Friday, 30 December 2011

मुलां-मुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका - डॉ. थोरात

     वर्धा,दि.30-अनेक क्षेत्रांत मुलिंनी नेत्रपदक शिखरे पदक्रांत केली असून मुलिंना मुलासारखे समान अधिकार शासनाने प्रदान केले आहे. अद्यापही प्रसवपूर्व स्त्रिभ्रृन हत्‍येचे प्रमाण वाढलेले असून दर हजारी मुलींचे प्रमाण घटत होत आहे. ही बाब समाजासाठी चिंतेची असून ती दूर करण्‍यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राच्‍या गैर प्रकाराला आळा घालून मुलांमुलिंमध्‍ये भेदाभेद करु नका असे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या माजी उपसंचालक डॉ. पुष्‍पा थोरात यांनी केले.

      जिल्‍हा समान्‍य रुग्‍णालयाच्‍या सभागृहांत प्रसवपूर्व निदान तंत्र व गर्भधारण पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र या विषयी समुचित प्राधिकरण संबधित अधिका-यांसाठी कार्यशाळा संपन्‍न झाली त्‍याप्रंसगी त्‍या बोलत होत्‍या.
     यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक रत्‍ना रावखंडे, नागपूरचे डॉ. शिवकुमार चव्‍हाण , अतिरीक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सोमलकर व डॉ. शर्मा मंचावर उपस्थित होते.
     ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात मुलांच्‍या प्रमाणात वाढ झाली असल्‍याचे सांगून डॉ. थोरात म्‍हणाले की गेल्‍या काही वर्षात अनेक भागामध्‍ये प्रसवपूर्व निदान करणा-या केंद्राची वाढ झाली असून त्‍यातील काही केंद्रे गर्भ चिकित्‍सा करण्‍यासाठी निदान तंत्राचा गैरवापर करतात. त्‍यामुळे मुलिंच्‍या प्रमाणात घट होताना दिसत आहे. वास्‍तविक गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्‍हा समजण्‍यात येतो. अशा प्रवृत्‍ती टाळण्‍यासाठी स्‍वंयंसेवी संस्‍थे सोबत आता समुचित प्राधिका-यांना व संबधित अधिका-यांना प्रसवपूर्व निदान केंद्राची तपासणी करण्‍याचे अधिकार दिले आहे यामध्‍ये दोषींवर गुन्‍हा  नोंदवून कार्यवाही सुध्‍दा होऊ शकते. यावेळी त्‍यांनी विस्‍ताराने  नियमनाचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
     यावेळी बोलताना डॉ. चव्‍हाण म्‍हणाले की विकृत स्‍वरुपाचे बाळ, मतीमंद व इतर असाध्‍य आजाराचे बाळ जन्‍माला येऊ नये यासाठी प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर या चांगल्‍या कामासाइी होऊ शकतो. मात्र अलिकडे स्त्रिभृण हत्‍यासाठी या तंत्राचा गैरवापर होत आहे. त्‍यामुळे भविष्‍यात समाजस्‍वास्‍थावर विपरीत परिणाम होऊ शकते असेही ते म्‍हणाले.
    प्रास्‍ताविक करताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. रावखंडे म्‍हणाले की 2001 च्‍या जनगननेनुसार महाराष्‍ट्रात दर हजारी पुरुषांमागे 922 असे सित्रायांचे प्रमाण आहे. तर जिल्‍ह्यामध्‍ये 928 व 2011 च्‍या जनगणने प्रमाणे स्त्रियांचे प्रमाण 916 असे घटते प्रमाण  आहे. यावेळी त्‍यांनी पी.एन.डी.टी. कायदा व नियमाच्‍या तरतूदी, संस्‍थाची नोंदणी, डॉक्‍टर व केंद्रधारकावर बंधने, नियंत्रण व पर्यवेक्षण कार्यप्रणाली, लोक जागृतीचे कार्य, समुचित जिल्‍हा व तालुका पातळीवरील प्राधिकरणाचे अधिकार, कायद्यातील तरतुदींचा भंग केल्‍यास गुन्‍ह्याचे स्‍वरुप, गर्भधारणापूर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र अधिनियिम 2003 च्‍या तरतूदी व दक्षता पथकाची माहिती तपशिलाने त्‍यांनी यावेळी दिली.
     कार्यशाळेचे संचलन डॉ. शर्मा यांनी व आभार डॉ. रवि धकाते यांनी केले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.  

