Tuesday, 3 January 2012

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!

`स्‍कूल बस ` ची सुरक्षा महत्‍वाची ....!
रस्‍ते सुरक्षा पंधवड्याला सुरुवात झाली आणि हरणातल्‍या भीषण अपघाताची बातमी समोर आली. या निमित्‍ताने शालेय मुलांची वाहतूक करणा-या बस आणि सुरक्षेचे नियम याबाबत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिलेली ही माहिती.
लेखक – विजय चव्‍हाण
शब्‍दांकन - प्रशांत दैठणकर

हरयाणातील अंबाला जवळ शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या अपघाताची जी दुर्दैवी घटना घडली त्‍या 12 शाळकरी मुलांचा जीव गेला. क्ष्‍णभर हळळळ व्‍यक्‍त करुन पुन्‍हा जगरहाटीला सुरुवात करण्‍याची आपली सवय असते. आपण या घटनेचे गांभीर्य जाणून आपल्‍या आसपास याबाबत जागरुकता ठेवावी ही शिकवण सा-या पालकांसाठी आहे.
शाळांसाठी मुलांना सोडताना बरेच पालक घराच्‍या कोप-यावर आली बस आणि दिलं मुलांना बसवून त्‍यात या पलिकडे फारसा विचार करताना दिसत नाहीत. केवळ स्‍वस्‍त सेवा आहे. यापेाटी खच्‍चून भरलेल्‍या स्‍कूलबसमध्‍ये मुलांना पाठवणारे अनेक पालक आहेत. बसेससाठी सुरक्षेचे नियम असे आहेत.
शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्‍क, बस थांबे निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्‍यासाठी प्रत्‍येक शाळेची एक परिवहन समिती असेल आणि ही समिती, वाहनाची कागदपत्रे जसेः नोंदणी प्रमाणपत्र, योग्‍यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालविण्‍याचे लायसन, अग्निशामक, प्रथमोपचार पेटी इत्‍यादींची पडताळणी करील.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे शालेय व्‍यवस्‍थापन, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका किंवा नगरपरिषदेशी विचारविनिमय करुन, शाळेच्‍या वेळा आणि मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केवळ स्‍कूल बसकरिता यथोचित ठिकाणी वाहनतळ आणि वाहन थांबे विनिर्दिष्‍ट करील.
शाळेच्‍या मालकीच्‍या आणि मुलांची ने-आण करण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍याचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमान्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेल्‍या नमुना पी.एससी,सी.ओ.एस. नुसार असेल.
शाळेव्‍यतिरिक्‍त इतरांच्‍या मालकीच्‍या असलेल्‍या आणि शाळेचे कंत्राटी वाहन म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनांच्‍या संबंधात परवाना देणे आणि त्‍यांचे नूतनीकरण करणे याकरिता प्रत्‍येक अर्ज या नियमांन्‍वये अनुसूचीमध्‍ये विहित केलेलया नमुना पी.सीओ.एस.नुसार असेल.
परवान्‍यामध्‍ये समावेश केलेली वाहने आणि शाळेतील मुलांचे वाहन करण्‍याकरिता केवळ वापर करण्‍यात येणारी वाहने यांना पिवळा रंग देण्‍यात येईल आणि वाहनाच्‍या पुढच्‍या आणि मागच्‍या बाजूला स्‍कूल बस असे लिहिलेले शब्‍द दिसले पाहिजे. तसेच शाळेची ओळख पटण्‍याकरिता वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 150 मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असेल ज्‍यावर शाळेचे नाव लिहिलेले असेल.
