Wednesday, 26 September 2012

शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांमधे महाराष्‍ट्राचा लौकीक वाढवा - ज्ञानेश्‍वर ढगे



          * राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांना सुरुवात
          * राज्‍यातील 768 खेळाडूंचा समावेश
          * राष्‍ट्रीय संघासाठी चमूची निवड

       वर्धा, दि. 26 – सॉफ्ट बॉल स्‍पर्धामध्‍ये  उत्‍कृष्‍ट  कामगीरी  करुन महाराष्‍ट्राचा  लौकीक  वाढवा असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे  उदघाटन समारंभा प्रसंगी  व्‍यक्‍त केले.
          क्रिडा व युवक सेवा संचानालनालय तसेच जिल्‍हा क्रिडा परिषद, वर्धा मार्फत जी.एस.कॉमर्स कॉलेजच्‍या क्रिडांगणावर राज्‍यस्‍तरीय शालेय  सॉफ्ट बॉल स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आल्‍या असून, या स्‍पर्धेसाठी  अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे , कोल्‍हापूर व लातूर या आठ विभागातून  768  शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत.  
          राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धेचे   उदघाटन नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांच्‍या हस्‍ते झाले तर अध्‍यक्षस्‍थानी  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे उपस्थित होते.
          वर्धा येथे प्रथमच राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात येत असून  1 ऑक्‍टोंबर पर्यंत चालणा-या या स्‍पर्धांमध्‍ये  14 , 17  व 19 वर्षातील मुला मुलींचे संघ स्‍पर्धांमध्‍ये सहभागी  झाले आहेत. या स्‍पर्धामधून   इंदोर येथे होणा-या राष्‍ट्रीय स्‍पर्धांसाठी महाराष्‍ट्राची चमू निवडण्‍यात येणारआहे.  उदघाटनाचा पहिला सामना कोल्‍हापूर विरुध्‍द  नाशिक या संघा दरम्‍यान  खेळल्‍या गेला.
          स्‍पर्धाचे उदघाटन  राष्‍ट्रीय पारीतोषिक प्राप्‍त खेळाडूंनी  मशाल ज्‍योत  क्रिडांगणावर  आणली व प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते क्रिडा ज्‍योत  पेटविण्‍यात आली.  त्‍यानंतर  सर्व खेळाडूंना  स्‍पर्धामध्‍ये   खेळाडू वृत्‍तीने   सहभागी  होण्‍याबाबत  शपथ देण्‍यात आली.  
          यावेळी  नगराध्‍यक्ष  आकाश शेंडे यांनी  खेळाडूंना  मार्गदर्शन करुन स्‍पर्धांच्‍या   उदघाटनाची  घोषणा केली. क्रिडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांनी  प्रास्‍ताविकात राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धाच्‍या आयोजनाची तसेच  स्‍पर्धेच्‍या  नियोजनाबाबत  माहिती दिली.
       महाराष्‍ट्र राज्‍य  सॉफट बॉल संघटना तसेच  वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटना व विदर्भातील तज्ञ  पंच , अधिकारी  यांचे तांत्रिक सहकार्य या स्‍पर्धासाठी घेण्‍यात येत आहेत. स्‍पर्धांमध्‍ये  राष्‍ट्रीय निवड चाचणी करीता 240 खेळाडू  96 संघ व्‍यवस्‍थापक, 40  पंच व क्रिडा मार्गदर्शक तसेच निवड समिती सदस्‍य  स्‍पर्धांमध्‍ये सहभागी झाले आहेत.
      यावेळी  क्रिडा क्षेत्राचे जीवनगौरव पुरस्‍कार प्राप्‍त सुभाष पीसे, वर्धा शिक्षण मंडळाचे प्रधान मंत्री संजय भार्गव, वर्धा जिल्‍हा सॉफ्ट बॉल संघटनेचे अध्‍यक्ष सुरेश भोंगाडे, प्राचार्य डॉ. अब्‍दुल बारी , प्राचार्य डॉ. ओम महोदय, शिवछत्रपती राज्‍य क्रिडा  पुरस्‍कार  प्राप्‍त प्राध्‍यापक श्रीमती नंदीनी  बोंगाडे, प्रा. किशोर पोफळी, सुधाकर टावरी , नेहरु युवा केन्‍द्राचे विभागीय संघटक संजय माटे, रामराव किटे  आदी क्रिडा प्रेमी  खेळाडू   मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचलन श्रीमती सुजाता जोशी यांनी तर आभार जिल्‍हा क्रिडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी मानले.
                                                00000

