Thursday, 14 June 2012

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतक-यासाठी विशेष उपक्रम -- संजय भागवत




         वर्धा दि. 13-  राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्‍हयात कृषी उत्‍पादन वाढीसाठी 18 लाख 446 हजार रुपये खर्चाचा शेतक-यासाठी विशेष उपक्रम राबविण्‍यात येत असल्‍याची माहिती अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी आज दिली.
         जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमाचा आढावा अपर जिल्‍हाधिकारी  श्री.भागवत यांनी घेतला त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
        यावेळी अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही.गायकवाड नाबार्डच्‍या महाव्‍यवस्‍थापक  श्रीमती  स्‍नेहल बन्‍सोड, कृषी विकास अधिकारी बी.के. जेरापूरकर कार्यक्रम समन्‍वयक डॉ.सुरेश नेमाडे,सदस्‍य वसंत पाटील, मनिश देवळे, पी.आर.भारती आदि उपस्थित होते.
        राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत कृषी विकासासोबत उत्‍पादन वाढविण्‍यासाठी जिल्‍हयात 22 उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये 17 प्रकल्‍पामध्‍ये 1 हजार 100 शेतक-यासाठी गट प्रात्‍यक्षिकाचा समावेश आहे.शेतक-यांना तूर व हरभरा पीकाच्‍या अनुदानाचाही यामध्‍ये समावेश आहे.
         शेतक-यांना प्रमाणित बीयान्‍याचे वाटप सुक्ष्‍म मुलद्रव्‍य वाटप जिप्‍सम पुरवठा, एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन, पीक संरक्षण औषधी नॅपसॅक स्‍प्रेपंप,पंपसंच, तननाशक,अत्‍याधुनिक शेती औजारे ,तसेच शेतक-यासाठी प्रशिक्षण आदी राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रमा अंतर्गत या उपक्रमामध्‍ये समावेश असल्‍याचेही अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी सांगीतले.
          राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान कार्यक्रम जिल्‍हयात प्रभावीपणे राबवून शेतक-यांच्‍या शेतापर्यन्‍त तांत्रिक माहिती व उत्‍पादन वाढविण्‍यासाठी उपक्रम पोहचवा असे आवाहनही यावेळी श्री. भागवत यांनी केले.
          जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे यांनी प्रास्‍ताविकात राष्‍ट्री अन्‍न सुरक्षा अभियाना अंतर्गत यावर्षी राबविण्‍यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.
                                             0000

शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावणार श्रीमती जयश्री भोज


                                        

            वर्धा दि. 13- शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयात 17 लाख 80 हजार वृक्ष लावण्‍यात येणार असून वृक्ष लागवड कार्यक्रमास सामाजीक व शैक्षणिक संस्‍थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आत्‍मा जिल्‍हा नियामक मंडळाची बैठक जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्‍या बोलत होत्‍या.
         शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्‍हयात प्रभाविपणे राबविण्‍यात येणार असून वृक्ष लागवड अभियान ही लोक चळवळ व्‍हावी यासाठी मोठया प्रमाणात जागृती मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याची माहितीही श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
          शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत जिल्‍हयाला 17 लाख 80 हजार वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून वर्धा तालुका पातळीवर या मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. वर्धा तालुक्‍यासाठी 1 लाख 9 हजार 412  वृक्ष लागवड करण्‍यात येणार असून सेलू, देवळी व आर्वी तालुक्‍यात प्रत्‍येकी 2 लाख 8 हजार, आष्‍टी तालुक्‍यासाठी 1 लाख 4 हजार 706, कारंजा 2 लाख 9 हजार 412, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यासाठी प्रत्‍येकी 3 लाख 14 हजार 117 वृक्ष लागवडीचे उदिष्‍ट देण्‍यात आले आहे.
          कृषी विभाग, सामाजीक वणीकरण,वन तसेच विविध विभगाच्‍या समन्‍वयाने वृक्ष लागवड मोहीम यशस्‍वी करण्‍यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी कृषी विभागाच्‍या 7 रोप वाटिकेत 7 लाख 50 हजार रोपे तयार आहेत.तसेच किसान नर्सरी, सामाजीक वनीकरण व वन विभागाच्‍या रोप वाटीकेमधून उपलब्‍ध होणारे सर्व रोपे वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत जिल्‍हयात लावण्‍यात येणार असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
        यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एस.ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी आर.व्‍ही. बायकवाड, डी.के. जेरापूरकर, आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
00000

Tuesday, 12 June 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) व 3 कलम लागू


