Tuesday, 6 November 2012

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज स्‍वीकारणे सुरु


      वर्धा, दिनांक 5 – स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था च्‍या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणा-या मागासवर्गीय उमेदवारांच्‍या जाती दावा पडताळणीबाबत दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्‍या उमेदवारास 6 महिन्‍यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्‍यात आले आहे.
      दिनांक 31 डिसेंबर 2013 पर्यंत होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इच्‍छूक मागासवर्गीय उमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज निवडणूकीचे नामनिर्देशनपत्र भरण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवसापर्यंत  जिल्‍हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे स्विकारण्‍यात येतील. असे जिल्‍हाधिकारी यांनी कळविले आहे.
                               00000 

पत्रव्‍दारा डी.टी.एड. प्रशिक्षण


      वर्धा, दि. 5-बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या  शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत महाराष्‍ट्र राज्‍यातील जिल्‍हा परिषद, नगरपालीका, नगरपरिषद, महानगरपालीका, कटक मंडळाच्‍या प्राथमिक शाळा आणि सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या सर्व माध्‍यमाच्‍या  शासनमान्‍यता प्राप्‍त  खाजगी प्राथमिक व माध्‍यमिक अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विना अनुदानित शाळा तसेच आदिवासी विकास व समाजकल्‍याण विभागाच्‍या प्राथमिक व माध्‍यमिक शाळा व शासकीय मान्‍यताप्राप्‍त   खाजगी आश्रमशाळेतील पात्र अप्रशिक्षित प्राथमिक, माध्‍यमिक शिक्षण, शिक्षण सेवक, निमशिक्षक अपंक एका‍त्‍मीक शिक्षण योजने तील शिक्षण यांच्‍यासाठी  सन 2012-2013 साठी शासन निर्णयानुसार पत्रव्‍दारा डि.टी.एड.प्रशिक्षण योजनेची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात येत आहे.
      पत्रव्‍दारा डि.टी.एड. प्रशिक्षण प्रवेशाचे आवेदनपत्र व माहिती पुस्तिका शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिलहा परिशद यांचेकडे दिनांक 17 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत कार्यालयीन  वेळेत शासकीय सुटीचे दिवस सोडून रुपये 200 (रुपये दोनशे फक्‍त) शुल्‍कासह  उपलब्‍ध  होतील. मुंबई व उपनगरातील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्ष , शिक्षण सेवकासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बृहन्‍मुंबई हिंदु कॉलनी, दादर यांचेकडे उपलबध होतील. संबंधित अप्रशिक्षित शिक्षक, शिक्षण सेवकांनी पूर्ण भरलेली आवेदनपत्रे दिनांक 19 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत आपल्‍या विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापकामार्फत माहिती पुस्तिकेत नमुद केल्‍याप्रमाणे ज्‍या ठिकाणाहुन आवेदनपत्र घेतली त्‍याच ठिकाणी सादर करावीत. उशिरा अगर पोष्‍टाने व कुरिअरने आलेली आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत. पात्र अप्रशिक्षित शिक्षकांनी 31 मार्च 2015 पुर्वी प्रशिक्षित होणे बंधनकारक असल्‍याने ही अंतिम प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. याची सेवेत असलेल्‍या आणि सक्षम प्राधिका-याची मान्‍यता असलेल्‍या सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या व माध्‍यमाच्‍या पात्र अप्रशिक्षित प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षकांनी नोंद घ्‍यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
                           00000

सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्‍कार योजना


     वर्धा,दि.6 - महाराष्‍ट्र शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्‍यातील शासनमान्‍यताप्राप्‍त  सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या गुणात्‍मक विकास व्‍हावा, त्‍यांचया कउून अधिक चांगल्‍या सेवा दिल्‍या जाव्‍यात  यासाठी  प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी उत्‍कृष्‍ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्‍कृष्‍ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्‍कार  देऊन गौरविण्‍यता येते.
      या योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्‍कार  यांचे नावाने शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांच्‍या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्‍येकी एक अशा एकूण 8 पुरस्‍कारासाठी  ग्रंथालयांकडून प्राप्‍त  प्रस्‍तावांतून निवड समितीकडून निवड करण्‍यात येते. तसेच डॉ. एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्‍कार यांचे नावाने ग्रंथालय चळवळीच्‍या  विकासासाठी  कार्य करणा-या कार्यकर्त्‍यांना  व सेवाभावी  वृततीने काम करणा-या उत्‍कृष्‍ट कर्मचा-यांना प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने राज्‍यस्‍तरावर प्रत्‍येकी  एकेक व महसूली विभागातून प्रत्‍येकी एक याप्रमाणे  एकूण 14 पुरस्‍कारासाठी त्‍यासाठीच्‍या  निवड समितीकडून निवड करण्‍यात येते.
      2012-13 या वर्षासाठी  या पुरस्‍कार योजनेमध्‍ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्‍य  सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्‍या कार्यकर्त्‍यांनी  व कर्मचा-यांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन क्षेत्राच्‍या विकासासाठी कार्य केलेले आहे अशा पात्र ठरणा-या इच्‍छूक ग्रंथालय, कार्यकर्ते, कर्मचारी यांनी आपल्‍या विभागाच्‍या  सहाययक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे  30 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावेत. विद्यमान वर्षापासून  अर्ज करणा-या संस्‍था, व्‍यक्‍ती यांना प्रत्‍यक्ष भेटी देऊन प्राथमिक तपासणीनंतरच प्रस्‍ताव  अंतिमतः निवड समितीकडे सादर करण्‍यात येणार आहेत. याबाबत प्रस्‍ताव पाठविण्‍याची मुदतीत कार्यवाही  करावी. असे आवाहन दि. श्री. च्‍व्‍हाण, संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य  यांनी केले आहे.
                              00000 

Saturday, 3 November 2012

सर्वांगीन विकासाला चालना देणा-या योजनांचा समावेश जिल्‍हा वार्षिक योजनेत करा - एन.नविन सोना


                              

   *  पुढील वर्षासाठीच्‍या वार्षिक योजनेचा आराखडा तयार
   * बैठकींना अनुपस्थित अधिका-यांविरुध्‍द कडक कारवाई
   * विभाग प्रमुखांकडून 120 कोटी 13 लक्ष रुपयाचे प्रस्‍ताव सादर
   * लघु गटातर्फे जिल्‍हा वार्षिक योजनेला मान्‍यता  