सहा ग्रामपंचायतीच्‍या निवडणूका 21 ऑक्‍टोंबरला -जयश्री भोज


                                 आचारसंहिता लागू
    वर्धा, दि. 26- सेलू  तालुक्‍यातील   आलगाव  व कारंजा तालुक्‍यातील बोरगाव (गोंडी), सुसुंद, चोपन , बेलगाव  व धर्ती  या सहा  ग्रामपंचायतीच्‍या निवउणूका  जाहीर  झाल्‍या असून, निवडणूका 21 ऑक्‍टोंबर रोजी  असल्‍यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात  आचार संहिता लागू  असल्‍याचे  माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
         राज्‍य निवडणूक आयोगाने  वर्धा जिल्‍ह्यात नोव्‍हेंबर 2012 या कालावधीत  मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या  निवडणूका जाहीर केल्‍या असून, सेलू तालुक्‍यातील  आलगाव व कारंजा तालुक्‍यातील  पाच ग्रामपंचायतींच्‍या  निवडणूकांचा यामध्‍ये  समावेश आहे. त्‍यामुळे  संबधीत  ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक कार्यक्रम झाल्‍या पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे. आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही  याची सर्वांनी दक्षता घ्‍यावी , असे आवाहनही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                0000

Tuesday, 25 September 2012

राज्‍यस्‍तरीय शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे आज उदघाटन


      वर्धा, दि. 25 – राज्‍यस्‍तरीय  शालेय सॉफ्ट बॉल स्‍पर्धांचे उदघाटन  उद्या बुधवार दिनांक 26 सप्‍टेंबर रोजी दुपारी 3 वाजता  जी.एस.कॉमर्स कॉलेज व जे.बी. सायन्‍स कॉलेज वर्धा चे प्रांगणावर आयोजीत करण्‍यात आला आहे. 
         या स्‍पर्धांसाठी राज्‍यातील अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्‍हापूर  व लातूर या आठ विभागातून  768 खेळाडू  तसेच निवड चाचणीकरीता  240 खेळाडू , 96 संघ व्‍यवस्‍थापक , 40 पंच व क्रिडा मार्गदर्शक, निवडसमिती सदस्‍य सहभागी होणार आहेत.
         राज्‍यक्रिडा संचालनालयातर्फे राज्‍यस्‍तरीय सॉफ्ट बॉल स्‍पर्धाच्‍या आयोजनाची तयारी वर्धा जिल्‍ह्यावर सोपविली असून, स्‍पर्धेत  सहभागी होणा-या सर्व खेळाडूंची निवास व  भोजन व्‍यवस्‍था  करण्‍यात आली आहे. 26 ते 28 सप्‍टेंबर या कालावधीत 14, 17 व 19 वर्षे मुलींच्‍या स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले असून, दि. 29 सप्‍टेंबर ते 1 ऑक्‍टोंबर पर्यंत 14, 17 व 19 वर्षे मुलांच्‍या स्‍पर्धाचे आयेाजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  श्री. शेट्ये यांनी दिली आहे.
                                                000
         

29 युवती झाल्‍या स्‍वंयसिध्‍दा स्‍टार स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची यशस्‍वीता