शालेय कंत्राटाशिवाय अन्‍य कोणतेही कंत्राट असलेल्‍या वाहनांना पिवळा रंग आवश्‍यक असणार नाही. परंतु वाहनाच्‍या खिडकीखाली सर्व बाजूंना 400 मिलीमीटर पिवळ्या पट्टीने रंगविलेले असले पाहिजे. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणारे वाहन सुरुवातीच्‍या नोंदणीच्‍या दिनांकापासून 15 वर्षाहून अधिक जुनी असता कामा नये.
वाहनासोबत, ने-आण करणा-या शाळेतील मुलांची संपूर्ण यादी असेल ज्‍यामध्‍ये प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे नाव, वर्ग निवासाचा पत्‍ता, संपर्क दूरध्‍वनी किंवा भ्रमणध्‍वनी क्रमांक, रक्‍तगट आणि त्‍याचया किंवा तिच्‍या नावासमोर त्‍याला किंवा तिला चढण्‍याकरिता व उतरण्‍याकरिता थांबण्‍याचे ठिकाण त्‍याच्‍या किंवा तिच्‍या घराजवळील या गोष्‍टी नमूद केलेल्‍या असतील. यादीमध्‍ये मूळ ठिकाण, समाप्‍तीचे ठिकाण आणि वापरण्‍यात येणारा तपशीलवार मार्ग दाखवणारा शैक्षणिक संस्‍थेच्‍या मुख्‍य व्‍यक्‍तीकडून यथोचितरीत्‍या साक्षांकित केलेला मार्गदेखील नमूद केलेला असेल.
प्रत्‍येक स्‍कूल बसमध्‍ये चालकाव्‍यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 च्‍या नियम 249 मध्‍ये विहित केल्‍याप्रमाणे एक सहवर्ती असेल. तसेच मुलींची ने-आण करीत असलेलया स्‍कूल बसच्‍या बाबतीत, बसमध्‍ये स्‍त्री सहवर्ती उपस्थित असली पाहिजे जी स्‍कूल बसमध्‍ये प्रवास करणा-या मुलींच्‍या गरजांकउे लक्ष देईल आणि सकूल बसमधून चढताना किंवा उतरताना त्‍यांच्‍या सुरक्षेची खात्री घेईल आणि संपूर्ण प्रवासाच्‍या वेळी सर्वसामान्‍यपणे काळजीदेखील घेईल.
निकडीच्‍या प्रसंगी चालक आणि सहवर्ती शाळेच्‍या प्राधिका-यांना प्रसंगाची माहिती देतील आणि शाळेतील मुलांच्‍या सुरक्षेसाठी आवश्‍यक व्‍यवस्‍था करतील.
शिशुवर्गातील मुलांच्‍या बाबतीत जर अधिकृत व्‍यक्‍ती (शाळा आणि पालक यांनी परस्‍पर सहमतीने मान्‍यता दिलेली व्‍यक्‍ती) बस स्‍टॉपवर मुलाला घ्‍यायला आली नाही तर, त्‍या मुलाला पुन्‍हा शाळेत पाठविण्‍यात येईल आणि त्‍याच्‍या पालकांना बोलावून ते मूल त्‍यांना घेऊन जाण्‍यास सांगण्‍यात येईल.
चढण्‍याची खालची पायरी जमिनीपासून 220 मिलीमीटरपेक्षा अधिक उंचीची नसावी आणि सर्व पाय-या पाय न घसरणा-या असल्‍या पाहिजेत.
स्‍कूल बसमध्‍ये बहिर्वक्र भिंगाचा आरसा असला पाहिजे ज्‍यामुळे चालक मोटार वाहनाचा बाहेर पडण्‍याचा दरवाजा व प्रवेश दरवाजा आणि मागील भाग स्‍पष्‍ट बघू शकेल आणि चालकाला बसच्‍या आतील भागातील सर्व दृश्‍य स्‍पष्‍ट दिसू शकेल यासाठी मोठा पॅराबोलिक आरसा देखील असेल.
स्‍कूल बसमध्‍ये पुढील दरवाजाच्‍या पाय-यांसांबत हाताने धरता येणा-या कठड्याची तरतूद असली पाहिजे जिचा वापर दरवाजातून आत येणे आणि बाहेर पडणे यासाठी करण्‍यात येईल. हाताने धरता येणा-या कठड्याची उंची, धातू, रचना शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
सकूल बसमध्‍ये उभा दांडा (स्‍टॅन्चियन) असेल, प्रत्‍येक दांडा यथोचित अंतरावर असेल आणि तो छतामध्‍ये आणि तळपृष्‍ठाला घट्ट गुंतलेला असेल आणि वाहनाची जमीन न घसरणा-या धातूने बनवलेली असेल, ते धातू शासनाने जारी केलेल्‍या सर्वसाधारण निर्देशांप्रमाणे असेल.