          वर्धा, दि. 3- जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभुत ठरणा-या  तसेच वैयक्तिक लाभाच्‍या  योजनांसाठी  आवश्‍यक असलेल्‍या निधी मागणीचे प्रस्‍ताव विभाग प्रमुखांनी  तात्‍काळ  जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  समावेश करण्‍यासाठी  सादर करावेत. अशा सूचना जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी आज दिल्‍यात.
          जिल्‍हा वार्षिक योजनेसारख्‍या  महत्‍वाच्‍या  बैठकांना अनुपस्थित असलेल्‍या  अधिका-यांबद्दल  तीव्र  नाराजी व्‍यक्‍त करुन अशा अधिका-यांबाबतची माहिती  संबधीत विभागप्रमुख व सचिवांना  कळविण्‍याच्‍या  सुचनाही  जिल्‍हाधिकारी यांनी सुचना केली.
          जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात जिल्‍हा वार्षिक योजना 2013-14 साठी सर्व साधारण प्रारुप आराखड्याची  लघुगटाव्‍दारे  छाननी करण्‍यासाठीची बैठक  एन. नविन सोना यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  तसेच लघु गटाचे प्रमुख आमदार सुरेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आली होती.
          यावेळी  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प संचालक गिरीश सरोदे, जिल्‍हा  नियोजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच  सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  विभागप्रमुखांकडून  विविध विकासकामांबाबत प्रस्‍ताव  सादर करताना  लाभार्थ्‍यांना  होणारा वैयक्तिक लाभ तसेच जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभूत ठरणारे उपक्रमांचा समावेश  करतानाच या योजनांच्‍या  अंमलबजावणी  बाबतही    सविस्‍तर  अहवाल  तयार करण्‍याच्‍या  सूचना करतानाच उपलब्‍ध  झालेला निधी  निर्धारीत कालावधीत  खर्च करण्‍याचे  नियोजनही  करावे, असेही  जिल्‍हाधिका-याने यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
            120 कोटी  13 लक्ष रुपये खर्चाचे प्रस्‍ताव सादर
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  सर्वसाधारण योजनांसाठी  शासनाने  79 कोटी 19 लक्ष रुपायाच्‍या  कमाल आर्थिक  मर्यादेत निश्चित केली असून, अंमलबजावनी अधिका-यांनी  120 कोटी  13 लक्ष 94 हजार रुपयाच्‍या नियोजनाचे  प्रस्‍ताव  सादर केले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून प्राप्‍त   झालेल्‍या  प्रस्‍तावावर विभागनिहाय यावेळी  चर्चा करण्‍यात आली.  वार्षिक नियोजन आढावा बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याचा   अंतीम आराखडा निश्चित होणार आहे.                                               
       प्रारुप वार्षिक योजनेमध्‍ये  कृषी व संलग्‍न सेवेसाठी  10 कोटी 29 लक्ष 82 हजार रुपये  कमाल नियतव्‍यय  मंजूर आहे. ग्रामविकास कार्यक्रमासाठी  14 कोटी रुपये,पाटबंधारे विकासासाठी  5 कोटी 17 लक्ष 33 हजार रुपये  तसेच वाहतूक व दळणवळणासाठी  16 कोटी  11 लक्ष 72 हजार रुपये  याप्रमाणे  विविध विभागांसाठी  कमाल मर्यादेत निधी  मंजूर करण्‍यात आला आहे.  तसेच  अंमलबजावनी अधिका-यांकडून प्रस्‍तावित निधी  बाबतही  राज्‍यस्‍तरीय बैठकीसमोर सादरीकरण करण्‍यात येणार असलयाची माहिती  जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिली.
            अनुसूचित जाती उपाय योजने अंतर्गत सन 2013-14 साठी 28 कोटी  71 लक्ष रुपये कमाल आर्थिक मर्यादेत प्रस्‍ताव  मंजूर करण्‍यात आले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून 31 कोटी 59 लक्ष 65 हजार रुपये  खर्चाचे प्रस्‍ताव  सादर केले आहेत. आदिवासी उपययोजने अंतर्गत 22 कोटी 23 लक्ष रुपये  आर्थिक मर्यादा निश्चित केली असून, विविध यंत्रणांकडून  36 कोटी रुपयाचे प्रस्‍ताव सादर झालेले आहे. अतिरीक्‍त मागणी बाबत राज्‍य समिती समोर प्रस्‍ताव  ठेवण्‍यात येणार आहे.
प्रारंभी  जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी  स्‍वागत करुन  जिल्‍हा वार्षिक योजना  2013-14 साठीच्‍या  प्रारुप आराखड्याची  तसेच विविध विभागांकडून प्राप्‍त झालेल्‍या   अतिरीक्‍त प्रस्‍तावाची  माहिती दिली.  
आमदार सुरेश  देशमुख  यांनी  रस्‍ते, पाणी तसेच  कृ‍षी  विभागा संदर्भातील अपूर्ण  योजना प्राधान्‍याने  पूर्ण  करण्‍यावर  विशेष  भर विभागप्रमुखांनी द्यावा तसेच  नवीन कामांसाठी निधीची  मागणी करताना  वैयक्तिक लाभाच्‍या योजनांचा   प्राधान्‍याने  समावेश करावा, अशी सुचना केली.
 मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती  दिली. ग्रामीण भागात पिण्‍याचे पाणी ,दळणवळण,शाळांची  विशेष दुरुस्‍ती  व आरोग्‍य सेवेसाठी  अतिरीक्‍त  निधी  मंजूर करण्‍याची सुचना यावेळी केली.
जिल्‍ह्यातील  सर्व कार्यालयांचे हायर ऑडीट तात्‍काळ पूर्ण करुन त्‍या संबधीचा अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी नगर परिषदांनी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्‍यासाठी प्राधान्‍य देऊन महत्‍वाच्‍या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सज्ज  राहील यादृष्‍टीने खबरदारी घेण्‍यात  यावी. असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
बैठकीत जिल्‍ह्यातील विविध अंमलबजावनी यंत्रणांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
                                                     000000

डेंग्‍यू आजाराच्‍या नियंत्रणासाठी विशेष कक्ष सुरु - एन.नविन सोना




            * डास निर्मुलनासाठी  शहरात तसेच ग्रामीण भागात विशेष मोहीम
                     * डेंग्‍यू  प्रतीबंधात्‍मक उपाययोजना प्राधान्‍याने  राबवा
            * पाणी स्‍वच्‍छतेसाठी  प्रत्‍येकाने ड्रायडे सक्‍तीने पाळा
            * 54 गावांमध्‍ये  विशेष  तपासणी मोहीम    