       वर्धा, दिनांक – ग्रामीण भागातील  सुशिक्षित बेरोजगार  युवक व युवतींना स्‍वंय रोजगाराचे  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना  रोजगाराच्‍या  संधी उपलब्‍ध  करुन देण्‍याच्‍या  महत्‍वकांक्षी  उपक्रमामुळे 29 युवतींनी तीन आठवड्याचे टेलरींग आणि ड्रेस डिझायनिंगचे  प्रशिक्षण घेऊन स्‍वःताचा व्‍यवसाय करण्‍यासाठी  सज्‍ज  झाल्‍या.
       जिल्‍हा अग्रणी  बँक असलेल्‍या  बँक ऑफ इंडिया, राष्‍ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक तसेच रोजगार व स्‍वंयरोजगार विभागा मार्फत  बेरोजगार  युवक व युवतींना  व्‍यवसायाभिमुख  प्रशिक्षण देऊन  त्‍यांना स्‍वंयरोजगारासाठी   प्रोत्‍साहीत  करण्‍यात येते.
      बँक ऑफ इंडिया च्‍या  स्‍टार स्‍वंयरोजगार  योजनेच्‍या प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये दोन ते चार आठवड्याचे  प्रशिक्षण  आयोजीत करुन  युवकांना  स्‍वंयरोजगारासाठी  मुलभूत  प्रशिक्षण  दिल्‍या जाते. यासाठी  निवास व भोजनाची व्‍यवस्‍था मोफत असून प्रशिक्षणासाठी कोणतेही  शुल्‍क आकारल्‍या  जात नाही. ग्रामीण भागातील 29  युवतींचे  टेलरींग व फॅशन ड्रेस डिझाईनचे प्रशिक्षण पूर्ण  झाले असून , प्रशिक्षणानंतर व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी  या तरुणी  सज्‍ज  झाल्‍या आहेत. विविध बँकातर्फे स्‍वंय रोजगारासाठी अर्थसहाय्यासाठी सुध्‍दा ही संस्‍था  सहाय्य  करणार आहे.
          तीन आठवड्याच्‍या टेलरींग व ड्रेस डिझायनिंग  प्रशिक्षणाचा समारोप राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्‍या जिल्‍हा विकास प्रबंधक  डॉ. स्‍नेहल  बन्‍सोड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आला होता.यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, स्‍टार  स्‍वंयरोजगार प्रशिक्षण संस्‍थेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे, विपनन अधिकारी मुरलीधर बेलखोडे  उपस्थित होते.
           प्रशिक्षण यशस्‍वीपणे  पूर्ण झाले असून, आम्‍ही  स्‍वःताचा व्‍यवसाय सुरु करुन आमच्‍या गावातील  इतर भगीनींना रोजगार उपलब्‍ध  करुन देणार असल्‍याची ग्‍वाही यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांनी   दिली. त्‍यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्‍याचे प्रमाणपत्रही यावेळी देण्‍यात आले. तज्ञ मार्गदर्शक असलेल्‍या  श्रीमती शिल्‍पा सायरे यांनी  प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीकडून विविध प्रकारचे  विशेषता महिलांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या विविध तंयार कापडांचे  प्रदर्शनही यावेळी  लावण्‍यात आले होते.   
      सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी स्‍टार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे 23 विषयांचे प्रशिक्षण मोफत देण्‍यात येत असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण  खर्च नाबार्ड, बँक ऑफ इंडिया यांच्‍या मार्फत करण्‍यात येत असून,  राज्‍यातील  स्‍वंयरोजगार प्रशिक्षणाची  एकमेव संस्‍था आहे.  या संस्‍थेतर्फे यावर्षी  सात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आले असून, 187 युवकांना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्‍याची माहिती प्रभारी अधिकारी नरेंद्र काळे यांनी दिली.                                       
00000

