Wednesday, 22 February 2012

सेवाग्राम आश्रम येथे दोन दिवसीय राष्‍ट्रस्‍तरीय कार्यशाळा


             वर्धा,दि.22- महाराष्‍ट्र  राज्‍य  बाल क्‍क  संरक्षण आयोगाचे वतीने 23 आणि 24 फेब्रुवारी 2012 रोजी नयी तालीम केंद्र, सेवाग्राम आश्रम येथे बुनियादी शिक्षण आणि बाल क्‍क या विषयावर राष्‍ट्रस्‍तरीय  कार्यशाळा आयोजित करत आली आहे.
         नयी तालिम किंवा बुनियादी शिक्षण हे स्‍तकला व्‍दारे  शिक्षण प्रदान करणारे मानले जाते, ही अवधारणा महात्‍मा  गांधी यांनी 1937 साली प्रायोगिक तत्वावर  सुरुवात केली. शिक्षणाच्‍या  आवश्‍यकतेची अवधारणा आहे. जी त्‍य  प्रेम किंवा जीवनाची विविध कार्यशैली याशी  निगडीत आहे. सर्वांगिण विकास तसेच मस्तिष्‍कचे सर्वांगिण विकास होईल ही अवधारणा नयी तालिमची आहे. शारिरीक श्रमाव्‍दारे शिक्षण मिळणे हे बालहक्‍काच्‍या विरोधात जाते का ? या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजनाचा हेतू आहे.
         कार्यक्रम सुचिनुसार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10.45 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन, सकाळी 11 ते 11.45 या वेळेत पहिले सत्रात बुनियादी शिक्षणाचे ऐतिहासिक रुपरेखा विकास. दुपारी 12 ते 12.45  व्दितीय सत्रात 21 व्‍या  शतकामधील नयी तालीम बुनियादी शिक्षणाचे महत्‍व .  दुपारी 12.45 ते 1.30 वाजता तीस-या सत्रात बाल अधिकाराच्‍या संदर्भामधील बुनियादी शिक्षण आधुनिक शिक्षण यांचा तुलनात्‍मक  भ्‍यास  तसेच आधुनिक शिक्षण ध्‍दती.  दुपारी 2 ते 2.45 या चौथे सत्रात बुनियादी शिक्षा / नवी तालीम याची अवधारणा अंमलबजावणी. दुपारी 3 ते 3.45 वाजता पाचवे सत्रामध्‍ये विविध अधिनियम नियमाखाली दिलेले बालकांचे क्‍क त्‍याची अंमलबजावणी तसेच ऐतिहासिक अवधारणा. 3.45 ते 4.30 वाजता सहाव्‍या  सत्रामध्‍ये शारिरीक श्रमाचे महत्‍व  तसेच प्राचीन अर्वाचीन शिक्षणाचे संदर्भात (सुत कताई, विणकाम, गोसेवा शेती त्‍यादी संदर्भात.  दुपारी 4.30 ते 5.15 वाजता सातवे सत्रामध्‍ये  आधुनिक जीवन ध्‍दती कुटूंबाचे विघटन, बालकांच्‍या  क्‍काचे संरक्षणाचे संदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. संध्याकाळी दक्षिण ध्‍य सांस्‍कृतीक केन्‍द्राच्‍या  वतीने लोककलेचे कार्यक्रम सादर होतील.
         दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 वाजता आनंद निकेतन अवलोकन भेट, सकाळी 10 ते 10.15 वाजता खुली चर्चा, दुपारी 11.30 ते 1.30 वाजता सामुहिक विचार विनिमय, भविष्‍य  कालीन कार्यक्रम दुपारी 2 ते 2.45 वाजता सादरीकरण होईल.
      या कार्यशाळेत प्रमुख वक्‍त   म्‍हणून न्‍या . चंद्रशेखर धर्माधिकारी, वर्धेचे डॉ. अनिल फरसोल,  सुषमा शर्मा, करुणा फुटाणे, नसीम, पश्चिम बंगालचे प्रसाददास गुप्‍ता , हरिपाद महातो, अहमदाबादचे सुखदेव पटेल, डॉ. राजेंद्र खिमानी, भावनगरचे फाल्‍गून शेठ, नागपूरचे डॉ. निलिनी मिसळ, दिल्‍लीच्‍या  गिता धर्मपाल, तामिळनाडूचे एस.कुलंदयस्‍वामी   डॉ. सी. शेबगवली, पुण्‍याचे सुर्यकांत कुळकर्णी, दिल्‍लीचे .पी. दुबे, डॉ. श्‍वरदयाल सुनिल क्‍का आदि क्‍ते  कार्यशाळेला मार्गदर्शन करतील.
            या कार्यक्रमाला उपस्थित राहण्‍याचे  आवाहन बालहक्‍क संरक्षण आयोगाचे सचिव .ना.त्रिपाठी यांनी केले आहे.
                                                       000000