            वर्धा,दि. 3- डेंग्‍यूसह  किटकजन्‍य आजाराच्‍या   प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  जिल्‍हा  आरोग्‍य  अधिकारी  यांच्‍या  नियंत्रणाखाली  विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून, प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  ग्रामीण व शहरी भागात  साचलेले पाणी , अस्‍वच्‍छता  निर्मूलनासह जनतेमध्‍ये  आरोग्‍याविषयी  जागृती निर्माण करण्‍यासाठी  विशेष  मोहीम  सुरु करण्‍यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी एन.नविन सोना यांनी आज दिली.
           डेंग्‍यूसह किटकजन्‍य  आजारामुळे  जिल्‍ह्यात  23 रुग्‍ण  बाधीत झाले असून, बाधीत रुग्‍णांवर  तात्‍काळ  औषधोपचारासह  इतर  उपाययोजनांचा  आढावा वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकीत जिल्‍हाधिका-यांनी घेतला. यावेळी  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.माने,  जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक मिलींद सोनवने , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी  आर.एम.भुयार, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी  यावेळी उपस्थित होते.
          शहरी व ग्रामीण भागात साचलेल्‍या  पाण्‍यामुळे  व अस्‍वच्‍छतेमुळे  डासांचा प्रादुर्भाव होत आहे. यावर नियंत्रणासाठी  फॉगिंग मशीनने तसेच फवारणी करुन डास निर्मूलनाची  मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी  अशी सुचना करताना  जिल्‍ह्यात  ज्‍या गावांमध्‍ये  डेंग्‍यूचे  रुग्‍ण  आढळून  आले त्‍या गावामधील  प्रत्‍येक  घरातील  सदस्‍यांची  आरोग्‍य  तपासणी करुन  आवश्‍यक  औषधोपचार  करावा अशा सुचना  करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना  म्‍हणाले की प्रत्‍येक   गावात तसेच नगर परिषद क्षेत्रात   पाणी  साठवूण राहणार नाही तसेच आठवडृयातून  एक  दिवस सक्‍तीने ड्रायडे पाळण्‍याबाबत  विशेष मोहीम राबवावी .
        जिल्‍हा स्‍तरावर नियंत्रण कक्ष   तयार करुन  जिल्‍हा आरोग्‍य  अधिकारी  व जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक यांनी  वैद्यकीय  संघटनांचे प्रतीनिधी  व खाजगी  रुग्‍णालयांचे  सहकार्य घेवून   ताप येणा-या  तसेच साथीची  लागण झालेल्‍या   प्रत्‍येक  रुग्‍णांची रक्‍त तपासणी होईल व त्‍याची  नोंद ठेवून औषधोपचार  नियमित मिळेल याची  खबरदारी घ्‍यावी.                                            
            साथ रोगाबाबत ज्‍या गावांमधून  रुग्‍ण  आढळले तसेच नवीन रुग्‍णांची  माहिती घेऊन खाजगी रुग्‍णालयात सुध्‍दा दाखल होणा-या  रुग्‍णांबाबतही  औषधोपचारावर नियंत्रण  ठेवावे तसेच  हातपंप, सार्वजनिक नळ येाजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे विविध स्‍त्रोत या परिसरात  पाणी साचणार नाही याची दक्षता घ्‍यावी. व स्‍वच्‍छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना द्यावे अश्‍या सुचनाही जिल्‍हाधिकारी यांनी केल्‍यात.
          हिंगणघाट येथे साथ रोगाचे सर्वाधिक रुग्‍ण आढळले असून इतर जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये फवारणी तसेच जनजागृती करीता विशेष ग्रामसभा घेऊन जनतेचा सहभागही घ्‍यावा. अशा सुचना करताना   वर्धा शहरामध्‍ये  विविध वस्‍त्‍यांमध्‍ये    फॉगिंग मशीनने धुरळणी करावी यासाठी  जिल्‍हा परिषदेकडे असणा-या मशीन उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशा सुचनाही यावेळी करण्‍यात आल्‍या.
          ग्रामीण भागात अस्‍वच्‍छ  वातावरणामुळे  डासांची उत्‍पत्‍ती   होते अशा ठिकाणी विशेष स्‍वच्‍छता  मोहीम राबवावी  अशा सुचनाही  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी ग्राम पंचायतींना दिल्‍यात. यासाठी ग्रामपंचायतींना जबाबदार धरण्‍यात येईल असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
           डेंग्‍यूसह साथीच्‍या आजारासाठी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हा  शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद  सोणवने यांनी दिली.
                                                00000000