स्‍कूल बसमध्‍ये कोणताही प्रेशर हॉर्न जोडलेला नसला पाहिजे किंवा कर्कश आवाज करणारे जे ब्रेक यंत्रणेमधून हवेच्‍या दाबाने नियंत्रित होत असेल असे अन्‍य कोणतेही साधन बसवलेले नसले पाहिजे.
स्‍कूल बसमध्‍ये वरील बाजू काचेची असलेली प्रथमोपचार पेटी आणि आ.एस.आय.मार्ग असेलेली प्रत्‍येकी 5 किलो क्षमतेची ए बी सी प्रकारची दोन अग्निशामके ठेवणे आवश्‍यक असेल त्‍यापेकी एक चालकाच्‍या केबीनमध्‍ये असेल आणि दुसरे मागे बसच्‍या आणीबाणीच्‍या दरवाजाच्‍या जवळ असेल. परंतु बारापर्यंत आसन क्षमता म्‍हणून नोंदणी असलेल्‍या हलक्‍या चार चाकी मोटार वाहनामध्‍ये आय.एस.आय.मार्क असलेली 5 किलो क्षमतेचे एबीसी प्रकारचे एक अग्निशामक पुरेसे असेल.
बसमध्‍ये आसनाखाली बँग ठेवण्‍याच्‍या रॅकची तरतूद असली पाहिजे आणि परिवहन आयुक्‍तांमार्फत त्‍यांच्‍या आदेशाने वेळोवेळी विनिर्दिष्‍ट केलेलया अशा इतर गोष्‍टींची तरतूद असली पाहिजे. अशा वाहनाच्‍या चालकाकडे 5 वर्षे वाहन चालविण्‍याचा अनुभव असला पाहिजे आणि तो परिवहन अनुज्ञप्‍तीधारक असला पाहिजे आणि स्‍कूल बस चालविण्‍याच्‍या सेवेत असताना वैध बिल्‍ला धारण करीत असला पाहिजे. स्‍कूल बसमध्‍ये धोक्‍याचे इशारे देणारी प्रकाशयोजना (लाईट) असल्‍या पाहिजेत ज्‍यामुळे जेव्‍हा मुले चढताना किंवा उतरताना असे वाहन थांबेल तेव्‍हा त्‍या चालू होतील.
शैक्षणिक संस्‍थेची बस आणि मध्‍यम किंवा जड प्रवासी मोआर वाहने शाळेतील विद्यार्थ्‍यांची ने-आण करण्‍याच्‍या प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत असतील त्‍या बाबतीत, खिडकीला 3 आडवे स्‍टीलचे दांडे बसच्‍या बाहेरील बाजूने जोडलेले असले पाहिजेत त्‍या कोणत्‍याही दोन दांड्यांमधील अंतर हे पाच सेंटीमीटरपेक्षा अधिक असणार नाही अशारीतीने ते जोडलेले असले पाहिजे. वाहनाला वेगनियंत्राक जोडलेले असले पाहिजे त्‍यामुहे महानगरपालिकेच्‍या हद्दीमध्‍ये वाहनाचा वेग 40 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही आणि महानगरपालिकाव्‍यतिरिक्‍त हद्दीमध्‍ये तो 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक असणार नाही.
वाहन शालेय प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत आहे ही वस्‍तुस्थिती दर्शविण्‍याकरिता वाहनाच्‍या पुढच्‍या व मागच्‍या बाजूस घट्टपणे चिकटवलेला 350 मिलीमीटर x 350 मिलीमीटर आकाराचा फलक असला पाहिजे. त्‍या फलकावर काळ्या रंगाच्‍या 250 मिलीमीटरपेक्षा कमी नसेल इतक्‍या उंचीच्‍या शाळेत जाणा-या दोन मुलांची (एक मुलगी व एक मुलगा) चित्रे रंगविलेली असली पाहिजेत. चित्रांच्‍या खाली काळ्या रंगांमध्‍ये स्‍कूल बस असे लिहिलेले असले पाहिजे आणि त्‍या अक्षरांची उंची किमान 100 मिलीमीटर इतकी असली पाहिजे आणि जाडी (रुंदी) किमान 11 मिलीमीटर इतकी असली पाहिजे.
आसनक्षमता बारापर्यंत असलेलया चार चाकी हलके मोटार वाहन याव्‍यतिरिक्‍त असलेलया प्रत्‍येक स्‍कूल बसवर शाळेची ओहख दर्शविणारा एक फलक दिसेल असा असावा ज्‍यावर मार्ग क्रमांक लिहिलेला असावा आणि तो फलक 30 इंच आकाराचा आणि 8 इंच उंचीचा असावा जो पुढे वरच्‍या बाजूस आणि मागे वरच्‍या बाजूस दिसेल असा असावा आणि प्रवेशव्‍दार /बोहर पडण्‍याच्‍या दरवाजावरील फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असावी.