वर्धा, दि. 12 – जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था  अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी  जयश्री भोज यांना  प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 3 लागू केले आहे.
     या कामलाचा अंमल दि. 23 जून 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                                                            000000

30 जूनपर्यंत संगणक प्रशिक्षणासाठी अर्ज करावे


              
         वर्धा दि.12- वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या गेल्‍या वर्षाच्‍या अंदाजपत्राकातील तरतूदीप्रमाणे महिला व बालविकास समितीने सन 2012-13 वर्षात वैयक्तिक लाभाच्‍या योजनेनुसार ग्रामीण क्षेत्रातील 10 वी किंवा 12 वी पास महिला व मुलींनी एमएससिआयटी संगणक प्रशिक्षणासाठी 30 जून 2012 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. अर्जाचा नमुना सर्व गट विकास अधिकारी पंचायत समितीमध्‍ये उपलब्‍ध आहे.
     संगणक प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे निकष ठरविण्‍यात आले असून त्‍यानुसार अर्जदार हा वर्धा जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वार्शिक उत्‍पन्‍न 50 हजार  रुपयापर्यंत असावे. बि.पी.एल.चे कार्ड तहसिलदार किंवा तलाठ्याचे प्रमाणपत्रा अर्जासोबत जोडावे. अनुसूचित जाती व जमातीच्‍या अर्जदारांनी तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे. लाभार्थीनी प्रशिक्षध शुल्‍काच्‍या 10 टक्‍के रक्‍कम प्रवेश घेतेवेळी निवउून दिलेलया प्रशिक्षण केंद्रावर भरावी.  एकदा निवड केलेले नाव बदलून मिळणार नाही. लाभार्थी निवड ग्रामसभेने केलेली असावी. असे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा कळवितात.
                                                            0000000

Monday, 11 June 2012

पाण्‍याचे नियोजन करुन शेतक-यांनी फायद्याची शेती करावी दत्‍तात्रय वने



                        
वर्धा दि.11- तुषार संचाचा शेतात वापर करीत असतांना या संचातील दाब 2 केजी ठेवणे,सोयाबीनची पट्टा पेरणी पध्‍दतीचा वापर वेगवेगळया पिकाच्‍या  आवश्‍यकतेनुसार द्यावयाच्‍या पाण्‍याचे प्रमाण व त्‍यानुसार तुषार संच चालविण्‍याचा कालावधी तसेच त्‍याच पाण्‍यामध्‍ये गहू,हरभरा व कांदा या पिकांना नेमकी पाण्‍याची गरज याचे नियोजन करुन शेतक-यांनी फायदेशिर शेती करावी असा हितोपदेश राहुरी येथील प्रगतीशिल शेतकरी डॉ. दतात्राय वने यांनी दिला.
         येथील विकास भवन येथे आत्‍मा अंतर्गत जिल्‍हयातील निवड केलेल्‍या कृषी मित्राची कार्यशाळा नुकतीच संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ.व्‍ही. व्‍ही. पत्‍तीवार, किटक नाशक तज्ञ डॉ. लक्ष्‍मीकांत पेशकर आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
         पिकासाठी पाण्‍याचे नियोजन केल्‍यास 33 टक्‍के होणारी पाण्‍याची बचत व उत्‍पादनात होणारी वाढ याबाबत स्‍वतःचा अनुभव कथन करुन डॉ. वने म्‍हणाले की, शेतीचा ताळेबंध ठेवणे,काळाजी गरज असून शेती करीत असतांना पाळावयाची पथ्‍थे तसेच  प्राथमिक  गरजा सिमीत ठेवणे यातून स्‍वतःला घडविणे आदिबाबत मार्गदर्शन करुन कृषी विद्यालयाचे संशोधित झालेले तंत्रज्ञान गरजू शेतक-यापर्यन्‍त झापाट्याने व परिनामकारक पध्‍दतीने पोहचविण्‍यासाठी कृषी मित्र व कृषी  विभागाची भुमीका ही महत्‍वपूर्ण ठरत आहे.असे त्‍यांनी यावेळी सांगीतले.
       याप्रसंगी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी आत्‍मा संकल्‍पना व प्राप्‍त परिस्थिती व त्‍याचे महत्‍व शेतकरी गट संघटन पिकानुसार शेतक-यांचे समह स्‍थापन करणे त्‍यावर त्‍यांना पिकाच्‍या असलेल्‍या समस्‍यानुसार प्रशिक्षण, प्रात्‍याक्षिके व सहली यांचे तालुकास्‍तरावरील समितीव्‍दारे प्राथमिक नियोजन करुन प्रस्‍तावित करणे व त्‍याला जिल्‍हास्‍तरावरील मा.जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली आत्‍मा नियामक मंडळाखाली बैठकीमध्‍ये मान्‍यता घेवून राबविण्‍याची कार्यपध्‍दती सांगीतली तसेच गेल्‍यावर्षी आत्‍मा अंतर्गत निर्माण झालेल्‍या यशोगाधा यामध्‍ये संत्रा पिकाचे आंबीया बहार घेणे, कपाशीवरील लाल्‍या नियंत्रण करणे, रब्‍बी हंगामात ज्‍वारी उत्‍पादन करणे, यांत्रिकीपध्‍दतीने कापूस वेचणी करणे, सामुहिक पध्‍दतीने कमी खर्चाचे शेताला कुंपन करुन जंगली प्राण्‍याव्‍दारे जिल्‍हयात उत्‍पन्‍न झालेली समस्‍या बाबत सविस्‍तर माहिती दिली.
         यावेळी डॉ.व्‍ही.व्‍ही. पत्‍तीवार , यांनीही कापूस  पिकाच्‍या बाबतीमध्‍ये सविस्‍तर माहिती दिली.या कार्यक्रमाला वर्धा जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष व माजी कृषी सभापती  सुनिल राऊत यांनी संबोधित करतांना असे सांगितले की विदर्भामध्‍ये पाणी,जमीन मुबलक असून त्‍याव्‍दारे शास्त्रिय पध्‍दतीने शेती करणे आवश्‍यक झाले असून वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे आर्वजून सांगितले.यावेळी डॉ.लक्ष्‍मीकांत पेशकर यांनी ऐकात्‍मीक कीड नियंत्रण पध्‍दतीने कीड नियंत्रणाबाबत  तसेच मित्र व शत्रूकिडीची ओळख करुन घेणेबाबत व शास्त्रिय पध्‍दतीने किटकनाशकाचा वापर करुन उत्‍पादन खर्च कमी करण्‍यासाठी शेतक-यांना हितोपदेश केले.
         या कार्यक्रमामध्‍ये शेतकरी काशिनाथ राउत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक  रविन्‍द्र धर्माधिकारी, यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडू यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी जेजूरकर यांनी मानले.
                                                            000000