Monday, 24 September 2012

आयुष निदान व उपचाराचा 1694 रुग्‍णांना लाभ ग्रामीण आरोग्‍य अभियानाचा अभिनव उपक्रम


      वर्धा, दि. 24 –  स्‍वःताच्‍या  आरोग्‍याबद्दल आपण कायमच दुर्लक्ष करीत असतो.  आणि  आयुष्‍याच्‍या  उत्‍तरार्धात  अनेक व्‍याधींनी  ग्रासले जातो. आरोग्‍य निरोगी रहावे,  यासाठी   राष्‍ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत  ग्रामीण जनतेसाठी  मोफत  आयुष निदान व उपचार शिबीर  आयोजीत करण्‍यात आले होते.  या शिबीरामध्‍ये 1694 रुग्‍णांनी  आरोग्‍य तपासणी करुन  घेतली.
          वर्धा जिल्‍ह्यातील  ग्रामीण व  गरीब रुग्‍णांसाठी  जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात  आयुष निदान व उपचार  शिबीरा अंतर्गत  भारतीय विविध चिकित्‍सा पध्‍दतीने  रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये आर्युर्वेदिक चिकित्‍सा पध्‍दतीने 703 रुग्‍णांवर  मोफत चिकित्‍सा , होमीओपॅथीक 508 तर युनानी पध्‍दतीने  483 रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. आरोग्‍य तपासणीमध्‍ये ज्‍या रुग्‍णांना  विशेषोपचाराची  आवश्‍यकता आहे त्‍यांना तज्ञ डॉक्‍टरांकडे  विशेष तपासणीसाठी   पाठविण्‍यात आले.  तसेच शस्‍त्रक्रिया व इतर वैद्यकीय  उपचारासाठी  तज्ञ डॉक्‍टरांचे  मार्गदर्शनही देण्‍यात आले.
            राष्‍ट्रीय अभियान कार्यक्रम वर्धा अंतर्गत जिल्‍हा प्रशिक्षण केन्‍द्र व सामान्‍य रुग्‍णालयातर्फे  आयोजित करण्‍यात आलेल्‍या  मोफत आरोग्‍य निदान तपासणी शिबीराचे उदघाटन  विदर्भ पाटबंधारे  विकास महामंडळाचे उपाध्‍यक्ष  आमदार सुरेश देशमुख यांच्‍या हस्‍ते  दिप प्रज्‍वलनाने झाले.
     यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे , नगराध्‍यक्ष  आकाश शेंडे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने   उपस्थित होते.
     भारतीय  चिकित्‍सा पध्‍दतीचा  प्रचार व प्रसार सामान्‍य  जनतेकडून  होण्‍याच्‍या दृष्‍टीने आर्युर्वेदीक योग , निसर्गोपचार, होमीपॅथीक, युनानी चिकित्‍सा पध्‍दतीच्‍या तज्ञ डॉक्‍टरामार्फत  रुग्‍णांची तपासणी करुन  योग, प्राणायम, प्रात्‍याक्षिक , पंचकर्म, जलयीका, रक्‍तमोशन, इलाजबील , तदबीर या पध्‍दतीने  रुग्‍णांवर चिकित्‍सा करुन मोफत औषधोपचार करण्‍यात आला.
       रोगनिदान शिबीरासाठी तज्ञ  म्‍हणून आयुर्वेदीक  विभागाचे डॉ. अर्चना गुंफेवार, डॉ. रेणू राठी, डॉ. सोनाली चलाख, डॉ. सुभाषचंद्र वाष्‍णव , होमीपॅथीक विभागाचे डॉ. अनिल लोणारे, डॉ. किशोर फाले, युनानी विभागाचे डॉ. वाफिक, योग व निसर्गोपचार तज्ञ श्री. वांगे यांनी  रुग्‍णांची तपासणी  केली.
      निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. हे.रा. धामट, तसेच जिल्‍ह्यातील  आरोग्‍य विभागातील तज्ञ डॉक्‍टरांनी  शिबीर आयोजनासाठी   विशेष सहकार्य केले.
          प्रास्‍ताविक डॉ. अनुपमा जनईकर यांनी  तर संचलन डॉ. अश्विनी डोने व डॉ. नखाते यांनी केले. यावेळी रुग्‍णांना मोफत औषधे  वितरीत करण्‍यात आले. 

जलसंवर्धन व पर्यावरण 2 ऑक्‍टोंबर रोजी जिल्‍हास्‍तरीय चित्रकला स्‍पर्धा


      वर्धा, दि. 24- पाणलोट चळवळ विकास कार्यक्रमा अंतर्गत  2 ऑक्‍टोबर रोजी प्राथमिक व माध्‍यमिक विद्यार्थ्‍यांसाठी जिल्‍हास्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्राथमिक गटासाठी  माझे गाव माझी शेती व माध्‍यमिक गटासाठी  समस्‍या वाढत्‍या पाणी टंचाईच्‍या या विषयावर चित्रकला स्‍पर्धा होणार आहे.
     राज्‍य शासनाच्‍या  कृषी विभागातर्फे या स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले असून, मृद व जलसंधारण  व नैर्सर्गिक साधन संपत्‍तीचे जतन व पर्यावरण या विषयाबद्दल  विद्यार्थ्‍यांना  जिज्ञासा निर्माण व्‍हावी  तसेच  पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्‍यांचा सहभाग वाढावा यासाठी या स्‍पर्धांचे आयेाजन करण्‍यात आले आहे.  
        जिल्‍हास्‍तरीय  चित्रकला स्‍पर्धेसाठी स्‍पर्धकांना शासनातर्फे   ड्राईंग शिट पुरविण्‍यात येईल. पेन्‍सील, रंग व इतर आवश्‍यक साहित्‍य स्‍पर्धकांना  स्‍वःता  आणायचे असून, स्‍पर्धा  2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 9 वाजता लोकविद्यालय , बॅचलर रोड, आर्वी नाका , वर्धा रोड येथे  आयोजित करण्‍यात आले आहे.
     स्‍पर्धेसाठी  प्राथमिक गटात  माझे गाव माझी शेती  या विषयावर 35 बाय 28 सेंटीमीटर आकाराच्‍या ड्राईंग शिटवर तसेच माध्‍यमिक गटाकरीता  समस्‍या वाढत्‍या, पाणी टंचाईच्‍या या  विषयावर 35 बाय 28 सेंटीमीटर आकाराच्‍या ड्राईंग शिटवर वाटर कलर  व पोस्‍टर कलर  चित्र काढायचे आहेत. स्‍पर्धेमध्‍ये प्रथम आलेल्‍या  विद्यार्थ्‍यांस  अनुक्रमे दोन हजार, एक हजार व पाचशे रुपये  तसेच माध्‍यमिक गटातील  प्रथम क्रमांकास  चार हजार, व्दितीय दोन हजार पाचशे व तृतीय एक हजार पाचशे रोख बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येईल.  
     जिल्‍हा स्‍तरावरील दोन्‍ही गटातील प्राविण्‍यप्राप्‍त  विद्यार्थ्‍यांचे चित्र विभाग व राज्‍य स्‍तरावर पाठवून तयामधून त्‍या त्‍या स्‍तरावर निवड करण्‍यात येणार आहे. विद्यार्थ्‍यांना   या स्‍पर्धांमध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे असे आवाहन  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले आहे.
                                                   000000
       