शाळेतील मुलांची ने-आण करण्‍याकरिता वापरण्‍यात येणारे बारापर्यंत आसन क्षमता असलेले प्रत्‍येक चार चाकी हलके मोटार वाहन यावर शाळेची ओहख दर्शविण्‍यासाइी आणि वाहनाचा मार्ग क्रमांक ओळखता येण्‍यासाठी एक फलक असेल जो पुढील बाजूच्‍या वरच्‍या भागावर आणि मागच्‍या बाजूच्‍या वरच्‍या भागावर दिसेल. या फलकाची लांबी 18 इंचाच्‍या आकाराची आणि उंची 8 इंचाची असेल.
महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 20 च्‍या तरतुदींचे परवानाधारकाकडून तसेच चालकाकडून काटेकोरपणे पालन करण्‍यात येईल. स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या वाहनाची संपूर्ण स्‍टील बॉडीसह बंद स्‍वरुपाची बॉडी असेल. कोणत्‍याही कॅनव्‍हास हूड असलेलया वाहनास स्‍कूल बस म्‍हणून मान्‍यता देण्‍यात येणार नाही. वाहनामध्‍ये मुलांसाठी लॉक यंत्राणा जोडलेली असावी.
या प्रवर्गाखाली नोंदणी करण्‍यात आलेली वाहने ही मोटार वाहन अधिनियम 1988 व त्‍याखाली करण्‍यात आलेले नियम यांच्‍या तरतुदीनुसार योग्‍यतेच्‍या चाचणीच्‍या अधीन असतील. जेथे जेथे उपलब्‍ध असेल तेथे शाळेचे प्राधिकारी, शाळेतील मुलांना वाहनांमधून सुरक्षितपणे उतरण्‍यासाठी शाळेच्‍या परिवास्‍तूमध्‍ये जागेची तरतूद करतील. महाराष्‍ट्र मोटार वाहन नियम 1989 याच्‍या नियम 106 च्‍या तरतुदींनुसार स्‍कूल बसमध्‍ये परवानगी देण्‍यात आलेल्‍या मुलांची संख्‍या निर्धारित करण्‍यात येईल.
स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येणा-या बसमध्‍ये राज्‍य परिवहन प्राधिकरणाने वेहोवेळी विनिर्दिष्‍ट केलेले संकटकालीन बाहेर पडण्‍याचा दरवाजा किंवा बाहेर पउण्‍याची खिडकी जोडण्‍यात येईल. सर्व स्‍कूल बस, केंद्र सरकार वेळोवेळी विनिर्दिष्‍ट करेल त्‍याप्रमाणे बस बॉडी संकल्‍प चित्र आणि मान्‍यता एआयएस 063 आणि एआयएस 052 याकरिता व्‍यवसाय संहिता याव्‍दारे विहित केलेलया आवश्‍यकातांचे आणि विनिर्देशांचे अनुपालन करतील.
परिवहन आयुक्‍त, स्‍कूल बस म्‍हणून वापरण्‍यात येतील अशा सर्व वाहनांच्‍या प्रतिमानांना मान्‍यता देईल. तसे करताना, परिवहन आयुक्‍त, मुलांच्‍या सुरक्षा लक्षात घेऊन उत्‍पादकाने पुरविलेल्‍या सुरक्षाविषयक तरतुदींची खातरजमा करील. राज्‍य शासनास लेखी कारणे दिल्‍यानंतर एका किंवा त्‍यापैकी कोणत्‍याही शर्तीमधून स्‍कूल बस म्‍हणून नोंदणी झालेल्‍या वाहनांना सूट देता येईल.
शालेय बस संदर्भात जे नियम आहेत त्‍याचे पालन होते की नाही यासाठी शासनाने समिती बनविलेली आहे. राज्‍यात शाळेच्‍या मुलांची वाहतूक करणा-या एकूण 5688 बसेस आहेत. त्‍यापैकी सुरक्षा नियमांची पूर्तता करणा-या बसेसची संख्‍या 1780 आहे. नियमावली लागू झाल्‍यानंतर नोंदणी झालेल्‍या बसेसची संख्‍या 1215 इतकी आहे.
वर्धा जिल्‍ह्यात एकूण 36 बसेस शालेय मुलांची वाहतूक करतात पैकी 9 बसेसनी नियमांची पूर्तता केली आहे. परिवहन विभागातर्फे याबाबत सातत्‍याने पाठपूरावा होत आहे तथापि शाळेतील समित्‍या आणि सर्व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका ठेवण्‍याची गरज आहे.
विजय चव्‍हाण
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वर्धा