शेतक-यांच्‍या प्रश्‍नासह महत्‍वाच्‍या योजना लोकांपर्यंत पोहचविण्‍यावर - एन.नविन सोना भर नव्‍या जिल्‍हाधिका-यांनी पदभार सांभाळला


          वर्धा, दिनांक 2 – वर्धा जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासासाठी  आवश्‍यक असलेल्‍या  सर्व योजना प्रभावीपणे  राबविण्‍यासोबतच शेतक-यांच्‍या  प्रश्‍नाला  प्राधान्‍य देवून महत्‍वाच्‍या योजना  जनतेपर्यंत  पोहचविण्‍यासाठी  अग्रक्रम राहणार असल्‍याची  ग्‍वाही  वर्धा जिल्‍ह्याचे  नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी  जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  दिली.
       भारतीय  प्रशासकीय सेवेतील 2000 बॅचचे  असलेले एन.नविन सोना हे अभियांत्रीकी शाखेतील पदवीधर असून, ते चेन्‍न्‍ई येथील रहिवाशी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत पदार्पण केल्‍यानंतर  उपविभागीय अधिकारी रत्‍नागीरी  येथून  शासकीय सेवेला सुरुवात केली असून, औरंगाबाद येथे  विक्रीकर विभागाचे  सहआयुक्‍त , औरंगाबादचे अपर आयुक्‍त काम केल्‍यानंतर  2009 मध्‍ये त्‍यांची  अमरावती येथे  अपर आयुक्‍त या पदावर नियुक्‍ती  करण्‍यात आली.  अमरावती येथे  विभागीय आयुक्‍त तसेच जिल्‍हाधिकारी या पदाचाही अतिरीक्‍त कार्यभार सांभाळला असून, अमरावती  महानगरपालीकेचे आयुक्‍त पदावरही त्‍यांनी  काम केले आहे. नुकतेच नागपूर येथे संचालक वस्‍त्रोद्योग या पदावर  एन.नविन सोना यांची शासनाने नियुक्‍ती  केली होती.   
            जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांची  उत्‍तर प्रदेश प्रशासनामध्‍ये  प्रतीनियुक्‍तीवर  बदली झाल्‍यामुळे  एन.नविन सोना यांनी  वर्धाचे जिल्‍हाधिकारी पदाचा आज कार्यभार स्विकारला आहे.
           जिल्‍हाधिकारी पदाची  सुत्रे स्विकारल्‍यानंतर  वर्धा जिल्‍ह्याचे  विशेष प्रश्‍न समजावून घेवून  ते सोडवून घेण्‍यासाठी  माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्‍यावर विशेष भर राहणार असल्‍याचे सांगितले. जीआयएस बेस या आधुनिक तंत्राचा वापर करण्‍यात   येणार असल्‍याचे सांगतांना  एन.नविन सोना म्‍हणाले की, वर्धा जिल्‍ह्यात  औद्योगिक विकासाला चालना देणे तसेच शासनाच्‍या  विविध योजनांसाठी  शासनाकडून  जास्‍तीत जास्‍त  निधी उपलब्‍ध  होईल या दृष्‍टीने प्रयत्‍न असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
             वर्धा जिल्‍ह्यात  आधार कार्ड नोंदणी  राज्‍यात  सर्वाधिक झाली असून, ई-सेवेच्‍या माध्‍यमातून शेतकरी  व सामान्‍य जनतेला जलद व प्रभावी सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विशेष भर असल्‍याचेही  जिल्‍हाधिकारी  एन.नवीन सोना यांनी  यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
           मावळत्‍या जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री  भोज  यांनी  एन.नविन सोना यांना जिल्‍हाधिकारी  पदाची  सुत्रे प्रदान केली तसेच त्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ  देवून  स्‍वागत केले. व नव्‍या पदासाठी  शुभेच्‍छा दिल्‍यात.
                                                            00000

Wednesday, 31 October 2012

शेतक-याची फसवणूक टाळण्‍यासाठी शेती साहित्‍यांची किंमत निश्चित करणार - राधाकृष्‍ण विखे पाटील


