह चालविण्‍यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरु करुन रोजगार  निर्मिती करुन कुशल उद्योग सुरु करावे. यासाठी शासनाच्‍या योजनांचा लाभ घेऊन  आपला उद्योग सुरु करावा व बाजारपेठेत आपल्‍या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटानी उत्‍पादीत केलेल्‍या मालाला  शहरातील मध्‍यभागी दुकाणे सुरु करुन कमीशनवर विकण्‍यास प्रयत्‍न करण्‍यात येईल. गटानी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करुन शेतक-यांना भाडे तत्‍वार दयावी. या उपकरणामुळे शेतक-यांना आधुनिक शेती करण्‍यास मदत होईल बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्‍यास मदत होईल.  तसेच बाजारपेठेतील उत्‍पादनांशी स्‍पर्धा करुन या स्‍पर्धेत उतरायला पाहिजे. असेही ते म्‍हणाले.
प्रमोद पवार म्‍हणाले बचत गटानी बाजारपेठेमध्‍ये ज्‍या वस्‍तुची जास्‍त मागणी असेल त्‍याच वस्‍तुचे उत्‍पादन करावे. जेणेकरुन गटाच्‍या उत्‍पादित मालाला  भाव मिळून  गटाचे आर्थिक उत्‍पन्‍न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल. तसेच कंपनी च्‍या मालाशी स्‍पर्धा करुन कमी दरात मालाची विक्री केल्‍यास जास्‍त प्रमाणात बाजारपेठ मिळण्‍यास मदत होईल.
यावेळी कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प (केम) च्‍या वतिने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्‍यवरांचे हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.
यावेळी केमचे प्रकल्‍प संचालक गणेश चौधरी व इतर मान्‍यवरांनी उपस्थित बचत गटाच्‍या महिलांना उद्योग सुरु करण्‍याविषयी मार्गदर्शन केले.





                                           


















Wednesday, 24 August 2016

                               भूसंपादनापेक्षा भूसंचयनाने
                                   शेतक-यांना जास्त फायदे
                                                                 -शैलेश नवाल
वर्धा:- नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाना जोडणारा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा सेलू तालुक्यातील  काही  गावामधून जाणार आहे. या प्रकल्पाकरिता लागणा-या जमिनीचे भूसंपादन नव्हे, तर भूसंचयन करण्यात येणार आहे. या  भूसंचयानामध्ये भूसंपादनापेक्षा जास्त फायदे आहे. भूसंचयन प्रकल्पात शेतकरी  हे भागीदारी स्वरुपात सहभागी असणार आहे. शेती-उद्योगाशी संबंधित अन्य सुविधा भूसंचयानामध्ये  शेतक-यांना मिळणार  असल्याची माहिती  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी दिली.
          सेलू तालुक्यातील  कोटंबा येथील  ग्रामपंचायतीच्या  सभागृहात आयोजित  नागपूर -मुंबई सुपर एक्सप्रेस हायवे, महाराष्ट्र समृध्दी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी शैलेश  नवाल हे शेतक-यांशी  संवाद साधतांना बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी  धनश्याम भुगावकर, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता, डाबे, कार्यकारी अभियंता श्रीमती अंसारी, सेलूचे तहसिलदार रविंद्र होळी उपस्थित होते.      
          यावेळी जिल्हाधिकारी  यांनी  शेतक-यांशी  चर्चा करतांना  सांगितले की, शेतक-यांचे  समाधान झाल्याशिवाय जमिन घेणार नाही.शेतक-यांशी  याबाबत चर्चा सुरुच राहील. भूसंपादनाचा कायदा लागू आहे. तुमची जमीन शासन घेते ही शंका काढून टाका. भूसंचयानाबाबतचा आपला गैरसमज दूर करा, या नव्या प्रकल्पामध्ये  ज्या शेतक-यांच्या जमिनी जातील,त्या शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपये व यावर दरवर्षी 10 टक्के वाढ देण्यात येणार आहे. जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतक-यांना देण्यात येईल. असे  जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी यावेळी  सांगितले.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये राज्यातील 24 जिल्ह्ये जोडले जात असून प्रकल्पाशेजारीच नवीन शहर बसविण्यात येत असून भूसंचयन मध्ये ज्या शेतक-यांनी जमिनीची गुंतवणूक केली असेल.त्या शेतक-यांना  त्यांच्या आवडिचा  कुठलाही व्यवसाय करता येईल.  शिवाय  या योजनेमुळे शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
          महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये शेतक-यांनी  भूसंपादनापेक्षा  भूसंचयन केल्यास जमिनीची गुंतवणूक होईलच त्याच बरोबर, यामध्ये शेतक-याना  शहरातल्या भूखंडाचीविना अट मालकी मिळेल, दहा वर्ष वाढते अनुदान, दहा वर्षानंतरच्या जमिनीच्या किंमतीची  हमी, सातबा-यावर  शिक्का  लावल्या जाणान नाही., शेतक-यांच्या मुलांना मोफत औद्योगिक  शिक्षण, इत्यादी  फायदे  भूसंचयन जमिनीची गुंतवणूक केल्यास मिळू शकेल.     