शेती भावाचे अंदाजपत्रका विषयी कार्यशाळा


     वर्धा, दि. 30- विकास भवन वर्धा येथे दि. 22 डिसेंबर 2011 रोजी कृषि अर्थशास्‍त्र  व सांख्यिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे संयुक्‍त विद्यमाने जिल्‍ह्यात कार्यरत जिल्‍हा कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांकरीता शेतक-यांना शेती भावाचे अंदाजबाबत जागृती या विषयावर कार्यशाळा आयेाजीत केली होती.
     कार्यशाळेत डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्‍यापक ए.एस.टिंगरे यांनी पिकाचे पेरणीपूर्वी व पिकाचे काढणीपूर्वी  प्रत्‍येक शेत मालाचे भावाचा अंदाज कसा काढण्‍यात येतो याबाबत सविस्‍तर माहिती दिली व काढलेल्‍या  अंदाजीत भावाची माहिती विद्यापीठामार्फत सर्व दैनिक वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द करत असल्‍याचे सांगीतले. विद्यापीठामार्फत जाहीर होणारे पुढील 5-6 महिन्‍याचे अंदाजीत भाव काढण्‍याचे काम मागील 4 वर्षापासून सुरु असून विद्यापीठाने वर्तविलेले अंदाजे भाव व प्रत्‍यक्ष त्‍या -त्‍या महिन्‍यात  असलेले बाजारभाव जवळपास 90 टक्‍के बरोबर येत असल्‍यामुळे विद्यापीठाकडून जाहीर होणारे पूर्व अंदाजीत भावाचे भरवशावर शेतक-यांनी शेतमाल केव्‍हा विकावा म्‍हणजे मालाला जास्‍तीत जास्‍त भाव मिळेल याची माहिती कृषि विभागामार्फत शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यात यावे असे आवाहन केले.
     या कार्यशाळेत जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, भाऊसाहेब ब-हाटे यांनी सांगितले की विद्यापिठाने प्रत्‍येक अंदाजाचे वेळी शेतकी विभागचे ई-मेल वर माहिती टाकल्‍यास विभगामार्फत अंदाजीत भाव शेतक-यापर्यंत पोहचविण्‍याचे काम कृषि विभागामार्फत करण्‍यात येईल.
     कार्यशाळेला कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, 29 December 2011

विहिरी वर पंप बसविण्‍याच्‍या योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन


    वर्धा,दि.28- कृषि विभाग जिल्‍हा परिषद वर्धा मार्फत अनु.जाती व नवबौध्‍द शेतक-यांचे शासकीय योजने अंतर्गत तसेच खाजगी सिंचन विहीरीवर विद्युत कनेक्‍शन व विद्युत पंप 100% अनुदानावर वाटपाच्‍या  योजनेस मंजुरी मिळाली असुन, सदर योजना मार्च 2012 पर्यत पुर्ण करावयाचे आहे. त्‍या करिता अनुदानाची मर्यादा रु 50,000/- आहे.
या योजने करिता पात्र लाभार्थी निवडीचा प्राधान्‍य क्रमानूसार रोजगार हमी योजना अंतर्गत जवाहर विहिरी, रोजगार हमी योजना म.ग्रा.रो.ह.यो. तसेच अनु.जाती/नवबौध्‍द शेतक-यांना विहिर पुर्ण बांधुन देण्‍यात आलेली आहे व विहिरीस पुरेशे पाणी आहे. असे लाभार्थी (ज्‍यात महिला लाभार्थींना प्रथम प्राधान्‍य) कृषि विभागामार्फत अनु.जाती उपयोजना अंतर्गत बांधुन दिलेल्‍या विहिरी. अनुसूचित जातीच्‍या खाजगी मालकीची विहिरी. विदर्भ विभागातील शेतकरी पॅकेज अंतर्गत बांधण्‍यात आलेल्‍या विहिरी यांचा समावेश आहे.
 योजनेचा लाभ घेवु इच्‍छीणा-या शेतक-यांनी तालुक्‍यातील पंचायत समितीच्‍या कृषि विभागाशी संपर्क साधावा व आवश्‍यक कागदपत्राची पुर्तता करुन घ्‍यावी, असे आवाहन कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी केले आहे.