        वर्धा दि.31- शेतीसाठी लागणा-या  साहित्‍याची किंमत निश्चित नसल्‍यामुळे शेतक-यांना अवास्‍तव किंमत देवून शेती हंगामासाठी साहित्‍य खरेदी करावे लागते यामध्‍ये शेतक-यांची फसवणूक होत असल्‍यामुळे शेतीसाठी लागणा-या सर्व साहित्‍यांची किंमत निश्चित करण्‍यात येणार असल्‍याची घोषणा कृषी व पणनमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली .
           बोरगांव मेघे येथील औषधशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या प्रांगणात  दत्‍ता मेघे आयुर्विज्ञाण संस्‍थांन अभिमत विद्यापिठाच्‍या गुलगुरुपदी डॉ. दिलीप गोडे यांची नियुक्‍ती झाल्‍याबद्दल आयोजित अभिनंदन सोहळा तसेच कृषी विभागातर्फे ठिंबक तृषार योजनेतील लाभार्थ्‍यांना धनादेश व कृषी तारण योजनेच्‍या  भिंतीचित्राचे प्रकाशण राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
         यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नागपूर सुधार प्रन्‍यासचे विश्‍वस्‍त अंनंतराव घरड, राधिकाबाई मेमोरीयल ट्रसचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, माजी आमदार डॉ.राजेंद्र गोडे, डॉ.शिरीष गोडे, प्रा. डॉ. भरत मेघे, कुलगुरु डॉ. दिलीप संतोषराव गोडे, डॉ.सौ. सुरिंदर गोडे, युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे, बबणराव तायवाडे, शेखर देशमुख आदि व्‍यासपिठावर उपस्थित होते.
          डॉ.दिलीप संतोषराव गोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करुण मिळविलेले ज्ञानाचा  समाजातील अत्‍यंत गरीब व्‍यक्‍तींसाठी लाभ होणार असून सामाजिक जाणीव व शेतकरी व शेतमजूरांबद्दल त्‍यांची बांधिलकी असल्‍याचे सांगतांना कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञाणाचा लाभ शेतक-यांना करुण देण्‍यासाठी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊण प्रात्‍याक्षिक करण्‍याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली.
          शेतक-यांना शेती संदर्भात मार्गदर्शन करतांनाच शेतक-यांना बीयाणे, खत व शेतीसाहित्‍य योग्‍य दरात उपलब्‍ध करुण देण्‍यासाठी नवीन धोरण आखण्‍यात येत असून या धोरणामध्‍ये शेतक-यांची कुठेही फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्‍यात येणार आहे.
कृषी व पणन  हे दोन्‍ही विभाग एकत्र असल्‍यामुळे कृषी उत्‍पादनाला प्रोत्‍साहन देण्‍यासोबतच कृषी मालाला योग भाव मिळण्‍यासाठी मदत होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले कृषी व पणन विभागातील अधिका-यांनी पारदर्शकपणे काम करावे तसेच प्रत्‍यक्ष फिल्‍डवर जावून पाहणी करावी व त्‍यानुसार शेतक-यांना मदत करावी अशी सूचनाही कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी यावेळी केली                                 
दत्‍ता मेघे आयुविज्ञाण अभिमत विद्यापिठाच्‍या कुलगुरुपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल दिलीप संतोषराव गोडे यांचा शाल श्रीफळ, व भेट वस्‍तू देवून कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी गौरव केला. यावेळी डॉ. श्रीमती सुरिंदर गोडे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
नागपूर सुधार प्रन्‍याचे विश्‍वस्‍त अनंतराव घारड,राधाकीबाई मेमोरीयलचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, आमदार विजय वडट्टीवार, डॉ.राजेंद्र गोडे, यांचे यावेळी डॉ. दिलीप गोडे यांची गुलगुरुपदी निवड झाल्‍याबद्दल अभिनंदनपर भाषणे झाली.
युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे यांनी  स्‍वागत करुण प्रास्‍ताविक भाषणात डॉ. दिलीप गोडे यांच्‍या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी पाहुण्‍यांचा परिचय करुण दिला.
जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाडे यांनी शेतक-यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या कृषी तारण योजनेच्‍या पुस्तिकेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदिप मेघे तर आभार प्रदर्शन डॉ. शिरीष गोडे यांनी मानले. यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,बोरगांव मेघे ग्रामपंचायतचे सरपंच देवानंदजी दखणे, अविनाश देशमुख, राजेश तरारे, सौ.भारती गोडे, प्रदिप मेघे, अर्चनाताई मेघे, अरुणभाऊ वसू तसेच विविध क्षेत्रातील गणमान्‍य व्‍यक्‍ती विविध संस्‍थांचे पदाधिकारी ,लोप्रतिनिधी,शेतकरी मोठयासंखेने उपस्थित होते.
00000