          यावेळी  शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही जिल्हाधिकारी शैलेश  नवाल यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र समृध्दी महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी  जाणारे व  या परिसरातील  इतर शेतकरी  मोठ्या संखेने  उपस्थित होते.


 

Monday, 22 August 2016

                  दिपालीला मिळाली उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची प्रेरणा
Ø एक दिवस प्रशासनासोबत
Ø जिल्‍हाधिकारी यांचा नविन उपक्रम
Ø स्‍पर्धा परिक्षार्थीसाठी प्रेरणा प्रकल्‍प
वर्धा, दि.22 :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परिक्षेची तयारी करण्‍यासाठी योग्‍य दिशा मिळावी यासाठी जिल्‍हा ग्रंथालय मध्‍ये येणा-या विद्यार्थ्‍यांसाठी महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात येत आहे. याचेच पुढचे पाऊल म्‍हणुन या शिबिरात येणा-या विद्याथ्‍यांमधुन  एका विद्यार्थ्‍याला तिस-या शनिवारी प्रशासनासोबत एक दिवस घालविण्‍याची संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही अशी संधी मिळणारी पहिली विद्यार्थींनी ठरली असून यामुळे उपजिल्‍हाधिकारी होण्‍याची नवी प्रेरणा मिळाल्‍याचे मत दिपालीने व्‍यक्‍त केले.
आज प्रत्‍येक क्षेत्रात नोकरी  मिळण्‍यासाठी प्रंचड स्‍पर्धेचा सामना करावा लागतो. मोठया शहरांमध्‍ये स्‍पर्धा परिक्षेचे अनेक क्‍लसेस चालतात. मात्र ग्रामीण भागातील बेरोजगारांना शहरातील मुलांसारखी अशी क्‍लासेसची सुविधा उपलब्‍ध होत नाही. आहे त्‍या अपु-या सुविधांमधुनच ग्रामीण तरुण स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतात. अशा अभावग्रस्‍ततेच्‍या तयारी वरच एमपीएससी व युपएससी सारख्‍या परिक्षांना सामोरा जातेा. ग्रामीण भागातील अशा  नाहीरेंच्‍यासाठी  जिल्‍हाधिकारी यांच्‍या पुढाकारातून जिल्‍हा  प्रशासन आणि जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोज‍न करण्‍यात येत आहे.
मागील दोन महिन्‍यापासून प्रत्‍येक महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी सामाजिक न्‍याय भवन येथे दुपारी 2.30 ते 4.30 हे दोन तास विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात येते. आतापर्यंत जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधिक्षक अंकित गोयल. , बॅक प्रोबेशनरी ऑफीसर वैभव गांवडे परिविक्षाधिन उपजिल्‍हाधिकारी स्‍वप्‍नील तांगडे यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले आहे.
स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांना प्रशासनाची तोंडओळख व्‍हावी आणि अधिका-यांच्‍या प्रत्‍यक्ष भेटीने त्‍यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्‍हाधिकारी यांनी विद्यार्थ्‍यांना एक दिवस प्रशासना सोबत घालवण्‍याची सुवर्ण संधी उपलब्‍ध करुन दिली आहे. महिन्‍याच्‍या तिस-या शनिवारी एका विद्यार्थ्‍याला ही संधी मिळणार आहे. दिपाली जयस्‍वाल ही या प्रेरणा प्रकल्‍पातील पहिली विद्यार्थीनी ठरली असून शनिवारी जिल्‍हाधिकारी यांनी तीच्‍याशी प्रत्‍यक्ष संवाद साधला. ग्रंथालयामध्‍ये येणा-या अडचणी तसेच मार्गदशन कार्यशाळेत कोणकोणत्‍या विषयाचे मार्गदर्शन करण्‍याची गरज आहे, यावर चर्चा केली. महसूल अधिका-यांच्‍या बैठकीत सहभागी होण्‍याची संधीही तीला मिळाली. अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय दैने यांनी प्रश्‍नांचा भडीमार करुन दिपालीला मुलाखतीच्‍या वातारवरणाची जाणीव करुन दिली.