वर्धेत तीन दिवसीय ग्रंथोत्‍सवाचे आयोजन


वर्धा,दि.28-महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ आणि जिल्‍हा माहिती कार्यालय वर्धा याचे वतीने दिनांक 12, 13, 14 जानेवारी 2012 रोजी ग्रंथोत्‍सवाचे आयोजन होणार आहे.
     या ग्रंथोत्‍सवात नामांकिंत कवि व लेखक सहभागी होणार असून, ग्रंथोत्‍सवाची समिती नुकतीच स्‍थापन करण्‍यात आली आहे. या समिती चे अध्‍यक्ष जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर असून, सचिव म्‍हणून जिल्‍हा ग्रंथपाल सुरज मडावी राहणार आहे. या समितीचे समन्‍वयक म्‍हणून मिलींद आवळे यांची नियुक्‍ती करण्‍यांत आली आहे.
आयोजन समितीचे सदस्‍य म्‍हणून प्रगतीशिल लेखक संघाचे अध्‍यक्ष राजेद्र मुंडे, विदर्भ साहित्‍य संघ शाखा वर्धाचे अध्‍यक्ष संजय इंगळे तिगांवकर, वर्धा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्‍यक्ष प्रविण धोपटे, यशवंतराव दाते स्‍मृती संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदिप दाते समन्‍वय संस्‍थेचे प्रा. शेख हाशम, साहित्‍यीक डॉ. प्रविण वानखेडे, साहित्‍यीक प्रा.नवनीत देशमुख, साहित्‍यीक डॉ. किशोर सानप, महात्‍मा गांधी विद्यालय वर्धेचे प्राचार्य पद्माकर बाविस्‍कर, कस्‍तुरबा कला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य स्मिता वानखेडे
नियंत्रित सदस्‍य म्‍हणून निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले व जि.प.चे शिक्षणाधिकारी लक्ष्‍मीकांत सोनवणे यांचा या समितीमध्‍ये समावेश करण्‍यांत आला आहे. असे जिल्‍हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर कळवितात.

Tuesday, 27 December 2011

वर्धा जिल्‍ह्यात 37(1) आणि (3) कलम लागू



   वर्धा, दि.27- वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या  अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 लागू केले आहे.
     या कलमाचा अंमल दि. 10 जानेवारी 2012 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                          00000

संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानावर आतापावेतो 64 टक्‍के खर्च - शेखर चन्‍ने


    वर्धा,दि.27-जिल्‍ह्यात संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्‍यात येत असून, या अभियानावर आतापर्यंत 64.27 टक्‍के खर्च करण्‍यात आला असल्‍याची माहिती जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
     जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍या कक्षामध्‍ये संपूर्ण स्‍वच्‍छता अभियान कार्यक्रम आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प  अधिकारी बी.एम.मोहन, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

     संपूर्ण स्‍वच्छता अभियाना अंतर्गत केंद्र शासनाने वर्धा जिल्‍ह्याकरीता एकूण 22 कोटी 70 लक्ष 99 हजार रुपयाच्‍या प्रकल्‍पास मंजूरी प्रदान केली होती त्‍यापैकी 15 कोटी 18 लक्ष रुपये आतापावेतो प्राप्‍त झाले आहे. 14 कोटी 39 लक्ष 34 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाला असून, या खर्चामध्‍ये वैयक्तिक शौचालय, शालेय स्‍वच्‍छता गृह, आंगणवाडी स्‍वच्‍छता गृह, सार्वजनिक स्‍वच्‍छता गृह, घनकचरा व द्रव्‍य व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन / विक्री केंद्र, प्रशासकीय व इतर अनुशांगिक खर्चाचा समावेश आहे. या खर्चाची टक्‍केवारी 64.27 आहे. असे यावेळी सांगण्‍यात आले.

