वर्धा,दि.22-शासन व ग्राहक चळवळीतील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जयश्री भोज असून, प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष आर.बी.सोमानी, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.ए.अनभोरे, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, तसेच प्रमुख वक्ते म्हणून नागपूर विद्यापिठाचे विधी शाखा अधिष्ठाता अशोक पावडे, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे विदर्भ शाखेचे सचिव अजय भोयर हे मार्गदर्शन करणार आहेत.
या काकर्यक्रमास बहुसंख्येने जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार सुशांत बनसोडे, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष उशा फाले आणि तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिवचरण मिश्रा यांनी केले आहे.
00000