सामान्‍य माणसाला मोठया अधिकां-शी  बोलायची भिती वाटते तिथे आज मला जिल्‍हाधिका-याशी थेट संवाद साधायला मिळाला ही गोष्‍ट माझ्यासाठी  कल्‍पनेपलिकडची आहे. यामुळे प्रशानाबद्दलची माझी भिती दूर झाली  असून प्रशासकीय अधिका-यांकडे असलेले अधिकार आणि कर्त्‍यव्‍य याची जाणिव झाली आहे. यातून मला नविन उर्जा मिळाली असून उपजिल्‍हाधिकारी होण्‍यासाठी मी आता खूप अभ्‍यास करणार असल्‍याचे दिपालीने सांगितले यासाठी तीने जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे आभार मानुन सर्व तरुणांना अशी संधी मिळाल्‍यास ग्रामीण भागातील तरुण मोठया प्रमाणात प्रशासनात येतील असा आशावाद तिने व्‍यक्‍त केला.
                                                                             दिपाली जयस्‍वाल



Saturday, 20 August 2016

दिव्‍यांगांसाठी नागपूरला होणार
संयुक्‍त पुर्नवास केंद्र
                                           -केंद्रीय मंत्री  थावरचंद्र गेहलोत
Ø 532 दिव्‍यांगांना साहित्‍याचे वितरण
वर्धा, दि.20 :-दिव्‍यांगांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्‍यांची आरोग्‍य तपासणी, प्रशिक्षण, स्‍वंयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा योजना, यासारख्‍या  सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्‍हणुन नागपूरला संयुक्‍त पुर्नवास केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. कर्मचा-यांची नियुक्‍ती झाल्‍यावर तीन महिन्‍यात हे केंद्र अंपगासाठी कार्यान्वित होईल.  अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.
दिव्‍यागांसाठी निःशुल्‍क साहित्‍य वितरणाचा कार्यक्रम आज सावंगी मेघे येथील दंत महाविद्यालयाचे सभागृहात सामाजिक न्‍याय आणि अधिकारि‍ता मंत्रालय ,एलिम्‍को कंपनी आणि जिल्‍हा प्रशासनाच्‍या संयुक्‍त विद्यमाने घेण्‍यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री गेहलोत बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी , जिल्‍हाधिकारी  शैलेश नवाल, शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर उपस्थित होते.
यावेळी श्री गेहलोत यांचे हस्‍ते अपंगांना तीन चाकी सायकल, व्‍हील  चेअर, श्रवणयंत्र, एमएसआयईडी कीट, ब्रेलकाठी, ब्रेलकीट इत्‍यादी साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. यावेळी बोलतांना ते म्‍हणाले, आतापर्यंत दिव्‍यागांना शिष्‍यवृत्‍ती देण्‍यात येत नव्‍हती. मात्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिव्‍यांगांच्‍या सर्वांगिण विकासासाठी काही योजना नव्‍याने सुरु केल्‍या. त्‍यामध्‍ये 2014-15 पासुन अपंगांसाठी शिष्‍यवृत्‍ती योजना सुरु केली आहे. याचा लाभ पूर्वमाध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक आणि पदवीधर विद्र्या‍र्थी  घेऊ शकतात .