     या आढावा बैठकीत संपूर्ण जिल्‍ह्यात जनजागृती अभियाना अंतर्गत 47 लक्ष 55 हजार रुपयांच्‍या खर्चाला मंजूरी, संगणक खरेदीला मंजूरी, वाहन भाडे तत्‍वावर घेण्‍यास मंजूरी, एल.सी.डी. प्रोजेक्‍टरच्‍या दुरुस्‍तीला मंजूरी प्रदान केली.

     याप्रसंगी संपूर्ण स्‍वच्‍छता अभियाना अंतर्गत कार्यकरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, 26 December 2011

2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष रुपयाच्‍या प्रारुप आराखड्यास मंजूरी- राजेंद्र मुळक


     वर्धा,दि.26- येथील विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. यावेळी 2012-13 या वित्‍तीय वर्षासाठी  कमाल आर्थिक मर्यादेत राहून, जिल्‍हा नियोजन समितीने 118 कोटी 33 लक्ष रुपये खर्चाच्‍या आराखड्यास मंजूरी प्रदान करण्‍यात आली असल्‍याची माहिती वित्‍त व नियोजन तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
     यावेळी मंचावर खासदार दत्‍ताजी मेघे, पाणी पुरवठा राज्‍यमंत्री रणजित कांबळे, आमदार दादाराव केचे, आमदार अशोक शिंदे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने उपस्थित होते.
     जिल्‍हा वार्षीक योजनेच्‍या आराखड्याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री मुळक म्‍हणाले की 2012-13 च्‍या पुढील वित्‍तीय वर्षासाठी 118 कोटी 33 लक्ष     16 हजार रुपये खर्चाच्‍या आराखड्यास  मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये सर्वसाधारण योजने मध्‍ये 69 कोटी 12 लक्ष आदिवासी उपयोजने मध्‍ये 20 कोटी 50 लक्ष 16 हजार व अनुसूचित उपयोजनेमध्‍ये 28 कोटी 71 लक्ष रुपयाचा समावेश आहे. सर्वसाधारण योजनेमध्‍ये अंमलबजावणी करणा-या अधिका-यांनी 107 कोटी 57 लक्ष 46 हजार, आदिवासी उपयोजनेसाठी 34 कोटी 10 लक्ष 24 हजार व अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 27 कोटी 71 लक्ष रुपयाची मागणी केली होती. त्‍यापैकी वरील प्रमाणे कमाल आर्थिक मर्यादेत राहून यातील अतिरीक्‍त मागणी 52 कोटी 72 लक्ष 56 हजाराची नोंद करण्‍यात आली आहे. असल्‍याने ही मागणी राज्‍य स्‍तरावरील बैठकीत आवश्‍यक त्‍या कारणासह चर्चा करण्‍यात येईल.
     सर्वसाधारण योजने अंतर्गत कृषि व संलग्‍न  सेवेसाठी प्रस्‍तावित अनुदान  9 कोटी 63 लक्ष 30 हजार असून कमाल आर्थिक मर्यादेत 8 कोटी 20 लक्ष 80 हजार मंजूरीसाठी पात्र ठरविण्‍यात आले. अरिीक्‍त मागणी 1 कोटी 42 लक्ष 50 हजार आहे. ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत 17 कोटी 38 लक्ष 36 हजार रक्‍कम प्रस्‍तावित केली असून कमाल आर्थिक मर्यादेत 11 कोटी 88 लक्ष  36 हजाराला मंजूरी प्रदान करण्‍यात आली. उर्वरीत 5 कोटी 50 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी प्रस्‍तावित आहे. पाटबंधारे या शिर्षकाअंतर्गत 7 कोटी 45 लक्ष 30 हजार प्रस्‍तावित करण्‍यात आले असून, कमाल मर्यादेनुसार 3 कोटी 47 लक्ष 80 हजार रकमेला