शेतक-यांच्‍या गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा


       
·        संरक्षित साठयातून पाचहजार मेट्रीकटन खत
·        21 गावातील 442 शेतक-यांना लाभ

वर्धा दि. शेतक-यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत 25 गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा करण्‍यात आला आहे. जिल्‍हयातील 21 गावातील 442 शेतक-यापर्यन्‍त खताचा पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी आज दिली.
          खरीप हंगामासाठी शेतक-यांना खताचा पुरवठा सुलभपणे व्‍हावा यासाठी शेतक-यांच्‍या बांधावर खत ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.जिल्‍हयात या योजने अंतर्गत 100 गटाची नोंदणी करण्‍यात आली असून विविध योजने अंतर्गत स्‍थापन झालेले शेतकरी गट या योजनेत सहभागी होवू शकतात.
          खरीप हंगामासाठी उपलब्‍ध असलेल्‍या संरक्षित रासायनिक साठ्यामधून 5 हजार मेट्रीकटन साठा शेतक-यांना विक्रीकरीता खुला करण्‍यात आला आहे. संरक्षित साठा शेतक-यांच्‍या गटांना बांधावर त्‍यांच्‍या मागणी नुसार वाटप करण्‍यासाठीच असल्‍याची माहितीही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी दिली.
          शेतकरी गटांसाठी असलेले सर्व खत,खताच्‍या अधितम मुल्‍यापेक्षा जास्‍त किंमतीत पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवूनच शेतकरी गटाच्‍या मागणी नुसार गावापर्यन्‍त पोहचविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट  केले.
          संरक्षित साठयामधून मुक्‍त करण्‍यात आलेल्‍या खतामध्‍ये 1 हजार टन युरीया, प्रत्‍येकी 2 हजार टन संयुक्‍त खत व डीएपीचा समावेश आहे. हा साठा तालुका विकास कृषी अधिका-यामार्फत वितरीत करण्‍यात येणार आहे. युरीया, संयुक्‍तखत व डीएपीचा पुरवठा  आर्वी 605 मेट्रीकटन, आष्‍टी 560, देवळी 625, हिंगणघाट 695, कारंजर 555, समुद्रपूर 710, सेलू 825 व वर्धा तालुक्‍यासाठी 625 मेट्रीकटन खताच्‍या पुरवठ्याचा समावेश आहे.
          जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना खताचा पुरवठा व्‍हावा यासाठी जिल्‍हास्‍तरावर नियोजन करण्‍यात आले असून कंपनीकडून प्राप्‍त होणा-या 2 हजार सहाशे मेट्रीकटन युरीया वितरणाचे आदेशही देण्‍यात आल्‍याची माहिती अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                            94 हजार 300 मेट्रीकटन खते
      जिल्‍हयाला 94 हजार 300 मेट्रीकटन खताचे आवंटन मंजुर झाले आहे.या खतामध्‍ये 26 हजार 810 मेट्रीकटन युरीया 29 हजार 900 मेट्रीकटन डीएपी 10 हजार 120 टन एसएसपी 8 हजार 370 टन एमओपी  तसेच 19 हजार 840 मेट्रीकटन संयुक्‍त खताचा समावेश असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                                       ०००