त्‍याचबरोबर 80 टक्‍के पेक्षा जास्‍त अंपग असणा-या व्‍यक्‍तींना मोटराईज्‍ड ट्रायसिकल देण्‍याची योजना सुरु केली आहे. यामध्‍ये केंद्र सरकार 25 हजार अनुदान देते उर्वरित 12 हजार रुपये आमदार ,खासदार निधीतून उपलब्‍ध करुन दिल्‍यास दिव्‍यांग याचा सुध्‍दा लाभ घेऊ शकतात. देशात आतापर्यंत दोन हजार शिबिराच्‍या माध्‍यमातून 5 लाख पेक्षा जास्‍त दिव्‍यांगांना विविध दैनंदिन साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. कर्णबधिर मुलांसाठी  कॉकलिअर इम्‍प्‍लॉटची सुविधा उपलब्‍ध करुन दिली असून यासाठी 6 लाख रुपये अनुदान केंद्र शासन देते.  आतापर्यंत 355 मुलांवर इम्‍प्‍लाट केले असून आता ती मुले चांगल्‍याप्रकारे ऐकू व बोलू शकत आहे.
 याशिवाय केंद्र सरकार राष्‍ट्रीय  स्‍तरावर राष्‍ट्रीय क्रिडा केंद्र स्‍थापित करण्‍याचा विचार करीत आहे. यामुळे दिव्‍यांगांमध्‍ये असलेल्‍या  क्रिडागुणांचा विकास होईल. त्‍याचबरोबर दिव्‍यागांसाठी विशिष्‍ट प्रकारचे ओळखपत्र बनविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून  यामुळे दिव्‍यांग कोणत्‍याही शहरात कुठल्‍याही  योजनेचा लाभ घेऊ शकतील असेही ते यावेळी म्‍हणाले. वर्धा जिल्‍हयाच्‍या उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन लवकरच त्‍यांनाही साहित्‍याचे वितरण करण्‍यात येईल, अशी हमी त्‍यांनी यावेळी दिली.
यावेळी खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्‍हयातील 532 दिव्‍यांगांना केंद्र सरकारच्‍या  सामाजिक न्‍याय विभागाने साहित्‍याचे वितरण केले याबद्दल सामाजिक न्‍याय  मंत्री थावरचंद गेहलोत यांचे प्रति आभार व्‍यक्‍त केले. केंद्र शासनाने आतापर्यत 71 नविन योजना सुरु केल्‍या याचा लाभ नागरिकांना घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले. तसेच उर्वरित तीन तालुक्‍यातील दिव्‍यांगाना सूध्‍दा साहित्‍य वितरण करण्‍यासाठी लवकरच कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार समिर कुणावार, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल आणि सामाजिक न्‍याय विभागाचे संयुक्‍त सचिव अविनाशकुमार अवस्‍थी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात  117 व्‍यक्‍तींना  तीन चाकी सायकल, 48 व्हील चेअर, 2 सीपी चेअर, 132 कुबडया, 39 वृध्द व्यक्तींना काठी, 10 अंध व्‍यक्‍तींना  काठी, 32 ब्रेल किट, 178 कर्ण यंत्र, बालकांसाठी 7 रोलेटर , मानसिक विकलांग व्यक्तींना एम.एस.आय.ई.डी. किट 176, कृष्ठ रुग्णांसाठी ए.डी.एल. किट 7 , अशा एकुण 748 साहित्याचे 532 व्‍यक्‍तींना वाटप करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ज्‍योती भगत यांनी  केले कार्यक्रमाला प्रशासकिय अधिकारी , लोकप्रतिनिधी, लाभार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते


शेतक-यांचे समाधान होईपर्यंत
                         जमिनीला हात लावणार नाही
                                                   -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा, दि.20 :-नागपूर-मुंबई महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासाठी शेतक-यांच्‍या जमिनीचे भुसंपादन नव्‍हे तर भूसंचयन करण्‍यात येणार आहे. यामधुन शेतक-यांना विकसित भूखंड देण्‍यात येईल. या भूसंचयनासाठी लागणारी जमीन जोपर्यंत शेतक-यांच्‍या शंकाचे पूर्ण निरसन करुन त्‍यांचे समाधान होत नाही तोपर्यंत शेतक-यांच्‍या  जमिनीला हात लावणार नाही असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. आर्वी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना त्‍यांनी हे स्‍पष्‍ट केले.
महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गासंदर्भात आर्वीतनी ा यंत शेतक-यांच् शेतक-यांच्‍ तालुक्‍यातील शेतकरी –भूधारकांशी प्रशासनाच्‍या वतीने संवाद साधुन त्‍यांच्‍या शंकाचे निरसन करण्‍यात आले. यावेळी आमदार अमर काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, महाराष्‍ट्र रस्‍ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता यु.व्‍ही. डाबे, तहसिलदार विजय पवार, पंचायत समिती सभापती  ताराबाई ताडाम उपस्थित होत्‍या.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी यांनी महाराष्‍ट्र समृध्‍दी महामार्गाबाबत. सादरीकरण करुन शेतक-यांना माहिती दिली. कोणताही विकास हा एकतर्फी न होता तो भागीदारीचा विकास व्‍हायला हवा आणि त्‍यासाठी शेतक-यांचा जास्‍तीत जास्‍त फायदा करुन देण्‍याचा प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. शेतक-यांच्‍या शेतातील पाईपलाईन, विहिर, विंधनविहीर, झाडे यांचेही सर्वेक्षण करुन त्‍यांची नोंद घेवून त्‍याचा मोबदला दिला जाईल. असेही त्‍यांनी यावेळी शेतक-यांचे शंका निरसन करतांना स्‍पष्‍ट केले. ज्‍या शेतक-यांच्‍या सातबारावर ओलिताची नोंद नाही ती सर्वेक्षणाच्‍या वेळी करुन घेण्‍यात येईल. तसेच कृषी समृध्‍दी केद्रामध्‍ये शेतक-यांना विकसित भुखंड हे लॉटरी काढून देण्‍यात येतील.
यावेळी त्‍यांनी शेतीचे आताचे दर आणि विकसित भुखंडाचे दर यातील तफावत उदाहरणाव्‍दारे पटवून दिली. तसेच शेतक-यांच्‍या शंकाचे निरसन केले.
आमदार अमर काळे म्‍हणाले लोकप्रतिनिधी म्‍हणुन लोकांचे हित बघणे जबाबदारी असुन शेतक-यांच्‍या विकासाठी या प्रकल्‍पासंदर्भात सकारात्‍मक भूमिका असेल. पण लोकांचे समाधान झाले तरच भूसंचयन करु देणार असुन शेतक-यांच्‍या काही प्रश्‍नांची उत्‍तर अजुनही शासनाकडे नाहीत. त्‍यासंदर्भात शासनाकडून स्‍पष्‍ट सुचना आल्‍या तरच भुसंचयन करणे शक्‍य होईल. शेतक-यांचे प्रश्‍नासंदर्भात मुख्‍यामंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य गजानन निकम, कार्यकारी अभियंता श्रीमती अन्‍सारी, शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


 