Sunday, 23 September 2012

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांची सेवाग्राम आश्रमाला भेट · नक्षल समस्‍या आणि विकासाची दिशा यावर विचार मंथन


          वर्धा, दि. 23 – केंद्रीय ग्राम विकास मंत्री जयराम रमेश  यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीस भेट देवून संपूर्ण आश्रम परिसराची पहाणी केली. तसेच सेवाग्राम परिसरात सुरु असलेल्‍या विविध उपक्रमाची माहिती घेतली.
          सेवाग्राम येथील बापू कुटीच्‍या परिसरात नक्षलवादी हिंसा थांबविण्‍यासाठी गांधीजींचा विचार याविषयावर आयोजित विचार मंथन बैठकीतही जयराम रमेश सहभागी झाले होते. या विचार मंथन बैठकीचे आयोजन गांधीवादी विचारवंत डॉ. सुगंध बरठ यांनी केले होते.
          सर्वसेवा संघाच्‍या अध्‍यक्ष श्रीमती राधाबेन भट यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नक्षलवादसे बढती हिंसा और गांधीजनकी भुमिका या विषयावर या बैठकीत जेष्‍ठ  गांधीवादी विचारवंत यांनी आपली भूमिका मांडली. दंडकारन्‍यांमध्‍ये शांतीचे कार्य पुढे सुरु ठेवण्‍यासाठी गांधी विचारांची बैठक तसेच या भागातील विकासाची दिशा ठरवून ती कशी पुढे सुरु ठेवता येईल या विषयावर प्रामुख्‍याने यावेळी  चर्चा करण्‍यात आली.
          नक्षलग्रस्‍त भागांचा विकास साधतांनाच संवेदन सुरक्षेच्‍या दृष्‍टीने पावले टाकणे , राजकीय प्रक्रियेतून स्‍थानिक नेतृत्‍व विकसित व्‍हावे तसेच विकासासंदर्भात लोकांमध्‍ये जागृती निर्माण करावी  आणि गांधीजींच्‍या विचारांनी अहिंसक, मानविय व विकासात्‍मक दृष्‍टीकोण ठेवून ग्रामीण भागांचा विकास आदि विषयावर यावेळी विचार मंथन करण्‍यात आले.  
          यावेळी डॉ. सुमंत बरठ यांच्‍यासह नारायणदास, शशिभाई, राधाबेन भट, डी.के.मनिष,आदित्‍य पटनायक, एम. तेजस्‍वानी, आशिशकुमार, के.एस.गोपाल, श्रीकांत बाराहाते, अविनाश काकडे, मोहन हिराभाई हिरालाल, शंकर दत्‍त, देवाजी तोफा, डॉ.सुरेश साहू, रजत अवसत, तेजस्‍ती, तसेच जेष्‍ट गांधीवादी विचारवंत यावेळी उपस्थित होते.
                             सेवाग्राम आश्रमाला भेट
       केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी आज सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. त्‍यावेळी सेवाग्राम आश्रम पतिष्‍टानचे अध्‍यक्ष मा.म. गडकरी, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय  भागवत, जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक बी.एस.मोहन, उपविभागीय अधिकारी हरिश  धार्मिक, तहसीलदार सुशांत बनसोड आदि अधिकारी व पदाधिका-यांनी स्‍वागत केले.
0000