Sunday, 1 January 2012

प्रमोद नलावडे माहिती महासंचालक पदी रुजू

शनिवार, ३१ डिसेंबर, २०११
प्रमोद नलावडे (भा.प्र.से.) यांनी शनिवारी माहिती महासंचालक पदाचा कार्यभार प्रभारी महासंचालक राजेश अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला. श्री.नलावडे हे १९९६ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील असून ते यापूर्वी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा या विभागात सह सचिव या पदावर कार्यरत होते.

श्री.नलावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग, विक्रीकर सह आयुक्त नरिमन पॉईंट विभाग, विक्रीकर सह आयुक्त अन्वेषण विभाग, अपर विक्रीकर आयुक्त (आस्थापना) महाराष्ट्र राज्य अशा विविध पदावर उल्लेखनीय काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

Saturday, 31 December 2011

माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी पी.टी.नलावडे


             मुंबई दि. 31:  भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागात सह सचिव पदावर कार्यरत असलेल्या पी.टी.नलावडे यांची  माहिती जनसंपर्क महासंचालक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
            सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आज नियुक्तीचे हे आदेश निर्गमित करण्यात आले.
            याव्यतिरिक्त झालेल्या नियुक्त्या अशा आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद याठिकाणी कार्यरत असलेल्या आर.एन.शिनगारे यांची नियुक्ती  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर येथे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक येथील डी.आर.बन्सोड यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे, गोंदियाचे जिल्हाधिकारी ए.के.झाडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई येथे, वाशिम चे जिल्हाधिकारी यु.एस.राठोड यांची नियुक्ती महासंचालक, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, अमरावती येथे तर ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त पी.डी.करवंदे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय  संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी रत्नागिरी एम.बी.गायकवाड यांची नियुक्ती संचालक, माहिती व तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई येथे पदोन्नतीने करण्यात आली आहे, (अधिकालिक वेतनश्रेणीत पद उन्नत करुन)  नियोजन विभागाच्या सहसचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांची  संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग महसूल वन विभाग  पदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण रस्‍ते सुरक्षा पंधरवड्याचे आज वर्धेत उदघाटन