Thursday, 18 August 2016

कापूस ते कापड प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार
                        -ना. दीपक केसरकर 
*
चंद्रपुर जिल्ह्याची प्रायोगिक  स्तरावर निवड. 
*
एम गिरी करणार तांत्रिक सहकार्य 
*5
वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
वर्धा, दि.17 :- महात्मा गांधीनी चरख्याचा उपयोग कापसापासून कपड़ा तयार करुन त्याकाळी विदर्भाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले होते. आजही महात्मा गांधींची ही विचारधारा विदर्भासाठी लागू होते. कापूस हे विदर्भातील शक्तिस्थान असून कापूस  उत्पादक शेतकऱ्यांच्या  कापसाचे मूल्य वर्धन करुन विदर्भात कापूस ते कापड  अशी मूल्यवर्धित साखळी  विकसीत करण्याची योजना राबवतोय. ज्यामुळे पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट होईल. हा प्रायोगिक प्रकल्प  चंद्रपुर  जिल्ह्यात  राबवण्याचा निर्णय घेतला असून एम गिरी यामधे महत्वाची भूमिका बजावेल असे वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. एम गिरी येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
         यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, लीना बनसोड, एम गिरी चे संचालक डॉ प्रफुल्ल काळे,राहुल ठाकरे,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, नियोजन अधिकारी उपस्थित होते. 
          महाराष्ट्रात रिसोर्स बेस प्लानिंग चा प्रयोग राबवण्यात येतोय.  यामधे  त्या- त्या  जिल्ह्यातील शक्तिस्थानावर काम करुन तेथील जनतेच्या  उत्पन्नात वाढ कशी करायची याचा विचार या प्रकल्पात करण्यात येईल. यामधे वस्तुच्या मूल्यवर्धनाला  खुप महत्व आहे. विदर्भात कापूस पिकवणारया  शेतकऱ्यांच्या घरामधे जर सूत तयार झाले तर मोठा आर्थिक बदल घडू शकतो.  असे काही प्रकल्प या आधी राबवले गेलेत. पण ते पायलट मॉडेल आहेत. त्या प्रायोगिक प्रकल्पांना मोठ्या स्तरावर एखाद्या  जिल्ह्यात राबवून यशस्वी झालोत तर विदर्भातील सर्व कापूस उत्पादक जिल्ह्यात हा प्रकल्प राबवता येईल. असेही ते यावेळी म्हणाले. यासाठी एमगिरि या  भारत सरकारच्या अधीनस्थ संस्थेने  या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य  करावे. या संस्थे ने याविषयावर बरेच काम केले आहे.  सौर उर्जेवर आधारित चरखे बनवले आहेत. अशाच प्रकारची सौर उर्जेवर चालणारे लूम आणि रोमिंग मशीन्स त्यांनी  तयार कराव्यात. 
         तसेच सामूहिक सुविधा केंद्र तयार करावे. जिथे शेतकरी आपला कापूस देवून त्यापासून लळया किंवा सूत तयार करुन घेऊ शकेल. अर्थातच सुताची कींमत कापसापेक्षा जास्त असेल. याशिवाय कापड़ तयार करण्याच्या प्रक्रिएमधे सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग कसा राहील याचा विचार करुन प्रकल्प तयार करण्यासाठी एम् गिरी ने सहकार्य करावे यावर सुद्धा चर्चा झाली. विदर्भात कापसावर प्रक्रियेची अशी संपूर्ण साखळी विकसित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ करता येईल. यासाठी शासनाने प्रायोगिक स्तरावर यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात हा प्रयोग  राबविन्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण विदर्भात याची अमलबजावणी करण्यात येईल यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.  डॉ काळे यांनी या प्रकल्पात एमगिरि संपूर्ण सहकार्य करण्याची हमी केसरकर यांना  दिली.  यावेळी एम गिरीचे अधिकारी उपस्थित होते. श्री केसरकर यांनी एमगिरि ने विकसित केलेले लूम रोमिंग मशीन्स आणि सूत कताई मशीन्स तसेच सोलर वर चालणाऱ्या मशीन्सची पाहणी केली. प्रथम  त्यांनी महात्मा गांधी आणि कस्त्तुरबा यांच्या पुतळ्यास कापूस माला घालून अभिवादन केले.
0000