Tuesday, 21 February 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) 3 कलम जारी


      वर्धा,दि.21-वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि (3) कलम जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल दि.2 मार्च 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                     0000000

पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


     वर्धा,दि.19- पल्‍स पोलिओ लसीकरणाची मोहिम आज संपुर्ण राज्‍यभर राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेचा नागरी भागातील सुभारंभ नगर पालिकेचे अध्‍यक्ष आकाश शेंडे व ग्रामीण क्षेत्राचा शुभारंभ जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांच्‍या हस्‍ते पाच वर्षाखालील बालकांना पल्‍स पोलीओचे दोन थेंब पाजून करण्‍यात आले.

     येथील सामान्‍य रुग्‍णालयात झालेल्‍या कार्यक्रमात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍स डॉ.रत्‍ना रावखंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा, डॉ.दिक्षीत नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी विजय खोराटे तर प्राथमिक आरोग्‍य केंद्र आजी येथे झालेल्‍या कार्यक्रमात जि.प.उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.के.झेड राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्‍मीकांत झोड, डॉ.कल्‍पना सुतनकारी, डॉ.प्रविण धाकटे, अनूराधा  जाधव व प्रणाली चौधरी उपस्थित होते.
     वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांवत 30 हजार 454 लाभार्थी असून त्‍यासाठी 182 पोलिओ केंद्र कार्यरत राहणार आहेत. त्‍यासाठी 543 कर्मचारी कार्यरत असून, 36 पर्यवेक्षक लक्ष देवून आहेत. पल्‍स पोलिओ लसीकरणाच्‍या कामासाठी 400 शितकरण बॉंक्‍स लागणार असल्‍याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा यांनी दिली.
     प्राथमिक आरोग्‍य केंद्र आंजी (मोठी) या क्षेत्रामध्‍ये 28 गांवे असून 16 ग्रामपंचायती आहेत. या गांवामध्‍ये 5 वर्षाखालील 7 हजार 208 लाभार्थी असून पोलिओ  केंद्र 60 राहणार आहे. 360 ऑइस बॉंक्‍स लागणार असून 166 कर्मचारी कार्यरत असतील असे वैद्यकीय अधिकारी झोड यांनी सांगितले.
     पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही. यांची पालकांनी तसेच ओरोग्‍य कर्मचा-यांनी काळजी घ्‍यावी. बालकांला पोलिओ लस दिल्‍यास भविष्‍यात त्‍यांना अपंगत्‍व येणार नाही, बालक सुदृढ राहील अशी भावना नगराध्‍यक्ष शेंडे व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मोहन यांनी व्‍यक्‍त केली.
     यावेळी मोठया संख्‍येने अधिकारी व कर्मचारी व बालकांचे पालक उपस्थित होते.
                      ०००००