      वर्धा,दि.31- दरवर्षीप्रमाणे 1 ते 15 जानेवारी दरम्‍यानच्‍या कालावधीत रस्‍ता सुरक्षा पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून, याचे उदघाटन उद्या दि. 1 जानेवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजता बजाज चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखेच्‍या मैदानात होत आहे.
     23 वा रस्‍ता सुरक्षा सप्‍ताहाचे उदघाटन के.आर.बजाज उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व  अविनाश कुमार पोलीस अधिक्षक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तसेच विजय खोराटे मुख्‍याधिकारी नगर परिषद , लक्ष्‍मीनाराण सोनवणे शिक्षणाधिकारी यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होणार आहे.
     उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी ही माहिती दिली. हे पंधरवड्याचे 23 वे वर्ष आहे. अॅक्‍सीडेन्‍ट ब्रिंग टिअर्स सेफ्टी ब्रिंग्‍ज चिअर अर्थात अपघात अश्रुंचे कारण, सुरक्षा सुखाचे कोंदण असे या वेळेचे ब्रीदवाक्‍य आहे.
     या पंधवड्यातील कार्यक्रम असे राहणार आहेत.
    दि. 1 जानेवारी 2012 रेाजी रस्‍ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन, दि. 2 जानेवारी रोजी वाहनांना व बैलगाडयांना रिफ्लेक्‍टर टेप लावणे, दि.3 जानेवारी रोजी वाहन चालकांची नेत्र तपासणी, 4 जानेवारी रोजी मोटार वाहन चालक, स्‍कूलबस चालक प्रशिक्षण व पार्कींग व रहदारी नियमाविषयी प्रबोधन, दि. 5 जानेवारी  विद्यार्थ्‍यांचे रस्‍ता सुरक्षा विषयी वत्‍कृत्‍व, चित्रकला व निबंध स्‍पर्धा, दि. 6 जानेवारी रोजी वाहन चालक व पोलीस कर्मचारी यांचेकरीता धोकादायक रसायन हाताळणी संबंधी प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण,दि.7 जानेवारी टोलनाक्‍यावर माहिती पुस्‍तीकेचे वाटप तसेच सिनेमा केबलवर स्‍लाईड शो, दि. 8 जानेवारी 2012 रोजी सार्वजनिक बांधकाम  विभागासोबत ब्‍लॅकस्‍पॉटची दुरुस्‍ती करणे व तुटलेले दुभाजक दुरुस्‍ती करणे, दि. 9 जानेवारी टि.व्‍ही.चॅनल, रेडिओवर परिसंवाद कार्यक्रम तसेच सिनेमा टॉकिजमध्‍ये स्‍लाईड शो दाखविणे, दि. 10 जानेवारी आर.एस.पी. रॅली ऑडीओ, व्हिडीओ प्रदर्शन व विद्यार्थ्‍यांना वाहतुक नियमांची माहिती व प्रशिक्षण, दि.11 जानेवारी  चौका-चौकात झेब्राक्रॉसींग पादचारी व जनतेला माहिती देणे तसेच चौकात बोर्ड लावणे, दि. 12 जानेवारी  पत्रके वाटप व चालकाची जनजागृती,    दि. 13 जानेवारी वाहन चालक, पेालीस व वाहतुक कर्मचारी यांना प्रथमोपचार प्रशिक्षण मार्गदर्शक डॉ. मोहन अडयाळकर, दि. 14 जानेवारी रस्‍ता सुरक्षा अभियान संबंधी सेमिनार,आणि दि. 15 जानेवारी 2012 रोजी समारोप कार्यक्रम होईल.

सोमवार 2 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


    वर्धा, दि.31 – सोमवार दि. 2 जानेवारी 2012 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय वर्धा येथे नेहमी प्रमाणे महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी होणारा लोकशाही दिन होईल. मागील महिन्‍यात नगरपालिका /नगर परिषद निवडणूक आदर्श आचारसंहिता असल्‍याने लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला होता.
      आचारसंहिता आता संपली आहे त्‍यामुळे सोमवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता लोकशाही दिन होईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हाधिकारी कार्यालयाव्‍दारे कळविण्‍यात  आले आहे.

ग्रामबिजोत्‍पादनांत सहभागी शेतक-याची कार्यशाळा


   वर्धा,दि.31-विकास भवन वर्धा येथे नुकतेच (दि.22 डिसे.) विविध योजने अंतर्गत राबविण्‍यांत येणा-या ग्रामविजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेणा-या शेतक-यांची कार्यशाळा जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यांत आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्‍याकरीता कृषि विज्ञान केंद्र सेलसुरा येथील डॉ. नेमाडे, जिल्‍हा बिज प्रमाणिकरण यंत्रणा वर्धा चे गावंडे उपस्थित होते

      प्रथम गावंडे यांनी बियाणे कायदा 1966 नुसार ग्रामबिजोत्‍पादनाच्‍या सर्व कायदेशीर बाबी समजावुन सांगीतल्‍या व ग्रामबिजोत्‍पादक शेतक-यांनी कार्यक्रमात भाग घेण्‍यासाठी काय कार्य करावयास पाहिजे याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ. नेमाडे यांनी ग्रामबिजोत्‍पादन घेताना शेतक-यांनी कोणकोणत्‍या तांत्रिक बाबी लक्षात घ्‍यावयास पाहिजे यावर सविस्‍तर मार्गदर्शन केले.

      भाऊसाहेब ब-हाटे यांनी शेवटी कृषि विभागामार्फत ग्रामबिजोत्‍पादक    शेतक-यांना रुपये 1000 प्रति क्विंटल बियाणे उत्‍पादनावर अनुदान देत असल्‍याचे व सन 2011-12 मध्‍ये प्रायोगिक तत्‍वावर कडधान्‍य पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन अंतर्गत उत्‍पादन झालेल्‍या  बियाण्‍याला बियाणे शेतक-यांना विक्री केल्‍यानंतर प्रति क्विंटल रुपये 1200 विक्री अनुदान देण्‍यात येणार असल्‍याचे विषद केले. तसेच जिल्‍ह्यात ग्रामबिजोत्‍पादना अंतर्गत कार्यरत पाच गटांना बियाणे प्रक्रीया युनिट 50 टक्‍के अनुदानावर देण्‍याचे नियेाजन असल्‍याचे सांगीतले.