शेतक-यांच्‍या गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा


                                           शेतक-यांच्‍या गटांना
                         296 मेट्रीकटन खताचा पुरवठा
               
·        संरक्षित साठयातून पाचहजार मेट्रीकटन खत
·        21 गावातील 442 शेतक-यांना लाभ

वर्धा दि. शेतक-यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत 25 गटांना 296 मेट्रीकटन खताचा पुरवठा करण्‍यात आला आहे. जिल्‍हयातील 21 गावातील 442 शेतक-यापर्यन्‍त खताचा पुरवठा करण्‍यात आला असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी आज दिली.
          खरीप हंगामासाठी शेतक-यांना खताचा पुरवठा सुलभपणे व्‍हावा यासाठी शेतक-यांच्‍या बांधावर खत ही योजना सुरु करण्‍यात आली आहे.जिल्‍हयात या योजने अंतर्गत 100 गटाची नोंदणी करण्‍यात आली असून विविध योजने अंतर्गत स्‍थापन झालेले शेतकरी गट या योजनेत सहभागी होवू शकतात.
          खरीप हंगामासाठी उपलब्‍ध असलेल्‍या संरक्षित रासायनिक साठ्यामधून 5 हजार मेट्रीकटन साठा शेतक-यांना विक्रीकरीता खुला करण्‍यात आला आहे. संरक्षित साठा शेतक-यांच्‍या गटांना बांधावर त्‍यांच्‍या मागणी नुसार वाटप करण्‍यासाठीच असल्‍याची माहितीही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे  यांनी दिली.
          शेतकरी गटांसाठी असलेले सर्व खत,खताच्‍या अधितम मुल्‍यापेक्षा जास्‍त किंमतीत पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवूनच शेतकरी गटाच्‍या मागणी नुसार गावापर्यन्‍त पोहचविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट  केले.
          संरक्षित साठयामधून मुक्‍त करण्‍यात आलेल्‍या खतामध्‍ये 1 हजार टन युरीया, प्रत्‍येकी 2 हजार टन संयुक्‍त खत व डीएपीचा समावेश आहे. हा साठा तालुका विकास कृषी अधिका-यामार्फत वितरीत करण्‍यात येणार आहे. युरीया, संयुक्‍तखत व डीएपीचा पुरवठा  आर्वी 605 मेट्रीकटन, आष्‍टी 560, देवळी 625, हिंगणघाट 695, कारंजर 555, समुद्रपूर 710, सेलू 825 व वर्धा तालुक्‍यासाठी 625 मेट्रीकटन खताच्‍या पुरवठ्याचा समावेश आहे.
          जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना खताचा पुरवठा व्‍हावा यासाठी जिल्‍हास्‍तरावर नियोजन करण्‍यात आले असून कंपनीकडून प्राप्‍त होणा-या 2 हजार सहाशे मेट्रीकटन युरीया वितरणाचे आदेशही देण्‍यात आल्‍याची माहिती अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                            94 हजार 300 मेट्रीकटन खते
      जिल्‍हयाला 94 हजार 300 मेट्रीकटन खताचे आवंटन मंजुर झाले आहे.या खतामध्‍ये 26 हजार 810 मेट्रीकटन युरीया 29 हजार 900 मेट्रीकटन डीएपी 10 हजार 120 टन एसएसपी 8 हजार 370 टन एमओपी  तसेच 19 हजार 840 मेट्रीकटन संयुक्‍त खताचा समावेश असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली.
                                                       0000