Saturday, 18 February 2012

स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत निर्मल स्‍वराज्‍य मोहिम


     वर्धा, दि. 18-राज्‍यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानास गती देण्‍यासाठी निर्मल स्‍वराज्‍य मोहिम राबविण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असून, वर्धा जिल्‍ह्यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाच्‍या  वतीने जिल्‍ह्यात ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. येत्‍या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी या मोहिमेचा शुभारंभ जिल्‍हास्‍तरावरुन करण्‍यात येणार आहे. तसेच तालुकास्‍तर व ग्रामपंचायत स्‍तरावरुनही निर्मल स्‍वराज्‍य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
     राज्‍यात स्‍वच्‍छतेची लोकचळवळ निर्माण करण्‍यासाठी केंद्र शासन पुरस्‍कृत मागणी आधारित व लोकसहभागाच्‍या तत्‍वावर  संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान राज्‍यातील 33 जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यातही या अभियानाच्‍या  यशस्‍वी अंमलबजावणी करीता जिल्‍हा  प्रशासन कार्यरत असुन, जिलह्यात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती सन 2003 मध्‍ये 33 टक्‍के होती ती आता 84 टक्‍के पर्यंत पोहचली आहे. राज्‍याच्‍या  सुवर्ण महोत्‍सवानिमित्‍य जिल्‍ह्यात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्‍यात आली असून, निर्मल महाराष्‍ट्राचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी स्‍वच्‍छतेची ही लोकचळवळ अधिक बळकट करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरीता 19 फेब्रुवारी 2012 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनाचे औचित्‍य साधून निर्मल स्‍वराज्‍य मोहीम राबविण्‍याचा निर्णय शासनाने मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही घेतलेला आहे. या मोहीमेचा समारोप दिनांक 14 एप्रिल 2011 रेाजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी करण्‍यात येणार आहे.
     या मोहीमे दरम्‍यान 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती, 8 मार्च जागतीक महिला दिन, 22 मार्च जागतिक जल दिन व 7 एप्रिल जागतिक आरोग्‍य दिन विशेषांचे औचित्‍य साधून वेगवेगळे कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहे. मोहिमे दरम्‍यान स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती 70 टक्‍के पेक्षा कमी असलेल्‍या  ग्रामपंचायतीमध्‍ये वैयक्तिकशौचालयाची वाढ करुन प्रत्‍येक तालुक्‍यातील किमान 20 ग्रामपंचायतीची निवड करुन 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त करणे, ज्‍या ग्रामपंचायतीची स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती 70 टक्‍के असेल त्‍या ग्रामपंचायती 100 टक्‍के हागणदारी मुक्‍त करणे व त्‍या व्‍यतीरिक्‍त सर्व ग्रामपंचायतीची स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती किमान 70 टक्‍के पर्यंत
                                                ..2..
                             ..2..
आणने, दि. 18 नोव्‍हेंबर 2011 रोजीच्‍या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय व नवबौध्‍द  यांच्‍या कुटूंबाकडे वैयक्‍तीक शौचालय उपलब्‍ध  होईल हे पाहणे, केंद्र सरुकारच्‍या  सुचनेप्रमाणे महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी अधिनियम व संपूर्ण स्‍वच्‍छता  अभियानाच्‍या  प्रभावी समन्‍वयाव्‍दारे अंमलबजावणी करणे, सर्व शाळा व अंगणवाडी मध्‍ये स्‍वच्‍छतागृह उपलब्‍ध  करुन दणे, सर्व माध्‍यमिक शाळा, आश्रमशाळा व शासकीय कार्यालयामध्‍ये स्‍वच्‍छतागृह उपलब्‍ध असल्‍याची खात्री करणे, वार्षिक अंमलबजावणी आराखड्यानुसार भौतीक व आर्थिक उद्दिष्‍टे साध्‍य करणे, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनाबाबत जनजागृती करणे, इत्‍यादी उदिृदष्‍टे ठरविण्‍यात आलेले आहे.
     मोहिमेच्‍या प्रभावी अंमलबजावणीकरीता ज्‍या गावाची निवड मोहिमेकरीता करण्‍यात येणार आहे त्‍यामध्‍ये गवंडी प्रशिक्षण मोहिम काळात जिल्‍हास्‍तर, तालुकास्‍तर तसेच ग्रामस्‍तरावर विशेष दिनाचे आयोजन करणे तसेच स्‍वच्‍छतेविषयक मोठ्या प्रमाणात जनजागृती व्‍हावी यासाठी विविध घटकांच्‍या कार्यशाळा, रथयात्रा, कलापथक, पथनाट्य, किर्तनकार , प्रबोधनकार यांचे कार्यक्रम इ. जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
      मोहिम कालावधीत 200-300 शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्‍त केलेल्‍या ग्रामपंचायतीला रुपये 5000, गौरवपत्र व स्‍मृतीचिनह देवून गौरविण्‍यात येणार आहे. 300-500 पर्यंत शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्‍त केल्‍यास रु. 25,000 , गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. मोहिम कालावधीत ज्‍या पंचायत समितीमधील 20 किंवा त्‍यापेक्षा अधिक गावे हागणदारीमुक्‍त करतील त्‍या पंचायत समितींना रु. 25,000, गौरवपत्र, स्‍मृतीचिनह देवून गौरविण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या जिल्‍ह्यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त गावे हागणदारीमुक्‍त होतील अश्‍या जिल्‍ह्यांना प्रथम क्रमांक रु. 50,000, व्दितीय क्रमांक रु. 25,000, तृतीय क्रमांक रु. 10,000 तसेच गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. मोहिमेमध्‍ये उत्‍कृष्‍ट काम केलेल्‍या  100 टक्‍के हागणदारीमुक्‍त झालेल्‍या ग्रामपंचायतीचा गौरव दिनांक 1 मे 2012 रोजी महाराष्‍ट्र दिनाचे औचित्‍य साधून जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांचे हस्‍ते गौरवपत्र व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात येणार आहे. अशी माहिती जि.प. मुख्‍यकार्यपालन अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी दिली.