     कार्यशाळेला 80 ग्रामबिजोत्‍पादक व 50 अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत 27 शेतक-यांना ग्रामबिजोत्‍पादनासाठी रुपये 95 लक्ष 8 हजार रुपयाचे वाटप करण्‍यात आले. कार्यशाळेत सन 2010-11 वर्षात  हरबरा पिकाचे ग्रामबिजोत्‍पादन कार्यक्रमात भाग घेतलेल्‍या शेतक-यांना अनुदानाचे धनादेशाचे वाटप भाऊसाहेब ब-हाटे यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यशाळेचे संचालन धर्माधिकारी यांनी केले.

Friday, 30 December 2011

योजनांची माहिती देणारे चित्ररुपी भिंतीपत्रकाचे उदघाटन जिल्‍हाधिका-यांचे हस्‍ते संपन्‍न


     वर्धा, दि.30- कृषि विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची आढावा बैठक  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आले. सदर बैठकीचे औचित्‍य साधून कृषि विभागामार्फत समुह व गट शेतीसाठी   शेतक-यांना होणारे फायदे व विविध योजनांची  माहिती देणारे चित्रारुपी पोष्‍टर तयार करण्‍यात  आले. या पोष्‍टरचे उदघाटन जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी नुकतेच केले.    
     सामुहिक शेती करण्‍यासाठी पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये गटामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी सभासद स्‍वतः शेतकरी असावा. गटाची नोंदणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कार्यालयात आत्‍मा संस्‍थेकडे रु. 500 भरुन करावी लागेल. गटामध्‍ये साधारण 10 ते 15 सभासद असावे. शेतकरी गट हा एकच शेती विषयक कार्यक्रम घेणारा असावा. गटातील शेतकरी एकाच गावातील व एकाच आर्थिक स्‍तरावरचे असावे. गटाचे नावे बँकेत स्‍वतंत्रा खाते उघडावे लागेल. त्‍यात दर महिण्‍यात होणारी बचत जमा करावी लागेल व  गटाचे नियमित बैठका घेणे बंधनकारक राहील.
     सामुहीक शेतीचे शेतक-यांसाठी फायदे पुढील प्रमाणे असून त्‍यामध्‍ये  गटात शासनाचया योजनांचा लाभ प्राधान्‍याने धेता येईल. गटातील सदस्‍यांना  शेतीसाठी लागणा-या बि, बियाणे, खते, औषधी, इत्‍यादी स्‍वस्‍त दारात उपलब्‍ध होवू शकतील. गटातील सदस्‍यांनी शेतमालाचे संघटीतरीत्‍या  विक्री केल्‍यास मालाला चांगला भाव मिळेल. गटाच्‍या माध्‍यमातून कृषि मालावर प्रक्रीया केल्‍यास शेतमालाचे मुल्‍य  वाढ होवून शेतक-यांना जास्‍तीचा नफा मिळेल. गटातील सदस्‍या कडून दरमहा बचत केल्‍यामुळे गटाजवळ निधी उपलब्‍ध राहील व त्‍या निधीतून गटातील सदस्‍यांना व तातडीच्‍या कामासाठी तात्‍काळ कर्ज मिळू शकेल.

     राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत पॉवर ऑपररेड मशीनमध्‍ये रोटावेटर खरेदीच्‍या 50 टक्‍के अनुदान 60 हजार रुपये चा चेक नंदकिशोर तोटे यांना जिल्‍हाधिकारी यांचे हस्‍ते देण्‍यात आला. कृषि विभागामार्फत राबविल्‍या जाणा-या आत्‍मा,राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान, पाणलोट प्रकल्‍प, आय.आर.डी.एफ प्रकल्‍पाचा अध्‍यक्षाच्‍या व सदस्‍याच्‍या समवेत आढावा घेण्‍यात आला व विविध घटकाच्‍या बाबीवर चर्चा करण्‍यात आली. असे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा कळवितात.