मंजूरी प्रदान करण्‍यात आली तर 3 कोटी 97 लक्ष 50 हजार रुपयाची अतिरीक्‍त मागणी करण्‍यात आली आहे. विद्यूत विकास वितरण कार्यक्रमा अंतर्गत अंमलबजावणी अधिका-यांनी    5 कोटीची मागणी केली असून, कमाल मर्यादे अंतर्गत 2 कोटीची मागणी मंजूर करण्‍यात आली. उर्वरीत 3 कोटीची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यता आली आहे. उद्योग विकासा अंतर्गत 50 लक्ष रुपयांची मागणी करण्‍यात आली असून कमाल मर्यादेत 45 लक्ष रुपये मंजूर करण्‍यात आले. उर्वरीत 5 लक्ष रुपयाची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली. वाहतूक व दळणवळणासाठी 25 कोटी 75 लक्ष रुपये प्रस्‍तावित करण्‍यता आले त्‍यापेकी कमाल आर्थिक मर्यादे अंतर्गत 14 कोटी 62 लक्ष 66 हजार रुपये मंजूर करण्‍यात आले असून, 11 कोटी 12 लक्ष 34 हजार रुपये अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आली आहे. सर्वसाधारण आर्थिक सेवा योजने अंतर्गत 7 कोटी 52 लक्ष 59 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले  त्‍यापैकी 7 कोटी 22 लक्ष 95 हजार रुपये  नियतव्‍यय मंजूर करण्‍यता आला असून, 29 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे. सामाजिक व सामुहिक सेवा अंतर्गत 34 कोटी 32 लक्ष 99 हजार रुपये प्रस्‍तावित करण्‍यात आले होते. त्‍यापैकी  21 कोटी 24 लक्ष 43 हजार रुपयाला मंजूरी प्रदान करण्‍यात आली असून, विकास कामावर एकूण  12 कोटी 95 लक्ष 56 हजाराची अतिरीक्‍त मागणी नोंदविण्‍यात आली आहे.
जिल्‍ह्यातील विकास कामांची प्रगती समाधानकारक असून, चालू वर्षामध्‍ये आतापर्यंत सर्वसाधारण योजनेवर 27 कोटी 69 लक्ष 26 हजार रुपये , अनुसूचित जाती उपयोजनेवर 4 कोटी 32 लक्ष 57 हजार व आदिवासवी उपाययोजनेवर     8 कोटी 41 लक्ष 90 हजार रुपये खर्च झालेला असून, 64 प्रतिशत खर्च झालेला आहे.
पुढील आर्थिक वर्षामध्‍ये नाविण्‍यपूर्ण योजना प्रस्‍तावित असून यामध्‍ये  तिर्थक्षेत्राचा विकास, नविन आरोग्‍य केंद्राचा समावेश आहे. यावेळी खर्चाच्‍या पूर्नविनीयोजनाला मंजूरी प्रदान करण्‍यता आली. यावेळी 2011-12 मध्‍ये झालेल्‍या आतापावेतो खर्चाचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.
यावेळी खासदार दत्‍ताजी मेघे, राज्‍यमंत्री  रणजित कांबळे व इतर जिल्‍हा नियोजन समितीच्‍या सदस्‍यांनी चर्चेत भाग घेवून समसयांचे निराकरण केले . तसेच त्‍यांनी उपयुक्‍त सुचना सभागृहात सादर केल्‍या.
यावेळी जिल्‍हा नियेाजन समितीचे सदस्‍य, विभाग प्रमुख मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.