अल्‍पसंख्‍याक समाजासाठी शिक्षणाच्‍या पायाभुत सुविधा


वर्धा,दि.18- अल्‍पसंख्‍यांक समाजाच्‍या संस्‍था किंवा शाळांना पायाभुत सुविधेच्‍या  विकास योजनेची राज्‍यात अंमलबजावणी करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
    अल्‍पसंख्‍यांक समाजाच्‍या प्राथमिक, माध्‍यमिक व उच्च माध्‍यमिक शाळांकरीता पायाभुत सुविधा या योजनेव्‍दारे पुरविण्‍यात येतील. अत्‍यंत  दुर्लक्षित व शैक्षणिकदृष्‍ट्या  मागास असलेल्‍या अल्‍पसंख्‍यांक समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी व मुलांच्‍या विशेष गरजा पुर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने या योजनेव्‍दारे शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध  करुन देण्‍यात येत आहे. तसेच मदरसांमधून गुणवत्‍तापुर्ण शिक्षण देण्‍यासाठी केंद्रशासन पुरस्‍कृत योजना मान्‍यताप्राप्‍त नोंदणीकृत मदरसांकडून प्रस्‍ताव केंद्र शासनाने मागविलेला आहे.
     उपरोक्‍त दोन्‍ही येाजनांच्‍या पात्रता व अटी इत्‍यांदिंसाठी शासन निर्णय उपलब्‍ध आहे. याकरीता शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जिल्‍हा परिषद,वर्धा (शासकीय रुग्‍णालयाचे मागे, गणेश टॉकीज रोड, वर्धा) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
                              000000

कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रमाच्‍या पाहणीसाठी केंद्रीय चमू


     वर्धा, दि. 18- राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रमाची पाहणी करण्‍याकरीता (दि. 14 रोजी) नुकतीच केंद्रीय चमुनी  वर्धा जिल्‍ह्यातील वर्धा व देवळी तालुक्‍यांना  भेट दिली.
     केंद्रीय चमुमध्‍ये सहाय्यक आयुक्‍त (राअसुअ) चे वाय.सी.बारापात्रे , वरीष्‍ठ तांत्रीक सहाय्यक  भुपेद्रसिंह यांनी वर्धा तालुक्‍यातील आष्‍टा येथे हरभरा लघु प्रकल्‍पाची पाहणी केली. भेटी दरम्‍यान शेतक-यांशी चर्चा करुन पिक प्रात्‍यक्षिके, एच.डी.पी.ई.पाईप व इलेक्‍ट्रीक मोटरपंप इ. पाहणी केली. यावेळी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.
      गतिमान कडधान्‍य उत्‍पादन कार्यक्रम अंतर्गत देवळी तालुक्‍यात मौजा रत्‍नापुर येथे निसार कदीर अली यांचे शेतातील हरभरा या वाणाचे प्रात्‍यक्षिक प्‍लॉटची पाहणी केली तसेच प्रत्‍यक्ष शेतावर उपस्थित शेतक-यांशी शेतीशाळा, फेरोमन सापळे, जैविक किटकनाशके, पक्षी थांबे इ. माहिती घेतली.

Friday, 17 February 2012

पल्‍स पोलीओ लसीकरणाचा शुभारंभ जिल्‍हाधिका-यांचे हस्‍ते


    वर्धा, दि.17- पल्‍स पोलीओ लसीकरणाची मोहीम येत्‍या 19 फेब्रुवारी 2012 रोजी येथील सामान्‍य रुग्‍णालयातील परीसरात सकाळी 8 वाजता जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांच्‍या हस्‍ते      5 वर्षाखालील बाळाला पोलीओचा डोज देवून कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
     या केंद्रावर 5 वर्षाखालील बालकांना पेालीओचा डोज पाजणार असून, रुग्‍णालयाच्‍या परीसरात असलेल्‍या बालकांच्‍या पालकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे. असे आवाहन सामान्‍य रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी शर्मा यांनी केले आहे.
                           000000